शेती शाश्वत करणा साठी सर्वाचे प्रयत्न हवे
शेती शाश्वत साठी सर्वांनीचे प्रयत्न हवे – कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज| प्रतिनिधी शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे. अनेक शेतकरी अजूनही माती परीक्षण न करता रासायनिक खतांचा वापर करतात. पिकांना दिलेले सर्व रासायनिक खत पिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे जैविक व जिवाणू खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीची उत्पादकता, पिकांचे उत्पादन आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जिवाणू खते, सेंद्रिय खते तसेच हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर देऊन भरडधान्य पिकांचा समावेश करावा. मानवी आरोग्य आणि शेती यांची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शासनाचे विविध विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. शेती शाश्वत होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान’ आणि ‘संतुलित खत वापर जनजागृती अभियान’ अंत...