Posts

कॅमेऱ्यासमोर रडताना...हसताना..

Image
कॅमेऱ्यासमोर रडताना... हसताना..  संवेदना ॥शिवाजी घाडगे ॥ राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद आणि समीकरणांचा खेळ नाही; ते समाजजीवनाचे प्रतिबिंब असते. पण अलीकडील घडामोडी पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो — राजकारणात प्रवेश करताच माणूस बदलतो का, की सत्तेच्या स्पर्धेत त्याच्या संवेदनाच हरवतात? सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून समाज अपेक्षा ठेवतो ती केवळ निर्णयक्षमतेची नाही, तर संवेदनशीलतेचीही. कारण ते फक्त पक्षाचे प्रतिनिधी नसतात, तर समाजाच्या भावविश्वाचेही प्रतिनिधित्व करीत असतात. मात्र अनेकदा दुःखाचे प्रसंगही राजकीय रंगमंचावर ‘इव्हेंट’ ठरतात. कॅमेऱ्यासमोर उमटणारे अश्रू आणि कॅमेऱ्यामागे सुरू होणारी राजकीय रणनीती — या दोन टोकांमधील दरीच आज सर्वाधिक अस्वस्थ करते. “राजकारणात कोण कुणाचं नसतं,” ही म्हण आपण वारंवार ऐकतो. परंतु ही वस्तुस्थिती म्हणून स्वीकारताना आपण माणुसकीलाही गहाण ठेवायचं का? मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका भिन्न असू शकतात; पण दुःख, आपुलकी आणि संवेदना या मूल्यांना तरी पक्षरेषा नसाव्यात. अन्यथा राजकारण हे समाजघटकांना जोडण्याऐवजी अधिक दुर...

देवळाली प्रवरा नगरपालिका पाणी दर वाढ कमी करा-नगरसेविका थोरात

Image
देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यावर पाणी पट्टी दर वाढ रद्द करा  -नगरसेविका सुनिता थोरात  प्रतिनिधी।देवळाली प्रवरा देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या विद्यमान नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात आदोलनाचा इशारा दिला आहे वाढीव पाणी पट्टी रद्द करावी  देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी १,८००/- रुपयांवरून थेट ३,०००/- रुपये इतकी वाढ करण्याचा बेकायदेशीर, अन्यायकारक व जनता  विरोधी निर्णय तात्काळ रद्द करण्या यावा  देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला पाणीपट्टी दर १,८००/- रुपयांवरून ३,०००/- रुपये करण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी लक्षात न घेता, लोकशाही मूल्यांना तिलांजली देत व जनतेवर जबर आर्थिक बोजा टाकणारा असून, तो पूर्णतः अन्यायकारक, अव्यवहार्य व निषेधार्ह आहे. नगर परिषद हद्दीतील नागरिक आधीच महागाई, बेरोजगारी, वीजदरवाढ व विविध करभारामुळे त्रस्त असताना, पाणीपुरवठा हा मूलभूत हक्क असताना त्यावर अशी अमर्याद दरवाढ करणे म्हणजे नागरिकांच्या संयमाची जाणीवपूर्वक परीक्षा घेण्याचा प्रकार आहे. या बाबत नगरसेविका सुनीत...

लोणीत ग्रंथोत्सव 2025 आयोजन

Image
लोणीत ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन प्रतिनिधी।लोणी  ​ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व सिंधुताई एकनाथराव विखे पाटील  यांच्या संयुक्त विद्यमाने 'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन  खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृह, पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर, ता. राहाता येथे शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ व रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिली आहे. ​'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चा उद्घाटन समारंभ विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते  २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. ​या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल खताळ, आमद...

मालक तो मालकच खरा मालक कोण

Image
मालक तो मालकच… ‘खरा मालक’  रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मालक’ हा शब्द केवळ मालकीहक्काचा नसतो—तो वलयाचा, वारशाचा आणि जनमानसावरच्या पकडीचा असतो. म्हणूनच आजचा प्रश्न कागदोपत्री नाही; तो भावनांचा आहे. शिवसेना नेमकी कोणाची? शिक्क्याची की स्मृतीची? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही फक्त एक पक्ष नव्हती; ती आक्रमक शैली, रस्त्यावर उतरलेला स्वाभिमान आणि ‘मातोश्री’केंद्रित निर्णयप्रक्रियेची राजकीय शाळा होती. त्या व्यक्तिमत्त्वाने पक्षाला जे वलय दिले, ते आजही राज्याच्या राजकारणावर सावली टाकते. म्हणूनच त्यांच्या जाण्यानंतरचा प्रश्न“पुढे काय?”—हा केवळ संघटनात्मक नव्हता; तो भावनिक होता. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रथम भाजपासोबत सत्ता घेतली, नंतर वेगळा मार्ग स्वीकारत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. ही चाल परंपरेपासून विचलन होती की काळाची गरज यावर मतभेद झाले; पण इतके मात्र खरे की सत्तेचे गणित बदलले. त्यानंतरचे बंड, सत्तांतर आणि ‘गुवाहाटी मार्गे’ रंगलेले राजकीय नाट्य यांनी शिवसेनेचे दोन...

संजलसंपदा विभागाचा विखे पॅटर्न

Image
जलसंपदा विभागाचे ‘रिपोर्ट कार्ड’ : पारदर्शकतेचा नवा पायंडा की राजकीय संदेश? रिपोर्ट कार्ड घाडगे न्यूज ॥ शिवाजी घाडगे ॥ राज्याच्या प्रशासनात एखाद्या विभागाने स्वतःहून वर्षभराच्या कामाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध करून तो थेट मुख्यमंत्रीसमोर सादर करणे, ही बाब सामान्य नाही. जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेले ‘रिपोर्ट कार्ड’ हे केवळ कामगिरीचे दस्तऐवजीकरण नाही; तर तो प्रशासनातील उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि राजकीय संदेश यांचा संगम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा अहवाल सादर होणे आणि त्यात कृष्णा–गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प, नदीजोड योजना, अतिक्रमण हटाव, ‘लँड बँक’ निर्मिती यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात येणे, यामागे स्पष्ट राजकीय आणि प्रशासकीय गणित दिसते. पाणी हा केवळ विकासाचा मुद्दा नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, उद्योग आणि सामाजिक स्थैर्याशी थेट निगडित आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या कामगिरीचा थेट परिणाम राज्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होणार आहे. ‘विकसित भारत २०४७’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी राज्यातील जलव्यव...

सिध्दार्थ बागुल अकस्मात निधन

Image
राहुरी फॅक्टरीतील तरुण विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन दुखद ।घाडगे न्यूज  राहुरी फॅक्टरी परिसरातील २३ वर्षीय विद्यार्थी सिद्धार्थ सुरेश बागुल यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी दुर्दैवी निधन झाले. या आकस्मिक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थ बागुल हे अमृतवाहीनी काॅलेज ऑफ फार्मसी  येथे औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत होते. ते अभ्यासू, मनमिळावू आणि होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखले जात. महाविद्यालयात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ यांना पुढे एम.फार्म. करून उच्च शिक्षण घ्यायचे स्वप्न होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांना उभारी देण्याचा त्यांचा निर्धार होता. “मला नोकरी लागली की मोठा बंगला बांधेन आणि तुम्ही नोकरी करू नका,” असे ते वडिलांना प्रेमाने सांगत असत, अशी आठवण कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यांच्या या स्वप्नाळू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वामुळे मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सिद्धार्थ हे आ...

महात्मा फुले भाजीपाला संशोधन केंद्राला पुरस्कार

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भाजीपाला संशोधन केंद्र उत्कृष्ट केंद्र पुरस्काराने सन्मानित घाडगे न्यूज।प्रतिनिधी           भाजीपाला संशोधन संस्थेची 44 वी वार्षिक गट बैठक श्री कोंडा लक्ष्मण तेलंगणा राज्य फलोत्पादन विद्यापीठ, हैदराबाद येथे पार पडली. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठतील उद्यान विद्या विभागांतर्गत  असलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पास उत्कृष्ट केंद्र पुरस्कार- 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. बी. टी. पाटील, कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. शर्मिला शिंदे, कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ प्रा. चिमाजी बाचकर, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. शालिग्राम गांगुर्डे यांनी मान्यवरांच्या हस्ते सदरचा पुरस्कार स्वीकारला. हैदराबाद मधील राजेंद्रनगर येथील फलोत्पादन महाविद्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी तेलंगणा उद्यानविद्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीजी रेड्डी, तेलंगणा राज्याचे सचिव  सुरेश कुमार मोहन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील सहाय्यक महास...