व्यवस्थेचा बो-या की तरुणांचा असंतोषाचा उद्रेक
व्यवस्थेचा बो-या की तरुणांच्या असंतोषाचा उद्रेक? घाडगे न्यूज।प्रतिनिधी राहुरीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत घडलेली लघुलेखन विद्यार्थिनींची बॅनरबाजी ही केवळ एक ‘घटना’ म्हणून पाहून चालणार नाही. ती दोन गंभीर बाबी अधोरेखित करते एक म्हणजे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, आणि दुसरी म्हणजे तरुणांमध्ये वाढत चाललेला असंतोष. प्रथम, एवढ्या मोठ्या आणि उच्चस्तरीय सभेत आंदोलक सहजपणे प्रवेश करून बॅनर फडकवू शकतात, हे निश्चितच चिंताजनक आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असते. मात्र राहुरीतील घटनेने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही त्रुटी केवळ दुर्लक्ष म्हणून सोडून देता येणार नाही; कारण अशा घटनांचे परिणाम गंभीर असू शकतात. दुसरीकडे, लघुलेखन क्षेत्राशी संबंधित पदे संपुष्टात आणल्याच्या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये निर्माण झालेला रोषही तितकाच महत्त्वाचा आहे. या तरुणींची कृती पद्धत वादग्रस्त असू शकते, पण त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शिक्षण घेऊनही रोजगाराच्या...