Posts

शोध पत्रकारीता लोप पावता कामा नयेत प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील

Image
शोध पत्रकारिता लोप पावता कामा नये ; माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे – जयंत पाटील घाडगे न्यूजसाठी -श्रीरामपुरहुन @अनिल पाडे देशातील राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक बदलांचा सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या क्षेत्रावर पडला असेल, तर तो पत्रकारितेवर पडला आहे. पूर्वी समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी शोध पत्रकारिता आज दुर्मिळ होत चालली आहे. त्याऐवजी अनेक माध्यमांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप आणि तात्कालिक चर्चांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेने सत्य, वस्तुनिष्ठता आणि जनहित यांचा ध्यास सोडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीरामपूर येथे आयोजित ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकमतचे राजकीय संपादक यद...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
कापूस उत्पादक शेतकर्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन राहुरी। महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांतर्गत  कोंढवड येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या कापूस उत्पादक शेतकर्यांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार आणि दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सहायक कृषि अधिकारी भारती ढगे, दुर्गा शहाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. खर्डे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे उद्दिष्टे विषद केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मंचामार्फत शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कापूस उत्पाद...

जिल्हा सहकारी बॅकसाठी विधानपरिषद संभापती प्रा राम शिंदे व माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील याच्या निर्णयाने रंगत

Image
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली; प्रा राम शिंदे व माजी खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय समीकरणे आकार घेत असून, बँकेच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व राहणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, माजी मंत्री तसेच बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के हे यावेळी निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना संधी मिळू शकते, असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्येच नेतृत्व आणि वर्चस्वाची चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणांवर भाजपच्या वरिष्ठ ने...

श्रीरामपूरातील पोलिस उपनिरीक्षक वर लाचखोरीचा गुन्हा दाखल

Image
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचखोरीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील यवला येथे कार्यरत असतानाच्या प्रकरणाशी संबंधित असून, त्यांच्यासह दोन खासगी हस्तकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात अटक न करणे व सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांनी ₹४ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती ही रक्कम ₹२ लाख ५० हजारांवर निश्चित करण्यात आली. यातील ₹५० हजारांची रक्कम ऑनलाइन फोनपे  द्वारे स्वीकारण्यात आल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. ही रक्कम सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) याने स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर, सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३८, दोघेही रा. पाटोदा, ता. यवला, जि. नाश...

शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे पावित्र्य राखा

Image
 शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे पावित्र्य राखा  श्रध्दा।शिवाजी घाडगे  शिर्डी हे केवळ महाराष्ट्रातील एक गाव नाही, तर ते जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि अध्यात्माचे केंद्र आहे. "श्रद्धा" आणि "सबुरी" हा साईबाबांनी दिलेला संदेश आजही लाखो भाविकांच्या जीवनाला दिशा देतो. देश-विदेशातून येणारे भक्त साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतात. त्यांच्या मनात एकच भावना असते बाबांचे दर्शन घ्यायचे, त्यांच्या चरणी माथा टेकवायचा आणि मनातील दुःख, वेदना व आशा त्यांच्या चरणी अर्पण करायच्या. मात्र, गेल्या काही दिवसांत शिर्डीत घडलेल्या काही घटनांनी साईभक्तांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, समाधीचे पावित्र्य, विशेष व्यक्तींना मिळणारी वागणूक आणि संस्थानचा कारभार यावर चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नांकडे भावनेने नव्हे, तर जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. अलीकडे मंदिर परिसरात एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी लाखो भक्त स्वतःला सुरक्षित समजतात, त्या परिसरात अशी घटना घडणे ही...

पिसाळलेल्या कुत्र्या चा वृध्दाला चावा घेत ठार मारल अण्य 15 जणांना डसले

Image
पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्धाचा फाडले १५ जणांना चावा घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने झोपेत असलेल्या एका वृद्धावर अत्यंत क्रूर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. याच कुत्र्याने परिसरातील सुमारे १५ नागरिकांनाही चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत वृद्धाचे नाव साहेबराव राघुजी वाघमारे (वय ७०) असे आहे. ते आपल्या दुकानासमोर नेहमीप्रमाणे झोपलेले असताना मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. कुत्र्याने त्यांच्या शरीराचा अक्षरशः चावा घेत फाडल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ला इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन राहुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. १५ नागरिक जखमी; रेबीज प्रतिबंधक उपचार सुरू वृद्धावर हल्ला केल्यानंतर या पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरात ध...

श्रीराबुरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र

Image
श्रीरामपूरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  पायात रुतलेला काटा अर्धवट काढून चालत नाही. तो अर्धवट राहिला, तर प्रत्येक पावलागणिक वेदना देत राहतो. जोपर्यंत तो पूर्णपणे बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत आराम मिळत नाही. हाच न्याय समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींबाबत लागू होतो. गुन्हेगारांवर कारवाई अर्धवट राहिली, भ्रष्टाचाराला मूक संमती मिळाली किंवा कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने झाली, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही पोलीस दलाची खरी ताकद केवळ गुन्ह...