Posts

मंत्रालय की लाचालय सांगाना न्याय कोठे मागायचा?

Image
 मंत्रालय की लाचालय सांगाना न्याय        कुठे मागायचा ? घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट   ॥ शिवाजी घाडगे ॥ राज्यकारभाराचा किल्ला… सत्तेचे केंद्र… जनतेच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक  तेच मंत्रालय. आणि त्याच मंत्रालयात, मंत्र्यांच्या कार्यालयातच लाच घेताना कर्मचारी रंगेहात पकडला जातो! ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही; हा व्यवस्थेवरचा सार्वजनिक अविश्वासाचा शिक्का आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने छापा टाकून कार्यालय सील केले, ही बातमी धक्कादायक आहे. परवाना नूतनीकरणासाठी ५० हजारांची मागणी, त्यातील ३५ हजारांची रंगेहात वसुली  आणि तेही मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर! म्हणजे भ्रष्टाचाराने आता दरवाजे तोडून आत शिरण्याची गरजच उरलेली नाही; तो खुर्च्यांवर बसून व्यवहार करत आहे.  प्रश्न फक्त एका लिपिकाचा आहे का? प्रत्येक वेळी सूत्र एकच असते — “कर्मचारी दोषी आहे, मंत्री अनभिज्ञ आहेत.” पण प्रश्न असा आहे की, मंत्र्यांच्या दालनात होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी कोणाची? खाजगी सचिवांचे नाव पुढे ये...

नविन तुती लागवडी साठी अर्ज करा

Image
नवीन तुती लागवडीसाठी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी – संदीप आगवणे घाडगे न्यूज | प्रतिनिधी रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकतो. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असून अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष उत्पादनाची कामे सुरू आहेत. रेशीम उत्पादनांना दिवसेंदिवस वाढती मागणी असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा रेशीम ...

नरेश आरोरा विषयी आरडाओरड

Image
नरेश आरोरा याच्या विषयी आरडाओरड  चर्चा।शिवाजी घाडगे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आपघातात आकाली निधनानंतर राजकीय सल्लागार नरेश आरोरा याच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे राष्ट्रवादी दादा गटाच कॅपियन हा अरोरा करीत होता गुलाबी रंग हा यांनीच आणला आता या कंपनीला पुढे मुदत वाढ देण्यात येईल की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून स्थानिक व परप्रांतीय असा वाद निर्माण केला जातोय? तसे राजकारणात काही व्यक्ती निवडणूक लढवत नाहीत भाषणांच्या सभा घेत नाहीत,  तरी त्यांच्या नावाभोवती निर्माण होणारा गदारोळ अनेक उमेदवारांपेक्षा मोठा असतो. नरेश ओरोरा हे त्यापैकीच एक नाव. साधारण 2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नरेश अरोरा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी नरेश अरोरा यांची 'डिझाइनबॉक्स' ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली गेली.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबत सुरू असलेली आरडाओरड ही केवळ व्यक्तीविषयी नाही, तर ती राजकीय सल्लागारांच्या वाढत्या प्रभावाविषयी आहे. आरडाओरडीचे नेमके कारण काय? ओरोरा हे व...

अहिल्यानगरात काॅफी रेव्ह पार्टी निवेदनानंतर रद्द

Image
अहिल्यानगरात प्रस्तावित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द; निवेदनानंतर रद्द  घाडगे न्यूज। प्रतिनिधी  मोठ्या शहरांमध्ये अधूनमधून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होत असल्याच्या घटना समोर येत असतात. अशा कार्यक्रमांचे नियोजन प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मर्यादित गटांमध्ये केले जाते. काही ठिकाणी अशा कार्यक्रमांवर कारवाई झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये “कॉफी रेव्ह पार्टी” नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रसारित झाली. ही बाब काही हिंदू संघटनांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवार, १४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) रोजी नगर शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. संबंधित जाहिरातीत महाविद्यालयीन तरुणींसाठी कमी शुल्कात प्रवेश दिला जाणार असल्याचा उल्लेख होता. तसेच संपर्कासाठी काही क्रमांकही देण्यात आले होते. सदर कार्यक्रमाबाबत संभाव्य गैरप्रकारां...

दादा गेले पण प्रश्नाचे वादळ थांबेना

Image
 दादा गेले… पण प्रश्नांचे वादळ थांबेना घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा कायमअसताना. मात्र या दुःखद घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काही चर्चांमागे त्यांच्या निधनानंतर उसळलेल्या प्रचंड सहानुभूती आणि लोकप्रियतेची धार बोथट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. दादा आज आपल्यात नाहीत; पण त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येकजण स्वतःला अधिक शहाणा ठरविण्याच्या स्पर्धेत उतरल्याचे चित्र दिसते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी कधी घ्यायला हवा होता, दहावा-तेरावा झाल्यानंतर घ्यायला हवा होता का, यावरही चर्चा रंगवली जात आहे. दादांच्या जाण्यानंतर घरातील नेतृत्व कोण स्वीकारणार, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र अशा चर्चांमधून नेमके काय साध्य होणार, याचाही विचार व्हायला हवा. दादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नाही, तर एका शैलीचे, एका कार्यपद्धतीचे आणि...

राहुरीत आमदार नाही महामार्ग साडेसाती त्यात आता हेल्मेट सक्ती

Image
राहुरीत आमदार नाही अधिकारी मुजोर?  महामार्ग  साडेसाती कधी संपणार त्यात हेल्मेट सक्ती! घाडगे न्यूज। प्रतिनिधी  राहुरी तालुक्याला सध्या आमदार नाही, आणि याच संधीचा गैरफायदा घेत अधिकारी वर्ग अधिकच शिरजोर झाला आहे का, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. नगर–मनमाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. गेली अनेक वर्ष झाले काम सुरु आहे  कडेने गॅस पाईपलाईन गेली ती पुर्ण झाल्यावर काम पूर्ण होईल अशी चर्चा आहे   दररोज जीवघेणे अपघात, मृत्यू, जखमी—परंतु प्रशासन मात्र अजूनही ढिम्मच आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारी अवजड वाहने, नियम धाब्यावर बसवलेले ढपर, क्षमतेपेक्षा अधिक भार—या सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना राहुरी पोलीस केवळ हेल्मेट तपासणीपुरतेच आपले कर्तव्य मर्यादित ठेवत असल्याचे चित्र आहे. नियम पाळणे गरजेचेच आहे; मात्र फक्त गोरगरीब शेतकरी, कामगार, दुचाकीस्वार यांनाच लक्ष्य करून कारवाई करणे म्हणजे सोपी शिकार नाही का? तालुक्यात अवैध व्यवसायांचे पेव फुटलेले असताना त्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिसांकडे आहे का, असा थेट प्रश्...

मुस्कान पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केले कौतुक

Image
अप्पर पोलीस महासंचालक  कृष्ण प्रकाश  यांच्याकडून राहुरी पोलीस ठाण्यातील टीम मुस्कान चे कौतुक   सोमवारी नगर जिल्ह्याच्या तपासणी साठी आलेले अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  राहुरी पोलीस स्टेशन  चे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुटका करत अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करत मुदतीत  न्यायालयात दोषारोप पाठवत कारवाई केल्या बाबत संपूर्ण राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले  तसेच बेलवडी पोलीस ठाण्यात देखील पो नि संजय ठेंगे यांची कामगिरी कौतुकास्पद राहीली.