गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी
गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी? आता निर्णायक लढ्याची वेळ! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांची भरदिवसा हॉटेलमध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण शहर भयभीत झाले. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशीही शहर कडेकोट बंद राहिले. विशेष म्हणजे हा बंद कोणत्याही एका पक्षाचा नव्हता, तर सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, नागरिक रस्त्यावर उतरले आणि गुन्हेगारांविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला. हा बंद केवळ एका हत्येच्या निषेधासाठी नव्हता; तो श्रीरामपूरच्या सुरक्षित भविष्याची मागणी करणारा आवाज होता. एका तरुण व्यावसायिकाचा भरदिवसा खून होतो, तोही शहराच्या मध्यवर्ती भागात. याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती राहीलेली नाही का? शहरातील व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? असे अनेक प्रश्न या घटनेने निर्माण केले आहेत. श्रीरामपूर हे उद्योग, व्यापार आणि शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वा...