Posts

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे श्रीरामपूर दाखल

Image
ब्रेकिंग@घाडगे न्यूज  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे श्रीरामपूरमध्ये दाखल श्रीरामपूर शहरातील अलीकडील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे आज श्रीरामपूर येथे दाखल झाले आहेत. सध्या पोलीस अधिकारी आणि संबंधित विभागांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपासाची प्रगती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू आहे. शहरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावर ही बैठक होत असल्याचे समजते. 

गुन्हेगारांवर सुदर्शन चक्र फिरलेच पाहीजे

Image
 गुन्हेगारांवर ‘सुदर्शन चक्र’ फिरलेच पाहिजे स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरती मर्यादित नसून, शहरातील वाढत्या गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायद्याच्या धाकाच्या अभावाकडे बोट दाखवणारी आहे. नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे  गुन्हेगारांच्या दहशतीतून मुक्त कधी होणार? हत्येचे नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाही. मात्र, केवळ जेवण देण्याच्या किरकोळ कारणावरून इतकी गंभीर घटना घडली असे मानणे कठीण वाटते, अशी चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणामागे वैयक्तिक वैर, गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्वाची लढाई किंवा इतर काही कारणे आहेत का, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. श्रीरामपूरमध्ये गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ, गांजा, मादक द्रव्ये आणि इतर अवैध व्यवसायांचे जाळे वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अशा अवैध धंद्यांमधून आर्थिक बळ मिळवणारे काही लोक समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वावर...

मी पगारावर खुश आहे म्हणारा निघाला लाचखोर

Image
मी पगारावर समाधानी बोर्ड लावणारा निघाला लाचखोर  दिखावा।शिवाजी घाडगे  "मी माझ्या वेतनात समाधानी आहे." सरकारी कार्यालयाबाहेर लावलेला हा फलक पाहिला की सामान्य नागरिकाच्या मनात त्या अधिकाऱ्याबद्दल आदर निर्माण होतो. शासनाकडून मिळणाऱ्या वेतनात समाधान मानून प्रामाणिकपणे सेवा करणारा अधिकारी अशी त्याची प्रतिमा तयार होते. पण हाच अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला, तर तो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर घाला घालणारा प्रसंग ठरतो. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप उत्तम मोरे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. एका बांधकाम कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या तीन टक्के रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला आणि मोरे यांना रंगेहात पकडले. कायद्याचे काम कायदा करेल; न्यायालय अंतिम निर्णय देईल. मात्र या घटनेने समाजासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कार्यालया...

न्यायालयात नम्र पोलीस ठाण्यात राज्या सारखी ऐट

Image
न्यायालयात नम्र... पोलीस ठाण्यात 'राजासारखी' ऐट मत ।शिवाजी घाडगे  लोकशाही व्यवस्थेत पोलीस दल हे कायद्याचे रक्षक मानले जाते. नागरिकांच्या जीवित, मालमत्ता आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. परंतु जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच कायद्याच्या चौकटीबाहेर वागत असल्याचे आरोप वारंवार पुढे येतात, तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. मुंबई उच्च न्यायालयाने पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या प्रकरणात केलेली कठोर टिप्पणी ही केवळ एका अधिकाऱ्यावर केलेली टीका नसून, संपूर्ण पोलीस व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्याचा इशारा आहे. "पोलीस न्यायालयात नम्र होतात; मात्र पोलीस ठाण्यात राजासारखी ऐट दाखवतात," हे न्यायालयाचे निरीक्षण अत्यंत मार्मिक आहे. ही टिप्पणी एखाद्या भावनेतून केलेली नसून, न्यायालयापुढे वारंवार येणाऱ्या अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे या निरीक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना वारंवार मागणी करूनही एफआयआरची प्रत देण्यात आली नाही. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार एफआयआरची...

श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा अंत करावा लागेल

Image
श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा अंत करावाच लागेल  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि व्यसनांचा विळखा ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या राहिलेली नाही, तर ती संपूर्ण समाजासमोरील गंभीर चिंता बनली आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या भरदिवसा झालेल्या हत्येनंतर शहरात सर्वपक्षीय आणि पक्षविरहित नागरिकांनी एकत्र येत केलेला संघटित विरोध हा श्रीरामपूरच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल. हा केवळ एका हत्येचा निषेध नव्हता, तर वाढत्या गुन्हेगारीविरोधातील जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होता. श्रीरामपूरमध्ये मारामाऱ्या, खून आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना नवीन नाहीत. मात्र, भरदिवसा एका तरुण व्यावसायिकाची निर्घृण हत्या झाल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. श्रीरामपूर हे सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाणारे शहर. मात्र गेल्या काही वर्षांत या शहराची ओळख बदलू लागल्याची खंत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, अमली पदार्थांच...

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका श्रीरामपूरात जाणून घेतल्या व्यथा

Image
जिल्हा अधीक्षक मुम्मका सुदर्शन  जाणून घेतल्या श्रीरामपूरात व्यथा  सपोर्ट।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे 'नागरिकांशी संवाद साधत तक्रारी अडचणी, तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेबाबतच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. यावेळी शहरातील विविध भागांतील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी व सूचना पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीविरोधात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून काही नागरिक व संघटनांनी गुन्हेगारांना स्थानिक पातळीवर मदत मिळत असल्याचे आरोपही केले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हा नागरिक तक्रार दिवस आयोजित केला. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्र...

खासदार शरद पवार यांनी घेतले सोपानकाका पालखीचे दर्शन

Image
गोविंद बागेत सोपानकाका पालखीचे शरद पवारांकडून प्रथमच दर्शन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी प्रथमच दर्शन घेतले आहे. पालखी गोविंद बाग येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम  प्रतिभा पवार यांनी पालखीचे दर्शन घेत वारकरी परंपरेप्रती आदर व्यक्त केला. त्यानंतर खासदार शरद पवार यांनीही पालखीचे दर्शन घेऊन वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेला अभिवादन केले. त्यांच्या या भेटीची उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये विशेष चर्चा झाली. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा वातावरणात शरद पवार यांनी प्रथमच सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्याने या घटनेकडे अनेकांनी विशेष लक्ष वेधले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात राजकीय घुसखोरी होत असल्...