Posts

तोच जिव्हाळा उत्साह कायम पुण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ

Image
 जिव्हाळा कायम… दिघीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची स्नेहभेट राहुरी : नोकरीच्या बदल्या, जबाबदाऱ्या आणि काळाच्या ओघात अनेक नाती मागे पडतात; मात्र काही नाती अशी असतात की वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचा जिव्हाळा तसाच टिकून राहतो. पुणे येथील दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या राहुरीतील भेटीतून याच भावनेचा प्रत्यय आला. रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना प्रमोद वाघ यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून जुन्या मित्रांची स्नेहभेट घेतली. तब्बल नऊ वर्षांपूर्वी ते राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. बदली होऊन अनेक वर्षे उलटून गेली असली तरी राहुरीतील मित्रमंडळी आणि परिचितांशी असलेले त्यांचे स्नेहबंध आजही तेवढ्याच आत्मीयतेने जपले गेले आहेत. शिर्डीकडे जाताना राहुरीत थांबण्याचा त्यांचा निर्णय हा त्या आठवणींना आणि नात्यांना दिलेला मान असल्याचे मित्रांनी सांगितले. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रम...

बाबांनी तारले केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत

Image
बाबांनी ‘तारले’ केंद्रीय मंत्री रामदास आठवले  शिर्डीत रविवार विशेष।शिवाजी घाडगे  शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकेकाळी राजकारणाचा गंध नसलेले आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले भाऊसाहेब वाकचौरे खासदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. पंढरपूरमधून निवडून येण्याची अपेक्षा असताना शिर्डीतील हा पराभव आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हेही नगर दक्षिणमध्ये पराभूत झाले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केला होता. मात्र ते साध्य झाले नाही आणि अखेरीस पवार यांनी दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांना राज्यसभेची संधी दिली. यानंतर रामदास आठवले आणि दिवंगत शिवाजी कर्डिले हे दोघेही भाजपसोबत राजकारणात सक्रिय झाले. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत आठवले भाजपसोबत असले तरी ते सर्वच पक्षांना परवडणारे नेते मानले जातात. कार्यकर्त्यांना कोरे लेटरपॅड देऊन काम करण्याची संधी ...

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हातात लग्नांच्या बेड्या

Image
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे याच्या हातात लग्नांच्या बेड्या  घाडगे न्यूज।प्रतिनिधी   कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज कारवाईमुळे नगर जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे शनिवारी विवाहबंधनात अडकले. त्याच्या हातात लग्नांच्या  बेड्या अडकल्या संभाजीनगर येथील ‘सूर्या लॉन्स’ येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील  संतोष खाडे हे अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले अधिकारी आहेत. ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील मुलगा असलेल्या खाडे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर निवड मिळवली. सेवेत दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशिक्षण काळातच त्यांनी धाडसी व प्रभावी कारवायांमुळे स्वतःची वेगळी छाप उमटवली. गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी अल्पावधीतच जनतेत विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. खाडे यांच्या लग्नसोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्...

कृषी उत्पन्न वाढीस भारतीय स्त्री यांचे मोठे योगदान-डाॅक्टर सौम्या स्वामीनाथन

Image
कृषी उत्पन्न वाढीस भारतीय महिलांचे मोठे योगदान : डॉ. सौम्या स्वामीनाथन  राहुरी घाडगे न्यूज।प्रतिनिधी  शेतीत महिलांची वाढती भूमिका; तंत्रज्ञानाची जोड आवश्यक #*ग्रामीण भागात ८० टक्क्यांहून अधिक महिला शेतीत कार्यरत असल्याची माहिती #*महिलांच्या श्रम कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व इंटरनेट सुविधा आवश्यक #*स्मार्टफोनच्या मदतीने महिलांसाठी शेती अधिक सुलभ होणार #*महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशातील पहिले ‘बायोहॅपीनेस सेंटर’ सुरू #*एकात्मिक शेती मॉडेलमुळे काही गावांचे उत्पन्न १.५ कोटींवरून ३.५ कोटींवर #*महिला शेतकऱ्यांचा ‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पांतर्गत सत्कार -ग्रामीण भागातून शहरांकडे वाढत्या स्थलांतरामुळे शेतीत मजुरांची टंचाई निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या शेतीतील श्रम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. महिलांना साक्षरतेबरोबरच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या स्मार्टफोनच्या मदतीने अधिक सक्षमपणे शेती करू शकतील. घरामध्ये अन्न तयार करण्याबरोबरच शेतात धान्य उत्पादनामध्येही महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन...

वाणीची मका अण बिबट्याची डरकाळी

Image
वाणी यांच्या मकेत बिबट्याचे दर्शन देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली वाणी यांच्या मकाच्या शेतात शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. शेतात काम करत असलेल्या महिलांसमोर बिबट्याने अचानक डरकाळी फोडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती समजताच प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढूस, मच्छिंद्र तांबे, विजय गव्हाणे, चंद्रकांत कराळे, गणेश भालके व दादा वाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्ञानेश्वर वाणी, दत्ता वाणी, ओम वाणी, साई वाणी, श्रीराम वाणी, सार्थक वाणी, अथर्व वाळके आदींनी फटाके फोडून बिबट्याला पळवून लावले. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी केली आहे.

वैज्ञानिक सत्यजित मुसमाडे युवकानसाठी आयडॉल

Image
 वैज्ञानिक सत्यजित मुसमाडे  युवकासाठी नवा आदर्श घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  भारताची प्रगती केवळ राजकारण, उद्योग किंवा अर्थकारणावर अवलंबून नसते; ती विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांवरही तितकीच अवलंबून असते. अशा वेळी छोट्या शहरातून एखादा तरुण देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेत पोहोचतो, तेव्हा तो केवळ एका कुटुंबाचा किंवा शहराचा अभिमान राहत नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. देवळाली प्रवरा येथील सत्यजित कृष्णा मुसमाडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये वैज्ञानिक म्हणून झालेली निवड ही अशीच अभिमानास्पद घटना आहे. इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर देशाच्या प्रगतीत थेट योगदान देण्याची मोठी जबाबदारी असते. भारताने गेल्या काही वर्षांत अंतराळ संशोधनात मोठी झेप घेतली आहे. चंद्रयान, मंगळयान आणि सूर्य मोहिमांसारख्या यशस्वी प्रकल्पांमुळे भारताचे नाव जगभरात गौरवाने घेतले जात आहे. अशा संस्थेत देवळाली प्रवरासारख्या शहरातील तरुणाची निवड होणे ही त्या शहराच्या बौद्धिक आणि शैक्षणिक क्षमतेची साक्ष देणारी बाब आहे...

देवळालीत वाढीव पाणी पट्टी रद्द करा

Image
देवळाली प्रवरा नगरपालिकेची  वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यासाठी  सर्वपक्षीय धरणे आंदोलन घाडगे न्यूज।प्रतिनिधी  वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी देवळाली प्रवरा नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष शहरावर हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाढीव पाणीपट्टीचा निर्णय रद्द केल्यास तुमचा अपमान होणार नाही, उलट जनतेत मान वाढेल, असे आंदोलकांनी नगराध्यक्षांना उद्देशून सांगितले. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि अनेक महिलांनी आपले विचारही व्यक्त केले. विद्यमान नगरसेविका सुनीता थोरात यांनी सांगितले की, “आम्ही सत्तेसोबत नाही तर जनतेसोबत आहोत. देवळाली प्रवरा नगरपालिकेत पाणीपट्टी वाढविण्याच्या निर्णयाला आम्ही सुरुवातीपासून विरोध केला होता. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. अशा वेळी ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. विरोधकांना बोलू दिले जात नाही, नगराध्यक्ष मनमानी क...