बातम्यांचा वेग वाढला;सत्याचे काय
बातम्यांचा वेग वाढला; पण सत्याचे काय भाष्य।शिवाजी घाडगे एकेकाळी बातमी म्हणजे सकाळचे वर्तमानपत्र, दुपारची आकाशवाणी किंवा संध्याकाळच्या दूरदर्शनवरील बातम्या. एखादी महत्त्वाची घटना घडली की ती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही तास, कधी कधी दुसरा दिवस उजाडायचा. मात्र त्या बातमीमागे एक प्रक्रिया होती. माहिती गोळा केली जायची, संबंधित व्यक्तींची बाजू जाणून घेतली जायची, तथ्यांची पडताळणी केली जायची आणि त्यानंतरच ती बातमी वाचक किंवा श्रोत्यांपर्यंत पोहोचायची. आज काळ पूर्णपणे बदलला आहे. मोबाईल सुरू केला की काही सेकंदांत जगभरातील बातम्या आपल्या हातात येतात. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम , व्हाॅटस्प यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे बातमीचा वेग कल्पनेपलीकडे वाढला आहे. एखादी घटना घडते आणि काही क्षणांत तिचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचते. तंत्रज्ञानाने पत्रकारितेला वेग दिला, माहितीचे जग सर्वांसाठी खुले केले; पण या वेगाच्या शर्यतीत एक मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर होत चालला आहे—बातमीचा वेग वाढला, पण सत्याचे काय? आज ‘सर्वांत आधी बातमी’ देण्याची स्पर्धा सुरू...