न्यायालयात नम्र पोलीस ठाण्यात राज्या सारखी ऐट
न्यायालयात नम्र... पोलीस ठाण्यात 'राजासारखी' ऐट मत ।शिवाजी घाडगे लोकशाही व्यवस्थेत पोलीस दल हे कायद्याचे रक्षक मानले जाते. नागरिकांच्या जीवित, मालमत्ता आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. परंतु जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच कायद्याच्या चौकटीबाहेर वागत असल्याचे आरोप वारंवार पुढे येतात, तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. मुंबई उच्च न्यायालयाने पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या प्रकरणात केलेली कठोर टिप्पणी ही केवळ एका अधिकाऱ्यावर केलेली टीका नसून, संपूर्ण पोलीस व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्याचा इशारा आहे. "पोलीस न्यायालयात नम्र होतात; मात्र पोलीस ठाण्यात राजासारखी ऐट दाखवतात," हे न्यायालयाचे निरीक्षण अत्यंत मार्मिक आहे. ही टिप्पणी एखाद्या भावनेतून केलेली नसून, न्यायालयापुढे वारंवार येणाऱ्या अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे या निरीक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना वारंवार मागणी करूनही एफआयआरची प्रत देण्यात आली नाही. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार एफआयआरची...