Posts

विधानसभेचे संभापती प्रा राम शिंदे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या निवासस्थानी

Image
देवळाली प्रवरात कदम निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण घाडगे न्यूज। प्रतिनिधी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी रात्री देवळाली प्रवरा येथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी रात्री सुमारे नऊ  वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आगामी विधान परिषद निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रा. राम शिंदे यांच्या या भेटीकडे संभाव्य राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील भाजप नेतृत्वात प्रा. राम शिंदे यांचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याने, कदम कुटुंबाला पक्षाची साथ मिळाल्यास सत्यजित कदम या...

झुरळांची भाषा तरुणांचा संताप

Image
झुरळांची भाषा आणि तरुणांचा संताप उद्रेक । शिवाजी घाडगे देशात सध्या सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” अर्थात सीजीपीची जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला विनोद, उपरोध आणि ट्रोलिंगचा भाग वाटणारी ही संकल्पना आता व्यवस्थेविरोधातील असंतोषाचे प्रतीक बनताना दिसत आहे. काही दिवसांतच लाखो युवक या मोहिमेशी जोडले गेल्याचा दावा होत आहे. हे केवळ सोशल मीडियावरील आणखी एक ट्रेंड म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे नाही; तर देशातील तरुणांच्या मनात साचलेल्या नाराजीचा हा उद्रेक प्रगट होताना दिसत असला तरी यांच्या भाई सगळेच झुरळ आहेत . एका कथित वक्तव्यात बेरोजगार तरुणांना “झुरळां”ची उपमा देण्यात आल्याचा आरोप झाला आणि त्यावरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. “जर सारी झुरळे एकत्र आली तर?” या प्रश्नातून सीजीपीचा जन्म झाला. या संपूर्ण आंदोलनात विनोद आहे, उपहास आहे; पण त्यामागे दडलेली वेदना अधिक मोठी आहे. कारण हा रोष केवळ एखाद्या व्यक्तीविरोधात नाही, तर संपूर्ण व्यवस्थेविरोधात आहे. सध्या सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” (सीजीपी) या नव्याने समोर आलेल्या संकल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसांत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेने येत आहेत शिर्डीला

Image
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  रेल्वेत बसले शिर्डी येतात  घाडगे न्यूज। प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी शिर्डी येथे होणाऱ्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रेल्वेने रवाना झाले आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून पहाटे ५.५० वाजता त्यांनी रेल्वेने शिर्डीकडे प्रस्थान केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर भर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री शिर्डीतील कार्यक्रमानंतर सायंकाळी नागपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे साधेपणा आणि खर्च बचतीचा संदेश दिला जात असला, तरी दुसरीकडे शिर्डीतील संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य विधान परिषद ची आचार संहिता देखील लागु आहे.  विशेषतः कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाण...

विधानपरिषदे साठी कदम कदम बढाते जाये

Image
विधानपरिषदे साठी कदम कदम बढाते जाये  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पक्ष लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून इच्छुक उमेदवारांनीही पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी या निवडणुकीसाठी सक्रिय भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगू लागली आहे. जिल्ह्यात भाजपाच्या एकनिष्ठ आणि पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्याला विधान परिषदेत संधी मिळावी, अशी भावना पक्षातील काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उमेदवारीसाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे देखील प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर उद्योजक जगदीश कदम यांनीही पक्षातील संबंध अधिक दृढ करत विविध स्तरांव...

महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या यंत्राला पेटेंट

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि यंत्राला पेटंट राहुरी । प्रतिनिधी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या कृषि यंत्राला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या यंत्राच्या संशोधनामध्ये अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड यांच्यासह डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि इंजि. रोहित गेठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सदर यंत्र ५५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे सहज चालवता येते. स्पेड नांगर व तव्याच्या कुळवाच्या एकत्रित मशागतीद्वारे पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते. या यंत्राच्या वापरामुळे मशागतीसाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्हीमध्ये बचत होते. एका तासात सुमारे ०.३३ हेक्टर क्षेत्रावर मशागत करता येते. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुल...

बोगस डॉक्टर चा गुण पदवी मौनात?

Image
बोगस डॉक्टरचा “गुण” आणि पदवी मौनात !  काहूर।शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात नुकत्याच घडलेल्या एका कारवाईने संपूर्ण परिसरात चर्चेचे वादळ उठवले आहे. एका निसर्गोपचार केंद्रावर प्रशासनाने धाड टाकत संबंधित डॉक्टरला अटक केली आणि तो “बोगस” असल्याचा ठपका ठेवत थेट जेलची हवा दाखवली. कायद्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्यच असेल; पण या घटनेनंतर गावागावात, चौकाचौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर एक उपहासात्मक पण बोचरा प्रश्न चर्चिला जात आहे  “जर तो इतकाच बोगस होता, तर त्याच्याकडे रोज शंभरहून अधिक रुग्ण उपचारासाठी का जात होते?” हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच तो उपरोधिक भाष्य करणारा ठरत आहे. कारण लाखो रुपये खर्च करून पदव्या घेणारे, इंग्रजीत प्रिस्क्रिप्शन लिहिणारे आणि क्लिनिकच्या बोर्डावर नावामागे दहा-दहा अक्षरे लावणारे अनेक “अधिकृत” डॉक्टर रुग्णांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरत असताना, एका गावाकडच्या उपचारकाकडे एवढी गर्दी का होत होती? काही जण तर उपहासाने म्हणू लागले आहेत, “हे काय लातूर पॅटर्नचे विद्यार्थी होते का? परीक्षा पास झाल्या; पण रुग...

श्रध्देच्या भुमीत राष्ट्र सुरक्षतेची नवी ताकत

Image
श्रद्धेच्या भूमीत राष्ट्रसुरक्षेची नवी ताकद संवाद । शिवाजी घाडगे एकेकाळी जगाला “श्रद्धा आणि सबुरी” हा शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत आता राष्ट्रसुरक्षेच्या सामर्थ्याची नवी पहाट उगवत आहे. अध्यात्म, भक्ती आणि मानवतेची ओळख असलेल्या या पावन भूमीत डिफेन्स हब उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ही केवळ औद्योगिक घटना नाही तर बदलत्या भारताच्या नव्या शक्तीची घोषणा आहे. आजच्या जागतिक परिस्थितीत युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सीमारेषेवर फक्त सैनिक उभे करून युद्ध जिंकता येत नाही; त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी शस्त्रनिर्मिती आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता अत्यावश्यक बनली आहे. अशा वेळी शिर्डीसारख्या धार्मिक आणि ग्रामीण भागात अत्याधुनिक तोफगोळे, रॉकेट, मिसाईल आणि ड्रोन निर्मितीचा प्रकल्प उभा राहणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह  यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणे, हेही या उपक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारे आहे. एकेकाळी केवळ भक्तीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीची आता संरक्षण उत्पादन क्षेत्रात...