Posts

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका श्रीरामपूरात जाणून घेतल्या व्यथा

Image
जिल्हा अधीक्षक मुम्मका सुदर्शन  जाणून घेतल्या श्रीरामपूरात व्यथा  सपोर्ट।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे 'नागरिकांशी संवाद साधत तक्रारी अडचणी, तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. यावेळी शहरातील विविध भागांतील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी व सूचना पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीविरोधात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून काही नागरिक व संघटनांनी गुन्हेगारांना स्थानिक पातळीवर मदत मिळत असल्याचे आरोपही केले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हा नागरिक तक्रार दिवस आयोजित केला. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्र...

खासदार शरद पवार यांनी घेतले सोपानकाका पालखीचे दर्शन

Image
गोविंद बागेत सोपानकाका पालखीचे शरद पवारांकडून प्रथमच दर्शन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी प्रथमच दर्शन घेतले आहे. पालखी गोविंद बाग येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम  प्रतिभा पवार यांनी पालखीचे दर्शन घेत वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त केला. त्यानंतर खासदार शरद पवार यांनीही पालखीचे दर्शन घेऊन वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेला अभिवादन केले. त्यांच्या या भेटीची उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये विशेष चर्चा झाली. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा वातावरणात शरद पवार यांनी प्रथमच सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्याने या घटनेकडे अनेकांनी विशेष लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात राजकीय घुसखोरी होत असल्...

देवळाली प्रवरात नगरपालिकेच्या कारभारा विरोधात भिक मागो आंदोलन

Image
देवळाली प्रवरात 'भिक मागो' आंदोलन; पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात विरोधकांचा एल्गार घाडगे न्यूज।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांच्या कथित मनमानी, एकतर्फी व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणाऱ्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील नगरसेवकांनी शनिवारी शहरात अनोखे 'भिक मागो' आंदोलन करून पालिका प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात नगरपालिका अपयशी ठरली असून प्रत्येक प्रश्नावर "पालिकेकडे निधी नाही" हेच कारण पुढे केले जाते. मात्र दुसरीकडे लाखो रुपयांचा खर्च कागदोपत्री दाखविला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक दासू पठारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हातात भिक्षापात्रे घेऊन नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भिक्षा मागितली. "पालिकेकडे विकासकामांसाठी निधी नसेल, तर नागरिकांकडून भिक्षा गोळा करून तीच रक्कम पालिकेला देऊ," असा उपरोधिक स...

गुंड गिरीचा अंत हवा अरोपी नव्हे संपूर्ण खाखळी उध्दव करा

Image
 गुंडगिरीचा अंत हवा आरोपी नव्हे, संपूर्ण साखळी उद्ध्वस्त झाली करा  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूरमध्ये घडलेले आकाश दुबया हत्याकांड हे केवळ एका तरुण उद्योजकाच्या हत्येचे प्रकरण नाही. ही घटना शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीचे, कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्हाचे आणि समाजात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचे विदारक प्रतीक आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एका गुन्ह्याच्या चौकशीच्या चौकटीत पाहून चालणार नाही. या घटनेच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारीला पोषक ठरणारी संपूर्ण यंत्रणा उघड करणे आणि तिच्यावर कठोर प्रहार करणे ही काळाची गरज आहे. आकाश दुबया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये अभूतपूर्व जनआक्रोश दिसून आला. व्यापारी, सामाजिक संस्था, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. हा उद्रेक केवळ एका हत्येच्या निषेधाचा नव्हता, तर अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या दहशतीविरुद्धचा होता. नागरिकांना सुरक्षित वातावरण हवे आहे. व्यवसाय करणाऱ्या तरुणाला भरदिवसा जीव गमवावा लागत असेल, तर कायद्याची भीती कोणाला राहिली आहे, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित हो...

नगर-मनमाड की मृत्यू महामार्ग अजून किती जणांची कुर्बानी हवी

Image
नगर -मनमाड  की मृत्यू महामार्ग  किती जणाची कुर्बानी हवी ? समस्या।शिवाजी घाडगे  नगर–मनमाड महामार्गाची साडेसाती कधी संपणार  विद्यापीठ नजीक रिक्षा व मोटार आपघात महिला जागीच ठार झाली असून चार जण जखमी झाले आहेत चागुणाबाई पवार असे आपघात मरण पावलेल्या महिलेचे नाव असून तीच्या पती सह तीन जण जखमी झाले आहेत  नगरची वाहतूक वांबोरी मार्गे वळवत एक टप्पा, बाभळेश्वर ची नेवासे मार्गे तसेच कोपरगाव ची पुणतबा मार्गे वाहतूक वळवत अवघ्या वर्षभरात हा रस्ता पूर्ण झाला असता परतु राजकीय श्रेय कोणाला आणि अण्य काही गडबडी मुळे सात वर्ष झाले तरी या महामार्ग ची साडेसाती थांबायला तयार नाही अक्षरशा या महामार्गावरून प्रवास म्हणजे जीवंत पणी मरण यातना सोसाव्या लागतात पुढारी येतात फोटो शेशन पूर्ण करतात परिस्थिती जैसे थे श्रीरामपूरात नागरिक चार दिवस शहर बंद ठेवतात हाॅटेल व्यावसायिक खुन झाला म्हणून नगर मनमाड महामार्ग वर देखील अनेक माणसे मृत्यूमुखी पडले यांचे कोणालाच सोयरसुतक नाही साईट गटारणे व्यावसायिककांची दूकाने खाली गेलेत तरी ते गप्प राहुरी खाली गेली तरी गप्प नागरिक देखील किती सहन शिल अस...

महिला पोलीस उपनिरीक्षक तीन लाखाची लाच घेतना अटक

Image
तीन लाख रूपयांची लाच स्विकारताना महिला पोलीस उपनिरीक्षक अटक   पोलीस दल हे कायद्याचे रक्षण करणारे, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणारे आणि न्यायव्यवस्थेची पहिली पायरी मानले जाते. एखाद्या नागरिकावर अन्याय झाला, गुन्हा घडला किंवा संकट ओढवले की त्याचा पहिला आधार पोलीस ठाणे असतो. मात्र, जेव्हा याच पोलीस यंत्रणेतील अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले जातात, तेव्हा तो केवळ एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा देणारा प्रसंग ठरतो. दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट यांना गुन्हा 'बी-फायनल' करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणात सुरुवातीला तब्बल आठ लाख रुपयांची मागणी झाल्याचा आरोप आहे. हा आकडा केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नाही; तर भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, याचे तो गंभीर चित्र उभे करतो. आज अनेक नागरिकांची तक्रार आहे की, काही ठिकाणी न्यायापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले जाते. गुन्हा दाखल करायचा असेल, तपासाची दिशा बदलायची असेल, आरोपीला मदत करायची असे...

खाकी- खांदी -गुंडाची अभ्रद्र युती जनतेची सुरक्षा वाऱ्यावर

Image
खाकी–खादी–गुंडांची अभद्र युती : जनतेची सुरक्षा वाऱ्यावर स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूरातील तरुण उद्योजक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात उसळलेला संताप हा केवळ एका गुन्ह्याविरोधातील निषेध नाही; तो संपूर्ण कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेवर नागरिकांनी व्यक्त केलेला अविश्वास आहे. सलग बंद, सर्वपक्षीय मोर्चे, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद यामधून एकच संदेश स्पष्टपणे समोर आला गुन्हेगारांची वाढती दहशत आणि त्यांना मिळत असल्याची भावना असलेले राजकीय व प्रशासकीय संरक्षण आता असह्य झाले आहे. कायद्याचा धाक कमी झाला की गुन्हेगारीचे साम्राज्य वाढते. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडणे पुरेसे नसते; गुन्हेगारीची मुळे शोधून ती उपटून टाकणे अधिक महत्त्वाचे असते. श्रीरामपूरात अंमली पदार्थांचे जाळे उघडकीस आले, काही कारवाया झाल्या; परंतु त्यामागील सूत्रधार, आर्थिक साखळी आणि राजकीय संरक्षण यांचा शोध घेणे तेवढेच आवश्यक आहे. अन्यथा आज दुसऱ्याच्या घरात पोहोचलेली गुन्हेगारी उद्या प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावेल. आजची सर्वात भीषण बाब म्हणजे तरुण ...