Posts

गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह भक्ती, सेवा सामाजिक बांधिलकीचा संगम

Image
१७९वा गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह : भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अध्यात्म।शिवाजी घाडगे  स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. धनगरवाडी ता. राहाता जि .अहिल्यानगर येथे यंदाचा १७९व्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आले असून,  विविध भागांतून लाखो भाविक या सप्ताहात सहभागी झाले आहेत. अखंड हरिनामाचा गजर, संत-महंतांची प्रवचने, धुनीचे दर्शन, महाप्रसाद आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे धनगरवाडी परिसर भक्तिमय झाला आहे. सप्ताहाच्या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी पाहता जणू काही पंढरीच धनगरवाडीत अवतरली असल्याचा अनुभव भाविकांना येत आहे. गंगागिरी महाराजांच्या कार्यावर आणि विचारांवर असलेली हरिनाम सप्ताह पंपरा महंत नारायण गिरी यांच्या नंतर महंत रामगिरी महाराज पुढे नेत असुन  परमेश्वर बद्दल अपार श्रद्धा या सप्ताहातून प्रकर्षाने जाणवते. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. ह...

गोड साखर माहागाईने कडु झाली

Image
गोड साखर महागाईने कडू झाली! भाष्य।शिवाजी घाडगे  दोन दिवसांत साखरेच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील गोडवा अक्षरशः कडू झाला आहे. रोजच्या चहापासून ते सणासुदीच्या गोड पदार्थांपर्यंत साखरेचा वापर प्रत्येक घरात होतो. त्यामुळे साखरेच्या दरात झालेली वाढ ही केवळ एका वस्तूची महागाई नसून तिचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन अर्थसंकल्पावर होतो. साखरेचा किरकोळ दर काही ठिकाणी ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जाते. पावसाचे कमी प्रमाण, उसाच्या उत्पादनावर होणारा परिणाम, साखर कारखान्यांकडून साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीला दिले जाणारे प्राधान्य, बाजारातील मागणी-पुरवठ्याचे बदलते गणित आणि व्यापाऱ्यांकडून केला जाणारा साठा, या सर्व बाबींचा परिणाम साखरेच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. मात्र, या सगळ्याचा अंतिम भार ग्राहकांच्या खिशावर पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचे नेमके कारण आणि त्यामागील बाजारव्यवस्था तपासणे आवश्यक आहे. पावसाच्या लहरीपणाचा उसाला फटका यंदा अनेक भागांत पावसाचे प्रमाण ...

पाणी व माती वाचवा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया

Image
नैसर्गिक घटकांचे संवर्धन ही काळाची गरज — जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज। प्रतिनिधी माती आणि पाणी ही आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून, त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी माती व पाणी संवर्धनाची लोकचळवळ उभी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माती व पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर श्रीमती ज्योती गाडे, नगरसेवक ऋग्वेध गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक सालविठ्ठल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी मुळीक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरांगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्व...

गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहात रंग न बदलनारा भला मोठा सरडा

Image
गंगागिरी महाराज  हरिनाम सप्ताहा सरडा रंग न बदलणारा..... भाष्य।शिवाजी घाडगे  प्रत्येक वर्षी गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह आयोन जिल्ह्यात होत असते या वर्षी धनगरवाडी येथे हा सप्ताह सुरु असुन या ठिकाणी कृषीप्रर्दशन भरले असून यात तब्बल २१किलो वजनाचा सरडा पाहायला मिळतोय  मोठ्या भक्तिभावाने गंगागिरी महाराज १७९ व्या  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक उपस्थित राहतात. भक्ती, श्रद्धा, सेवा, सामाजिक एकोपा आणि संतपरंपरेचे दर्शन घडविणारा हा सप्ताह आता एक मोठी धार्मिक आणि सामाजिक परंपरा बनला आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य माणसाला अध्यात्माची गोडी लागावी, त्याला भक्तीच्या माध्यमातून एकत्र आणता यावे आणि त्याचबरोबर त्याला गोडधोड महा प्रसाद मिळावा, या हेतूने महंत गंगागिरी महाराज यांनी या हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. पुढे नारागिरी महाराज यांनी ही परंपरा अखंड सुरू ठेवली आणि आता रामगिरी महाराज ती पुढे नेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने...

श्रीरामपूरा अंमली पदार्थ जनजागृती फेरी निर्धार व्यसनमुक्तीतीचा

Image
श्रीरामपूरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती फेरी ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’  घाडगे न्यूज। प्रतिनिधी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवक-युवतींना दूर ठेवण्यासाठी आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर शहरात शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) अंमली पदार्थविरोधी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या फेरीत युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून पुढे नेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर शहरात या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूरचे अप्पर  पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता आर.बी.एन. महाविद्यालयातून जनजागृती फेरीला प्रारंभ ह...

गाळयुक्त शिवार शेतजमीन झाली सुपीक

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात गाळयुक्त शिवार’मुळे  ३८३९ हेक्टर जमीन झाली सुपीक राहुरी   जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या  योजनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.  गत तीन वर्षांत जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ७१.९१ लाख घनमीटर गाळाचा उपसा करुन हा गाळ ३८३९ हेक्टर शेतजमिनीवर टाकून पसरविण्यात आला . याचा  लाभ संबंधित २७६० शेतकऱ्यांना झाला . गाळ उपसल्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत झाली असून, अंदाजे ७१०० घनमीटर इतका अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होण्यास हातभार लागला आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांनी दिली. जलसंधारण सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाच्या विविध उपक्रमांना गती देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतून एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य होत आहेत. एकीकडे धरणे, तलाव, बंधारे व नाल्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढविण्यात येत आ...

बातम्यांचा वेग वाढला;सत्याचे काय

Image
बातम्यांचा वेग वाढला; पण सत्याचे काय भाष्य।शिवाजी घाडगे  एकेकाळी बातमी म्हणजे सकाळचे वर्तमानपत्र, दुपारची आकाशवाणी किंवा संध्याकाळच्या दूरदर्शनवरील बातम्या. एखादी महत्त्वाची घटना घडली की ती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही तास, कधी कधी दुसरा दिवस उजाडायचा. मात्र त्या बातमीमागे एक प्रक्रिया होती. माहिती गोळा केली जायची, संबंधित व्यक्तींची बाजू जाणून घेतली जायची, तथ्यांची पडताळणी केली जायची आणि त्यानंतरच ती बातमी वाचक किंवा श्रोत्यांपर्यंत पोहोचायची. आज काळ पूर्णपणे बदलला आहे. मोबाईल सुरू केला की काही सेकंदांत जगभरातील बातम्या आपल्या हातात येतात. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम , व्हाॅटस्प यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे बातमीचा वेग कल्पनेपलीकडे वाढला आहे. एखादी घटना घडते आणि काही क्षणांत तिचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचते. तंत्रज्ञानाने पत्रकारितेला वेग दिला, माहितीचे जग सर्वांसाठी खुले केले; पण या वेगाच्या शर्यतीत एक मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर होत चालला आहे—बातमीचा वेग वाढला, पण सत्याचे काय? आज ‘सर्वांत आधी बातमी’ देण्याची स्पर्धा सुरू...