Posts

नसिफा अब्दुल सत्तार यांचे निधन

Image
नफिसा अब्दुल सत्तार बेगम यांचे दुःखद निधन सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम पत्न  होत . त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. नसिफा सत्तार  केवळ आमदारांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर सिल्लोडच्या राजकारणातील एक सक्रिय व प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना मिळाली होती. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांविषयी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहराने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात गिते यांच्या नियुक्तीचे गित सुरुच....

Image
राहुरी पोलिस ठाण्यात प्रल्हाद गिते यांच्या बदलीचे गित सुरुच   चर्चा ।शिवाजी घाडगे  राहुरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली. मात्र ही बदली नेमकी नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दिलासा, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुरीत अवघ्या आठ दिवसांपूर्वी नगरहून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना सोनई पोलीस ठाण्यातील खातेनिहाय चौकशीमुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर गिते यांची राहुरीत एंट्री झाली. परंतु गिते यांच्याविरोधातही चौकशीचे सावट असल्याने ते राहुरीत किती दिवस टिकणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. नगर तालुक्यातील गंभीर आरोप नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना गिते यांनी खुनाचे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप आहे. अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय ४२) यांना ६ मार्च २०२५ रोजी निघृण मारहाण झाली. उपचारादरम्यान २३ मार्च रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. इतक्या गंभीर घटनेनंतरही सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल...

वैतरणाचे अतिरिक्त पाणी आता मुकणे धरणात !

Image
वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी आता मुकणे धरणात घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट ॥ शिवाजी घाडगे ॥ अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी काही प्रमाणात अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे थेट अरबी समुद्रात वाहून जाते. हेच पाणी आता मुकणे धरणात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील इंजिनिअर प्रा. सतीश राऊत तसेच प्रहारचे अप्पासाहेब ढुस यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. वैतरणा बॅकवॉटरमधील अतिरिक्त पाणी उपयोगात आणल्यास नगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणांवरचा ताण कमी होईल आणि जायकवाडीला द्यावे लागणारे समन्वयी पाणी (५ टीएमसी) वाचू शकेल, असा त्यांचा ठाम आग्रह होता. या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक मान्यता देत निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  यांचेही या निर्णयामागे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अलीकडेच अप्पर वैतरणा व मुकणे धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी रविवारी करण्यात आली. ‘दोन...

मंत्रालय की लाचालय सांगाना न्याय कोठे मागायचा?

Image
 मंत्रालय की लाचालय सांगाना न्याय        कुठे मागायचा ? घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट   ॥ शिवाजी घाडगे ॥ राज्यकारभाराचा किल्ला… सत्तेचे केंद्र… जनतेच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक  तेच मंत्रालय. आणि त्याच मंत्रालयात, मंत्र्यांच्या कार्यालयातच लाच घेताना कर्मचारी रंगेहात पकडला जातो! ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही; हा व्यवस्थेवरचा सार्वजनिक अविश्वासाचा शिक्का आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने छापा टाकून कार्यालय सील केले, ही बातमी धक्कादायक आहे. परवाना नूतनीकरणासाठी ५० हजारांची मागणी, त्यातील ३५ हजारांची रंगेहात वसुली  आणि तेही मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर! म्हणजे भ्रष्टाचाराने आता दरवाजे तोडून आत शिरण्याची गरजच उरलेली नाही; तो खुर्च्यांवर बसून व्यवहार करत आहे.  प्रश्न फक्त एका लिपिकाचा आहे का? प्रत्येक वेळी सूत्र एकच असते — “कर्मचारी दोषी आहे, मंत्री अनभिज्ञ आहेत.” पण प्रश्न असा आहे की, मंत्र्यांच्या दालनात होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी कोणाची? खाजगी सचिवांचे नाव पुढे ये...

नविन तुती लागवडी साठी अर्ज करा

Image
नवीन तुती लागवडीसाठी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी – संदीप आगवणे घाडगे न्यूज | प्रतिनिधी रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकतो. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असून अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष उत्पादनाची कामे सुरू आहेत. रेशीम उत्पादनांना दिवसेंदिवस वाढती मागणी असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा रेशीम ...

नरेश आरोरा विषयी आरडाओरड

Image
नरेश आरोरा याच्या विषयी आरडाओरड  चर्चा।शिवाजी घाडगे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आपघातात आकाली निधनानंतर राजकीय सल्लागार नरेश आरोरा याच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे राष्ट्रवादी दादा गटाच कॅपियन हा अरोरा करीत होता गुलाबी रंग हा यांनीच आणला आता या कंपनीला पुढे मुदत वाढ देण्यात येईल की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून स्थानिक व परप्रांतीय असा वाद निर्माण केला जातोय? तसे राजकारणात काही व्यक्ती निवडणूक लढवत नाहीत भाषणांच्या सभा घेत नाहीत,  तरी त्यांच्या नावाभोवती निर्माण होणारा गदारोळ अनेक उमेदवारांपेक्षा मोठा असतो. नरेश ओरोरा हे त्यापैकीच एक नाव. साधारण 2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नरेश अरोरा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी नरेश अरोरा यांची 'डिझाइनबॉक्स' ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली गेली.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबत सुरू असलेली आरडाओरड ही केवळ व्यक्तीविषयी नाही, तर ती राजकीय सल्लागारांच्या वाढत्या प्रभावाविषयी आहे. आरडाओरडीचे नेमके कारण काय? ओरोरा हे व...

अहिल्यानगरात काॅफी रेव्ह पार्टी निवेदनानंतर रद्द

Image
अहिल्यानगरात प्रस्तावित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द; निवेदनानंतर रद्द  घाडगे न्यूज। प्रतिनिधी  मोठ्या शहरांमध्ये अधूनमधून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होत असल्याच्या घटना समोर येत असतात. अशा कार्यक्रमांचे नियोजन प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मर्यादित गटांमध्ये केले जाते. काही ठिकाणी अशा कार्यक्रमांवर कारवाई झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये “कॉफी रेव्ह पार्टी” नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रसारित झाली. ही बाब काही हिंदू संघटनांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवार, १४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) रोजी नगर शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. संबंधित जाहिरातीत महाविद्यालयीन तरुणींसाठी कमी शुल्कात प्रवेश दिला जाणार असल्याचा उल्लेख होता. तसेच संपर्कासाठी काही क्रमांकही देण्यात आले होते. सदर कार्यक्रमाबाबत संभाव्य गैरप्रकारां...