Posts

डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचन कट्टा उभारा

Image
देवळाली प्रवरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा’ उभारा   नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदन घाडगे न्यूज।प्रतिनिधी  देवळाली प्रवरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक  ज्ञान, वाचन आणि वैचारिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवळाली प्रवरा शहरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचक कट्टा’ उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. युवकांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा तसेच विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना अभ्यासासाठी दर्जेदार व सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक ३३७ येथे वाचक कट्टा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन परिसरातील युवकांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांना सादर करण्यात आले. सचिनभाऊ कोठुळे व सतीशभाऊ वाळुंज यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांच...

कृषी दिनाचे औचित्य साधून कुलगुरु डॉ विलास खर्चे यांनी केली पेरणी

Image
कृषी दिनाचे औचित्य साधून कुलगुरु विलास खर्चे यांनी  केली पेरणी घाडगे न्यूज।प्रतिनिधी  शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे कमी करणे सध्या शक्य नसले, तरी रासायनिक खतांचा संतुलित वापर, हिरवळीच्या खतांसह जैविक खतांचा अधिक वापर आणि शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलचा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात अवलंब करावा. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करणे हे महत्त्वाचे पाऊल असून, या कृषी दिनापासून ‘विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ...

घरकुला साठी 20 हजाराची तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Image
घरकुल मंजुरीसाठी २० हजारांची लाच; ग्रामविकास अधिकारीसह तिघांविरुद्ध गुन्हा घाडगे न्यूज | प्रतिनिधी सात्रळ येथे घरकुल योजनेचे पैसे मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारीसह तिघांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी हैदर याकुब पटेल (वय ५६), ग्रामविकास अधिकारी, सात्रळ ग्रामपंचायत, रा. वृंदावन कॉलनी, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, ज्ञानदेव मोहन डुकरे, लिपिक, रा. सात्रळ, तसेच सचिन हौशिबा ब्राम्हणे, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती राहुरी, रा. लोणी, ता. राहाता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. कारवाईनंतर हैदर पटेल आणि ज्ञानदेव डुकरे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, कोणताही लो...

आमदार सचिन आहेर शिदे सेनेकडे

Image
आमदार सचिन आहेर शिंदे सेनेत  राजरंग।शिवाजी घाडगे  ठाकरेंना धक्क्यावर धक्के पक्षातील गळती थांबणार कधी शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेकदा "निष्ठावंत आमच्यासोबत आहेत" असा दावा केला. मात्र प्रत्यक्ष राजकीय वास्तव काही वेगळेच चित्र दाखवत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली गळती आज पर्यत थांबण्याचे नाव घेत नाही. खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते सातत्याने ठाकरे गटाची साथ सोडत असल्याचे दिसत आहे. अलिकडेच सहा खासदारांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा सुरू असतानाच आता आमदार सचिन आहेर यांच्या उपसभापतीपदाच्या अर्जामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे. सचिन आहेर हे केवळ आमदार नसून कामगार चळवळीशी जोडलेले आणि संघटनात्मक पातळीवर प्रभाव असलेले नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांची भूमिका बदलणे हा केवळ एका आमदाराचा निर्णय नसून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसाठीही धक्का मानला जात आहे. प्रश्न असा आहे की, पक्षातून होणारी ही सततची गळती केवळ सत्तेच्या मोहामुळे होत आहे का, की पक्षांतर्गत संवाद आणि ...

शिक्षक पात्रता परिक्षेची गरज आहे

Image
शिक्षक प्रात्रता परीक्षेची गरज आहे  तरंग।शिवाजी घाडगे  शिक्षक हा समाजाचा शिल्पकार मानला जातो. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्या शिक्षकांची निवड गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर व्हावी, याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. याच उद्देशाने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची संकल्पना पुढे आली.  मुळात आगोदर जे अभ्यासक्रम आहेत ते पुर्ण करताना परिपूर्ण ज्ञान दिलेले असतेच मग पुन्हा टी ई टी कशा साठी घ्यायची व यात नेमक कोणाच भल होते एक तर गेले अनेक दिवसांपासून शिक्षक भरले गेले नाहीत त्याचा परिणाम विद्यार्थाच्या शिकवण्यावर होतो  मात्र अलीकडे उघडकीस आलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारानंतर या परीक्षेच्या विश्वासार्हतेबरोबरच तिच्या उपयुक्ततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टीईटीची प्रश्नपत्रिका फुटते, परीक्षा रद्द होते, चौकशा सुरू होतात, आरोपी अटक होतात आणि काही दिवसांत सर्व काही शांत होते. मात्र या सगळ्या गोंधळात लाखो उमेदवारांचे काय? अनेक वर्षे अभ्यास करून, आर्थिक अडचणींवर मात करून आणि शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून परीक...

हा खाऊसाहेब तिकडे गेलाय बट्याबोळ

Image
हा ‘खाऊसाहेब’ जिकडे गेला तिकडे बट्ट्याबोळ!    घाडगे न्यूज | प्रतिनिधी | शिर्डी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करताना त्यांचा उल्लेख "खाऊसाहेब" असा केला. सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम पक्षांतर्गतच सुरू आहे. महिलांच्या आरक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळूनही अशा घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रातील राजकारणावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळू नये यासाठी काहीजण खासदार फोडण्याचे काम करत...

गुणवंतांचा सत्कार की मानापानाचे राजकीय नाट्य

Image
गुणवंतांचा सत्कार की मानपानाचे राजकीय नाट्य ?  तरंग।शिवाजी घाडगे  अलीकडेच एका कार्यक्रमात खासदार मेघा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात आसनव्यवस्थेवरून झालेल्या वादाची राज्यभर चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत मराठा समाजातील तरुणांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मूळ उद्देश तरुणांच्या यशाचा सन्मान करणे हा होता. मात्र, कार्यक्रमात घडलेल्या घटनांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू गुणवंत विद्यार्थी न राहता राजकीय मानपानाचा वाद ठरला. कार्यक्रमासाठी खासदार मेघा कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांना पहिल्या रांगेत बसवून नंतर जागेवरून उठविण्याऐवजी थेट व्यासपीठावर स्थान देणे अधिक उचित ठरले असते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कारण त्या लोकप्रतिनिधी असून संसदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवर खासदार आहेत. विशेष म्हणजे त्या पक्षनिष्ठ आणि सक्रिय महिला नेत्या म्हणूनही ओळखल्या जातात. वादाच्या वेळी खासदार मेघा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना, "तुम्ही आता मुख्यमंत्री देवेंद...