कॅमेऱ्यासमोर रडताना...हसताना..
कॅमेऱ्यासमोर रडताना... हसताना.. संवेदना ॥शिवाजी घाडगे ॥ राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद आणि समीकरणांचा खेळ नाही; ते समाजजीवनाचे प्रतिबिंब असते. पण अलीकडील घडामोडी पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो — राजकारणात प्रवेश करताच माणूस बदलतो का, की सत्तेच्या स्पर्धेत त्याच्या संवेदनाच हरवतात? सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून समाज अपेक्षा ठेवतो ती केवळ निर्णयक्षमतेची नाही, तर संवेदनशीलतेचीही. कारण ते फक्त पक्षाचे प्रतिनिधी नसतात, तर समाजाच्या भावविश्वाचेही प्रतिनिधित्व करीत असतात. मात्र अनेकदा दुःखाचे प्रसंगही राजकीय रंगमंचावर ‘इव्हेंट’ ठरतात. कॅमेऱ्यासमोर उमटणारे अश्रू आणि कॅमेऱ्यामागे सुरू होणारी राजकीय रणनीती — या दोन टोकांमधील दरीच आज सर्वाधिक अस्वस्थ करते. “राजकारणात कोण कुणाचं नसतं,” ही म्हण आपण वारंवार ऐकतो. परंतु ही वस्तुस्थिती म्हणून स्वीकारताना आपण माणुसकीलाही गहाण ठेवायचं का? मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका भिन्न असू शकतात; पण दुःख, आपुलकी आणि संवेदना या मूल्यांना तरी पक्षरेषा नसाव्यात. अन्यथा राजकारण हे समाजघटकांना जोडण्याऐवजी अधिक दुर...