श्रीरापुरात नेमके अपयश कोणाचे
श्रीरामपूरत नेमके अपयश कोणाचे स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या कारणाने राज्याच्या चर्चेत आले आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, संताप आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेले प्रश्न पाहता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) निखिल गुप्ता यांना स्वतः श्रीरामपूरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा लागला. एखाद्या गंभीर घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देणे ही प्रशासनाची नियमित प्रक्रिया असली, तरी अशा भेटीची वेळ का आली, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. कायदा व सुव्यवस्था ही केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यापुरती मर्यादित नसते. गुन्हे होण्यापूर्वीच त्यांना आळा घालणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे, सराईत गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवणे, अवैध व्यवसायांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबद्दल विश्वास निर्माण करणे ही पोलिस यंत्रणेची मूलभूत जबाबदारी आहे. जेव्हा या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पडत नाहीत, तेव्हा परिस्थिती...