Posts

रेल्वे उड्डाण पुलासाठी भूसंपादनाचे पैसे देण्या साठी लाचेची मागणी श्रीगोदा-पारनेर प्रात कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Image
रेल्वे उड्डाणपुलासाठी भूसंपादन भरपाई प्रकरणात लाचेची मागणी; दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा घाडगेन्यूज| प्रतिनिधी रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश विजय ढुमणे (महसूल सहाय्यक) आणि अमोल काशिनाथ खामकर (कंत्राटी कामगार) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील एका शेतकऱ्याची गट क्रमांक 13 मधील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी अंतर्गत रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी शासनाने भूसंपादन केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यास 1 कोटी 47 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी संबंधित शेतकरी प्रांत कार्यालयात पाठप...

निवासी अतिक्रमणे नियमित करण्या साठी ढुस यांच्या कडून जनजागृती मोहीम

Image
निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांच्याकडून रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम राहुरी : शासन निर्णयातील तरतुदीनुसार देवळाली प्रवरा हद्दीतील निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील वसाहत परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आप्पासाहेब ढूस यांनी शासन निर्णयातील विविध तरतुदींची माहिती नागरिकांना दिली. यावेळी गजानन येवले, अबूबकर शेख, बाळू पेटारे, राहुल गायकवाड, कांतीलाल गायकवाड, संगीता सोज्वल, रैसा शेख, सुग्राबी शेख, मार्था बोर्डे, दत्तात्रय देसाई, शारदा थोरात, बबन सरोदे, अनिल खरात, बाळू पंडित, सोमनाथ कांबळे, दीपक थोरात, नर्मदा वरगुडे, कुसुम बोरकर, सतीश गायकवाड, रमाबाई पालवे, आत्माराम शिंदे, रतनबाई बाबुळके, चंद्रकांत दहिवाले, सुनीता म्हस्के, आकाश पेटारे, लीलाबाई पेटारे, संगीता देसाई, सिद्धार्थ दहिवाले आदींसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपले मत मांडताना आप्पासाहेब ढूस यांनी १ जानेवारी २०११ पूर्वी शासनाच्या ...

आता आम्ही आहोत तुमच्या समवेत

Image
आम्ही आहोत तुमच्या पाठीशी!  राजकीय शुभेच्छांचा अर्थ काय राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  तसेच  सुजय विखे-पाटील  उपस्थित होते. या सत्कारानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री सत्कार करताना नेमके काय म्हणाले असतील, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. "घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी," असे काहीसे आश्वासक शब्द त्यांनी उच्चारले असतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण तर मिश्किलपणे असेही म्हणू लागले आहेत की, "तुम्हाला पक्षात घेतले आणि अवघ्या काही दिवसांत आमदारकीची संधी मिळाली; आता तरी मामांना सांगा या ईकडे अर्थात हा राजकीय उपहासाचा भाग असला तरी सध्याच्या राजकारणातील वेगवान घडामोडी पाहता अशा चर्चांना खतपाणी मिळणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, बिनविरोध निवड होणे ही कोणत्याही राजकारण्या...

पत्रकार सुधाकर कराळे यांचा ७१व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Image
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस तसेच जलनायक व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी कराळे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला   सुधाकर कराळे यांनी शेतकरी, कष्ट करी शोषित  घटक तसेच ग्रामीण विकासा साठी लेखन केले   पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्य करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि सुखसमृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात पत्रकारिता, समाजसेवा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. ७१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

शुटीबाॅल स्पर्धेत यशसंपादन केलेल्या खेळाडु समृध्दी पवळेचा गौरव

Image
 समृध्दीचा गौरव शूटींग बाॅल यश आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाच्या यशामध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु. समृद्धी महेश पवळे हिचा महत्वाचा सहभाग राहीला  कु. समृद्धी महेश पवळे यांची कन्या ज्येष्ठ नागरिक चांगदेव पवळे यांच्या नात  डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत  संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा विशेष गुण गौरव   करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी शाल व वैभव ढूस लिखित ‘अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन तिचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, चांगदेव पवळे, सार्थक पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी समृद्धीच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या भावी वाटचाल...

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुळे अहिल्यानगर ठरला राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Image
प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा घाडगे न्यूज @प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने आता आणखी एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या १९ वर पोहोचली असून, राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगरची नोंद झाली आहे. हा विक्रम राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि अल्पावधीतच उमेदवारी जाहीर होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडामोडीची मोठी चर्चा रंगली. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आणि विधान परिषदेचे ७ असे एकूण १९ आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ९ आमदार असून, अजित पवार गटाचे ५, शिवसेना (शिंदे गट) चे २ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँ...

जंतर-मंतरवर तरुणाईचा हुंकार

Image
जंतर-मंतरवर पुन्हा तरुणाईचा हुंकार?   तरंग।शिवाजी घाडगे  देशाच्या राजकारणात अनेक आंदोलने झाली, अनेक नेते आले-गेले; पण जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. सध्या नीट  परीक्षा, विद्यार्थ्यांचे भविष्य, वाढता मानसिक ताण आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे देशातील युवकांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काॅकोरज पार्टीचे अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरून केंद्र सरकारविरोधात उघडलेला मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुणांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात असला, तरी या पाठिंब्याचे प्रत्यक्ष आंदोलनात किती रूपांतर होते, हा खरा प्रश्न आहे. कारण सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि जनआंदोलनातील ताकद यामध्ये मोठा फरक असतो. आज देशातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. गावाकडील पालक कर्ज काढून मुलांना शहरात शिकवतात. मुलांच्या यशस्वी...