Posts

पत्रकार सुधाकर कराळे यांचा ७१व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Image
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस तसेच जलनायक व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी कराळे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला   सुधाकर कराळे यांनी शेतकरी, कष्ट करी शोषित  घटक तसेच ग्रामीण विकासा साठी लेखन केले   पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्य करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि सुखसमृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात पत्रकारिता, समाजसेवा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. ७१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

शुटीबाॅल स्पर्धेत यशसंपादन केलेल्या खेळाडु समृध्दी पवळेचा गौरव

Image
 समृध्दीचा गौरव शूटींग बाॅल यश आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाच्या यशामध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु. समृद्धी महेश पवळे हिचा महत्वाचा सहभाग राहीला  कु. समृद्धी महेश पवळे यांची कन्या ज्येष्ठ नागरिक चांगदेव पवळे यांच्या नात  डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत  संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा विशेष गुण गौरव   करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी शाल व वैभव ढूस लिखित ‘अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन तिचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, चांगदेव पवळे, सार्थक पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी समृद्धीच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या भावी वाटचाल...

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुळे अहिल्यानगर ठरला राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Image
प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा घाडगे न्यूज @प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने आता आणखी एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या १९ वर पोहोचली असून, राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगरची नोंद झाली आहे. हा विक्रम राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि अल्पावधीतच उमेदवारी जाहीर होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडामोडीची मोठी चर्चा रंगली. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आणि विधान परिषदेचे ७ असे एकूण १९ आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ९ आमदार असून, अजित पवार गटाचे ५, शिवसेना (शिंदे गट) चे २ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँ...

जंतर-मंतरवर तरुणाईचा हुंकार

Image
जंतर-मंतरवर पुन्हा तरुणाईचा हुंकार?   तरंग।शिवाजी घाडगे  देशाच्या राजकारणात अनेक आंदोलने झाली, अनेक नेते आले-गेले; पण जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. सध्या नीट  परीक्षा, विद्यार्थ्यांचे भविष्य, वाढता मानसिक ताण आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे देशातील युवकांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काॅकोरज पार्टीचे अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरून केंद्र सरकारविरोधात उघडलेला मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुणांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात असला, तरी या पाठिंब्याचे प्रत्यक्ष आंदोलनात किती रूपांतर होते, हा खरा प्रश्न आहे. कारण सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि जनआंदोलनातील ताकद यामध्ये मोठा फरक असतो. आज देशातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. गावाकडील पालक कर्ज काढून मुलांना शहरात शिकवतात. मुलांच्या यशस्वी...

पत्रकारांचे भुषण हरपले

Image
पत्रकारितेतील ‘भूषण’ हरपले... भूषण।शिवाजी घाडगे  मृत्यू कोणत्या रूपाने समोर येईल, हे कुणालाच सांगता येत नाही. मात्र आपल्या आवडत्या कामात, आपल्या ध्यासात आणि समाजासाठी ज्ञानदान करत असताना मृत्यूने कवेत घेणे, हे फारच विरळा नशिबी येते. अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि वारसा संवर्धन चळवळीचे प्रणेते भूषण देशमुख यांच्या निधनाने नगर जिल्ह्याने केवळ एक पत्रकार गमावलेला नाही, तर आपल्या इतिहासाचा एक चालता-बोलता ग्रंथच हरवला आहे. भुईकोट किल्ल्यावर इतिहासाची माहिती देत असताना झालेला सर्पदंश आणि त्यानंतर आलेले निधन हा केवळ एक अपघात नाही; तर आपल्या वारशासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीच्या कार्याचा कळसाध्याय आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले. इतिहास सांगताना, वारसा जपण्याचा संदेश देताना आणि समाजाला ज्ञानाचा प्रकाश देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पत्रकारिता क्षेत्रात वेग, स्पर्धा आणि प्रसिद्धीची धडपड वाढत असताना भूषण देशमुख यांनी पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप दिले. त्यांनी कधीही पत्रकारितेचा वापर वैयक्तिक लाभासाठी केला नाही. सत्तेच्या...

शाब्बास शहाबाज शाब्बास...

Image
शाब्बास शहाबाज... शाब्बास! राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आणि महायुतीने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या बिनविरोध निवडीमागील पडद्यामागच्या घडामोडी पाहिल्या तर अनेक राजकीय धागेदोरे उलगडताना दिसतात. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत चर्चेत आलेले नाव म्हणजे एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद. विधान परिषद निवडणुकीतील सर्व गणिते जुळून आली आहेत, असे वाटत असतानाच दत्तात्रय पानसरे यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नसल्याचा दावा करून प्रशासन आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडवली. तब्बल सहा तास जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण झालेल्या या पेचामुळे बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला आणि पानसरे यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त झाला. राजकारणात अंकगणित जितके महत्त्वाचे असते तितकेच संवादाचे राजकारणही महत्त्वाचे असते. पानसरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि संवादाची दारे खुली ठे...

अखेर भाजपाचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झालेच...

Image
अखेर प्राजक्त तनपरेआ यांना आमदारकीचा बिनविरोध गुलाल  राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून हा क्षण राहुरीच्या राजकीय इतिहासात सुर्वण अक्षरानी कोरला जाईल व राहुरीचे राजकारण पुन्हा तनपुरे कुटुंबा भोवती आले  श्रध्दा व सबुरीचा फायदा प्राजक्त तनपुरे यांना झाला असून   उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर इतर सर्व प्रतिस्पर्धी मैदानातून बाहेर पडल्याने तनपुरे यांना बिनविरोध आमदार होण्याचा मान मिळाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना इतक्या लवकर विधान परिषदेची संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि त्याचे फलित बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या...