Posts

दादांचा आपघात अहवाल अण अनुत्तीर्ण प्रश्न

Image
अपघात, अहवाल आणि अनुत्तरित प्रश्न तरंग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  दादा आपल्यातून जाऊन आज एक महिना पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात त्यांच्या विमान अपघाताबाबत असंख्य तर्क-वितर्क रंगले. एखाद्या नेत्याचे नाव सलग महिनाभर जनतेच्या ओठांवर राहणे ही साधी गोष्ट नसते; दादांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या कार्याची छाप याचे ते द्योतक आहे. अपघातानंतर कुटुंबावर अचानक कोसळलेला हा आघात मोठाच होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय यांच्यासह संपूर्ण कुटुंब या दु:खातून सावरत असताना सार्वजनिक जीवनात अनेक चर्चा रंगत राहिल्या. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पार्थ पवार यांना आलेले अपयश हे दादांच्या हयातीतच त्यांच्या मनाला लागले होते, अशी चर्चा होती. कुटुंबातील आणि राजकीय पातळीवरील मतभेदही उघडपणे दिसत होते. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांबाबत न्यायाची मागणी करत अपघाताच्या चौकशीबाबत प्रश्न उपस्थित केले. रक्ताच्या नात्यांमध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्नही दिसून आला. दादा हयात असताना ज्या ...

डिजिटल युगात वाचन चळवळ आबादीत-शालिनी विखे-पाटील

Image
डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित, ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान- शालिनी विखे पाटील  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  ​ ग्रंथांना आपण ‘गुरू’ची उपमा देतो. जसा गुरू शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना. विश्वास शालिनी विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ​प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या. ​यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूल...

विमान आपघात धुकं की धोका

Image
धुकं की धोकं? सत्याच्या शोधात राजकारणाची सावली चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेत या अपघाताच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. “अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे?” हा राज ठाकरे यांचा सवाल केवळ शब्दांचा खेळ नाही; तो शासनाच्या पारदर्शकतेवर थेट बोट ठेवणारा आहे. अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नसते. ती प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक दक्षता आणि जबाबदारी यांच्या साखळीची कसोटी असते. अशा वेळी जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. ते प्रश्न दाबून टाकणे हा उपाय नसतो; उलट त्यांना स्पष्ट उत्तर देणे हीच लोकशाहीची खरी ताकद असते. रोहित पवार यांनी एफ आय आर नोंदवण्याची आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मागणी चुकीची नाही. परंतु प्रश्न असा आहे की या मागणीमागे केवळ सत्याचा शोध आहे की राजकीय गणितांचे सावट? कारण गेल्या काही दिवसांत या...

देवळाली नगर पालिकेत नगरसेवकांची बसायची पंचायत

Image
बसायची पंचायत… मग विकासाची दिशा कशी ठरवणार? तरंग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सभागृहात उभा राहिलेला “बसायचा” वाद हा केवळ खुर्च्यांचा प्रश्न नाही; तो स्थानिक लोकशाहीच्या संस्कारांचा कस लावणारा प्रसंग आहे. जर विरोधी नगरसेवक यांची बसायची पंचायत असेल तर विकासाची दिशा कशा ठरवणर.    लोकप्रतिनिधी सभागृहात बसतात ते मानाच्या जागेसाठी नव्हे, तर जनतेच्या विश्वासासाठी. आणि जर त्या सभागृहातच सन्मानाची उणीव भासू लागली, तर विकासाच्या चर्चा किती परिणामकारक होतील? बैठकीत पाणीपट्टी दरवाढीचा मुद्दा  देखील शहरात देखील तापलेला आहेच.     एका बाजूला वीजबिलाचा वाढता बोजा, सिंचन विभागाकडून आकारली जाणारी पाणीपट्टी आणि नगरपालिकेचे तुटपुंजे उत्पन्न हे प्रशासनाचे गणित. दुसऱ्या बाजूला महागाईने हैराण झालेला नागरिकहा विरोधकांचा मुद्दा. दोन्ही बाजूंचा हेतू शहरहिताचाच असायला हवा; पण हेतू शुद्ध असेल, तर पद्धतही पारदर्शक आणि सन्मानाची असावी लागते. विरोधी नगरसेवकांना बसण्याची योग्य व्यवस्था न देणे, सार्वजनिक कार्यक्रमांत व्यासपीठावर स्थान न देणे हे के...

महिला महापौरांच्या हातातील घड्याळ केव्हड्याचे

Image
घड्याळाची किंमत की विश्वासाची? तरंग चर्चेचे।शिवाजी घाडगे  एखाद्या महापालिकेच्या महिला महापौरांच्या हातातील केव्हड्याचे एवढे महागडे घड्याळ  सुमारे .... रुपयांचे घड्याळ असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि क्षणार्धात चर्चा पेटली—“हातावरच इतके महागडे घड्याळ असेल तर बाकी काय?” प्रश्न घड्याळाच्या ब्रँडचा नाही; प्रश्न आहे प्रतिमेचा, नैतिकतेचा आणि सार्वजनिक विश्वासाचा. राजकारणात प्रतीकांचे महत्त्व मोठे असते. साधेपणा, पारदर्शकता आणि जनतेशी नाळ जोडलेली असल्याची भावना—ही लोकप्रतिनिधींची खरी भांडवलं. अशा वेळी लाखोंच्या-कोट्यवधींच्या वस्तूंचे प्रदर्शन जनमानसात शंका निर्माण करते. विशेषतः जेव्हा महागाई, बेरोजगारी, पायाभूत सुविधा, पाणी-रस्ते यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडवायचे असतात, तेव्हा वैभवाचे दर्शन लोकांच्या मनात दुरावा निर्माण करू शकते. नक्कीच, प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. समर्थक म्हणतात, “राजकीय प्रवासाचे साक्षीदार आहोत; कामे मार्गी लागली की चाहत्यांकडून भेटवस्तू येतात.” हेही वास्तव असू शकते. पण सार्वजनिक पदावर असताना ‘हितसंबंधां...

देवळाली प्रवरा पाणी दर वाढ रद्द करा-नगसेविका पल्लवी ढुस

Image
पाणीपट्टी दर वाढ निर्णय रद्द करा  - नगरसेविका पल्लवी वैभव ढूस  देवळाली प्रवरा ।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा शहरातील  नागरिकांना विश्वासात न घेता १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये पाणीपट्टी वाढविण्याचा देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घेतलेला निर्णयाने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले असून ही जाचक पाणी पट्टी दर वाढ नागरिकांना विश्वासात न घेऊन केली असून ती    करा अन्यथा ०६ मार्च २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार हेमंतजी ओगले यांना २५ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.    पल्लवी ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही त्यांच्या आर्थिक क्षमतेशी सुसंगत्व व्यवहार्य असणे आवश्यक आहे.  तथापि, देवळाली प्रवरा नगरप...

कॅमेऱ्यासमोर रडताना...हसताना..

Image
कॅमेऱ्यासमोर रडताना... हसताना..  संवेदना ॥शिवाजी घाडगे ॥ राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद आणि समीकरणांचा खेळ नाही; ते समाजजीवनाचे प्रतिबिंब असते. पण अलीकडील घडामोडी पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो — राजकारणात प्रवेश करताच माणूस बदलतो का, की सत्तेच्या स्पर्धेत त्याच्या संवेदनाच हरवतात? सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून समाज अपेक्षा ठेवतो ती केवळ निर्णयक्षमतेची नाही, तर संवेदनशीलतेचीही. कारण ते फक्त पक्षाचे प्रतिनिधी नसतात, तर समाजाच्या भावविश्वाचेही प्रतिनिधित्व करीत असतात. मात्र अनेकदा दुःखाचे प्रसंगही राजकीय रंगमंचावर ‘इव्हेंट’ ठरतात. कॅमेऱ्यासमोर उमटणारे अश्रू आणि कॅमेऱ्यामागे सुरू होणारी राजकीय रणनीती — या दोन टोकांमधील दरीच आज सर्वाधिक अस्वस्थ करते. “राजकारणात कोण कुणाचं नसतं,” ही म्हण आपण वारंवार ऐकतो. परंतु ही वस्तुस्थिती म्हणून स्वीकारताना आपण माणुसकीलाही गहाण ठेवायचं का? मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका भिन्न असू शकतात; पण दुःख, आपुलकी आणि संवेदना या मूल्यांना तरी पक्षरेषा नसाव्यात. अन्यथा राजकारण हे समाजघटकांना जोडण्याऐवजी अधिक दुर...