Posts

गुंडगिरीचा वाढता विळखा श्रीरामपूरात नागरिकांचा आक्रोश

Image
गुंडगिरीचा वाढता विळखा आणि श्रीरामपूरचा आक्रोश स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  शहराची खरी ओळख त्याच्या उद्योगधंद्याने, व्यापाराने, संस्कृतीने आणि कायदा-सुव्यवस्थेने ठरते. नागरिक निर्भयपणे व्यवसाय करतात, कुटुंबासह रात्री फिरू शकतात आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते, तेव्हा त्या शहराची प्रगती होते. पण जेव्हा भरदिवसा व्यापाऱ्याचा निर्घृण खून होतो, त्यानंतर सलग चार दिवस शहर बंद राहते, सर्वपक्षीय मोर्चे निघतात आणि नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न पडतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीच्या हत्येचा विषय राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवरील अविश्वासाचा उद्रेक ठरतो. श्रीरामपूरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबया यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती ही याच वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. सलग चार दिवस शहर बंद राहिले. ही घटना केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून नागरिकांच्या मनात साचलेल्या असुरक्षिततेची अभिव्यक्ती आहे. व्यापाऱ्याचा जीव सुरक्षित नसेल तर शहरातील व्यापार किती दिवस टिकणार? उद्योजक गुंतवण...

प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अवघड

Image
प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना काम करणे अवघड      स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर येथील सद्य स्थिती तसेच  जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केलेली खंत  श्रीरामपूर शहरांवर गुंडगिरी सावट रिपोर्ट वर मत व्यक्त करताना  संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संपर्कात असल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कायद्याचे निष्पक्ष पालन आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे अधिकाधिक कठीण बनत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही राजकीय शिफारशी आणि इतर अनौपचारिक बाबींना महत्त्व दिले जात आहे. अशा वातावरणात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता काम करतात, मात्र त्यांनाच अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते. अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या भावनांनुसार, अलीकडच्या काळात पोलीस दलातील काही...

श्रीरामपूर च्या शांतेवर गुंडाचे सावट

Image
श्रीरामपूरच्या शांततेवर गुंडगिरीचे सावट! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असून व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. बुधवारी या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.  अवघ्या तीस वर्षांच्या तरुण व्यावसायिकाची भरदिवसा, त्याच्या वडिलांसमोर निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. हल्ल्यावेळी वडिलांसमोर घडलेला हा थरारक प्रसंग पाहून ते अक्षरशः हतबल झाले. काही क्षण त्यांना काय घडत आहे याचाही अंदाज आला नाही. या घटनेने दुबया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील व्यापारी वर्गात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवण न मिळाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले. अशा क्षु...

अहिल्यानगर चे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून संजय मस्के

Image
अहिल्यानगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारीपदी संजय मस्के यांची नियुक्ती  जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी अहिल्यानगरचे नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.  बिड येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून त्याच्या कडे चार्ज होता जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची नवी मुंबई येथे बदली झाल्यानंतर संजय मस्के  यांची अहिल्यानगर येथे बदली झाली आहे  संजय मस्के यांनी आपल्या सेवाकाळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषतः जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रंथालय संचालनालयात त्यांची ओळख "वास्तुशिल्पकार अधिकारी" अशी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सुमारे आठ जिल्हा ग्रंथालय कार्यालयांच्या इमारती पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालयाच्या नव्या इमारतीचे कामही त्यांच्या नेतृत्वाखाली गती घेऊन लवकर पूर्ण होईल आणि वाचकांना सुसज्ज, आधुनिक ग्रंथालय उपलब...

गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी

Image
गुन्हेगारांचा बंदोबस्त की श्रीरामपूरची बदनामी? आता निर्णायक लढ्याची वेळ! स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. लक्ष्मीनारायण हॉटेलचे तरुण व्यावसायिक आकाश दुबया यांची भरदिवसा हॉटेलमध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण शहर भयभीत झाले. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशीही शहर कडेकोट बंद राहिले. विशेष म्हणजे हा बंद कोणत्याही एका पक्षाचा नव्हता, तर सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, नागरिक रस्त्यावर उतरले आणि गुन्हेगारांविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला. हा बंद केवळ एका हत्येच्या निषेधासाठी नव्हता; तो श्रीरामपूरच्या सुरक्षित भविष्याची मागणी करणारा आवाज होता. एका तरुण व्यावसायिकाचा भरदिवसा खून होतो, तोही शहराच्या मध्यवर्ती भागात. याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती राहीलेली नाही का? शहरातील व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? असे अनेक प्रश्न या घटनेने निर्माण केले आहेत. श्रीरामपूर हे उद्योग, व्यापार आणि शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वा...

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काॅगेस करणार भिक मागो आंदोलन-नगरसेवक दासू पठारे

Image
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचा 'भिक मागो' आंदोलनाचा इशारा-नगसेवक दासू पठारे  देवळाली प्रवरा| प्रतिनिधी देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ १८ जुलै रोजी 'भिक मागो' आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक दासू पठारे यांनी दिला आहे. पत्रकारांशी बोलताना पठारे म्हणाले की, शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून नागरिकांना रोज खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवरही टीका केली. "राज्यात लोकप्रतिनिधींचे सरकार असतानाही मुख्याधिकारी अजूनही प्रशासकीय राज असल्याप्रमाणे वागत असून नागरिकांच्या प्रश्नांबाबत...

मुलांच्या आग्रहाखातर देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम सायकल पंढरपूर वारीला

Image
मुलाच्या आग्रहाखातर देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम  पंढरपूर सायकल वारीला ! वारी।शिवाजी घाडगे  आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी पायी दिंड्यांमधून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सायकल संस्कृतीचा संदेश देणाऱ्या सायकल दिंडीने यंदाच्या वारीत विशेष लक्ष वेधून घेतले. देवळाली प्रवरा सायकल ग्रुपच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीत देवळाली प्रवराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपल्या मुलगा ध्रुवच्या आग्रहाखातर सहभाग घेत संपूर्ण सायकल वारी पूर्ण केली. वडील-मुलाने एकत्र पूर्ण केलेली ही वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. शुक्रवारी देवळाली प्रवरातून या सायकल दिंडीचे उत्साहात प्रस्थान झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तब्बल चार हजारांहून अधिक सायकलस्वार या दिंडीत सहभागी झाले. पंढरपूरमध्ये या सायकल दिंडीने भव्य रिंगण घालत विठ्ठलभक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. देवळाली प्रवरा येथील सुमारे २५ सायकल वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. त्यांनी विविध वृक्ष व औषधी वनस्पतींच्या बियाण्या...