Posts

तामिळनाडूचे खरे नायक विजय थलापती

Image
 तामिळनाडूचा निकाल… राजकारणाला नवा दिशादर्शक राजरंग।शिवाजी घाडगे  तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता नेते विजय थलापती यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या राजकीय घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद देत, नव्या चेहऱ्याने आणि नव्या आश्वासनांनी मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता या निकालातून दिसून आली. हा निकाल केवळ सत्तांतराचा नसून, जनतेच्या अपेक्षांमध्ये होत असलेल्या बदलांचा संकेत मानावा लागेल. या निवडणुकीत लोकाभिमुख योजनांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. महिलांसाठी मासिक आर्थिक मदत, बेरोजगारांसाठी भत्ता, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, तसेच सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना या सगळ्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. या योजनांमुळे केवळ आश्वासनांची यादी नव्हे, तर “सरकार आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष मदत करू शकते” हा संदेश पोहोचवण्यात यश आले. याहून महत्त्वाची बाब म्हणजे, विजय यांनी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासह संविधानिक मूल्यांचा उल्लेख करत दिलेला संदेश. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन त्याला आमदार बनवणे ही कृती प...

अक्षय कमळाच्या विजयात दडली जबादारीची जाणीव

Image
 अक्षय कमळाच्या विजयात  दडलेली जबाबदारीची जाणीव  राजरंग।शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हा केवळ एका उमेदवाराच्या विजयापुरता मर्यादित नाही, तर तो स्थानिक राजकारणातील भावनिक लाट, पक्षनिष्ठा आणि वारशाच्या सातत्याचा महत्त्वाचा दाखला ठरला आहे. आमदार अक्षय कर्डीले यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा भाजपासाठी गड कायम राखणारा ठरला, पण त्यामागे असलेल्या भावना आणि वास्तव याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी अजून भरून निघालेली नाही. त्यांनी उभारलेली राजकीय ताकद, मतदारांशी असलेला जिव्हाळा आणि विकासकामांची परंपरा यामुळेच राहुरीत ‘कमळ’ पुन्हा फुलले होते. त्याच वारशाची धुरा आता त्यांच्या पुत्राच्या खांद्यावर आली आहे. मात्र, वारसा मिळवणे जितके सोपे दिसते, तितके तो टिकवणे कठीण असते हे वास्तव नव्या आमदारांसमोर उभे आहे. या निवडणुकीत सहानुभूतीची लाट, पक्षयंत्रणेची ताकद आणि राज्य-केंद्रातील सत्तेचा प्रभाव हे सर्व घटक अक्षय कर्डीले यांच्या बाजूने होते. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून सर्वतोपरी प्र...

राहुरीचे आमदार अक्षय कर्डीले

Image
राहुरीचे आमदार अक्षय कर्डीले  राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाचा गड कायम राखला आहे. कर्डीले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर तब्बल १,१२,५८७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. आहे अक्षय कर्डीले यांनी भाजपा युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पुर्ण केली असून जिल्हा सहकारी बँक चे संचालक म्हणून देखील काम केले असून  लेकरासाठी आई फिरली मतदारसंघात… दुःख बाजूला ठेवून उभा राहिलेला संघर्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी चित्र संपूर्ण मतदारसंघाने अनुभवले. पतीच्या निधनाचे दुःख मनात दडपून, लेकराच्या भवितव्यासाठी आई स्वतः रस्त्यावर उतरली… आणि याच भावनिक क्षणांनी प्रचाराला वेगळीच ऊर्मी दिली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आयुष्यभर जनतेसाठी झटणारे कर्डीले यांनी जवळपास तीस वर्षे आमदार म्हणून काम केले, पण त्यांनी कधीच घराचा उंबरठा ओलांडून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नव्हता. मात्र परिस्थिती बदलली… आणि त्याच घरातून...

उद्या मतदान यंत्रातून येणार राहुरीचा आमदार

Image
उद्या मतदान यंत्राच्या पोटातून येणार राहुरीचा आमदार घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी ४ एप्रिल रोजी जाहीर होणार असून, राहुरी कॉलेज येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, राहुरीचा पुढील आमदार कोणत्या पक्षाचा असेल हे उद्या स्पष्ट होणार आहे. अक्षय कर्डीले यांना वाढदिवसां निमित्त आमदारकीची गिप्ट मिळणार की वेंकटरमना गोविंदा  होणार हे समजायला अवघा एक दिवस उरला आहे  या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अर्थव म्हसे आणि महेश हापासे यांनी आपले नशीब आजमावले आहे. एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी सुमारे ५०.७५ टक्के म्हणजेच अंदाजे १लाख ६९ हजार ४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा प्रतिसाद मध्यम असला तरी निवडणुकीची चुरस कायम राहिली आहे. रिंगणात सहा उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्...

अण्णा एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत , पण आठवणींचा अनंत प्रकाश

Image
अण्णा… एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत, पण आठवणींचा अनंत प्रकाश         @शिवाजी घाडगे “अण्णा…” ही हाक आजही कानात घुमते आहे. पण आता ती फक्त आठवणीत उरली आहे. आजच्या धावपळीच्या, बदलत्या काळात “अण्णा” अशी आपुलकीची, जिव्हाळ्याची हाक ऐकायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. डोक्यावर साधी टोपी, अंगात पायजमा-शर्ट किंवा तीन गुड्याचा सदरा, चेहऱ्यावर शांतता, वागण्यात संयम, बोलण्यात मितपणा आणि मनात अपार कर्तव्यभाव ही ओळख ज्या व्यक्तिमत्त्वाची होती, ते म्हणजे आमचे आधारवड सिताराम रंगनाथ घाडगे (वय ८४). राहुरी फॅक्टरी परिसरातील मुळा कॉलनीत वास्तव्यास असलेले अण्णा यांचे मूळ गाव कणगर. कणगर-तांभेरे रस्त्यावरील माळावर वसलेल्या साध्या मातीच्या छपरात त्यांचा जन्म झाला. वडील रंगनाथ बाबुराव घाडगे आणि आई जयाबाई यांच्या कुटुंबात नऊ अपत्यांचा मोठा परिवार रामचंद्र, सोन्याबापू, सिताराम, बन्सी, गोरक्षनाथ, मच्छिंद्र असे सहा भाऊ आणि विठ्ठाबाई, किसनबाई, लक्ष्मीबाई या तीन बहिणी. अजून आयुष्य समजायचं बाकी असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि संसाराच्या आभाळाला भेग पडली. त्या एका घटनेने घरात अंधार दाटला. पण आई ...

मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी करारावर सहमती बैठक

Image
मुंबई येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत  संवर्धित  शेतीसाठी संशोधन करार संपन्न घाडगे न्यूज @प्रतिनिधी           हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पीक पद्धतींमध्ये संवर्धित शेतीला  चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय मृदा विज्ञान संस्था, भोपाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने प्रकल्पातील २१ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन वर्षांकरिता संशोधन हाती घेण्यात येणार आहे. या विषयीचे सामंजस्य करार लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती मिनल करणवाल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ...

राहुरीत कमळ की तुतारी?

Image
राहुरीत ‘कमळ’ की ‘तुतारी’? राजरंग।शिवाजी घाडगे   मतदारांचा कौल ठरवणार दिशा राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अखेर पार पडली आणि उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ही निवडणूक केवळ रिक्त जागा भरण्यापुरती मर्यादित नसून, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाचणी म्हणूनही पाहिली गेली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात ही लढत रंगली असली, तरी प्रत्यक्षात ती दोन प्रमुख पक्षांतील थेट संघर्ष ठरली आहे. एकीकडे भाजपाचे अक्षय कर्डीले ज्यांनी वडिलांच्या वारशासोबत भावनिक मुद्दा पुढे करत विकासाची हमी दिली; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे ज्यांनी स्थानिक प्रश्न, शेतकरी अडचणी आणि बेरोजगारी यावर भर देत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले, ज्यातून राज्य आणि स्थानिक राजकारणातील दरीही स्पष्टपणे समोर आली. या निवडणुकीत सुमारे ५६.२० टक्के मतदान झाले, ही बाब विचार करायला लावणारी आहे. तीव्र उन्हाळा हा एक घटक असला तरी, मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद ही लोकशाहीसाठी चि...