Posts

श्रीगोंदा पोलीस ठाण्याला एसीबीचा दणका तीन लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल

Image
श्रीगोंदा पोलीस ठाण्याला एसीबीचा दणका; तीन  लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल  घाठगे न्यूज।प्रतिनिधी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली असून, लाच मागितल्याच्या आरोपावरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील कथित भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर आला असून, ही केवळ तीन कर्मचाऱ्यांची बाब आहे की त्यामागे मोठी साखळी कार्यरत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी म्हणून नितीन अशोक गाडगे (वय ४४), राजेश रावसाहेब जाधव (वय ३८) आणि दादाराम शिवराम म्हस्के (वय ५६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या भावाच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात मदत करण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, नंतर ही रक्कम ७ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या ...

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा

Image
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा? राजरंग।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही खासदारांबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, तथाकथित "ऑपरेशन टायगर"मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचेही नाव घेतले जात आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळ स्पष्ट करेल, मात्र मतदारसंघात त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. सेवेतून निवृत्तीनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक घडामोडी घडल्या. एका निवडणुकीत त्यांनी ...

खासदार भाऊसाहेब वाकचौरे याच्या भूमिकेबाबत चर्चा

Image
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण चर्चा।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, खासदार वाकचौरे हे आगामी काळात वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रंगत आहे. यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि तेथून उमेदवारी मिळविली होती. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला. दरम्यान, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अल्पावधीत खासदारकी मिळवली होती. त्यांनी सलग दोन वेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, नंतरच्या राजकीय घडा...

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना एलसीबीचा मोह सुटेना

Image
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना स्थानिक गुन्हे शाखेचा मोह सुटेना? तरंग @शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी पुन्हा चर्चेत आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अलीकडेच जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या. त्यामध्ये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली. मात्र, या बदली आदेशाविरोधात कबाडी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) येथे दाद मागितल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, जिल्हा पोलीस प्रशासनानेही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मॅटसमोर कॅव्हेट दाखल केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद केवळ बदलीपुरता मर्यादित न राहता प्रशासकीय चर्चेचा विषय बनला आहे. कबाडी यांनी आपला कार्यकाल पूर्ण झालेला नसल्याचे कारण देत बदलीला आक्षेप घेतला असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलीस खात्यातील बदल्या या प्रशासकीय गरजेनुसार केल्या जातात आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना उ...

हरित कवच विस्तार 7लाख 65 वृक्ष लागवडीचे उदिष्ट

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात हरित कवच विस्तारासाठी प्रशासन सक्रिय; ७.६५ लाख वृक्षलागवडीचे नियोजन अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि जिल्ह्याचे हरित कवच अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन केले आहे. हवामान बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर्षी १४ तालुक्यांमध्ये किमान ७ लाख ६५ हजार १८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील १० हजार ५७५ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, वन विभागाची क्षेत्रे, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सर्व घटकांचा सहभाग वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतींचा सर्वाधिक सहभाग राहणार असून जिल्ह्यातील १ हजार ३२७ ग्रामपंचायतींमार्फत तब्बल २ लाख ११ हजार ३०० रोपांची लागवड केली जाणार आहे. ग्रामीण भागात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ग्रामपं...

एलसीबी समोर विश्वासार्हतेचा संतोष कमी होईल का असंतोष

Image
एलसीबीसमोरील विश्वासार्हतेचा संतोष कमी होईल का असतोष  तरंग @शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारी आणि संघटित गुन्ह्यांविरोधात कारवाई करणारी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. त्यामुळे या विभागाची प्रतिमा, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अबाधित राहणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत विविध वादग्रस्त घटनांमुळे एलसीबीबाबत जनमानसात प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपविली आहे. मुटकुळे यांनी यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच युवकांमधील व्यसनाधीनता, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विषयांवर उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे आशावादी नजरेने पाहिले जात आहे. परंतु एलसीबीचे नेतृत्व स्वीकारणे आणि त्या विभागाची प्रतिमा उंचावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नव्या अधिकाऱ्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्ह...

वृक्ष लागवड करुन पर्यावरण संरक्षण करा

Image
 वृक्ष लागवड करा पर्यावरण वाचवा        संकल्प @शिवाजी घाडगे  शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा नवीन उमेद, नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पांचा काळ असतो. अशा वेळी केवळ शैक्षणिक प्रगतीचा विचार न करता पर्यावरण संरक्षणाचाही संकल्प प्रत्येकाने करणे ही काळाची गरज बनली आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात सोपा, प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे. आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. काँक्रीटच्या जंगलात हिरवाई झपाट्याने कमी होत असून त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यातील वाढती उष्णता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील बदल ही त्याचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.  उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ...