Posts

दोन्ही दादांवर भाजपाचा भरोसा नाय काय

Image
दोन्ही दादांवर भाजपचा भरोसा नाय का? राजरंग।शिवाजी घाडगे  जलतरण तलावाच्या उद्घाटनात गळाभेट; राजकीय अस्वस्थतेवर मात्र पडदा किती दिवस? राजकारणात एखादा साधा कार्यक्रमही अनेकदा मोठे राजकीय संकेत देऊन जातो. देवळाली प्रवरा येथील जलतरण तलावाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने लोणीचे दादा आणि देवळालीचे दादा एकमेकांच्या गळ्यात गळा घालून भावूक झाले. दोघांच्या या गळाभेटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. ही केवळ जिव्हाळ्याची भेट होती की त्यामागे दोन्ही दादांच्या सध्याच्या राजकीय अस्वस्थतेची छाया होती, असा प्रश्न आता विचारला जात आहे. दोन्ही दादा भाजपशी निष्ठावान असल्याचे सातत्याने सांगत आले आहेत. मात्र पक्षाशी असलेली निष्ठा आणि पक्षाच्या सत्ताकारणात मिळणारे स्थान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गेल्या काही वर्षांत पक्षाच्या राजकारणात झालेल्या बदलांकडे पाहिले, तर दोन्ही दादांना अपेक्षित राजकीय वजन मिळत आहे का, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज सुरू झाली आहे. देवळालीच्या दादांचा राजकीय प्रवास पाहिला, तर पवार कुटुंबीयांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध...

जलसंधारण सप्ताहातून जलसाक्षर अभियान

Image
जलसंधारण सप्ताहातून ‘जलसाक्षर’ अहिल्यानगरचा संकल्प   । विशेष प्रतिनिधी। पाणी ही जीवनाची मूलभूत गरज असून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण आणि पाणी बचतीची लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प अहिल्यानगर जिल्ह्यात करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या संकल्पनेतून माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाला शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. पाण्याचे महत्त्व, जलसाठ्यांचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती करून ‘जलसाक्षर’ समाज निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विविध उपक्रमांतून जलजागृती जलसंधारण सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यात विविध जन...

वाॅक फाॅर वॉटर अभियान

Image
महा वॉकेथॉन २०२६ – ‘वॉक फॉर वॉटर’ २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन; जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न विशेष प्रतिनिधी शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्या साठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात   ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’  या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करून त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आले आहे.  या उपक्रमाची ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो’  ही संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांनी जास्तीत जास्त ३ किलोमीटर अंतराची वॉकॅथॉन पूर्ण करायची असून त्यानंतर मृदसंधारण आणि जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात येणार आहे. जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर जलसंधा...

भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांचा नाही

Image
भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांची नाही  भाष्य।शिवाजी घाडगे  शिक्षण हा देशाच्या विकासाचा कणा असतो. ज्या देशाने शिक्षण, संशोधन, विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले, त्या देशाने जगाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील बदल हा केवळ अभ्यासक्रम बदलण्याचा विषय नसतो. तो देशाच्या भवितव्याशी संबंधित असतो. भारताच्या शिक्षण व्यवस्थेबाबत आज निर्माण झालेले प्रश्न त्यामुळेच गंभीर आहेत. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले. या बदलांमध्ये काही सकारात्मक उद्दिष्टे असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी, सरकारी शाळांची अवस्था, शिक्षकांची कमतरता, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न, खासगी शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी शिक्षणाचा तुटलेला संबंध यामुळे चिंता वाढत आहे. आज ‘नीट’ परीक्षेभोवती निर्माण झालेला गोंधळ हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थतेचे एक लक्षण आहे. नीटचा गोंधळ आणि तरुणांचा संताप वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो ...

तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावेच लागतील !

Image
तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावेच लागतील! भाष्य।शिवाजी घाडगे  सीजीपीचा संस्थापक अभिजीत दीपके याच्यामध्ये एक पत्रकार दडलेला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती, सत्तेला थेट प्रश्न विचारण्याची हिंमत, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेला शब्द देण्याची हातोटी यामुळे त्यांनी उभी केलेली सीजीपी ही केवळ सोशल मीडियावरील संघटना राहिलेली नाही. तिने एका विशिष्ट काळात तरुणाईच्या असंतोषाला व्यासपीठ मिळवून दिले आहे. आजच्या राजकारणात हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी आंदोलन उभे करायचे असेल तर पक्षाचे कार्यालय, संघटनेचे जाळे, कार्यकर्त्यांची फळी, मोठमोठ्या सभा आणि मोर्चे आवश्यक असायचे. आता एका मोबाईलच्या माध्यमातून प्रश्न उभा करता येतो, हजारो तरुणांना जोडता येते आणि काही तासांत एखादा मुद्दा देशव्यापी चर्चेचा विषय बनू शकतो. पारंपरिक राजकीय पक्षांना या बदलाची अजूनही पूर्ण जाणीव झालेली दिसत नाही. सीजीपीच्या आंदोलनाला मिळालेला तरुणाईचा प्रतिसाद याच बदलाचा संकेत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्य...

ध्येयाची नशा करा व्यसनाची नाही देवळाली प्रवरात विद्यार्थानी घेतली भारत नशामुक्त शपथ

Image
‘ध्येयाचा नशा करा, व्यसनाचा नाही’;  विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प घाडगे न्यूज: प्रतिनिधी भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत देवळाली प्रवरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, जनजागृती व्याख्यान आणि प्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी केंद्राच्या प्रमुख विजया दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या सहकार्याने देशभर ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ राबविण्यात येत असून, चार कोटी युवक-युवतींना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. व्यसनमुक्त भारत ही केवळ सरकारी योजना नसून ...

अहिल्यानगर च्या शासकीय रुग्णालयांच्या 981पदाना शासकीय मान्यता

Image
अहिल्यानगरच्या ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदांना राज्य शासनाची मान्यता  घाडगे न्यूज @विशेष बातमी  अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी आवश्यक ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय  निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाचे कार्यक्षम संचालन, दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला मोठी गती मिळणार आहे. राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शासन निर्णयानुसार रुग्णालयासाठी गट-अ, गट-ब आणि गट-क स...