Posts

शनिदेवता विश्वाची न्याय देवता जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

Image
शनिदेव ही विश्वाची न्यायदेवता : अनुराधा पौडवाल रक्षाबंधनानिमित्त  शनिदर्शन; शनिदेव आणि स्व. बाबुराव बानकर यांना राखी अर्पण घाडगे न्यूज। प्रतिनिधी प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शनिशिंगणापूर येथे  शनिदेवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, आपुलकी, ऋणानुबंध आणि भावनिक नात्यांची जपणूक करणारा सण आहे. याच भावनेतून अनुराधा पौडवाल दरवर्षी शनिशिंगणापूरला येतात. यावेळी त्यांनी शनिदेवाला तसेच आपल्या जीवनात मोलाचे स्थान असलेल्या स्व. बाबुराव बानकर यांना राखी अर्पण करून आपल्या भावनिक नात्याला उजाळा दिला. शनिशिंगणापूर येथे आगमन झाल्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी उदासी महाराज मठात पुरोहितांच्या हस्ते शनिदेवाला तैलाभिषेक केला. त्यानंतर शनी चौथऱ्याखालून देवाचे औक्षण करून त्यांनी शनिदेवाला राखी अर्पण केली. तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही शनिदेवाला अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत अॅड. आश्लेषा गोवारीकर उपस्थित होत्या. अनुराधा पौडवाल यांचे शनिदेवाशी असलेले नाते केवळ श्रद्धेपुरते म...

कबाडींची शिर्डी बदलीला आव्हान देणारी याचिका मॅट ने फेटाळली

Image
कबाडींची शिर्डी बदलीला आव्हान देणारी याचिका मॅटने फेटाळली घाडगे न्यूज। प्रतिनिधी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी येथे करण्यात आलेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली बदली ही नियमबाह्य नसून प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेली असल्याचे स्पष्ट करत मॅटने कबाडी यांना दिलासा देण्यास नकार दिला. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असताना अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणावरून पोलीस विभागात मोठी चर्चा निर्माण झाली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कबाडी यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली. या बदलीच्या आदेशाला त्यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. बदली करताना प्रशासकीय नियमांचे पालन झाले नसल्याचा तसेच आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे, प्रशासनाची बाजू आणि बदलीमागील परिस्थितीचा विचार केल्यानंतर मॅटने ही बदली य...

साहित्य ,संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Image
साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घाडगे न्यूज। प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रेरणास्थान असून, ग्रामविकासाचा आदर्श नमुना म्हणून ‘प्रवरा मॉडेल’ची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ऐतिहासिक कार्य सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी केले. त्यांनी उभा केलेला हा विचार आणि वारसा पुढे नेत सहकार चळवळीला साहित्य, कला आणि संस्कृतीची जोड देऊन ती अधिक समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी केले. प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव, प्रबोधन आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, ...

ध्येयाची नशा साहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे साहित्यातून गाठातात लक्ष

Image
ध्येयाची नशा आणि साहित्याची वाट : ‘चला गाठू या लक्ष्य’ भाष्य।शिवाजी घाडगे  आजच्या तरुणाईसमोर संधींची कमतरता नाही; कमतरता आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याची. मोबाईलच्या पडद्यावर क्षणाक्षणाला बदलणारे जग, सोशल मीडियावरील आभासी यश, झटपट प्रसिद्धीची अपेक्षा आणि अपयश सहन करण्याची कमी होत चाललेली मानसिकता यामुळे अनेक युवक संभ्रमित झालेले दिसतात. अशा काळात एखादा पोलीस अधिकारी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातून तरुणाईला ध्येयाची दिशा देण्यासाठी पुस्तक लिहितो, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. श्रीरामपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे चेतन लोखंडे यांनी लिहिलेले ‘चला गाठू या लक्ष्य’ हे पुस्तक याच दृष्टीने महत्त्वाचे ठरते. पोलीस दलातील कर्तव्य, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आणि सततचे काम यामधून वेळ काढून साहित्याची वाट धरताना लोखंडे यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक उपयोगाची दिशा दिली आहे. एकीकडे समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती केली जात असताना दुसरीकडे तरुणाईने ज्ञानाची, साहित्याची आणि ध्येयाची नशा करावी, असा संदेश एखादा पोलीस अधिकारी...

सत्तेच्या सावलीतून व्यवसायांच्या प्रकाशझोतात त्यांची चाॅइस द नाईस

Image
सत्तेच्या सावलीतून व्यवसायाच्या प्रकाशझोतात त्यांची चाॅइस द नाईन्स  भाष्य।शिवाजी घाडगे  सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीने व्यवसाय करणे हा काही गुन्हा नाही. उलट, राजकारणाबरोबर उद्योग-व्यवसाय उभारणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती घटनात्मक स्वरूपाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळून सार्वजनिक जीवनात मोठी ओळख निर्माण करते आणि त्यानंतर अचानक कोट्यवधींच्या गुंतवणुकीच्या व्यवसायामुळे चर्चेत येते, तेव्हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रश्नांना ‘राजकीय सूड’ म्हणून झटकून न टाकता त्यांची उत्तरे पारदर्शकपणे देणे हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यावेळी त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे नव्हे, तर पुण्यातील कल्याणीनगर परिसरात सुरू करण्यात आलेल्या नव्या हॉटेल व्यवसायामुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी पुण्यात ‘द नाईन्स...

दोन पोलीस महिला करणार एकमेकींसोबत लग्न

Image
 पोलीस दलातील दोन महिला पोलिस कर्मचारी करणार एकमेकींसोबत लग्न  भाष्य।शिवाजी घाडगे  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलिस कर्मचारी  विवाह बंधनात अडकणार असून दोघींनी   एकमेकींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० ऑगस्ट २०२६ रोजी  आळंदी येथे वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाहासाठी दोन्ही महिला पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचे अर्ज देखील सादर केला असून, त्यासोबत विवाहाची निमंत्रण पत्रिकाही जोडली आहे. पोलीस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची सध्या पोलीस दलासह सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तर खाकीत एवढेच पाहायचे बाकी होते याची चर्चा आहे.  विवाह म्हटला की आपल्या समाजाच्या डोळ्यांसमोर पारंपरिक पद्धतीने स्त्री आणि पुरुष यांचे नाते उभे राहते. मात्र, काळ बदलत आहे तसे व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही हळूहळू बदलत आहे. आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार, परस्पर संमती, भावनिक जुळवून घेणे आणि आयुष्य एकत्...

गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह भक्ती, सेवा सामाजिक बांधिलकीचा संगम

Image
१७९वा गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह : भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अध्यात्म।शिवाजी घाडगे  स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. धनगरवाडी ता. राहाता जि .अहिल्यानगर येथे यंदाचा १७९व्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आले असून,  विविध भागांतून लाखो भाविक या सप्ताहात सहभागी झाले आहेत. अखंड हरिनामाचा गजर, संत-महंतांची प्रवचने, धुनीचे दर्शन, महाप्रसाद आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे धनगरवाडी परिसर भक्तिमय झाला आहे. सप्ताहाच्या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी पाहता जणू काही पंढरीच धनगरवाडीत अवतरली असल्याचा अनुभव भाविकांना येत आहे. गंगागिरी महाराजांच्या कार्यावर आणि विचारांवर असलेली हरिनाम सप्ताह पंपरा महंत नारायण गिरी यांच्या नंतर महंत रामगिरी महाराज पुढे नेत असुन  परमेश्वर बद्दल अपार श्रद्धा या सप्ताहातून प्रकर्षाने जाणवते. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. ह...