या आमदारांना झाल तरी काय
या आमदारांना झालं तरी काय राजरंग।शिवाजी घाडगे अलीकडच्या काळात या आमदार महोदयांच्या काही वक्तव्यांमुळे मतदारांच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला आहे—“या आमदारांना झालं तरी काय?” लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या पदाचे महत्त्व कमी करणारी, मतदारांच्या भावनांना धक्का देणारी आणि स्वतःच्याच राजकीय भवितव्याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये नेमकी कोणत्या भावनेतून केली जात आहेत, याची चर्चा आता मतदारांमध्ये सुरू झाली आहे. एकीकडे कोणीतरी म्हणतो, “मला झाटभर मतांची गरज नाही, माझ्याकडे काम घेऊन येऊ नका.” तर दुसरीकडे दुसरे आमदार महोदय म्हणतात, “आमदारकी गेली तरी चालेल; पण मी मागे हटणार नाही.” प्रश्न एवढाच आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना आपण नेमके काय बोलतोय, याचे भान राहते आहे का? राजकारणात आक्रमक भूमिका घेणे गैर नाही. अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणेही आवश्यक आहे. मात्र, जनतेने निवडून दिलेल्या पदावर असताना शब्दांना मोठे महत्त्व असते. कारण आमदाराचे प्रत्येक वक्तव्य केवळ वैयक्तिक मत राहत नाही, तर त्यातून मतदारांशी असलेले नाते आणि लोकशाहीतील जबाबदारीही प्रतिबिंबित होते. ज्या मतांसाठी अश्...