Posts

आधुनिक बाबा कडुन अध्यात्माला उद्योगाचे स्वरुप

Image
आधुनिक "बाबा"आणि संपत्तीचा साम्राज्य अध्यात्म की उद्योग? श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  हल्लीच्या काळात आधुनिक बाबा  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्तींनी कोट्यवधी-करोडो रुपयांची अफाट संपत्ती उभी केली आहे. ही संपत्ती केवळ भक्तांच्या श्रद्धेवर आधारित असून, स्वतःचे महात्म्य निर्माण करून ती गोळा करण्यात आली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या बाबांची संपत्ती किती असेल, याचा विचार केला तरी सामान्य माणसाला अक्षरशः आध्यात्मिक भोवळ आल्या शिवाय राहत नाही. काही बाबा बाह्य स्वरूपात साधेपणा दाखवतात अंगावर कमी वस्त्र, साधी जीवनशैली परंतु लोभाचा त्याग केला आहे का, हा खरा प्रश्न आहे. वस्त्रांचा त्याग सहज शक्य आहे; पण लोभाचा त्याग कितीजण करतात? सध्या गाजत असलेले भोगू कॅप्टन अशोक खरात यांचे प्रकरण हे याच प्रवृत्तीचे ताजे उदाहरण आहे. काही दिवस हे प्रकरण चर्चेत राहील, नंतर विस्मरणात जाईल आणि पुन्हा एखादा ‘नवा बुवा’ जन्माला येईल हीच  वस्तुस्थिती आहे. मागे वळून पाहीले तर अनेक मोठ्या आध्यात्मिक संस्थांच्या संपत्तीचे आकडे चकित करणारे आहेत.  सत्य साईबाबांच्या मालमत्तेची मोजद...

विद्यार्थानी ज्ञाना बरोबरच खेळाला महत्व द्यावे- अध्यक्ष अरुण तनपुरे

Image
विद्यार्थानी ज्ञाना बरोबर खेळाला महत्व द्यावे -अध्यक्ष अरुण तनपुरे राहुरी : आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या संस्थांना पुन्हा नवसंजीवनी देणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, तसेच ज्ञाना बरोबर खेळाला महत्व द्यावे  असे प्रतिपादन डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी केले. संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान संचालिका मीनाताई करपे होत्या. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, राहुरी तालुक्याला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर बंद असलेला तनपुरे साखर कारखाना सुरू करणे अत्यावश्यक आहे. कारखान्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेला हा कारखाना मुक्त करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखान्यावर प्रशासक नियुक्त असल्यामुळे अपेक्षित वेगाने निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कारखाना बंद असल्याने तालुक्यातील विकासाची गती मंदावली असून त्याचा मोठ...

भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली ?

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली? श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, तपासाची व्याप्ती आता केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे. जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष तपास पथक  अशोक खरातच्या बंगल्यावर कारवाईसाठी गेले असता त्याची पत्नी कल्पना खरात हिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती तेथून फरार झाली. यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात तसेच आणखी तीन जणांविरुद्ध फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, गुरुवारी पुन्हा एका महिलेने अशोक खरातविरुद्...

अवकाळी वारा अण गाराचा पाऊस

Image
राहुरी तालुक्यात अवकाळी गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान राहुरी : राहुरी तालुक्यात गुरुवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारपर्यंत वातावरण उष्ण असताना अचानक ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. काही भागात गारांचा मारा इतका तीव्र होता की उभ्या पिकांना फटका बसला. विशेषतः भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे (शेजारी राष्ट्रांतील युद्धजन्य स्थितीमुळे) शेतीमालाच्या बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, आता अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात ...

राहरी विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध धूसर अब तक 36

Image
 बिनविरोधची शक्यता धुसर अब तक ३६ इच्छुकांनी घेतले अर्ज  घाडगे न्यूज। प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून बिनविरोध निवडणुकीची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत तब्बल 36 इच्छुक उमेदवारांनी 71 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून घेतली आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना अद्याप प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी नामनिर्देशनपत्र घेतलेले नाही. त्यामुळे अंतिम क्षणीच खरी लढत कोणामध्ये होणार, याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी नामनिर्देशनपत्रे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती उमेदवार रिंगणात राहणार, हे अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतरच निश्चित होईल. राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकस्मात निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने बुधवारी आपल्या उमेदवाराची घोषणा केली असली, तरी इतर पक्षांक...

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकी साठी अक्षय कर्डीले यांना भाजपाची उमेदवारी

Image
अक्षय कर्डीले भाजपाचे अधिकृत उमेदवार जाहीर घाडगे न्यूज | प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली असून युवा नेते अक्षय शिवाजी कर्डीले यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून पक्षाचे केंद्रीय राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी दिल्लीहून या उमेदवारीची घोषणा केली. अक्षय कर्डीले हे दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र असून, त्यांच्या उमेदवारीमुळे राहुरी मतदारसंघात भाजपाने नव्या पिढीवर विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर कर्डीले कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता, या निर्णयाला राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची रणनीती आणि नेतृत्वाची एकजूट दिसून येत आहे.

भोगू कॅप्टन अशोक खरात वर गुन्हे वाढ मुलगा अटक कुटुंब गोत्यात

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात गुन्हे वाढले; कुटुंबीयांवरही कारवाईची छाया मुलगा अटक  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि  आणखी तिघांविरुद्ध फसवणूक तसेच बेकायदेशीर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एकेकाळी भक्तांच्या समस्या चुटकीसरशी सोडवणारा म्हणून प्रसिद्ध असलेला खरात आज मात्र कारागृहात आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासात उघड होत असलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने तथाकथित ‘अघोरी शक्ती’ आणि अंधश्रद्धेच्या आड एक प्रकारचे व्यावसायिक मॉडेल उभे केले होते. सत्ता, मनासारखी बदली किंवा पोस्टिंग, जमीन-जुमला, संपत्ती, तसेच वैयक्तिक आणि लैंगिक समाधान अशा विविध ‘सेवा’ देण्याचे आमिष दाखवून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. ग्राहकाच्या आर...