Posts

Showing posts from January, 2025

अहिल्यानगर च्या 912 कोटी 78 लक्ष प्रारुप आराखड्यास मान्यता

Image
नगर जिल्ह्याच्या ९१२  कोटी ७८ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता -राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत  १४४ कोटी  रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत  ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष  रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस आमदार शिवाजी गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ.किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते,  हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,  जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते. एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी १७५ कोटी ७२ लक्ष २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. वित्त व नियोजन...

पद व खुर्ची कायम नाही

Image
पद व खुर्ची कायम नसते  असे म्हणतात ते काय खोटे नाही एखादे सर्वोच्च पद तुम्ही लाड्या लबाडी करून मिळवु शकता मात्र तुम्ही जर त्या पदाचा दुर उपोयोग करीत असाल तर निती तुमचा बदला घेतल्या शिवाय राहत नाही अनेक व्यक्ती सत्ता आल्यावर उर्मट वागतात लोकांना गुलाम म्हणून वागणुक देतात आपल्या सहकाऱ्यांना आपमानाची वागणुक देतात अनितीच्या मार्गाने संपत्ती कमवतात कागदावर वजन ठेवल्या शिवाय कगद पुढे सरकवत नाहीत  सत्ता व पदावरून समाज विकास करायचा असतो हे विसरुन जातात  लाचार व पाय चाटे व लोडा घोळणारे असतात दिमतीला पदाचा माजोरा व उर्मट पना जास्त काळ टिकत नसतो काही लोकांच कोणीच नसत म्हणुन ते आधार म्हणून तुमच्या कडे येत असतात मात्र तुम्ही त्यांच्या परिस्थितीची गैर फायदा घेऊन त्यांना त्रास देत असाल तर एक दिवस तुमच्यावर ही वेळ आहेत  तुम्हाला लोक मान देतात तुम्ही असलेल्या पदावर मात्र तुम्ही पुर्ण सेवा काल जावा असे वाटत असेल तर योग्य व चांगले काम करा चांगले काम केले तर निवांत झोप येते नाहीतर झोपे बरोबर इतर कार्या साठी गोळ्या घ्याव्या लागतात अण गोळ्याचा ढोस जास्तीचा झाला की तुम्ही मातीत...

कुलगुरू प्रशांत पाटील याचे निधन

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठचे विद्यमान कुलगुरू प्रशांत गुलाब पाटील यांचे दुःख निधन  त्याच्यावर मुळ गावी कवठे एकंद ता-तासगाव जि सांगली येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 

पल्लवी प्रकाश सोनी यांचे दुःख निधन

Image
पल्लवी सोनी यांचे दुःख निधन  राहुरी फॅक्टरी येथील आर्दश नागरी पतसंस्थेच्या संचालिका पल्लवी प्रकाश सोनी यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःख निधन  येथील व्यावसायिक प्रकाश सोनी यांच्या पल्वली पत्नी होत.  नाशिक येथील पल्लवी यांचा विवाह प्रकाश यांच्या समवेत झाला पल्लवी यांना कॅन्सर जडला होता मुंबई येथे कॅन्सर आटोक्यात आला मात्र काही दिवसांपासून त्या आजारी होत्या पुण्यात रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र सोमवरी 27 जानेवरी रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला  दुपारी 3 वाजता प्रसादनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.  पल्लवी यांच्या  अकस्मात जाण्याने प्रकाश यांच्या  जीवनात अंधार झाला  पल्लवी यांना कोरोना लागण झाली होती  उपचार ही झाले मात्र काही दिवसानंतर कॅन्सर झाला औषधोपचार कॅन्सर बरा झाला मात्र काळाने डाव साधला पल्लवी यांची शेवटपर्यंत ची झुंज अखेरची ठरली 

महाराष्ट्र 14 पद्म पुरस्काराचे मानकरी

Image
महाराष्ट्र14 पद्म पुरस्काराचे मानकरी  दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म भूषण            11 मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर    देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  महाराष्ट्रातून  दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी व  गजल गायक पंकज उधास  यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.    केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.    सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी  दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास  आणि  चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना  पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 11 मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर...

महाराष्ट्रातील 49 जीवन रक्षक पुरस्कार

Image
महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर नगरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा सामावेश  दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार,  ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, यांना जाहीर करण्यात आले.    देशातील 49 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरीकास ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’     जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देशातील 09 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्क...

राहुरी चे तहसीलदार नामदेव पाटील यांचे बनावट कागदपत्र करणारा लक्ष्मणला पोलीसांनी केली अटक

Image
राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या बनावट सही शिक्का करणाऱ्या ठकाला ठोकल्या बेड्या   आपले बनावट सही शिक्के बनवुन वापर होत असल्याची फिर्याद राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांनी  23 जानेवारी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं 42/ 2025 कलम 336(3) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.    बनावट कागदपत्र व  शिक्याचा वापर करुन हेरा फेरी गुन्ह्यातील आरोपी  लक्ष्मण सोपान दळे वय-39 रा- कुंभार गल्ली राहुरी,ता- राहुरी याला पोलिसांनी त्याचे राहत्या घरून ताब्यात घेऊन  24 जानेवारी 2025 रोजी त्याला अटक केली  लक्ष्मण दळे याला राहुरी न्यायालयात हजर केले असता हजर न्यायालयाने त्याला  पाच दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार  विजय नवले हे करीत आहे    पुढील तपास    मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे मार्गदर्शना खाल , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे...

राहुरी फॅक्टरी येथील एस बी आय च्या एटीएम बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद

Image
नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील युवराज काॅप्लेक्स मधील एस बी आय बॅकेच्या एटीएम च्या 14 बॅटऱ्या चोरणारी टोळी राहुरी पोलीसांनी नाशिक येथुन पकडून जेरबंद केली  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली ,पोहेकों बाबासाहेब शेळके,  पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, अमोल भांड यांनी  ही टोळी पकडली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.

बिबट्या आला अंगणी

Image
बिबट्या आला अंगणी  स्पाॅट रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरी फॅक्टरी येथे वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा बिबट्या दुष्टीस पडला अण अनेकानी याच देही याच डोळ्या बिबट्या पाहण्याचे भाग्य लाभले खरे मात्र सुदैवाने बिबट्याने कोणावर हल्ला केला नसल्याने जीवित हनी टळली?  येथील स्वामी विवेकानंद आर्वेद महाविद्यालय व नर्सिग होम संध्या चांगलेच चर्चेत आहे असे असले तरी याच परिसरात पाठी मागे राहुरी कारखान्या वरील कामगार वसाहतीला पाणी पुरवठा करण्या साठी पाणी साठवण टॅक गेले अनेक दिवसांपासून आहे संध्या हा टॅक मध्ये पाणी साठवण होत नाही कारण कारखाना गेले अनेक वर्षांपासून बंद आहे   इंजिनिअरिंग काॅलेज  , पब्लिक स्कूल देखील बंदच्या यादीत आहे तेव्हा या परिसरात प्रसाद नगर येथील लहान मुले शिवाजी प्राथमिक शाळेत, छत्रपती शिवाजी हायस्कूल, तसेच भरती साठीचे युवक तसेच सकाळ संध्याकाळी फिरणारे नागरिक व आर्वेद महाविद्यालय व नर्सिग होम तसेच औषध निर्माण चे विद्यार्थी यांची नेहमीच वर्दळ असते तर रात्रीला मंदिराचा अस्वाद घेणारे अथवा पॅलस्टीक गोळा करणार्या महिला असे हे ठिकाण अण गुरुवारी येथ...

नगर येथे ग्रंथोत्सवोचे उद्घाटन पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते

Image
अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन रविवारी 26 जानेवारीला   - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र  शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स  कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी  २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार २६ जानेवारी  २०२५ रोजी सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे ,आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार  अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले,  आमदार विठ्ठल लंघे,...

हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धा

Image
आता परिवहन महामंडळाच्या एस टी  बस स्थानका साठी हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियाना गुरुवार 23 जानेवारी पासून महाराष्ट्र सुरु करण्यात येणार आहे 1 कोटी चे बक्षीस  पहिल्या बसस्थानकाला मिळणार आहे व अण्य बक्षीसे आहेतच 

आता पत्रकारांना मिळणार 20 हजार महिन्याला

Image
आता पत्रकारांना मिळणार विस हजार महिन्याला  महाराष्ट्र शासन च्या वतीने 50 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली असून पहिल्यांदा 10 हजार रुपये होती ती आता 20  हजार रुपये करण्यात आली असून  पुर्वीचा व अत्ताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे  शासनामार्फत दिले जाणारे पत्रकारा साठी पुरस्कार रक्कमेत देखील भरघोस वाढ करण्यात आली 

राहुरी तालुका राजकीय दुष्ट्या अंधारात जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील

Image
राजकीय दुष्टया राहुरी अंधारात  विश्वासार्हता संपुष्टात आल्याने आमदार व खासदार राहुरीचा होत नसल्याची खंत जिल्हा परिषद चे माजी अर्थ व बांधकाम समितीचे संभापती जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील यांनी रविवारी वांबोरी येथे व्यक्त केले पत्रकार स्नेह मेळाव्यात ते बोलत होते आता तालूका राजकीय दुष्ट्या पुर्णः अंधारात गेला आहे कोठे ही राहुरीचे नाव येत नाही सामाजिक व राजकीय मोठी दरी निर्माण झाली असून अस का झाले यांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे  यावेळी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, पत्रकार निसार सय्यद, सुनील भुजाडी, रियाज देशमुख, शिवाजी घाडगे आदीनी मनोगत व्यक्त केले तालुक्यातील पत्रकार स्नेह मेळाव्यात उपस्थित होते  युवा नेते उदयसिंह पाटील यांनी सर्वाचा स्नेह सत्कार केला   

नगरचे पालकत्व ना विखे-पाटील

Image
बेक्रींग @ पत्रकार शिवाजी घाडगे  नगरचे शासकीय ध्वजारोहण ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार कारण ना राधाकृष्ण विखे-पाटील हेच झाले अहिल्यानगर चे पालकमंत्री शनिवारी शासनाने पालमंत्री जाहीर केले  बिडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे व बिड पवार यांच्या कडे मस्सा जोग मुळे मुंडे बहीण भावडे बिड पासून दुर ठेवले  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोचे 

प्रहार च्या जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे

Image
प्रहार च्या जिल्हा प्रमुख पदी ज्ञानेश्वर सांगळे व युवक जिल्हाप्रमुख पदी पांडुरंग औताडे यांची निवड      प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चूभाउ कडू यांचे आदेशाने व प्रदेश प्रमुख अनिलभाउ चौधरी यांच्या हस्ते उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी  १४ जानेवारी रोजी  नेवासा येथील ज्ञानेश्वर सर्जेराव सांगळे (माऊली) तसेच युवक जिल्हा प्रमुख पदी विधीज्ञ पांडुरंग केशव औताडे यांची   निवड निश्चित करून त्यांना  निवडीचे पत्र देण्यात आले.         यावेळी बोलताना नूतन जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व पांडुरंग औताडे यांनी सांगितले की, काल  १३ जानेवारी अखेर असलेली जुनी जिल्हा कार्यकारीनी बरखास्त करण्यात येत असून नूतन कार्यकारिणीची लवकरच सर्वांनुमते निवड करण्यात येईल.        प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख अप्पासाहेब ढूस यांनी बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते आज जिल्हा प्रमुख पदी ज्ञानेश्वर सांगळे यांची व यु...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहीले तेल

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहीले शनि वर तेल   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी   शनिशिंगणापूर येथे शनिवर तेल अर्पण करीत विधीवत अभिषेक केला  यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार शिवाजीराव कर्डीले उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे स्वागत    तत्पूर्वी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले.  जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तर शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे आमदार शिवाजी  कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी  त्यांचे स्वागत केले.

बेकरी उत्पादनात बॅन्ड करा विस्तार शिक्षण संचालक गोरक्ष ससाणे

Image
बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा बॉन्ड निर्माण करावा - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे स्वंय रोजगारातुन रोजगाराची निर्मिती करुन मुल्यवर्धीत बेकरी पदार्थ समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध करुन द्यावेत. उत्कृष्ट प्रतीच्या कच्च्या मालाची निवड, गुणवत्ता बेकरी व्यवसाय स्वच्छता, पॅकींग आदी. बाबींवर विशेष भर दिल्यास बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागात दि. 6 ते 10 जानेवारी, 2025 दरम्यान बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, डॉ. बाबासाहेब भिटे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना डॉ. विक्रम कड यांनी विभागामार्फत घेण्यात येणार्या प्रशिक्षण कार्यक्रम...

भंडारदरा धरणातून शेतीचे चार आर्वतने सोडणार

Image
भंडारदरातून शेतीचे चार आवर्तने सोडण्यात येणार - भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात संपन्न झाली.‌ याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ किरण लहामटे आमदार अमोल खताळ आ.हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे,  निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते. भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्यातून सध्या सिंचन बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. येणाऱ्या  काळात २० फेब्रुवारी ते २४ मार्चमध्ये पुढचे आवर्तन करण्याचे नियोजन असून,२४ मार्च ते ३० एप्रिल मध्ये दुसरे आवर्तन आणि शिल्लक पाण्यातून जून...

केद्रीय गृह मंत्री अमित शहा शिर्डीत

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  केद्रीय गृह मंत्री अमित शहा  लवकरच शिर्डी येथे  12 जानेवारी रोजी येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे अमित भाई दुसऱ्यांदा शिर्डीत येतायत  तर दूसरीकडे शुक्रवारी अमित शहा यांनी संसदेत डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान कारण वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनुयानी मोर्चाचे आयोजन केले आहे 

शैक्षणिक समस्या सोडवु शिक्षण मंत्री दादा भुसे

Image
प्राथमिक शिक्षकांच्या समस्यां टप्प्याटप्प्याने सोडवु  -शिक्षणमंत्री दादा भुसे  आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचेशी संवाद साधला.यावेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा टप्प्याटप्प्याने संपूर्णपणे निपटारा करणार असल्याचे स्पष्ट आश्वासन या संयुक्त बैठकीत दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली . जयहिंद कॉलेज,चर्चगेट(मुंबई) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री यांच्या समवेत राज्याचे शिक्षणसचिव रणजितसिंह देओल,शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह,एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी , शिक्षण उपसचिव तुषार महाजन ,माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदी प्रशासकीय अधिकारी यांचेसह अखिल संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , इष्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर,आबासाहेब लोंढे,आबासाहेब जगताप या बैठ...

मृदविज्ञान कार्यशाळा एम पी के व्ही

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात मृद विज्ञानच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे  शाश्वत शेती व अन्य सुरक्षा यासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा  9 ते 10 जानेवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपट पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. ए वेलमुरुगन, पुणे येथील नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. रश...

आई वडीलीचे उपकार अनंत

Image
आई वडीलांच्या उपकार अनंत  परत फेड अजून कोणीच केली नाही  भविष्य कोणी करणार नाही  कवी -अनंत राऊत  मित्र वणव्या मध्ये गारव्या सारख्या कवितेची निर्मिती करून अख्या महाराष्ट्राला भुरळ घालणारे कवी प्रा अनंत राऊत यांनी विद्यार्थाना कविता सादर केल्या याच बरोबर काही उपदेश केला निमित्त होते  सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व इंग्लिश मिडिअम विद्यालयाचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे   सचिव डॉ. महानंद माने  होते. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा काव्य करणारे सुप्रसिद्ध कवी अनंत विठ्ठल राऊत ,तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील पांढरे अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,सहसचिव डॉ. उल्हास सुर्वे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, खजिनदार महेश घाडगे, तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य  अरुण तुपविहीरे,  मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे माध्यमिक विद्यालयाचे ...

हेलिकॉप्टर खरेदीचा विजयोत्सव !

Image
हेलिकॉप्टरचा विजयस्वोव! स्पाॅट रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे  उद्योजक विजय सेठी यांनी स्वतःच्या मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केले अण ते घेऊन पहिल्यांदा आपल्या गावी मंगळवारी आले परिसरातील सगळ्यानी त्यांचे मनापासून स्वागत केले.  खरच काही व्यक्ती असतात मुळात ध्येय वेडी असेच राहुरी फॅक्टरी येथील व्यावसायिक पवनकुमार सेठी यांचे कराळे वाडीत पंजाब काॅथ स्टोअर कापड दुकान होते त्यांना दोन मुले व एक मुलगी त्यात विजय हा त्यांचा तसेच अख्या राहुरी फॅक्टरीचा लाडका काॅलेज पासून एक भन्नाट व्यक्तीमत्व नाटकात काम करण्या पासून ते हवाई उडाना पर्यंत हौस असलेले कापड दुकान संजु शेट असायाचे सहाजिकच मग विजय यांनी राहुरीत बादल मुझिक दुकान सुरु केले मग मात्र माघार पाहीलेच नाही राहुरीतुन पुण्याला गेले व तेथे आपला जम बसविला नंतर आपले बंधु संजय व त्यांचा मुलगा बादल याला ही विजु शेट यांनी पुण्यात नेले एक मात्र पहिल्या पासुन त्याना आपल्या परिसरातील तरुणाच्या हाताला काम देण्याची जबरदस्त ईच्छा शक्ती होती ती त्यांनी पुर्ण केली  तस नशरात्र उस्वोव व अण्य स्थानिक मित्र मंडळीच्या सुख दुःख च्या कार्यक्रम...

बिबट्याच्या हल्ल्यात काका येवले बालबाल बचावले

Image
माझीये मरण पाहीले मी माझ्या डोळया  यांचा अनुभव  काका येवले यांना  आला असून राहुरी फॅक्टरी नजीक रहिवाशी  गोवर्धन (काका)भागवत येवले रा. गुजाळ नाका यवले वस्ती यांना आला असून रात्री ते आपले काम उरकून घरा कडे दुचाकीवरून जात असताना दबा धरून बसलेला बिबट्या त्याच्यावर धाऊन आला मात्र काका यवले यांनी समय सुचकता दाखवत दुचाकीचा वेग वाढविल्याने  बिबट्याची शिकार हुकली मात्र काका बालबाल बचावले  काका येवले यांनी घडलेला प्रकार आपले चिरंजीव गणेश याला सांगितले मग गणेश यांनी काका व देवा यांना टॅक्टर वर घेऊन बिबट्या कडे आगेकूच केली व बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले खरे मात्र बिबट्याची भिती मात्र कायम होती  येवले वस्तीवर बिबट्या असल्याचे रहिवाशांना सकाळी कळली  चारी व आजुबाजुला शेत असल्याने बिबट्या गारव्याला वास्तव करीत आहे येवले वस्तीवरील बिबट्याचा बंदोबस्त करण्या साठी पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे अनुसुचित जाती जमातीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे राहुरी वन विभाग कडे केवळ 28 पिंजरे असून त्यातील 10 न...

फुले ऊसाचे वाण सरस कुलगुरु पाटील

Image
उसाचे फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 हे वाण अधिक सरस -कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील  देशातील उसाच्या क्षेत्रापैकी महाराष्ट्र राज्यात ऊसाचे 18 टक्के क्षेत्र असून 32 टक्के उत्पादन आहे. राज्यामध्ये 86 टक्के क्षेत्र हे पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांच्याखाली आहे. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे साखर कारखान्यांची, शेतकर्‍यांची आणि कृषि विद्यापीठाची शान आहे. या संशोधन केंद्रातून ऊसाचे आतापर्यंत 17 वाण आणि 110 शिफारशी प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत. या ऊसाच्या वाणांमुळेच साखर कारखाने सक्षमपणे सुरू आहेत आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली आहे. हे सर्व श्रेय ऊस वाण निर्मिती करणार्‍या शास्त्रज्ञांना जाते. ज्या राष्ट्रात शास्त्रज्ञांचा सन्मान होतो त्याच राष्ट्राची प्रगती वेगाने होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.        महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे नव्याने प्रसारीत झालेल्या ऊसाच्या सुधारीत वाणांची ता...

राकेश ओला झाले उपमहानिरीक्षक

Image
नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती  ओला झाले आता उपमहानिरीक्षक  आणि तसेच राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती. संबधीत अधिकाऱ्यांना निवडश्रेणी मिळाली असून सध्या आहे त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.  आगामी काळात त्यांची (DIG) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  असे असले तरी  जिल्हा पोलीस पोर्टलवर मात्र राकेश ओला हे अद्याप ही पोलीस अधीक्षक आहेत जर आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां बद्दल येवढी उदासीनता असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय असा प्रश्न चर्चेला जात आहे

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास केंद्राचे प्राधान्य- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

Image
शेतीचे उत्पादन वाढविण्यात  केंद्राचे प्राधान्य - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान  अहिल्यानगर- शेतकरी हा देशाचा श्वास आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील,  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक डॉ .एस.के.रॉय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील उपस...