दुसर्याच पक्षांतर पाप स्वतःच मात्र पुण्य
दुसऱ्यांचे पक्षांतर पाप, स्वतःचे पुण्य राजरंग।शिवाजी घाडगे राजकारणात पक्षांतर हा काही नवीन विषय नाही. मात्र एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा त्याच्या निर्णयाचे मूल्यमापन तत्त्वांवर कमी आणि राजकीय सोयीसुविधांवर अधिक केले जाते, हे वारंवार दिसून येते. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर सुरू झालेल्या प्रतिक्रिया त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. जेव्हा एखादा नेता आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, तेव्हा त्याला "विचारधारेशी प्रतारणा", "संधीसाधूपणा" किंवा "स्वार्थी राजकारण" अशा विशेषणांनी हिणवले जाते. मात्र इतिहास पाहिला तर जवळपास सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या काळात इतर पक्षांतील प्रभावी नेत्यांचे स्वागत केले आहे. त्यावेळी विचारधारा आणि निष्ठेचे निकष अनेकदा मागे पडतात आणि राजकीय गणिते पुढे येतात. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे विरोधकांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. कारण एखादा प्रभावी नेता पक्ष सोडतो तेव्हा केवळ एक व्यक्ती जात नाही, तर त्याच्यासोबत कार्यकर्त्यांचा एक वर्ग, स्थानिक प्रभाव आणि राजकीय समीकरणेही बदलतात. त्यामुळे विरोधकां...