Posts

बातम्यांचा वेग वाढला;सत्याचे काय

Image
बातम्यांचा वेग वाढला; पण सत्याचे काय भाष्य।शिवाजी घाडगे  एकेकाळी बातमी म्हणजे सकाळचे वर्तमानपत्र, दुपारची आकाशवाणी किंवा संध्याकाळच्या दूरदर्शनवरील बातम्या. एखादी महत्त्वाची घटना घडली की ती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही तास, कधी कधी दुसरा दिवस उजाडायचा. मात्र त्या बातमीमागे एक प्रक्रिया होती. माहिती गोळा केली जायची, संबंधित व्यक्तींची बाजू जाणून घेतली जायची, तथ्यांची पडताळणी केली जायची आणि त्यानंतरच ती बातमी वाचक किंवा श्रोत्यांपर्यंत पोहोचायची. आज काळ पूर्णपणे बदलला आहे. मोबाईल सुरू केला की काही सेकंदांत जगभरातील बातम्या आपल्या हातात येतात. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम , व्हाॅटस्प यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे बातमीचा वेग कल्पनेपलीकडे वाढला आहे. एखादी घटना घडते आणि काही क्षणांत तिचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचते. तंत्रज्ञानाने पत्रकारितेला वेग दिला, माहितीचे जग सर्वांसाठी खुले केले; पण या वेगाच्या शर्यतीत एक मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर होत चालला आहे—बातमीचा वेग वाढला, पण सत्याचे काय? आज ‘सर्वांत आधी बातमी’ देण्याची स्पर्धा सुरू...

वकील रस्त्यावर येत म्हणतायत खड्डे आहेत मायलॉर्ड

Image
‘वकील रस्त्यावर येत म्हणतायत, खड्डे आहेत मायलॉर्ड!’ घाडगे न्यूज।प्रतिनिधी  नगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, या मागणीसाठी राहुरी वकील संघाने मंगळवारी आक्रमक भूमिका घेत भर पावसात रास्ता रोको आंदोलन केले. ‘महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत, मायलॉर्ड... आता तरी शासनाने या रस्त्याकडे गांभीर्याने पाहावे,’ अशा संतप्त भावना व्यक्त करत वकील बांधव-भगिनींनी शासनाचे लक्ष महामार्गाच्या दुरवस्थेकडे वेधले. गेल्या अनेक वर्षांपासून नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. या महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही प्रवाशांना मात्र खड्डे, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आता अधिक अंत न पाहता महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राहुरी येथील ग्रीन हॉटेल चौकात झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. भर पावसातही आंदोलन सुरू ठेवत वकिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला नागरिक, शेतकरी संघटना तसेच वाहन संघटन...

या आमदारांना झाल तरी काय

Image
या आमदारांना झालं तरी काय राजरंग।शिवाजी घाडगे  अलीकडच्या काळात या आमदार महोदयांच्या काही वक्तव्यांमुळे मतदारांच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला आहे—“या आमदारांना झालं तरी काय?” लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या पदाचे महत्त्व कमी करणारी, मतदारांच्या भावनांना धक्का देणारी आणि स्वतःच्याच राजकीय भवितव्याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये नेमकी कोणत्या भावनेतून केली जात आहेत, याची चर्चा आता मतदारांमध्ये सुरू झाली आहे. एकीकडे कोणीतरी म्हणतो, “मला झाटभर मतांची गरज नाही, माझ्याकडे काम घेऊन येऊ नका.” तर दुसरीकडे दुसरे आमदार महोदय म्हणतात, “आमदारकी गेली तरी चालेल; पण मी मागे हटणार नाही.” प्रश्न एवढाच आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना आपण नेमके काय बोलतोय, याचे भान राहते आहे का? राजकारणात आक्रमक भूमिका घेणे गैर नाही. अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणेही आवश्यक आहे. मात्र, जनतेने निवडून दिलेल्या पदावर असताना शब्दांना मोठे महत्त्व असते. कारण आमदाराचे प्रत्येक वक्तव्य केवळ वैयक्तिक मत राहत नाही, तर त्यातून मतदारांशी असलेले नाते आणि लोकशाहीतील जबाबदारीही प्रतिबिंबित होते. ज्या मतांसाठी अश्...

हल्ली समाज्यात संवाद कमी अण वाद जादा

Image
समाज्यात संवाद कमी अण वाद जादा  भाष्य।शिवाजी घाडगे   हल्ली छोट्या छोट्या गोष्टी वरुन वाद निर्माण होत असुन हे वाद विकोपाला जावून एक मेकाचा जीव घेण्या पर्यंत जावून पोहचले आहेत अत्यंत शुल्लक कारणावरुन वाद विवाद निर्माण करून सामाजिक वातावरण प्रदूषित केले जाते संवाद कमी अण वाद जास्त होत चाललेय.  अलिकडे सगळेच एका मेका कडे संशयाने पहात असून आपुलकी माणुसकी लोप पावत चालली काय अशी शंका यावी  गावातील सार्वजनिक उस्वोह हे सर्व समाज्याचे होते आता मात्र कोणीच कोणाचे उस्वोह साजरे करायचे नाही असे ठरवल की काय जुणे पुराणे वाद उकरून काढायचे व आपली पोळी भाजून घ्यायची मात्र समाज विघटना पेक्षा एकतेत अधिक चांगला राहतो एखाद्या सुवासिक पुष्पहार विविध रंगी बे रंगी फुलांनी अधिक मनमोहक दिसावा तसा  ९०च्या दशकातकात  स्मार्टफोन नव्हते, इंटरनेटचा वेग नव्हता आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात रमण्याची सवयही नव्हती. मोबाईलच्या छोट्याशा पडद्यावर हजारो मित्रांची यादी नव्हती; पण शेजारच्या घरातला प्रत्येक माणूस आपला वाटायचा. आजच्या भाषेत सांगायचे तर त्या काळात ‘कनेक्टिव्हिटी’ कमी हो...

मुक्ताई बारवेला नवसंजीवनी

Image
८०० वर्षे जुन्या मुक्ताई बारवेला नवसंजीवनी  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्याबाई होळकर बारव पुनर्जीवन व पुनर्वापर मोहिमेंतर्गत नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील सुमारे ८०० वर्षे जुन्या ऐतिहासिक मुक्ताई बारवेला नवसंजीवनी मिळाली आहे. गावकऱ्यांच्या प्रयत्नातून आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने या पुरातन बारवेची स्वच्छता व पुनरुज्जीवन करण्यात आले असून, आता ती पुन्हा वापरात आणण्यात आली आहे. या पुनर्जीवित मुक्ताई बारवेचा लोकार्पण सोहळा १९ ऑगस्ट रोजी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार विठ्ठल लंघे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पिचडगाव येथील मुक्ताई बारवेला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. सुमारे आठ शतकांपूर्वी बांधण्यात आलेली ही बारव केवळ पाण्याचा स्रोत नसून, परिसराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मृती जपणारा महत्त्वाचा ठेवा मानला जातो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानकाका आणि संत मुक्ताई यांच्या परंपरेशी या परिसराचा संबंध जोडला जात असल्याने मुक्ताई ...

दोन्ही दादांवर भाजपाचा भरोसा नाय काय

Image
दोन्ही दादांवर भाजपचा भरोसा नाय का? राजरंग।शिवाजी घाडगे  जलतरण तलावाच्या उद्घाटनात गळाभेट; राजकीय अस्वस्थतेवर मात्र पडदा किती दिवस? राजकारणात एखादा साधा कार्यक्रमही अनेकदा मोठे राजकीय संकेत देऊन जातो. देवळाली प्रवरा येथील जलतरण तलावाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने लोणीचे दादा आणि देवळालीचे दादा एकमेकांच्या गळ्यात गळा घालून भावूक झाले. दोघांच्या या गळाभेटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. ही केवळ जिव्हाळ्याची भेट होती की त्यामागे दोन्ही दादांच्या सध्याच्या राजकीय अस्वस्थतेची छाया होती, असा प्रश्न आता विचारला जात आहे. दोन्ही दादा भाजपशी निष्ठावान असल्याचे सातत्याने सांगत आले आहेत. मात्र पक्षाशी असलेली निष्ठा आणि पक्षाच्या सत्ताकारणात मिळणारे स्थान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गेल्या काही वर्षांत पक्षाच्या राजकारणात झालेल्या बदलांकडे पाहिले, तर दोन्ही दादांना अपेक्षित राजकीय वजन मिळत आहे का, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज सुरू झाली आहे. देवळालीच्या दादांचा राजकीय प्रवास पाहिला, तर पवार कुटुंबीयांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध...

जलसंधारण सप्ताहातून जलसाक्षर अभियान

Image
जलसंधारण सप्ताहातून ‘जलसाक्षर’ अहिल्यानगरचा संकल्प   । विशेष प्रतिनिधी। पाणी ही जीवनाची मूलभूत गरज असून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण आणि पाणी बचतीची लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प अहिल्यानगर जिल्ह्यात करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या संकल्पनेतून माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाला शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. पाण्याचे महत्त्व, जलसाठ्यांचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती करून ‘जलसाक्षर’ समाज निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विविध उपक्रमांतून जलजागृती जलसंधारण सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यात विविध जन...