Posts

खासदार प्रियंका गांधी यांना आर्शिवाद....

Image
खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांना पंतप्रधान होण्याचा बाबाचा आर्शिवाद  घाडगे न्यूज स्पेशल।शिवाजी घाडगे। आशीर्वाद, प्रतिमा आणि वास्तवाची राजकारणातली कसोटी कामाख्या मंदिराच्या पायऱ्यांवर दिलेला आशीर्वाद आणि दिल्लीच्या सत्तेचा दरवाजा — या दोन्हींत किती अंतर आहे? प्रियंका गांधी- वढेरा  यांना महाकाल बाबा आणि भैरवनाथ बाबांनी पंतप्रधानपदासाठी आशीर्वाद दिल्याची चर्चा रंगली, आणि त्या क्षणी भारतीय राजकारणात प्रतीकांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पण प्रश्न असा आहे की, आशीर्वादाने नेतृत्व घडते की नेतृत्वाच्या क्षमतेने आशीर्वाद अर्थपूर्ण ठरतो? प्रियंका गांधी या करिष्माई वक्तृत्व, ठाम देहबोली आणि जनसंपर्काच्या कौशल्यामुळे चर्चेत राहतात. अनेकांना त्यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी दिसते. परंतु केवळ साम्य पुरेसे नसते; त्या काळाचा राजकीय संदर्भ, पक्षाची ताकद आणि जनमानसाचा विश्वास हे घटक वेगळे असतात. इंदिरा गांधींना लाभलेली राजकीय पार्श्वभूमी आणि आजची काँग्रेसची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. खासदार राहुल गांधी यांच्याबाबत विरोधकांनी “पप्पू” अशी प्रतिमा उभी क...

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर संभागृह

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन; ५८ वर्षांनंतर नावाचा सन्मान      घाडगे न्यूज ॥शिवाजी घाडगे ॥           महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुसज्ज सभागृह उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांचे नावाचे संभागृह या विद्यापीठाला लाभण्यासाठी तब्बल ५८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली, ही बाब खेदजनकच म्हणावी लागेल. महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करण्यास एवढा विलंब का झाला, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. उशिरा का होईना, हा निर्णय झाला; मात्र तो अधिक आधी व्हायला हवा होता, हेही तितकेच सत्य आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभेच्या प्रचारसभेदरम्यान या परिसरात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. फळांपासून ज्यूससारखी उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळू शकते. त्य...

माझी वसुधरात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर

Image
माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल !  तीन ग्रामपंचायतींना दीड कोटींचे पुरस्कार जाहीर प्रतिनिधी ॥  ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.  या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरा...

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन नवीन तहसील कार्यालय

Image
महाराष्ट्र शासनाचा निर्णय : अहिल्यानगर जिल्हात दोन नवीन तहसील कार्यालयांना मंजुरी.        बेक्रींग । घाडगे न्यूज । अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनिक सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दोन नवीन तहसील कार्यालयांना मंजुरी दिली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव आणि अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू होणार असून, यामुळे स्थानिक नागरिकांना महसूल व प्रशासनाशी संबंधित कामांसाठी होणारी धावपळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. घोडेगाव येथे नवीन तहसील कार्यालय नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना जमीन, महसूल, उत्पन्न दाखले, वारस नोंदी आदी कामांसाठी तालुक्याच्या मुख्यालयावर जाण्याची गरज कमी होईल. स्थानिक पातळीवर प्रशासन उपलब्ध झाल्याने विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राजूरला तहसील कार्यालय; राजकीय समीकरणांची चर्चा अकोले तालुक्यातील राजूर येथेही स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. या निर...

शेतात राबविण्यात महिला अग्रगण्य कृषी मंत्री दत्ता भरणे

Image
शेतीच्या कामात महिलाचा सहभाग अग्रण्य   कृषि मंत्री दत्तात्रय भरणे घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे संशोधनाचे काम उत्तम असून. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम  दीपस्तंभासारखे आहे.  शेतीतात राबणारा मध्ये महिला भगिनी अग्रगण्य आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषि विभागांतर्गत आपण 50 हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबवत आहोत. शेतकर्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरो घरी, समृद्धी येईल गावो गा...

नसिफा अब्दुल सत्तार यांचे निधन

Image
नफिसा अब्दुल सत्तार बेगम यांचे दुःखद निधन सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम पत्न  होत . त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. नसिफा सत्तार  केवळ आमदारांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर सिल्लोडच्या राजकारणातील एक सक्रिय व प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना मिळाली होती. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांविषयी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहराने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात गिते यांच्या नियुक्तीचे गित सुरुच....

Image
राहुरी पोलिस ठाण्यात प्रल्हाद गिते यांच्या बदलीचे गित सुरुच   चर्चा ।शिवाजी घाडगे  राहुरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली. मात्र ही बदली नेमकी नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दिलासा, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुरीत अवघ्या आठ दिवसांपूर्वी नगरहून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना सोनई पोलीस ठाण्यातील खातेनिहाय चौकशीमुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर गिते यांची राहुरीत एंट्री झाली. परंतु गिते यांच्याविरोधातही चौकशीचे सावट असल्याने ते राहुरीत किती दिवस टिकणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. नगर तालुक्यातील गंभीर आरोप नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना गिते यांनी खुनाचे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप आहे. अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय ४२) यांना ६ मार्च २०२५ रोजी निघृण मारहाण झाली. उपचारादरम्यान २३ मार्च रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. इतक्या गंभीर घटनेनंतरही सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल...