खुर्चीला महत्व आणि बदलते चेहरे
खुर्चीचा महिमा आणि बदलणारे चेहरे बदल ।शिवाजी घाडगे शासकीय सेवेत बदली ही नित्याची बाब असते. काल एका ठिकाणी असलेला अधिकारी आज दुसऱ्या ठिकाणी असतो आणि उद्या आणखी कुठे. मात्र या बदल्यांमुळे केवळ कार्यालयांचा पत्ता बदलत नाही, तर अनेकांच्या वागणुकीचे रंगही बदलतात. अलीकडे झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर दिसणारे चित्र पाहिले की "खुर्चीला महत्त्व असते" ही म्हण किती वास्तववादी आहे याची पुन्हा एकदा खात्री पटते. कालपर्यंत नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडे फारसे फिरकणारे नसतात. एखाद्या कामासाठी फोन केला तर प्रतिसाद मिळेलच याची खात्री नसते. अनेकांना त्यांची आठवणही नसते. मात्र तेच अधिकारी एखाद्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी बनले की अचानक शुभेच्छुकांची रांग लागते. पुष्पगुच्छ, सत्कार, अभिनंदनाचे फलक आणि सोशल मीडियावरील पोस्टचा अक्षरशः पूर येतो. जणू काही अधिकाऱ्याची नव्हे, तर खुर्चीचीच पूजा सुरू झालेली असते. हे वास्तव केवळ पोलीस विभागापुरते मर्यादित नाही. समाजात सर्वच क्षेत्रांत व्यक्तीपेक्षा पदाला अधिक महत्त्व दिले जाते. अधिकार असेपर्यंत माणसाभोवती...