Posts

गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी

Image
गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी? आता निर्णायक लढ्याची वेळ! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांची भरदिवसा हॉटेलमध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण शहर भयभीत झाले. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशीही शहर कडेकोट बंद राहिले. विशेष म्हणजे हा बंद कोणत्याही एका पक्षाचा नव्हता, तर सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, नागरिक रस्त्यावर उतरले आणि गुन्हेगारांविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला. हा बंद केवळ एका हत्येच्या निषेधासाठी नव्हता; तो श्रीरामपूरच्या सुरक्षित भविष्याची मागणी करणारा आवाज होता. एका तरुण व्यावसायिकाचा भरदिवसा खून होतो, तोही शहराच्या मध्यवर्ती भागात. याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती राहीलेली नाही का? शहरातील व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? असे अनेक प्रश्न या घटनेने निर्माण केले आहेत. श्रीरामपूर हे उद्योग, व्यापार आणि शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वा...

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काॅगेस करणार भिक मागो आंदोलन-नगरसेवक दासू पठारे

Image
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचा 'भिक मागो' आंदोलनाचा इशारा-नगसेवक दासू पठारे  देवळाली प्रवरा| प्रतिनिधी देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ १८ जुलै रोजी 'भिक मागो' आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक दासू पठारे यांनी दिला आहे. पत्रकारांशी बोलताना पठारे म्हणाले की, शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून नागरिकांना रोज खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवरही टीका केली. "राज्यात लोकप्रतिनिधींचे सरकार असतानाही मुख्याधिकारी अजूनही प्रशासकीय राज असल्याप्रमाणे वागत असून नागरिकांच्या प्रश्नांबाबत...

मुलांच्या आग्रहाखातर देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम सायकल पंढरपूर वारीला

Image
मुलाच्या आग्रहाखातर देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम  पंढरपूर सायकल वारीला ! वारी।शिवाजी घाडगे  आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी पायी दिंड्यांमधून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सायकल संस्कृतीचा संदेश देणाऱ्या सायकल दिंडीने यंदाच्या वारीत विशेष लक्ष वेधून घेतले. देवळाली प्रवरा सायकल ग्रुपच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीत देवळाली प्रवराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपल्या मुलगा ध्रुवच्या आग्रहाखातर सहभाग घेत संपूर्ण सायकल वारी पूर्ण केली. वडील-मुलाने एकत्र पूर्ण केलेली ही वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. शुक्रवारी देवळाली प्रवरातून या सायकल दिंडीचे उत्साहात प्रस्थान झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तब्बल चार हजारांहून अधिक सायकलस्वार या दिंडीत सहभागी झाले. पंढरपूरमध्ये या सायकल दिंडीने भव्य रिंगण घालत विठ्ठलभक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. देवळाली प्रवरा येथील सुमारे २५ सायकल वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. त्यांनी विविध वृक्ष व औषधी वनस्पतींच्या बियाण्या...

श्रीरापुरच्या गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ

Image
 श्रीरामपूरातील गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ  स्पेशल रिपोर्ट ।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरात तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबया (वय ३०) यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेमुळे केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही, तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुंडांची दहशत नेमकी सामान्य नागरिकांवर आहे की कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर, असा सवाल उपस्थित केला जात आहे. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारहाण, खंडणी, दहशत आणि टोळीबाजीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा वर्चस्वाच्या संघर्षातून, तर कधी जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे शहराची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. शनिवारी घडलेल्या घटनेत एका हॉटेलमध्ये जेवण देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून वेटरला मारहाण करण्यात आली. हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या हॉटेल मालक आकाश दुबया यांच्यावर आरो...

टाळ्या वाजवणाऱ्या हातांनी केली टाळ वाजवणाऱ्या हाताची सेवा !

Image
टाळ्या वाजवणाऱ्या हातांनी केली टाळ वाजवणाऱ्यांची सेवा! तरंग।शिवाजी घाडगे  आषाढी वारी म्हणजे श्रद्धा, समता, सेवा आणि मानवतेचा अखंड उत्सव. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी श्रीरामपूरसह परिसरातील हजारो वारकरी दरवर्षी टाळ-मृदंगाच्या गजरात, मुखी हरिनामाचा जप करत पायी दिंडीतून पंढरपूरकडे प्रस्थान  करतात. या भक्तिमय वातावरणात श्रीरामपूरातील तृतीयपंथीय समाजाने केलेल्या सेवाभावी कार्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे केले. स्वतः टाळ्या वाजवून उपजीविका करणाऱ्या किन्नर (तृतीयपंथीय) समाजाने वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांना फळे, बिस्किटे आणि पिण्याचे पाणी वाटप केले. कोणताही गाजावाजा न करता, केवळ सेवाभाव आणि विठ्ठलभक्तीच्या प्रेरणेने त्यांनी केलेली ही सेवा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. "आम्ही टाळ्या वाजवून उदरनिर्वाह करतो; पण वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभावे, हीच आमची इच्छा आहे," अशी भावना तृतीयपंथीय समाजातील सदस्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीतून समाजाला माणुसकीचा आणि समतेचा अमूल्य संदेश मिळेल. ही घटना केवळ मदतीची नव्हे, तर सामाजिक समरसतेची होती. टाळ्या...

मुस्लिम समाजातील सहारा मंगल कार्यालयात महंत रामगिरी दिंडीचा मुक्काम

Image
 मुस्लिम बांधवांच्या 'सहारा' मंगल कार्यालयात महंत रामगिरी दिंडीचा मुक्काम  तरंग । शिवाजी घाडगे  आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या महंत रामगिरी महाराज यांच्या दिंडीचा शनिवारी रात्री देवळाली प्रवरा येथील 'सहारा' मंगल कार्यालयात मुक्काम झाला. या मुक्कामासाठी मुस्लिम समाजातील युनुस भाई  यांनी आपल्या मंगल कार्यालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचा एक सकारात्मक संदेश समाजापुढे आला. महंत गंगागिरी महाराज यांनी अनेक वर्षांपूर्वी पंढरपूर वारीची ही दिंडी सुरू केली होती. त्यांच्या पश्चात महंत नारायणगिरी महाराज यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे चालू ठेवली. सध्या महंत रामगिरी महाराज या दिंडीचे नेतृत्व संध्या करत असून, ही वारकरी परंपरा सातत्याने पुढे नेत आहेत. काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी एका धार्मिक विषयावरील केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाले होते. त्या वक्तव्याविरोधात विविध स्तरांतून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस संरक्षणही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा पा...

जिल्हा उपनिवडुक अधिकारी सुनील गाढे यांनी भरून घेतले सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र

Image
अहिल्यानगर चे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले घाडगे न्यूज।प्रतिनिधी  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणनापत्रे भरून घेत आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सक्रिय सहकार्य करून गणनापत्र वेळेत भरून द्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केले. शनिवारी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी राहुरी तालुक्यातील कणगर गावाला अचानक भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. पाहणीदरम्यान गावचे सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र भरले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर गाढे यांनी स्वतः त्यांच्या समक्ष त्यांचे गणनाप...