Posts

मुख्यमंत्री बदलण्याच्या वावड्या कशासाठी

Image
मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या कशासाठी राजरंग।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. काही इलेक्ट्रॉनिक माध्यमे, यूट्यूब वाहिन्या आणि सोशल मीडियावरील तथाकथित राजकीय विश्लेषक गेल्या काही दिवसांपासून "मुख्यमंत्री बदलणार", "दिल्लीत  राजकीय भूकंप" अशा मथळ्यांनी वातावरण तापवत आहेत. परंतु या चर्चांचा वस्तुस्थितीशी कितपत संबंध आहे, हा खरा प्रश्न आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात "ब्रेकिंग न्यूज" देण्याच्या नादात अनेक माध्यमांनी सत्यापेक्षा सनसनाटीला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. एखादा नेता दुसऱ्या नेत्याला भेटला, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, एखाद्या सूत्राने माहिती दिल्याचा दावा केला किंवा सोशल मीडियावर अफवा पसरली की त्यावर तासन्तास चर्चा सुरू होते. प्रत्यक्षात कोणताही अधिकृत निर्णय नसतानाही अनेक माध्यमे मुख्यमंत्री बदल निश्चित झाल्याप्रमाणे चित्र रंगवतात. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी आणि जबाबदार पत्रकारितेसाठी धोकादायक आहे. मुख्यमंत्री बदल हा एखाद्या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसार...

भेसळ दुधाचा जनतेच्या जीवाशी खेळ सुरु

Image
 भेसळ दुधाचा जनतेच्या जीवाशी  खेळ   भेसळ। शिवाजी घाडगे "दूध" हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर शुद्धता, पवित्रता, आरोग्य आणि पोषण यांचे चित्र उभे राहते. आईच्या दुधानंतर मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा आहार म्हणून दुधाकडे पाहिले जाते. नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात दुधाला अनन्य महत्त्व आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो. "श्वेतक्रांती"ने देशाला आत्मनिर्भर बनविले, लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. मात्र आज या श्वेतक्रांतीलाच भेसळीच्या काळ्या सावलीने ग्रासले आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही केवळ एक गुन्हेगारी कारवाई नाही; तर ती आपल्या अन्नसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि समाजात बोकाळलेल्या नफेखोरीच्या विकृत मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे. ही कारवाई उघड करते की काही लोक अवघ्या काही रुपयांच्या रासायन...

कृषी उद्योजक फोरम हिताचा कुलगुरु डॉ विलास खर्चे

Image
कृषी उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी आशादायक उपक्रम – कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज।प्रतिनिधी  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेला कृषी उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि भविष्याभिमुख उपक्रम असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ महाविद्यालयांमार्फत तो प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक कलाचा अभ्यास करून त्यानुसार या फोरमच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा विद्यापीठाचा अत्यंत आशादायक प्रकल्प असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती’ या विषयावरील एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. वि...

तडीपार आदेश धाक की केवळ कागदोपत्रीच कारवाई ?

Image
तडीपार आदेशांचा धाक की केवळ कागदोपत्री कारवाई? घाडगे न्यूज | विशेष प्रतिनिधी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सराईत गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ६८ सराईत आरोपींना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने ही मोठी प्रतिबंधात्मक कारवाई मानली जात असली, तरी या कारवाईच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही आरोपींकडूनच पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना संरक्षणाची गरज का भासते? त्यामागे नेमकी कारणे कोणती? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत राहुरी, सोनई, नेवासा, राहाता, संगमनेर, अकोले, शिर्डी आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या आरोपींचा समावेश आहे. यापैकी सहा आरोपींना केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातून, तर काहींना अह...

तीन बायका अमिरीला भुलल्या

Image
 तीन बायका अमिरीला भुलल्या ... चालय काय। शिवाजी घाडगे चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकारणी, उद्योगपती किंवा इतर कोणतीही सार्वजनिक व्यक्ती ही आपल्या कार्यामुळे लोकांच्या चर्चेचा विषय ठरते. त्यांच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर समाजात मतमतांतरे व्यक्त होत असतात. सोशल मीडियाच्या युगात ही चर्चा आणखी वेगाने पसरते. परंतु प्रत्येक चर्चेच्या केंद्रस्थानी एक मूलभूत प्रश्न उभा राहतो सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? कोणत्याही व्यक्तीचे लग्न, घटस्फोट किंवा पुनर्विवाह हा कायद्याच्या चौकटीत घेतलेला वैयक्तिक निर्णय असतो. सार्वजनिक व्यक्तींनी घेतलेल्या अशा निर्णयांवर लोक प्रतिक्रिया देतात, कारण त्यांना अनेक जण आदर्श मानतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर चर्चा होणे स्वाभाविक असले, तरी ती चर्चा तथ्याधारित, सभ्य आणि व्यक्तीच्या सन्मानाचा आदर राखणारी असणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रासह देशभरात विवाहसंस्थेसमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. हजारो तरुणांचे विवाह आर्थिक अस्थिरता, बेरोजगारी, वाढता खर...

राहुरीत एकल महिला व बालकांच्या योजना प्रभावी राबविणार

Image
राहुरीत एकल महिला व एकल बालकांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय; विविध योजनांच्या प्रभावी राबविणार  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीची महत्त्वपूर्ण सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. यात तालुक्यातील एकल महिला आणि एकल बालकांच्या विविध समस्या, त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच त्यांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले तसेच 'साऊ' एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस उपस्थित होते. सभेत तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या महिलांची अचूक ...

महात्मा फुले परिसरात हरित अभियान डाॅक्टर विलास खर्चे

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘फुले हरित अभियान’ची सुरुवात जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व; कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन घाडगे न्यूज।प्रतिनिधी   जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप रोखली जाते तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. याच उद्देशाने यावर्षीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात व्यापक स्वरूपात वृक्षलागवड करण्यासाठी ‘फुले हरित अभियान’ सुरू करण्यात येत असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणलोट क्षेत्र विकास व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पाणलोट क्षेत्र परिसरात तसेच उद्यानविद्या प्रक्षेत्रावर ‘फुले हरित अभियान’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे ...