Posts

कणगर येथे वाघाचा बबन कदम यांच्यावर हल्ला

Image
कणगर येथे वाघाचा इसमावर हल्ला; बबन कदम जखमी राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात शुक्रवारी रात्री वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात बबन कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कणगर येथील तांभेरे, वरघुडे व शेटे वस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बबन कदम हे परिसरातून जात असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करत मदतीस धाव घेतली. त्यानंतर जखमी अवस्थेत कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर कणगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच शेतात किंवा मोकळ्या परिसरात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन कणगरचे संरपंच सर्जेराव घाडगे यांनी केले आहे   वाघाचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  परिसरात सतर्कता वाढवली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे पिच्छे मूड

Image
नाशिक चे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पिच्छे मुड  राज्यातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी  बदल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या बदलीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता कराळे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ही बदली करण्यात आल्याने राजकीय तसेच पोलीस वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित प्रशासकीय बदल्यांचा भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात असले, तरी काही अलीकडील घडामोडींमुळे या बदल्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यापूर्वी अशोक खरात प्रकरणात दत्ता कराळे यांचे कथित संबंध असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर कराळे यांच्या बदलीकडे संशय...

गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी संख्या 16 वर पोहचली

Image
गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींची संख्या १६ वर @प्रतिनिधी  बेकायदेशीर सोनोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश; पाच डॉक्टरांसह आरोपी जाळ्यात राहाता तालुक्यात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली असून, त्यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश आहे. गर्भलिंग तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनच्या साखळीचा उलगडा करण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफी मशीनचा उपयोग गर्भातील बाळाची व रुग्णांची अचूक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी केला जातो. मात्र, याच यंत्रांचा गैरवापर करून गर्भलिंग निदानाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात यापूर्वी १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तीन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. तपासादरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर ...

राहुरी खुर्द तीव्र पाणीटंचाई विरोधात महिला अक्रमक

Image
राहुरी खुर्दमध्ये पाणी मिळत नाही  ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त महिलांनी ठोकले टाळे राहुरी ।   राहुरी खुर्द  तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थ हैराण झाले   असून संतप्त रहिवाशी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन बुधवारी करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आदोलन छेडले  “जोपर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपस्थित नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यही कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलां म्हणाल्या की, “आम्ही नियमितपणे व वेळेवर पाणीपट्टी भरत आहोत. मात्र तरीही नागरिकांना पुरे...

तटकरे सिल्व्हर ओक वर भेटीला

Image
तटकरे यांच्या ‘सिल्व्हर ओक’ वर भेटीला  सिल्व्हर भेटी।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात काही भेटी या केवळ शिष्टाचारापुरत्या नसतात; त्या अनेक राजकीय संकेत देऊन जातात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे  यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे घेतलेली भेट ही अशाच प्रकारची मानली जात आहे. वरकरणी साधी वाटणारी ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. अजित पवार यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली. त्यानंतर सत्तेतील समीकरणे बदलली, निष्ठा बदलल्या आणि अनेक नेत्यांचे राजकीय वजन नव्याने मोजले जाऊ लागले. या प्रक्रियेत सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनाही सतत राजकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षांतर्गत कोडमारी, सोशल मीडियावरील टीका, विविध वादांमध्ये नाव ओढले जाणे आणि कार्यकारिणीतील बदलांच्या चर्चा यामुळे तटकरे यांच्याभोवती अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी...

कांदा व लसूण पिकांवर कृत्रिम तंत्रज्ञान संशोधन हवे-कुलगुरु विलास खर्चे

Image
कांदा व लसुन या पिकांच्या संशोधनामध्ये आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आवश्यक - कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी । महाराष्ट्रामध्ये कांदा पिकातील 40% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाखाली असून रब्बी हंगामासाठी फुले स्वामी हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. कांदा व लसूण या पिकांमधील निर्यातक्षम वाणासाठी रंग, साईज व टिकवणक्षमता यावर अधिक काम करण्याची गरज आहे. आपल्याला काटेकोरपणे खते व औषधांचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कांदा आणि लसूण पिकांवरील 17 व्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी  अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत असलेले राष्ट्...

विचारांचे उत्तर विचारांनीच...

Image
विचारांना उत्तर विचारांनीच… एका मेका गच्चाडू अवघी फेकू शाई   रणसंग्राम।शिवाजी घाडगे  लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कधी राजकीय मंचावरून व्यक्त होतो, तर कधी सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर भाष्य करताना समोर येतो. मात्र, मतभेदांचा सामना करताना संयम, संवाद आणि विवेक या मूल्यांची जपणूक होणे तेवढेच आवश्यक असते. अलीकडे विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक  अथवा काळे वंगण फेकल्याची घटना  ही केवळ एका व्यक्तीवरील प्रतिक्रिया नसून समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक मानावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी ह भ प संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. मात्र, ही केवळ शाईफेक नसून काळे वंगण अंगावर ओतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदाय, काही कीर्तनकार आणि धार्मिक प्रवचनांच्या देवघेव पद्धतीबाबत भाष्य केले होते. काही महाराजांच...