Posts

जंतर-मंतरवर तरुणाईचा हुंकार

Image
जंतर-मंतरवर पुन्हा तरुणाईचा हुंकार?   तरंग।शिवाजी घाडगे  देशाच्या राजकारणात अनेक आंदोलने झाली, अनेक नेते आले-गेले; पण जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. सध्या नीट  परीक्षा, विद्यार्थ्यांचे भविष्य, वाढता मानसिक ताण आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे देशातील युवकांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काॅकोरज पार्टीचे अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरून केंद्र सरकारविरोधात उघडलेला मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुणांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात असला, तरी या पाठिंब्याचे प्रत्यक्ष आंदोलनात किती रूपांतर होते, हा खरा प्रश्न आहे. कारण सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि जनआंदोलनातील ताकद यामध्ये मोठा फरक असतो. आज देशातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. गावाकडील पालक कर्ज काढून मुलांना शहरात शिकवतात. मुलांच्या यशस्वी...

पत्रकारांचे भुषण हरपले

Image
पत्रकारितेतील ‘भूषण’ हरपले... भूषण।शिवाजी घाडगे  मृत्यू कोणत्या रूपाने समोर येईल, हे कुणालाच सांगता येत नाही. मात्र आपल्या आवडत्या कामात, आपल्या ध्यासात आणि समाजासाठी ज्ञानदान करत असताना मृत्यूने कवेत घेणे, हे फारच विरळा नशिबी येते. अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि वारसा संवर्धन चळवळीचे प्रणेते भूषण देशमुख यांच्या निधनाने नगर जिल्ह्याने केवळ एक पत्रकार गमावलेला नाही, तर आपल्या इतिहासाचा एक चालता-बोलता ग्रंथच हरवला आहे. भुईकोट किल्ल्यावर इतिहासाची माहिती देत असताना झालेला सर्पदंश आणि त्यानंतर आलेले निधन हा केवळ एक अपघात नाही; तर आपल्या वारशासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीच्या कार्याचा कळसाध्याय आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले. इतिहास सांगताना, वारसा जपण्याचा संदेश देताना आणि समाजाला ज्ञानाचा प्रकाश देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पत्रकारिता क्षेत्रात वेग, स्पर्धा आणि प्रसिद्धीची धडपड वाढत असताना भूषण देशमुख यांनी पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप दिले. त्यांनी कधीही पत्रकारितेचा वापर वैयक्तिक लाभासाठी केला नाही. सत्तेच्या...

शाब्बास शहाबाज शाब्बास...

Image
शाब्बास शहाबाज... शाब्बास! राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आणि महायुतीने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या बिनविरोध निवडीमागील पडद्यामागच्या घडामोडी पाहिल्या तर अनेक राजकीय धागेदोरे उलगडताना दिसतात. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत चर्चेत आलेले नाव म्हणजे एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद. विधान परिषद निवडणुकीतील सर्व गणिते जुळून आली आहेत, असे वाटत असतानाच दत्तात्रय पानसरे यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नसल्याचा दावा करून प्रशासन आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडवली. तब्बल सहा तास जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण झालेल्या या पेचामुळे बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला आणि पानसरे यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त झाला. राजकारणात अंकगणित जितके महत्त्वाचे असते तितकेच संवादाचे राजकारणही महत्त्वाचे असते. पानसरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि संवादाची दारे खुली ठे...

अखेर भाजपाचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झालेच...

Image
अखेर प्राजक्त तनपरेआ यांना आमदारकीचा बिनविरोध गुलाल  राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून हा क्षण राहुरीच्या राजकीय इतिहासात सुर्वण अक्षरानी कोरला जाईल व राहुरीचे राजकारण पुन्हा तनपुरे कुटुंबा भोवती आले  श्रध्दा व सबुरीचा फायदा प्राजक्त तनपुरे यांना झाला असून   उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर इतर सर्व प्रतिस्पर्धी मैदानातून बाहेर पडल्याने तनपुरे यांना बिनविरोध आमदार होण्याचा मान मिळाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना इतक्या लवकर विधान परिषदेची संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि त्याचे फलित बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या...

जिल्ह्यातील पोलीस दादा बदल्याना मुर्हुत

Image
अहिल्यानगर पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांना अखेर मुहूर्त  घाडगे न्यूज @प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतीक्षित प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुरुवारी  पोलीस मुख्यालयात विनंती बदली बैठक   प्रक्रियेत राबविण्यात आली  जिल्ह्यातील सुमारे 300 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.    जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अंमलदारांकडून यापूर्वीच बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या तीन ठिकाणांचा उल्लेख करून अर्ज सादर केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, 30 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया खोळबली  होती. पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन यांनी प्रलंबित प्रक्रिया पुन्हा गतीमान केली असून बदलीपात्र अंमलदारांना गुरुवारी सकाळ पासून ...

प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध आमदारकीला सहीची आडकाठी?

Image
प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोधला सहीची आडकाठी? राजरंग।शिवाजी घाडगे  नामनिर्देशनपत्र माघारी प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक पेचामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली । अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात अनपेक्षित घडामोडी घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली असतानाच नामनिर्देशनपत्र माघारी प्रक्रियेदरम्यान सहीच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या नामनिर्देशनपत्र माघारीबाबत आवश्यक असलेल्या सहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. पानसरे यांचा अर्ज वैध राहणार की माघारी मान्य होणार, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघाल...

भाजपाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोध गुलाल?

Image
भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोधचा गुलाल? घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत नगराध्यक्ष करण ससाणे आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. उर्वरित उमेदवार कमलेश गांधी आणि दत्तात्रय पानसरे यांची मनधरणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. करण ससाणे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दोन्ही उमेदवारांनीही माघार घेतल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होईल. त्यामुळे विधान परिषदेत अहिल्यानगरचे खाते प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने उघडले जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  यांच्यावर अहिल्यानगर जागेची जबाबदारी सोपविली होती. स्थानिक पातळीवरील समन्वय साधत त्य...