Posts
जप्त केलेल्या अंमली पदार्थ चोरीला वेगळे वळण वळणचे डाॅक्टर विजय मकासरे यांचा सरळ आरोप
- Get link
- X
- Other Apps
जप्त अमली पदार्थ चोरी व विक्री प्रकरणाला नवे वळण; स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांवर वळणचे डाॅक्टर विजय मकासरे यांचे गंभीर आरोप घाडगे न्यूज।प्रतिनिधी जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या चोरी व विक्री प्रकरणात आता स्थानिक गुन्हे शाखेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या भूमिकेची नव्याने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी डाॅक्टर विजय मकासरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांच्या कडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारी मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असतानाही त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुद्देमाल कक्षाची नियमित तपासणी, नोंदवही पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अनेक त्रुटी...
मेडल्सचा बादशहा रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील
- Get link
- X
- Other Apps
मेडल्सचा बादशहा : रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील साहस।शिवाजी घाडगे अहिल्यानगर येथील साहस, वेग आणि जिद्दीच्या जोरावर मोटारसायकल रेसिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे शरद काळे पाटील हे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या भेटी दरम्यान कार्यालयाच्या भिंतींवर झळकणाऱ्या विविध स्पर्धांतील विजयाची खुन मिरवणाऱ्या मेडल्स आणि सन्मानचिन्हांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक मेडलमागे संघर्ष, मेहनत आणि धाडसाची एक वेगळी कहाणी दडलेली असल्याचे जाणवत होते. दुचाकी रेसिंग हा अत्यंत धोकादायक आणि साहसी क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र, शरद काळे पाटील यांनी आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रेसिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेत अनेक पदके पटकावली आहेत. त्यामुळे त्यांना “मेडल्सचा बादशहा” अशी ओळख मिळाली आहे. शरद काळे पाटील यांच्या वेगाबाबत ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अवघ्या १ तास २० मिनिटां...
कोठे नेवून ठेवली ही व्यवस्था?
- Get link
- X
- Other Apps
कुठे नेऊन ठेवली आहे ही व्यवस्था? तरंग।शिवाजी घाडगे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बनत चालली आहे. शहरांतील अनेक सोसायट्यांमध्ये बारा-बारा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. मग ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला किती अंधार येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. एकीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा, तर दुसरीकडे पाणी आणि वीजटंचाईने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भविष्यातील भीषण पाणी संकटाची चाहूल आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असताना इंधन तुटवड्याची भीतीही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅस टंचाई इतकी तीव्र झाली आहे की काही मोठ्या हॉटेल्सनाही चुली पेटवण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे नव्हे, तर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत देणारी आहे. महागाईचा भडका इतका वाढला आहे की सामान्य माणसाच्या हाता...
१८जुन रोजी स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदान २२ निकाल -डाॅ पंकज आशिया
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक मतदारसंघ १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी ४६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क - जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज।प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया यांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारांना १ जूनपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार असून, २ जून...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 25 लाखाचे पारितोषिक
- Get link
- X
- Other Apps
पुणे कृषि हॅकथॉन 2026 मध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाला 25 लाखांचे प्रथम पारितोषिक कृषि विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पुणे कृषि हॅकथॉन 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या संवेदक आधारित ताण विशिष्ट नत्र फवारणी यंत्र या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ङङदेवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रुपये 25 लाखाचे कृषि यांत्रिकीकरण या विषयांतर्गत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे सदस्य डॉ. अवधूत वाळुंज यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ. प्रणव पावसे आणि इंजि. भूमिका पांडे हे या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे अन्य सदस्य असून हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या प्रकल्पाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी काम पाहिले. या प्रयोग...
स्थानिक स्वराज्य विधानपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवार द्या
- Get link
- X
- Other Apps
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी सत्यजित कदम यांच्या नावाची चर्चा; भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी घाडगे न्यूज।विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. कदम कुटुंबाचे भारतीय जनता पक्षाशी असलेले जुने नाते लक्षात घेता पक्षाने त्यांच्या निष्ठेचा सन्मान करावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. जनसंघाच्या काळापासून कदम कुटुंब भाजपाशी एकनिष्ठ राहिले आहे. सत्यजित कदम यांचे आजोबा लक्ष्मण कदम यांनी जनसंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांना यश मिळाले नसले, तरी त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. त्यानंतर भाजपाने माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पोटनिवडणुकीत विजय मिळवत ते उत्तर नगर जिल्ह्यातील भाजपाचे पहिले आमदार ठरले. एकदा पराभव झाल्य...