शोध पत्रकारीता लोप पावता कामा नयेत प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील
शोध पत्रकारिता लोप पावता कामा नये ; माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे – जयंत पाटील घाडगे न्यूजसाठी -श्रीरामपुरहुन @अनिल पाडे देशातील राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक बदलांचा सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या क्षेत्रावर पडला असेल, तर तो पत्रकारितेवर पडला आहे. पूर्वी समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी शोध पत्रकारिता आज दुर्मिळ होत चालली आहे. त्याऐवजी अनेक माध्यमांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप आणि तात्कालिक चर्चांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेने सत्य, वस्तुनिष्ठता आणि जनहित यांचा ध्यास सोडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीरामपूर येथे आयोजित ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकमतचे राजकीय संपादक यद...