Posts

डिजिटल क्रांती मुळे आम आदमी झाला पत्रकार

Image
डिजिटल माध्यम क्रांतीमुळे ‘आम आदमी’ झाला पत्रकार घाडगे न्यूज | प्रतिनिधी श्रीरामपूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकदिवसीय पत्रकार कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे आज सर्वसामान्य नागरिकही आपले म्हणणे थेट माध्यमांपर्यंत पोहोचवत असून ‘आम आदमी’ स्वतःच बातमीदार बनत आहे. मात्र या बदलाकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी समाजातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडावी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यशाळेला दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, सार्वमतचे संपादक अनंत पाटील, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे तसेच करण नवले, अनिल पांडे, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, रवी भागवत आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शिवाजी पवार यांनी केले. विकास अंत्रे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, तर प्रास्ताविक अशोक गाडेकर यांनी केले. डिजिटल युगातील पत्रकारितेची नवी वाटचाल संपादक सु...

लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागणे ही शोकांतिका

Image
 लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागणे हीच सर्वात मोठी शोकांतिका  घाडगे न्यूज। प्रतिनिधी  राहुरीत घडलेल्या अलीकडील घटनांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती व आता शुक्रवारी  खुद्द त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरावे लागले ही केवळ योगायोगांची मालिका नाही; ती व्यवस्थेतील उघड पडलेली पोकळी आहे. लोकप्रतिनिधी हे धोरणे ठरविणारे आणि जनतेच्या समस्या मांडणारे असतात; प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करणे ही त्यांची भूमिका नसते. जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा प्रश्न व्यक्तींचा राहत नाहीतो संपूर्ण व्यवस्थेचा बनतो. पोलिस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे सर्वाना माहीत आहे  असे असले तरी नियोजनात त्रुटी आहेत का? की जबाबदारीची साखळी सैलावली आहे? या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे गरजेचे आहे. राहुरीत वर्षा पुर्वी तालमीत शि...

देशी गाय सुधार प्रकल्पाला पुरस्कार

Image
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा पुरस्कार राहुरी ।  परळी वैजनाथ येथे आयोजित  महा पशुधन एक्सपो या प्रदर्शनात  कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने शुद्ध देशी गोवंश सन्मान  पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशी गोवंश जतन, संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण व शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने केलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सुनील सूर्यवंशी व  नेरकर हे गोसेवा आयोगाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.        देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व सह-शास्त्रज्ञ डॉ. सुजित भालेराव यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराबद्दल  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगु...

खासदार प्रियंका गांधी यांना आर्शिवाद....

Image
खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांना पंतप्रधान होण्याचा बाबाचा आर्शिवाद  घाडगे न्यूज स्पेशल।शिवाजी घाडगे। आशीर्वाद, प्रतिमा आणि वास्तवाची राजकारणातली कसोटी कामाख्या मंदिराच्या पायऱ्यांवर दिलेला आशीर्वाद आणि दिल्लीच्या सत्तेचा दरवाजा — या दोन्हींत किती अंतर आहे? प्रियंका गांधी- वढेरा  यांना महाकाल बाबा आणि भैरवनाथ बाबांनी पंतप्रधानपदासाठी आशीर्वाद दिल्याची चर्चा रंगली, आणि त्या क्षणी भारतीय राजकारणात प्रतीकांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पण प्रश्न असा आहे की, आशीर्वादाने नेतृत्व घडते की नेतृत्वाच्या क्षमतेने आशीर्वाद अर्थपूर्ण ठरतो? प्रियंका गांधी या करिष्माई वक्तृत्व, ठाम देहबोली आणि जनसंपर्काच्या कौशल्यामुळे चर्चेत राहतात. अनेकांना त्यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी दिसते. परंतु केवळ साम्य पुरेसे नसते; त्या काळाचा राजकीय संदर्भ, पक्षाची ताकद आणि जनमानसाचा विश्वास हे घटक वेगळे असतात. इंदिरा गांधींना लाभलेली राजकीय पार्श्वभूमी आणि आजची काँग्रेसची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. खासदार राहुल गांधी यांच्याबाबत विरोधकांनी “पप्पू” अशी प्रतिमा उभी क...

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर संभागृह

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन; ५८ वर्षांनंतर नावाचा सन्मान      घाडगे न्यूज ॥शिवाजी घाडगे ॥           महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुसज्ज सभागृह उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांचे नावाचे संभागृह या विद्यापीठाला लाभण्यासाठी तब्बल ५८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली, ही बाब खेदजनकच म्हणावी लागेल. महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करण्यास एवढा विलंब का झाला, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. उशिरा का होईना, हा निर्णय झाला; मात्र तो अधिक आधी व्हायला हवा होता, हेही तितकेच सत्य आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभेच्या प्रचारसभेदरम्यान या परिसरात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. फळांपासून ज्यूससारखी उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळू शकते. त्य...

माझी वसुधरात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर

Image
माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल !  तीन ग्रामपंचायतींना दीड कोटींचे पुरस्कार जाहीर प्रतिनिधी ॥  ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.  या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरा...

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन नवीन तहसील कार्यालय

Image
महाराष्ट्र शासनाचा निर्णय : अहिल्यानगर जिल्हात दोन नवीन तहसील कार्यालयांना मंजुरी.        बेक्रींग । घाडगे न्यूज । अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनिक सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दोन नवीन तहसील कार्यालयांना मंजुरी दिली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव आणि अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू होणार असून, यामुळे स्थानिक नागरिकांना महसूल व प्रशासनाशी संबंधित कामांसाठी होणारी धावपळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. घोडेगाव येथे नवीन तहसील कार्यालय नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना जमीन, महसूल, उत्पन्न दाखले, वारस नोंदी आदी कामांसाठी तालुक्याच्या मुख्यालयावर जाण्याची गरज कमी होईल. स्थानिक पातळीवर प्रशासन उपलब्ध झाल्याने विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राजूरला तहसील कार्यालय; राजकीय समीकरणांची चर्चा अकोले तालुक्यातील राजूर येथेही स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. या निर...