Posts

जळगावच्या केळी संशोधन सुधार केंद्रात केळी दिवसा निमित्त शिवार फेरी

Image
जळगावच्या केळी संशोधन  केळी दिवसा निम शिवारफेरी  उत्साहात संपन्न राहुरी  केळी पिकामध्ये सुधारित लागवड पद्धतींच्या वापराबरोबर रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. नवीन संशोधन निष्कर्षांवर आधारित प्रयोगांची आखणी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने केळी उत्पादनात व उत्पनात वाढ होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.    महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषि महोत्सव-2026 अंतर्गत केळी दिवस व शिवारफेरी या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे, नंदुरबार कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए.बी. होले, मुक्ताईनगर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ज...

कृषीपर्व कृषी प्रदर्शन ५ ते ९ अहिल्यानगर मध्ये

Image
‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव ५ ते ९ फेब्रुवारीला अहिल्यानगर मध्ये  घाडगे न्यूज | प्रतिनिधी कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केडगाव रोडवरील नेमाने इस्टेट येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ तसेच कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन करणे तसेच थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांच्या समन्वयातून हा उ...

पुणे व बिड जिल्हाच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Image
पालकमंत्री ना सुनेत्रा पवार  पुणे व बिड च्या पालमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती सामान्य प्रशासन वतीने शासन निर्णय निर्गमित  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकाली निधनानंतर त्यांच्या जागेवर आता त्यांच्या पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची आदेश देण्यात आले आहेत

दु:खाचे सावट एका लोकनेत्याच्या अकाली जाण्याने

Image
 जत्रेवर दुःखाचे सावट एका   लोकनेत्याच्या अकाली जाण्याने समाजमन सुन्न  घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे   गावाची जत्रा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसतो, तर तो गावाच्या सामाजिक एकात्मतेचा, आनंदाचा आणि परंपरेचा उत्सव असतो. मात्र यंदा देवळाली प्रवरा येथील हीच जत्रा सामूहिक दुःखाची साक्ष ठरत आहे. दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे आजोळ  या गावाने आपला लाडका भाचा गमावला गावाचा लाडका ‘दादा’ अकस्मात विमान अपघातात निधन पावल्याने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. देवळाली प्रवरा हे दादांचे आजोळ. केवळ नात्याने नव्हे, तर भावनेने, जबाबदारीने आणि सामाजिक ऋणानुबंधाने ते या मातीशी जोडलेले होते. बालपणापासूनच त्यांनी गावातील सामान्य माणसांशी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिला यांच्याशी आपुलकीचे नाते जपले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एखाद्या नेत्यापेक्षा घरातील आधारवड हरपल्याची भावना समाजात पसरली आहे. खंडोबा यात्रेचा उत्सव हा गावाच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू मानला जातो. या यात्रेच्या निमित्ताने गावकरी एकत्र येतात, नाती घट्ट होतात, मतभेद विसरले जातात...

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण व राजकीय मर्यादा

Image
दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण व  राजकीय मर्यादा चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  सध्या राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न सातत्याने चर्चेत आहे—दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होणार का? या महिन्यातच दोन्ही गट एकत्र येणार, अशा खमंग राजकीय चर्चा सुरू आहेत. अशा चर्चा होणे स्वाभाविकही आहे. कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी प्रत्यक्षात एकत्र लढत दिली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना त्यांच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही महापालिका हातातून निसटल्याची खंत त्यांना स्वतःलाच होती, हे राजकीय वर्तुळात उघड सत्य आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पार्थ पवार यांच्या भागीदारीतील एका फर्मकडून करण्यात आलेला आरक्षित जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आला. त्याचा राजकीय परिणाम जसा व्हायचा होता, तसाच तो झाला. दुसरीकडे, भाजपाने राज्यात सत्तेतील सहकारी म्हणून इतर पक्षांना घेतल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेत थेट सहभागी होता येणार नाही, या भीतीपोटी भाजपाने पुण्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. परिणामी, पुण्यात अजित पवार या...

सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपुख्यमंत्री

Image
 वहिनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री  घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे  नवरा अकस्मात गमावण्याचे अपार दुःख असतानाही सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवऱ्याच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी त्यांनी पदर खोचून पुन्हा सार्वजनिक जबाबदारी स्वीकारली. आयुष्यभर शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी कार्य करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार दुर्दैवी विमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेले. त्या अपघातानंतर घटनास्थळी उडालेली कागदपत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळली जणू संपूर्ण व्यवस्था कोलमडल्याचेच ते प्रतीक होते. कदाचित खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.  अतिशय  मनावर दगड ठेवून अथवा व्यक्तिगत मत बाजुला ठेवुन सहकाऱ्याच्या आग्रहा खातर सुनेत्रा पवार यांना शपथविधी उरकून घ्यावा लागला   त्यांनी हे पद इतक्या लवकर स्वीकारणे योग्य होते की नाही, याबाबत मतभेद असू शकतात आणि ते स्वाभाविकही आहेत. अजित पवारांचे दशक्रिया विधी अजून झाला नाही. आगोदर “अजित पवारांनंतर काय?”, “राष्ट्रवादी काँग्...

स्वतःचे घर उभे करुन संसार थाटणारा "दादा" आता फक्त आठवणीत

Image
स्वतःचे घर उभे करूनच संसार थाटणारा ‘दादा’… आता फक्त आठवणींत जिवंत राहुरी | घाडगे न्यूज ✍️ शिवाजी घाडगे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले अकाली निधन म्हणजे केवळ एका नेत्याचा अंत नाही; तो लाखो कुटुंबांच्या काळजावर उमटलेला खोल घाव आहे. कणखर निर्णय, रोखठोक शब्द, मिश्किल स्वभाव आणि सर्वसामान्यांशी घट्ट नातं जपणारा हा नेता आज प्रत्यक्षात नाही… उरल्या आहेत त्या केवळ आठवणी, अश्रू आणि न संपणारी हुरहूर. आज ‘दादा’ हे नाव घेताच डोळ्यांसमोर सत्ता, पद, राजकारण उभं राहतं. पण या सगळ्या यशाच्या झगमगाटामागे एक अतिशय साधं, कष्टकरी, मातीशी नाळ जोडलेलं आणि संवेदनशील मन दडलेलं होतं—जे आयुष्यभर आपल्या माणसांना, आपल्या गावाला आणि आपल्या मुळांना विसरलं नाही. दादांचं बालपण देवळाली प्रवऱ्याच्या मातीत घडलं. आजोळचा तो वाडा, मामाकडची शेती-वाडी, एकत्र कुटुंबाची ऊब, पाटपाण्याखालची हिरवीगार बागायत… त्या काळात देवळाली प्रवरा हे परिसरातील समृद्ध, गजबजलेलं आणि बोलकं गाव होतं. राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या वैभवामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली होती. ऊस फवारणीसाठी उडणारी छोटी हेलिकॉ...