Posts

राहुरी पोटनिवडणूकीतील सर्व्हेने धाकधूक कोणाची वाढवली

Image
राहुरी पोटनिवडणुक सर्वेक्षणाने धाकधूक नेमकी कोणाची  वाढवली   रंग तंरग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डाॅक्टर पंकज आशिया यांनी देखील सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत तसे अधिकृत रित्या जाहीर केले  सर्व साधारण उमेदवारास निवडणूक लढवण्या साठी रुर10000 अनमात रक्कम असून अनुसूचित जाती जमाती साठी रु5000 अनामत आहे राहुरी, नगर तालुका, पार्थडी तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत  दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार कोण असेल, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका...

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आचारसहिता लागू-डाॅक्टर पंकज आशिया

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : मतदारसंघाच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू  - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया     भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली असून मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.   यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीसाठीची अधिसूचना ३० मार्च २०२६ रोजी जारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ७ एप्रिल रोजी होईल, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. मतदान २३ एप...

अन्न सुरक्षा सह कृषी संशोधन म्हत्वाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Image
अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा  घाडगे न्यूज।राहुरी  जगातील एका भागात घडणाऱ्या युद्ध व संघर्षांचा परिणाम आज संपूर्ण जगावर होत असल्याने प्रत्येक देशाने आपली कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपाययोजना, नवउद्योग (स्टार्टअप) आणि शाश्वत शेती पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठ  चे कुलपती जिष्णू देव वर्मा  यांनी केले.आयोजित ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे , राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील   तसेच कृषिमंत्री ...

धुळीत हरवले प्रश्न की नवे राजकीय समीकरणे

Image
 धुळीत हरवलेले प्रश्न की नवे राजकीय समीकरण? रंग तरंग घाडगे न्यूज  ।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. देशातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने   राहुरी मतदारसंघाचाही त्यात समावेश केला आहे. कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे राहुरीत राजकीय हालचाली, आरोप-प्रत्यारोप आणि रणनीतींची चुरस पाहायला मिळणार हे निश्चित आहे. योगायोग असा की पोटनिवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीतच होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच हवेत उडालेली धूळ खाली बसण्याआधीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारणात शक्यता आणि अशक्यता यांची सीमा फारच पातळ असते, हे खरे असले तरी लोकशाही व्यवस्थेत बिनविरोध निवडणूक ही अपवादात्मक गोष्ट असते. कारण निवडणूक लढव...

राहुरी व बारामती विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी

Image
राहुरी व बारामती पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाडगे न्यूज| प्रतिनिधी राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र, निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी राहुरी  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभानिमित्त ते उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता काही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका देखील सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र, लोकशाही प्रक्रियेचा आदर ...

मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पदवी

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवीचा बहुमान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सन्मान घाडगे न्यूज । प्रतिनिधी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’  ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी सकाळी १० वाजता हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार असून राज्याच्या प्रशासनात तसेच विकासाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव केला जात आहे. सन १९६९ मध्ये स्थापन झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील अग्रगण्य कृषी शिक्षण व संशोधन केंद्र आहे. शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्ताराच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांमधील शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या वतीने दर दोन वर्षांनी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात कृषी व इतर शाखांतील पदवीधरांना राज्यपाल तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पदव्या...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल; राहुरी पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला यह भगवा रंग | शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. दरम्यान, राहुरी नगरपालिकेचे नियोजित कार्यक्रम रद्द करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक मुंबईकडे धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून यह भगवा रंग ची जोरदार चर्चा असून नेमका कोणावर कोणाच्या बाणाने पुन्हा विधानसभेत पोहोचणार  मुंबईतील विधानभवन परिसरात दुपारच्या सुमारास प्राजक्त तनपुरे विविध नेत्यांशी हस्तांदोलन करत आत्मविश्वासाने वावरताना दिसले. मात्र, येणारी निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवणार, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. आगामी काळात कोणते राजकीय डावपेच आखले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी राहुरी दौऱ्यात बोलताना या मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने युवा नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. भाजप युवा आघाड...