Posts

महिला मंडल अधिकाऱ्यांवर लाचेचा गुन्हा

Image
सातबारा नोंद संगणकीकृत करण्यासाठी ४ हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱणीवर गुन्हा दाखल  नगर| प्रतिनिधी बुऱ्हानगर येथील प्लॉटची सातबारा उताऱ्यावरील नोंद संगणकीकृत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कापुरवाडी मंडळ अधिकारी संगिता नारायण पुंड (वय ३७) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुंड यांना मंगळवारी ८ सप्टेंबर   अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार चालक असून, त्यांनी आपल्या मित्रासोबत दस्त क्र. अ.नं. १/२९१६/२०१३ अन्वये मौजे बुऱ्हानगर येथील गट क्रमांक ६ मधील प्लॉट क्रमांक ४९ मधील ४७५ चौ.मी. क्षेत्रापैकी २१०.९० चौ.मी. क्षेत्र खरेदी केले होते. या खरेदीची नोंद फेरफार क्रमांक ६८०२ अन्वये सातबारा उताऱ्यावर झाली होती. मात्र संगणकीकृत सातबारा तयार करताना ही नोंद कार्यान्वित झाली नव्हती. त्यामुळे संबंधित प्लॉटचा ऑनलाइन सातबारा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मित्राने ८ डिसेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर तहसीलद...

राज बाबा ठाकरे कुटुंबात कन्यारत्न

Image
राज ठाकरे पुन्हा आजोबा; ठाकरे कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन अमित-मिताली ठाकरे  आई-बाबा; चिमुकल्या लेकीच्या आगमनाने कुटुंबात आनंदोत्सव सुखद।शिवाजी घाडगे   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आली असून ठाकरे कुटुंबाच्या अंगणात चिमुकल्या कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाल्याने संपूर्ण ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्या संसारात चिमुकल्या लेकीच्या रूपाने आणखी एका सुंदर पर्वाची सुरुवात झाली आहे. घरात नव्या पाहुण्याचे आगमन म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. मात्र मुलीचे आगमन हा आनंद अनेक पटींनी वाढविणारा क्षण मानला जातो. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठीही हा क्षण विशेष आणि अविस्मरणीय ठरला आहे. राज ठाकरे पुन्हा आजोबा अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाल्याने राज ठाकरे यांची आजोबा म्हणून भ...

गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा-जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका

Image
गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा ; जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका  घाडगे न्यूज| प्रतिनिधी गणेशोत्सव हा आनंद, उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा; मात्र हा आनंद इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही काळजी घ्यावी. गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच ‘नशामुक्त अहिल्यानगर’ या अभियानाचा प्रचार व प्रसार करून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राहुरी येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनिप्रदूषण, विसर्जन मिरवणूक आणि सामाजिक सलोखा यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याव...

अँड सुभाष पाटील साहेब नेतृत्व नव्हे विश्वास!

Image
अँड सुभाष पाटील साहेब म्हणजे नेतृत्व नव्हे; एक विश्वास! जबरविश्वास।शिवाजी घाडगे  पद येतात-जातात, सत्ता बदलते, राजकीय समीकरणे बदलतात; पण माणसांच्या मनात निर्माण झालेला विश्वास कधीच बदलत नाही. आणि म्हणूनच अँड. सुभाष पाटील साहेब हे केवळ एक राजकीय नाव नाही, तर  सार्वजनिक जीवनातील एक विश्वासाची ओळख आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांच्या कर्तृत्वाची वेगळी ओळख आहेच , स्पष्टवक्ते, अभ्यासू, शिस्तप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि माणसांना जोडणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय मा. अँड. सुभाष पाटील साहेब. आज त्यांचा वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना मन अभिमानाने आणि आपुलकीने भरून येते. काही माणसे आयुष्यात येतात आणि केवळ स्वतःची ओळख निर्माण करून थांबत नाहीत; ते आपल्या विचारांनी, कृतीने आणि माणुसकीने अनेकांच्या आयुष्याला दिशा देतात. काही व्यक्ती पदावर असताना मोठ्या वाटतात; पण काही व्यक्ती अशा असतात की पद त्यांच्यामुळे मोठे होते. त्यांच्या नावापुढे पदाची गरज नसते, कारण त्यांच्या कार्यानेच त्यांची ओळख निर्माण झालेली असते. अँड. सुभा...

जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका राहुरीत

Image
 पोलीस अधीक्षक राहुरीत गणेश मंडळांशी साधणार हितगुज घाडगे न्यूज। प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम राखून साजरा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका हे सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) राहुरीत  येणार आहेत. यावेळी ते गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. सोमवारी सकाळी १०.३० वाजता राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात गणेश मंडळांच्या अध्यक्षांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका मार्गदर्शन करणार असून, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, मंडप उभारणी, वीज व अग्निसुरक्षा तसेच सामाजिक सलोखा याबाबत आवश्यक सूचना करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा उत्सव असल्याने उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या बैठकीत करण...

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरीत अडीच वर्ष श्रीगोंद्यात अडीच महिने

Image
राहुरीत अडीच वर्षे  श्रीगोंद्यात अडीच महिने  विशेष।शिवाजी घाडगे  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांतच श्रीगोंद्यातून  जावे लागल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. नेमके असे काय घडले की, ठेंगे यांची पुण्याला बदली झाली? की त्यांनीच ती करून घेतली? या प्रश्नाचे उत्तर सध्या नागरिक शोधत आहेत. विशेष म्हणजे, ज्या राहुरी पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तब्बल अडीच वर्षे सांभाळले, त्याच ठेंगे यांना श्रीगोंद्यात मात्र अडीच महिनेही पूर्ण करता आले नाहीत, ही बाब पोलीस वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. ठेंगे यांच्या राहुरीतील कार्यकाळाची आणि श्रीगोंद्यातील अल्प कार्यकाळाची तुलना केली जात असताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुरीत त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार ‘पाण्यात मिसळलेल्या रंगाप्रमाणे रंग घेण्याची’ भूमिका स्वीकारत कारभार केला, अशी चर्चा त्या काळात होती. मात्र श्रीगोंद्यात परिस्थिती वेगळी ठरल्याचे चित्र दिसून आले. राहुरी हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि संवेदनशील पोलीस ठ...

संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटाव विरोधात हिंदु जनआक्रोश मोर्चा

Image
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील अतिक्रमणाविरोधात नेवाशात हिंदू जनआक्रोश मोर्चा  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते ऋषी शेटे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी नेवासा येथे भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपावे, तसेच ऋषी शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नेवासा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्यामुळे आणि संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामुळे धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची भूमी मानली जाते. दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स...