मुख्यमंत्री बदलण्याच्या वावड्या कशासाठी
मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या कशासाठी राजरंग।शिवाजी घाडगे महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. काही इलेक्ट्रॉनिक माध्यमे, यूट्यूब वाहिन्या आणि सोशल मीडियावरील तथाकथित राजकीय विश्लेषक गेल्या काही दिवसांपासून "मुख्यमंत्री बदलणार", "दिल्लीत राजकीय भूकंप" अशा मथळ्यांनी वातावरण तापवत आहेत. परंतु या चर्चांचा वस्तुस्थितीशी कितपत संबंध आहे, हा खरा प्रश्न आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात "ब्रेकिंग न्यूज" देण्याच्या नादात अनेक माध्यमांनी सत्यापेक्षा सनसनाटीला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. एखादा नेता दुसऱ्या नेत्याला भेटला, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, एखाद्या सूत्राने माहिती दिल्याचा दावा केला किंवा सोशल मीडियावर अफवा पसरली की त्यावर तासन्तास चर्चा सुरू होते. प्रत्यक्षात कोणताही अधिकृत निर्णय नसतानाही अनेक माध्यमे मुख्यमंत्री बदल निश्चित झाल्याप्रमाणे चित्र रंगवतात. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी आणि जबाबदार पत्रकारितेसाठी धोकादायक आहे. मुख्यमंत्री बदल हा एखाद्या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसार...