अंधश्रद्धेच्या आड वाढलेली गती शेवटी करी अधोगती
अंधश्रद्धेच्या आड वाढलेली गती शेवटी करी आधोगती श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे राज्यात सध्या गाजत असलेले तथाकथित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या फसवणुकीपुरते मर्यादित नसून, समाजातील अंधश्रद्धा, सत्ताधाऱ्यांशी असलेली साटेलोटे आणि प्रशासनातील संशयास्पद संबंध यांचे विदारक वास्तव उघड करणारे आहे. भविष्यकथन, अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या आडून उभारलेले हे कथित साम्राज्य आता कोसळण्याच्या मार्गावर आहे; मात्र या निमित्ताने अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध ही बाब अधिक चिंताजनक राज्यातील काही मंत्री आणि बड्या राजकीय नेत्यांच्या भविष्यकथनाच्या नावाखाली, तसेच महिलांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या तथाकथित ‘भोगू बाबा’ प्रकरणामुळे त्याच्या भक्तांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता पसरली आहे. शिर्डी परिसरात अलीकडेच तीन आयएएस अधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा रंगू लागली असून, या बैठकीमुळे प्रकरणाला अधिकच गूढ व गंभीर वळण मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहुरी येथे...