झोडपले तरी शान कायम ?
झोडपले तरी शान कायम…? घाडगे न्यूज।प्रतिनिधी राहुरी शहरात अलीकडे घडलेल्या घटनेने कायदा, पोलीस यंत्रणा आणि लोकशाहीतील मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना शहरातून पायी फिरवत त्यांच्या तोंडावर काळे फडके बांधून धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि त्यानंतर शहरात चर्चेचे वादळ उठले. पोलीसांवर हल्ला करणे हे नक्कीच गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच जर हात उगारला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करताना कायद्याच्या चौकटीत राहणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. आरोपींची धिंड काढणे, त्यांना पायी फिरवणे किंवा सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक देणे हे कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा “दाखवण्याचा” प्रकार ठरतो, अशी टीका होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, आरोपींना न्यायालयात नेत असताना जर कोणत्याही नागरिकाने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर त्या अनर्थाची जबाबदारी कोणाची राहिली असती? पोलिसांकडे वाह...