Posts

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डाॅक्टर अटकेत

Image
अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डॉक्टरला अटक; आरोपींची संख्या 24 वर घाडगे न्यूज प्रतिनिधी :  अवैध गर्भलिंग निदान चाचण्या आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी दाखल गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटचा अतिशय बारकाईने तपास सुरू आहे. तपासादरम्यान अनेक डॉक्टर, मेडिकल चालक तसेच एजंट यांचा या गैरप्रकारांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे धागेदोरे आता विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या डॉक्टर, एजंट आणि मेडिकल चालकांची चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा तांत्रिक तपास केल्यानंतर विविध तालुक्यांमध्ये एजंटचे जाळे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आता आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय 54 वर्षे), बीएएमएस, रा. शिरूर, जि. पुणे असे आहे. सदर डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्या...

लाभा साठी आम्ही पक्षच काय बापाचे नाव बदलु माध्यमांनी नाक खुपसूनये

Image
लाभा साठी आम्ही पक्ष काय  बापाचे नाव बदलु माध्यमांनी नाक खुपसूनये  राजरंग।शिवाजी घाडगे  लोकशाहीत पत्रकार प्रश्न विचारतात आणि लोकप्रतिनिधी उत्तरे देतात. पण हल्ली काही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे म्हणजे जणू त्यांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी केल्यासारखे वाटू लागले आहे. शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी काही पत्रकारांना उद्देशून वापरलेली भाषा आणि व्यक्त केलेला संताप यामुळे पुन्हा एकदा राजकारणी आणि माध्यमांमधील नाते चर्चेत आले आहे. "मी आता काही बोलणार नाही", "उगाच बोट घालू नका", "माझ्या डोक्यात जाऊ नका", "कमिशनरकडे तक्रार करा" अशा शब्दांत खासदारांनी पत्रकारांना झापले. प्रश्न एवढाच आहे की, पत्रकारांनी नेमके काय अपराध केले होते? प्रश्न विचारला होता की गुन्हा केला होता? पक्ष बदरण्याचा गुन्हा तुम्ही करा आणि म्हणता घरा पर्यंत जावु नका मी पाटील  काय बी करीन म्हणजे आम्ही लाभा साठी पक्षच काय  बापाचे नाव बदलु राजकारणात पक्ष बदलणे आता नवीन राहिलेले नाही. कालपर्यंत ज्या पक्षासाठी जीव ओतून काम केले, त्याच पक्षावर दुसऱ्या दिवशी टीका क...

सत्तेत जाणच शाहणपणाच

Image
सत्तेत जाणच शाहणपणाच  राजरंग।शिवाजी घाडगे  सत्ये पुढे शहाणपण चालत नसत अस म्हणतात मात्र सत्तेत सहभागी होण हे देखील शहाणपणाचे नाही का तर याच उत्तर देखील होच येईल कोणाला काय वाटत कोण काय  म्हणेल याचा विचार राजकीय व्यक्तींनी करायचा नसतो तो करायचा सर्व सामान्य जनतेने  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या राजकीय भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम, नाराजी आणि आत्मपरीक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चूक नेमकी मतदारांची झाली की भाऊसाहेब वाकचौर यांची? शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांचा पराभव करून भाऊसाहेब वाकचौर यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले व  नंतर सदाशिव लोखंडे यांना डावलून भाऊसाहेब खासदार केले  पहिल्या कार्यकाळात निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या समीकरणांचा फायदा होईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा त्यांचा राजकीय अंदाज असावा. मात्र त्याचा अपेक्षित लाभ झाला नाही....

महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षक झाले आता डी वाय एस पी

Image
महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनाही बढती घाडगे न्यूज @प्रतिनिधी  महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल २४७ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेशही जाहीर करण्यात आले आहेत. या पदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले प्रमोद सदाशिव वाघ यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत त्यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून मुक्ताईनगर येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी पोलीस दलात जबाबदारीची पदे सांभाळताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे तसेच जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अ...

इंडीयाच्या विकासा साठी भारताचा त्याग

Image
इंडियाच्या विकासासाठी भारताचा त्याग का? तरंग।शिवाजी घाडगे  देशाचा विकास हा प्रत्येक नागरिकाचा अभिमानाचा विषय असतो. आधुनिक महामार्ग, बुलेट ट्रेन, मोठी धरणे, औद्योगिक प्रकल्प, बंदरे, विमानतळ आणि स्मार्ट शहरे ही प्रगतीची प्रतीके मानली जातात. परंतु या विकासाच्या चमकदार चित्रामागे एक मूलभूत प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो या विकासाची किंमत नेमकी कोण मोजत आहे? ग्रामीण आणि शहरी म्हणजे शहराचा विकासा साठी त्याग कोण करतय? चार, सहा किंवा दहा पदरी महामार्ग उभे राहताना हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जाते. बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. धरणांसाठी संपूर्ण गावे पाण्याखाली जातात. औष्णिक वीज प्रकल्पांसाठी जंगलांचा बळी दिला जातो आणि आदिवासींना त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडावे लागते. किनारपट्टीवरील प्रकल्पांसाठी मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते. प्रत्येक वेळी एकच युक्तिवाद पुढे केला जातो देशाच्या विकासासाठी काही ना काही त्याग करावाच लागतो. हा युक्तिवाद चुकीचा नाही. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीस...

नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले

Image
नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले   ‘राजकीय विमा’ फसला? राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकारणाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. राजकारणात पैसा, सत्ता, पद आणि प्रस्थ यांना महत्त्व असले तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हातातच असतो. अनेकदा निवडणुकीपूर्वी आखलेली गणिते, बांधलेली समीकरणे आणि केलेल्या राजकीय गुंतवणुकीवर नेतेमंडळींचा प्रचंड विश्वास असतो. मात्र निकाल लागल्यानंतर वास्तव काहीसे वेगळेच चित्र दाखवून जाते. नाशिकमध्ये नेमके तेच घडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला नसला तरी पाठींबा देऊन प्राचार थाबवण्या साठी हार घातला यातीलच फुले वाटुन गोकुळ गिते यांनी दराडे यांची हार करत विधानपरिषदेत पोहचले असून मंगळवारी त्यानी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. कदाचित नरेंद्र दराडे यांचा भविष्यात रोष रोखण्या साठी गोकुळ गिते यांनी सेनेचे गित गायले असावे अशी चर्चा आहे.  शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा झालेला प...

दिल्लीत वाढते शिंदेंचे वजन

Image
दिल्लीत वाढते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वजन राजरंग।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढते राजकीय महत्त्व. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील सभेत "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे" असे जाहीरपणे सांगितल्यानंतर या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षांपेक्षा हे संख्याबळ अधिक असल्याने केंद्रातील सत्तासमीकरणात शिंदे यांचे महत्त्व वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या वाढत्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वास्तव वेगळेच प्रश्न उपस्थित करत आहे. एका बाजूला दिल्लीत शिंदे यांचा गौरव होत असताना दुसऱ्या बाजूला नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होतो. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून महायुतीतील अंतर्गत राजकारणाचे संकेत देणारा मानला जात आहे. भाजपने मन...