Posts

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल; राहुरी पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला यह भगवा रंग | शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. दरम्यान, राहुरी नगरपालिकेचे नियोजित कार्यक्रम रद्द करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक मुंबईकडे धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून यह भगवा रंग ची जोरदार चर्चा असून नेमका कोणावर कोणाच्या बाणाने पुन्हा विधानसभेत पोहोचणार  मुंबईतील विधानभवन परिसरात दुपारच्या सुमारास प्राजक्त तनपुरे विविध नेत्यांशी हस्तांदोलन करत आत्मविश्वासाने वावरताना दिसले. मात्र, येणारी निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवणार, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. आगामी काळात कोणते राजकीय डावपेच आखले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी राहुरी दौऱ्यात बोलताना या मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने युवा नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. भाजप युवा आघाड...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आता डॉक्टर

Image
मुख्यमंत्री फडणवीस होणार ‘डॉक्टर’ घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी (१५ मार्च) विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभात एकूण ४ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ हजार १८२ विद्यार्थ्यांना पदवी, ३४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, तर ७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात येणार आहे. तसेच ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून...

पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा गौरव

Image
पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा साई प्रतिष्ठानकडून स्नेह सत्कार      समाजातील विविध घटकांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या साई प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिन औचित्य साधून गुरुवारी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. समाजातील पडद्यामागे राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला. साई मंदिरात सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकार समाजासाठी दिवस-रात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विशेषतः त्यांच्या पत्नी कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असतात. या निस्वार्थ योगदानाची कदर म्हणून पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाची परंपरा साई प्रतिष्ठानने काही वर्षांपासून जपली आहे. पहिल्या वर्षी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या ...

तनपुरेची गुगली बदलतील राजकीय समीकरणे

Image
 तनपुरेंची ‘गुगली’ बदलतील राजकीय समीकरणे तंरग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  राहुरी मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे संपूर्ण राजकीय समीकरण ढवळून निघाले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पुत्र अक्षय कर्डिले यांच्या बाजूने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट ही भाजपसाठी मोठी राजकीय ताकद मानली जात होती. मात्र प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने या सहानुभूतीच्या लाटेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीपूर्वीच आपल्या नावाची चर्चा मतदारांमध्ये निर्माण करत तनपुरे यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. त्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी त्यांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरणात उत्सुकता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतील, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजी कर्डि...

राहुरी विधानसभा पोट निवडणूक राजकीय अंदाज

Image
राहुरी पोटनिवडणूक  राजकीय संकेतांचा अंदाज  रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे   राहुरी विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेली पोटनिवडणूक आता केवळ एक निवडणूक राहिलेली नाही, तर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरणार आहे. या महिन्यातच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने सर्वच पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. राहुरी, नगर तालुका आणि पार्थेडी परिसरातील मतदारांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात तीन तालुक्यांच्या राजकीय समीकरणांचा प्रभाव दिसणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत मतभेद किंवा राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी नेतृत्वाशी समन्वय साधण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे भाजपही गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद ...

झोडपले तरी शान कायम ?

Image
झोडपले तरी शान कायम…? घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी शहरात अलीकडे घडलेल्या घटनेने कायदा, पोलीस यंत्रणा आणि लोकशाहीतील मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना शहरातून पायी फिरवत त्यांच्या तोंडावर काळे फडके बांधून धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि त्यानंतर शहरात चर्चेचे वादळ उठले. पोलीसांवर हल्ला करणे हे नक्कीच गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच जर हात उगारला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करताना कायद्याच्या चौकटीत राहणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. आरोपींची धिंड काढणे, त्यांना पायी फिरवणे किंवा सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक देणे हे कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा “दाखवण्याचा” प्रकार ठरतो, अशी टीका होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, आरोपींना न्यायालयात नेत असताना जर कोणत्याही नागरिकाने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर त्या अनर्थाची जबाबदारी कोणाची राहिली असती? पोलिसांकडे वाह...

राहुरीत पोलिसांवर हल्ला कायद्याचा धाक कमी झाल्याचा संकेत

Image
राहुरीत पोलिसांवर हल्ला; कायद्याचा धाक कमी झाल्याचे संकेत रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच सार्वजनिक ठिकाणी हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. या घटनेमुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. घटनेत जखमी झालेले पोलीस कर्मचारी विलास वैराळ यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांना अटक केली असून स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. मात्र या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असल्याने तपासाचे आव्हान अजूनही कायम आहे. या घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार अनेकांच्या उपस्थितीत घडल्याचे समोर येत आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाच अशा प्रकारे मारहाण होत असेल, त...