श्रीरापुरच्या गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ
श्रीरामपूरातील गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ स्पेशल रिपोर्ट ।शिवाजी घाडगे श्रीरामपूर शहरात तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबया (वय ३०) यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेमुळे केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही, तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुंडांची दहशत नेमकी सामान्य नागरिकांवर आहे की कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर, असा सवाल उपस्थित केला जात आहे. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारहाण, खंडणी, दहशत आणि टोळीबाजीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा वर्चस्वाच्या संघर्षातून, तर कधी जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे शहराची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. शनिवारी घडलेल्या घटनेत एका हॉटेलमध्ये जेवण देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून वेटरला मारहाण करण्यात आली. हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या हॉटेल मालक आकाश दुबया यांच्यावर आरो...