Posts

देवळाली प्रवरात भिक मागो आंदोलन;नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मनमानीला विरोध

Image
देवळाली प्रवरात  'भिक मागो' आंदोलन; सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर विरोधकांची टीका घाडगे न्यूज: प्रतिनिधी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कथित हुकूमशाही कारभारा विरोधात तसेच शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक दासू पठारे यांनी १८ जुलै (शनिवार) रोजी शहरात 'भिक मागो' आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या आंदोलनातून जमा होणारी रक्कम प्रतीकात्मक स्वरूपात नगरपालिकेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नगरसेविका सुनीता थोरात, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, वैभव गिरमे, ॲड. कुमार भिंगारे, नाना उंडे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना दासू पठारे यांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांवर प्रखर टिका केली लोक पंढरपुर दिड्या साठी पाणपोई उघडतात मात्र आमची पालिका टॅकरने पाणी देवू शकत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे  विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना निधी नसल्या...

खाकीला विश्वास मिळवावा लागेल

Image
खाकीला विश्वास मिळवावा लागेल      स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूरातील तरुण उद्योजक आकाश दुबें यांच्या हत्येनंतर केवळ एका गुन्ह्याची चर्चा झाली नाही, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली. सलग बंद, मोर्चे, निवेदने आणि नागरिकांचा संताप या सर्व घटनांमधून एकच संदेश समोर आला जनतेचा कायदा अंमलबजावणी यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत आहे. हा विश्वास परत मिळवणे ही आज पोलिस प्रशासनासमोरील सर्वात मोठी जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाल्याबाबतचा  प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक नागरिक, निवृत्त अधिकारी आणि काही विद्यमान पोलीस अधिकाऱ्यांनी संपर्क साधून जिल्ह्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही आरोप गंभीर आहेत. ते सिद्ध झालेले नाहीत; त्यामुळे त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र हे आरोप मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असतील, तर त्याकडे केवळ अफवा म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. कायद्याचे राज्य टिकवण्याची जबाबदारी पोलिस दलावर असते. गुन्हेगारांमध्ये का...

गुंडगिरीचा वाढता विळखा श्रीरामपूरात नागरिकांचा आक्रोश

Image
गुंडगिरीचा वाढता विळखा आणि श्रीरामपूरचा आक्रोश स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  शहराची खरी ओळख त्याच्या उद्योगधंद्याने, व्यापाराने, संस्कृतीने आणि कायदा-सुव्यवस्थेने ठरते. नागरिक निर्भयपणे व्यवसाय करतात, कुटुंबासह रात्री फिरू शकतात आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते, तेव्हा त्या शहराची प्रगती होते. पण जेव्हा भरदिवसा व्यापाऱ्याचा निर्घृण खून होतो, त्यानंतर सलग चार दिवस शहर बंद राहते, सर्वपक्षीय मोर्चे निघतात आणि नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न पडतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीच्या हत्येचा विषय राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवरील अविश्वासाचा उद्रेक ठरतो. श्रीरामपूरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती ही याच वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. सलग चार दिवस शहर बंद राहिले. ही घटना केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून नागरिकांच्या मनात साचलेल्या असुरक्षिततेची अभिव्यक्ती आहे. व्यापाऱ्याचा जीव सुरक्षित नसेल तर शहरातील व्यापार किती दिवस टिकणार? उद्योजक गुंतवण...

प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अवघड

Image
प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अवघड      स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर येथील सद्य स्थिती तसेच  जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केलेली खंत  श्रीरामपूर शहरांवर गुंडगिरी सावट रिपोर्ट वर मत व्यक्त करताना  संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संपर्कात असल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कायद्याचे निष्पक्ष पालन आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे अधिकाधिक कठीण बनत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही राजकीय शिफारशी आणि इतर अनौपचारिक बाबींना महत्त्व दिले जात आहे. अशा वातावरणात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता काम करतात, मात्र त्यांनाच अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते. अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या भावनांनुसार, अलीकडच्या काळात पोलीस दलातील काही...

श्रीरामपूर च्या शांतेवर गुंडाचे सावट

Image
श्रीरामपूरच्या शांततेवर गुंडगिरीचे सावट! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.  अवघ्या तीस वर्षांच्या तरुण व्यावसायिकाची भरदिवसा, त्याच्या वडिलांसमोर निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. हल्ल्यावेळी वडिलांसमोर घडलेला हा थरारक प्रसंग पाहून ते अक्षरशः हतबल झाले. काही क्षण त्यांना काय घडत आहे याचाही अंदाज आला नाही. या घटनेने दुबया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील व्यापारी वर्गात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवण न मिळाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले. अशा क्षु...

अहिल्यानगर चे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून संजय मस्के

Image
अहिल्यानगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारीपदी संजय मस्के यांची नियुक्ती  जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी अहिल्यानगरचे नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.  बिड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून त्याच्या कडे चार्ज होता जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची नवी मुंबई येथे बदली झाल्यानंतर संजय मस्के  यांची अहिल्यानगर येथे बदली झाली आहे  संजय मस्के यांनी आपल्या सेवाकाळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषतः जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रंथालय संचालनालयात त्यांची ओळख "वास्तुशिल्पकार अधिकारी" अशी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सुमारे आठ जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालयाच्या नव्या इमारतीचे कामही त्यांच्या नेतृत्वाखाली गती घेऊन लवकर पूर्ण होईल आणि वाचकांना सुसज्ज, आधुनिक ग्रंथालय उपलब...

गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी

Image
गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी? आता निर्णायक लढ्याची वेळ! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांची भरदिवसा हॉटेलमध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण शहर भयभीत झाले. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशीही शहर कडेकोट बंद राहिले. विशेष म्हणजे हा बंद कोणत्याही एका पक्षाचा नव्हता, तर सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, नागरिक रस्त्यावर उतरले आणि गुन्हेगारांविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला. हा बंद केवळ एका हत्येच्या निषेधासाठी नव्हता; तो श्रीरामपूरच्या सुरक्षित भविष्याची मागणी करणारा आवाज होता. एका तरुण व्यावसायिकाचा भरदिवसा खून होतो, तोही शहराच्या मध्यवर्ती भागात. याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती राहीलेली नाही का? शहरातील व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? असे अनेक प्रश्न या घटनेने निर्माण केले आहेत. श्रीरामपूर हे उद्योग, व्यापार आणि शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वा...