Posts

रावसाहेब खेवरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

Image
ब्रेकिंग न्यूज माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा शिंदे गटात प्रवेश; रविवारी मुंबईत होणार पक्षप्रवेश जिल्हाध्यक्षपद काढल्यानंतर नाराज असलेले खेवरे अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला करणार ‘जय महाराष्ट्र’ घाडगे न्यूज| प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे हे रविवारी दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर रावसाहेब खेवरे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. रावसाहेब खेवरे यांनी अलिकडेच राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. राहुरी तालुक्यासह शिर्डी लोकसभा मतदा...

प्रभु रामाचा वनवास संपायला तयार नाही श्रध्देचा बाजार तेजीत

Image
प्रभु रामाचा वनवास अजुन संपायला तयार नाही श्रध्देचा बाजार तेजीत   भक्ती।शिवाजी घाडगे  प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांचा संपूर्ण प्रवास संघर्ष, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा होता. चौदा वर्षांचा वनवास भोगताना त्यांनी सीतेसह वनवासी जीवन स्वीकारले. अन्यायाविरुद्ध लढा देत धर्म आणि मर्यादेचे पालन केले. परंतु आजच्या काळात रामाच्या नावाने उभारलेल्या व्यवस्थांमध्ये जे काही घडताना दिसत आहे, ते पाहता रामाचा वनवास जणू अद्यापही संपलेला नाही, असेच वाटते. अयोध्येतील राममंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिर उभारणीसाठी अनेक वर्षे संघर्ष झाला. या आंदोलनात अनेक कारसेवकांनी आपले प्राण गमावले. लाखो भाविकांनी आर्थिक मदत केली. मात्र आता मंदिरातील दानपेटीत जमा होणाऱ्या रक्कमेच्या आणि सोन्याच्या व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. दानातून आलेल्या पैशांची मोजणी आणि बँकेत जमा करण्याचे काम खासगी संस्थांकडून करून घेतले जात असल्याने पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या प्रकरणातील सत्य काय आहे, याचा निर्णय संबंधित यंत्रण...

विश्वास नागरे-पाटील यांच्या वक्तव्यावरून गैरविश्वासाची चर्चा

Image
विश्वास नागरे-पाटील यांच्या वक्तव्यावरून गैरविश्वासाची चर्चा तरंग।शिवाजी घाडगे  नागपुरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी नुकत्याच नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  एका कार्यक्रमात उपस्थित राहून संघाच्या कार्याचे कौतुक केल्याने विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर काहींनी समर्थन व्यक्त केले असून, तर काहींनी टीका केली आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विश्वास नागरे-पाटील हे राज्यातील अत्यंत अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान मानले जातात. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे मार्गदर्शनपर व्याख्याने देत असतात. विशेषतः गणेशोत्सव, युवक मेळावे आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची भाषणे मोठ्या उत्साहाने ऐकली जातात. अलीकडेच त्यांची मुंबईहून नागपूर येथे बदली झाली. त्यानंतर त्यांनी संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग घेत संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केल्याचे समोर आले. या पा...

शेती शाश्वत करणा साठी सर्वाचे प्रयत्न हवे

Image
शेती शाश्वत साठी सर्वांनीचे प्रयत्न हवे – कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज| प्रतिनिधी शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे. अनेक शेतकरी अजूनही माती परीक्षण न करता रासायनिक खतांचा वापर करतात. पिकांना दिलेले सर्व रासायनिक खत पिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे जैविक व जिवाणू खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीची उत्पादकता, पिकांचे उत्पादन आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जिवाणू खते, सेंद्रिय खते तसेच हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर देऊन भरडधान्य पिकांचा समावेश करावा. मानवी आरोग्य आणि शेती यांची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शासनाचे विविध विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. शेती शाश्वत होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान’ आणि ‘संतुलित खत वापर जनजागृती अभियान’ अंत...

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डाॅक्टर अटकेत

Image
अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डॉक्टरला अटक; आरोपींची संख्या 24 वर घाडगे न्यूज प्रतिनिधी :  अवैध गर्भलिंग निदान चाचण्या आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी दाखल गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटचा अतिशय बारकाईने तपास सुरू आहे. तपासादरम्यान अनेक डॉक्टर, मेडिकल चालक तसेच एजंट यांचा या गैरप्रकारांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे धागेदोरे आता विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या डॉक्टर, एजंट आणि मेडिकल चालकांची चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा तांत्रिक तपास केल्यानंतर विविध तालुक्यांमध्ये एजंटचे जाळे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आता आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय 54 वर्षे), बीएएमएस, रा. शिरूर, जि. पुणे असे आहे. सदर डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्या...

लाभा साठी आम्ही पक्षच काय बापाचे नाव बदलु माध्यमांनी नाक खुपसूनये

Image
लाभा साठी आम्ही पक्ष काय  बापाचे नाव बदलु माध्यमांनी नाक खुपसूनये  राजरंग।शिवाजी घाडगे  लोकशाहीत पत्रकार प्रश्न विचारतात आणि लोकप्रतिनिधी उत्तरे देतात. पण हल्ली काही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे म्हणजे जणू त्यांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी केल्यासारखे वाटू लागले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी काही पत्रकारांना उद्देशून वापरलेली भाषा आणि व्यक्त केलेला संताप यामुळे पुन्हा एकदा राजकारणी आणि माध्यमांमधील नाते चर्चेत आले आहे. "मी आता काही बोलणार नाही", "उगाच बोट घालू नका", "माझ्या डोक्यात जाऊ नका", "कमिशनरकडे तक्रार करा" अशा शब्दांत खासदारांनी पत्रकारांना झापले. प्रश्न एवढाच आहे की, पत्रकारांनी नेमके काय अपराध केले होते? प्रश्न विचारला होता की गुन्हा केला होता? पक्ष बदरण्याचा गुन्हा तुम्ही करा आणि म्हणता घरा पर्यंत जावु नका मी पाटील  काय बी करीन म्हणजे आम्ही लाभा साठी पक्षच काय  बापाचे नाव बदलु राजकारणात पक्ष बदलणे आता नवीन राहिलेले नाही. कालपर्यंत ज्या पक्षासाठी जीव ओतून काम केले, त्याच पक्षावर दुसऱ्या दिवशी टीका क...

सत्तेत जाणच शाहणपणाच

Image
सत्तेत जाणच शाहणपणाच  राजरंग।शिवाजी घाडगे  सत्ये पुढे शहाणपण चालत नसत अस म्हणतात मात्र सत्तेत सहभागी होण हे देखील शहाणपणाचे नाही का तर याच उत्तर देखील होच येईल कोणाला काय वाटत कोण काय  म्हणेल याचा विचार राजकीय व्यक्तींनी करायचा नसतो तो करायचा सर्व सामान्य जनतेने  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या राजकीय भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम, नाराजी आणि आत्मपरीक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चूक नेमकी मतदारांची झाली की भाऊसाहेब वाकचौर यांची? शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांचा पराभव करून भाऊसाहेब वाकचौर यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले व  नंतर सदाशिव लोखंडे यांना डावलून भाऊसाहेब खासदार केले  पहिल्या कार्यकाळात निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या समीकरणांचा फायदा होईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा त्यांचा राजकीय अंदाज असावा. मात्र त्याचा अपेक्षित लाभ झाला नाही....