Posts

भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली ?

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली? श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, तपासाची व्याप्ती आता केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे. जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष तपास पथक  अशोक खरातच्या बंगल्यावर कारवाईसाठी गेले असता त्याची पत्नी कल्पना खरात हिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती तेथून फरार झाली. यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात तसेच आणखी तीन जणांविरुद्ध फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, गुरुवारी पुन्हा एका महिलेने अशोक खरातविरुद्...

अवकाळी वारा अण गाराचा पाऊस

Image
राहुरी तालुक्यात अवकाळी गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान राहुरी : राहुरी तालुक्यात गुरुवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारपर्यंत वातावरण उष्ण असताना अचानक ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. काही भागात गारांचा मारा इतका तीव्र होता की उभ्या पिकांना फटका बसला. विशेषतः भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे (शेजारी राष्ट्रांतील युद्धजन्य स्थितीमुळे) शेतीमालाच्या बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, आता अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात ...

राहरी विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध धूसर अब तक 36

Image
 बिनविरोधची शक्यता धुसर अब तक ३६ इच्छुकांनी घेतले अर्ज  घाडगे न्यूज। प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून बिनविरोध निवडणुकीची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत तब्बल 36 इच्छुक उमेदवारांनी 71 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून घेतली आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना अद्याप प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी नामनिर्देशनपत्र घेतलेले नाही. त्यामुळे अंतिम क्षणीच खरी लढत कोणामध्ये होणार, याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी नामनिर्देशनपत्रे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती उमेदवार रिंगणात राहणार, हे अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतरच निश्चित होईल. राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकस्मात निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने बुधवारी आपल्या उमेदवाराची घोषणा केली असली, तरी इतर पक्षांक...

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकी साठी अक्षय कर्डीले यांना भाजपाची उमेदवारी

Image
अक्षय कर्डीले भाजपाचे अधिकृत उमेदवार जाहीर घाडगे न्यूज | प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली असून युवा नेते अक्षय शिवाजी कर्डीले यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून पक्षाचे केंद्रीय राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी दिल्लीहून या उमेदवारीची घोषणा केली. अक्षय कर्डीले हे दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र असून, त्यांच्या उमेदवारीमुळे राहुरी मतदारसंघात भाजपाने नव्या पिढीवर विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर कर्डीले कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता, या निर्णयाला राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची रणनीती आणि नेतृत्वाची एकजूट दिसून येत आहे.

भोगू कॅप्टन अशोक खरात वर गुन्हे वाढ मुलगा अटक कुटुंब गोत्यात

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात गुन्हे वाढले; कुटुंबीयांवरही कारवाईची छाया मुलगा अटक  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि  आणखी तिघांविरुद्ध फसवणूक तसेच बेकायदेशीर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एकेकाळी भक्तांच्या समस्या चुटकीसरशी सोडवणारा म्हणून प्रसिद्ध असलेला खरात आज मात्र कारागृहात आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासात उघड होत असलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने तथाकथित ‘अघोरी शक्ती’ आणि अंधश्रद्धेच्या आड एक प्रकारचे व्यावसायिक मॉडेल उभे केले होते. सत्ता, मनासारखी बदली किंवा पोस्टिंग, जमीन-जुमला, संपत्ती, तसेच वैयक्तिक आणि लैंगिक समाधान अशा विविध ‘सेवा’ देण्याचे आमिष दाखवून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. ग्राहकाच्या आर...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवणार?

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हाती छत्री  घाडगे न्यूज ।विशेष प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये जोर धरू लागली आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, शेजारील मतदारसंघातील शंकरराव गडाख यांनी ज्या पद्धतीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आणि नंतर सत्तेत सहभागी होत मंत्रीपदही मिळवले, त्याच धर्तीवर प्राजक्त तनपुरेही आपला राजकीय डाव आखत आहेत. त्यामुळे ‘गडाख पॅटर्न’चा अवलंब करत तनपुरे अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपक्ष लढवली तर आतुन आपल्याला मदत होईल  दरम्यान,प्राजक्त  तनपुरे यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल, अशीही चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, जर त्यांनी निवडणूक लढवली नाही तरच  मात्र कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊन असंतोष वाढू शकतो, या भीतीमुळेच ते प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेत असल्या...

मी कशाला एसआयटीसमोर जाऊ ग

Image
मी कशाला एसआयटीकडे  जाऊ ग.... श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  मी महिला आहे प्रवासात वेळ लागतो मी जाऊ शकले नाही हे कारण देत रुपाली चाकणकर एसआयटीसमोर गेल्या नसल्याचे समोर आले असून आता पुनर्निर्देश एसआयटीने केले असून भोगू अशोक खरात याच्या संस्थान वर रुपाली चाकणकर ह्या विश्वस्त असल्या कारणाने रुपाली चाकणकर याच्या कडुन अधिक माहीती मिळेल असे एसआयटी तपासी अधिकारी यामुळेच चाकणकर याचे जबाब घेणार प्रचंड प्रमाणात अशोक खरात विषयी समाज्यात रोष असून कदाचित आपल्यावर देखील प्रवासात काही होऊ शकते याची भीती रुपाली चाकणकर याना असल्याने कदाचित एसआयटीच्या गाडीतून चाकणकर याना एसआयटीला आणावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे  त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी अशोक खरात प्रकरण महिलांशी निगडित असल्याने तपासात हलगर्जी पणा होणार नाही जे जे कोणी खरातला मदत केली व करत आहेत त्याची गय केली जाणार नाही यावर ठाम असून त्याच्या पत्नी अमृता फडणवीस यानी देखील एका सार्वजनिक कार्यक्रमात अशोक खरात प्रकरणी ना पसंती व्यक्त केली असून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या रुपाली ठों...