Posts

जप्त अंमली पदार्थ चोरी व विक्री प्रकरणाला वेगळे वळण

Image
जप्त अमली पदार्थ चोरी व विक्री प्रकरणाला नवे वळण; अधिकाऱ्यावर   वळणचे  डाॅक्टर विजय मकासरे यांचे गंभीर आरोप घाडगे न्यूज।प्रतिनिधी   जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या चोरी व विक्री प्रकरणात आता स्थानिक गुन्हे शाखेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या भूमिकेची नव्याने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी डाॅक्टर विजय मकासरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांच्या कडे   तक्रार अर्जाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की   सरकारी मुद्देमाल सुरक्षित ठेवण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ हे अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असतानाही त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुद्देमाल कक्षाची नियमित तपासणी, नोंदवही पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात ...

कोठे नेवून ठेवली ही व्यवस्था?

Image
कुठे नेऊन ठेवली आहे ही व्यवस्था? तरंग।शिवाजी घाडगे  राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बनत चालली आहे. शहरांतील अनेक सोसायट्यांमध्ये बारा-बारा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. मग ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला किती अंधार येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. एकीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा, तर दुसरीकडे पाणी आणि वीजटंचाईने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भविष्यातील भीषण पाणी संकटाची चाहूल आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असताना इंधन तुटवड्याची भीतीही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅस टंचाई इतकी तीव्र झाली आहे की काही मोठ्या हॉटेल्सनाही चुली पेटवण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे नव्हे, तर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत देणारी आहे. महागाईचा भडका इतका वाढला आहे की सामान्य माणसाच्या हाता...

१८जुन रोजी स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदान २२ निकाल -डाॅ पंकज आशिया

Image
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक  मतदारसंघ  १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी ४६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क - जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज।प्रतिनिधी  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया यांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारांना १ जूनपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार असून, २ जून...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 25 लाखाचे पारितोषिक

Image
पुणे कृषि हॅकथॉन 2026 मध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाला 25 लाखांचे प्रथम पारितोषिक कृषि विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पुणे कृषि हॅकथॉन 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या संवेदक आधारित ताण विशिष्ट नत्र फवारणी यंत्र या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ङङदेवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रुपये 25 लाखाचे कृषि यांत्रिकीकरण या विषयांतर्गत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे सदस्य डॉ. अवधूत वाळुंज यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ. प्रणव पावसे आणि इंजि. भूमिका पांडे हे या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे अन्य सदस्य असून हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या प्रकल्पाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी काम पाहिले. या प्रयोग...

स्थानिक स्वराज्य विधानपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवार द्या

Image
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी सत्यजित कदम यांच्या नावाची चर्चा; भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी घाडगे न्यूज।विशेष प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. कदम कुटुंबाचे भारतीय जनता पक्षाशी असलेले जुने नाते लक्षात घेता पक्षाने त्यांच्या निष्ठेचा सन्मान करावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. जनसंघाच्या काळापासून कदम कुटुंब भाजपाशी एकनिष्ठ राहिले आहे. सत्यजित कदम यांचे आजोबा लक्ष्मण कदम यांनी जनसंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांना यश मिळाले नसले, तरी त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. त्यानंतर भाजपाने माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पोटनिवडणुकीत विजय मिळवत ते उत्तर नगर जिल्ह्यातील भाजपाचे पहिले आमदार ठरले. एकदा पराभव झाल्य...

संकट दारासमोर उभे उधळपट्टी थांबणार कधी

Image
संकट दारासमोर उभे उधळपट्टी थांबणार कधी  तरंग।शिवाजी घाडगे  देश संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना आपण मात्र अजूनही दिखावा, उधळपट्टी आणि राजकारणाच्या नशेत बुडालेलो आहोत. जगात युद्ध पेटले आहे, अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था हादरत आहे, इंधन आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे; पण आपल्या समाजाला अजूनही याचे गांभीर्य कळताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणाऱ्या मानसिकतेमुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालली आहे. आज वेळ आहे एकात्मतेची, संयमाची आणि जबाबदारीची. पण आपण काय करत आहोत? सोशल मीडियावर वाद, राजकीय टोळ्यांची बाजू घेणे, आणि वास्तवापासून पळ काढणे. देश अडचणीत असताना नागरिक म्हणून आपली भूमिका काय, याचा विचार करण्यास कोणी तयार नाही. भारत हा जगातील सर्वात मोठ्या ग्राहक बाजारपेठांपैकी एक देश आहे. अनेक राष्ट्रे आपल्याकडे ग्राहक म्हणून पाहतात, कारण आपण प्रचंड प्रमाणात खरेदी करतो. पण कटू सत्य असे की पेट्रोल, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आपण परदेशांवर अवलंबून आहोत. म्हणजे दुसऱ्या देशात युद्ध झाले, तर त्याची आग आपल्या घरच्या स्वय...

कणगर येथे वाघाचा बबन कदम यांच्यावर हल्ला

Image
कणगर येथे वाघाचा इसमावर हल्ला; बबन कदम जखमी राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात शुक्रवारी रात्री वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात बबन कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कणगर येथील तांभेरे, वरघुडे व शेटे वस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बबन कदम हे परिसरातून जात असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करत मदतीस धाव घेतली. त्यानंतर जखमी अवस्थेत कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर कणगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच शेतात किंवा मोकळ्या परिसरात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन कणगरचे संरपंच सर्जेराव घाडगे यांनी केले आहे   वाघाचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  परिसरात सतर्कता वाढवली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.