Posts

राहुरी खुर्द तीव्र पाणीटंचाई विरोधात महिला अक्रमक

Image
राहुरी खुर्दमध्ये पाणी मिळत नाही  ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त महिलांनी ठोकले टाळे राहुरी ।   राहुरी खुर्द  तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थ हैराण झाले   असून संतप्त रहिवाशी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन बुधवारी करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आदोलन छेडले  “जोपर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपस्थित नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यही कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलां म्हणाल्या की, “आम्ही नियमितपणे व वेळेवर पाणीपट्टी भरत आहोत. मात्र तरीही नागरिकांना पुरे...

तटकरे सिल्व्हर ओक वर भेटीला

Image
तटकरे यांच्या ‘सिल्व्हर ओक’ वर भेटीला  सिल्व्हर भेटी।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात काही भेटी या केवळ शिष्टाचारापुरत्या नसतात; त्या अनेक राजकीय संकेत देऊन जातात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे  यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे घेतलेली भेट ही अशाच प्रकारची मानली जात आहे. वरकरणी साधी वाटणारी ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. अजित पवार यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली. त्यानंतर सत्तेतील समीकरणे बदलली, निष्ठा बदलल्या आणि अनेक नेत्यांचे राजकीय वजन नव्याने मोजले जाऊ लागले. या प्रक्रियेत सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनाही सतत राजकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षांतर्गत कोडमारी, सोशल मीडियावरील टीका, विविध वादांमध्ये नाव ओढले जाणे आणि कार्यकारिणीतील बदलांच्या चर्चा यामुळे तटकरे यांच्याभोवती अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी...

कांदा व लसूण पिकांवर कृत्रिम तंत्रज्ञान संशोधन हवे-कुलगुरु विलास खर्चे

Image
कांदा व लसुन या पिकांच्या संशोधनामध्ये आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आवश्यक - कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी । महाराष्ट्रामध्ये कांदा पिकातील 40% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाखाली असून रब्बी हंगामासाठी फुले स्वामी हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. कांदा व लसूण या पिकांमधील निर्यातक्षम वाणासाठी रंग, साईज व टिकवणक्षमता यावर अधिक काम करण्याची गरज आहे. आपल्याला काटेकोरपणे खते व औषधांचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कांदा आणि लसूण पिकांवरील 17 व्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी  अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत असलेले राष्ट्...

विचारांचे उत्तर विचारांनीच...

Image
विचारांना उत्तर विचारांनीच… एका मेका गच्चाडू अवघी फेकू शाई   रणसंग्राम।शिवाजी घाडगे  लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कधी राजकीय मंचावरून व्यक्त होतो, तर कधी सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर भाष्य करताना समोर येतो. मात्र, मतभेदांचा सामना करताना संयम, संवाद आणि विवेक या मूल्यांची जपणूक होणे तेवढेच आवश्यक असते. अलीकडे विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक  अथवा काळे वंगण फेकल्याची घटना  ही केवळ एका व्यक्तीवरील प्रतिक्रिया नसून समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक मानावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी ह भ प संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. मात्र, ही केवळ शाईफेक नसून काळे वंगण अंगावर ओतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदाय, काही कीर्तनकार आणि धार्मिक प्रवचनांच्या देवघेव पद्धतीबाबत भाष्य केले होते. काही महाराजांच...

तक्रार निवारण दिन संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपक्रमाचे स्वागत

Image
तक्रार निवारण दिनाचे सुदर्शन! उपक्रम।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय पोलीस ठाण्यांमध्ये शुक्रवारी “तक्रार निवारण दिन” उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीस दलाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस ठाण्यांतील प्रलंबित तक्रारी, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी शिस्त आणि नागरिकांशी संवाद या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे.  त्यामुळे कठोर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर नगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडूनही जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या नगर जिल्ह्यात पोलीस खात्याची प्...

जैसी करणी वैसी भरणी भोगू अशोक खरात वर काळाचा आसूड

Image
जैसी करणी वैसी भरणी; स्वयंघोषित ‘कॅप्टन’वर काळाचा आसूड   श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिक येथील स्वयंघोषित “कॅप्टन” म्हणून चर्चेत आलेला अशोक खरात  सध्या विविध गुन्हे, चौकशी आणि प्रकृतीच्या समस्यांमुळे अडचणीत सापडला आहे. एकेकाळी मोठेपणाचा आव आणत फिरणाऱ्या या व्यक्तीवर आता काळानेच उलट वार करून आसूड ओढला असल्याची  चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. “जैसी करणी वैसी भरणी” अशीच प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात सध्या  शिर्डी पोलीस ठाण्यात तो पोलीस कोठडीत असून  पुन्हा नाशिक पोलिस त्याचा ताबा घेवु शकतात . एका हाताला लकवा झाल्याने त्याची प्रकृती खालावली असून रक्तदाब व शुगरसाठी उपचार सुरू आहेत. एकेकाळी मोठ्या थाटामाटात फिरणाऱ्या अशोक खरात याला आता न्यायालयीन आणि वैद्यकीय संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याची वेळ घेऊन भोळे भाबडे भक्त आपल्याला गुण येईल या आशेवर असायची आता मात्र खरातची शिर्डी पोलीसांनी वरात काढली असून खरातची वेळ खराब असून तो देखील आता याचना करीत असुन त्याला दिवसा चांदण्या दिसत आहेत.  राहाता न्याय...

तामिळनाडूचे खरे नायक विजय थलापती

Image
 तामिळनाडूचा निकाल… राजकारणाला नवा दिशादर्शक राजरंग।शिवाजी घाडगे  तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता नेते विजय थलापती यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या राजकीय घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद देत, नव्या चेहऱ्याने आणि नव्या आश्वासनांनी मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता या निकालातून दिसून आली. हा निकाल केवळ सत्तांतराचा नसून, जनतेच्या अपेक्षांमध्ये होत असलेल्या बदलांचा संकेत मानावा लागेल. या निवडणुकीत लोकाभिमुख योजनांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. महिलांसाठी मासिक आर्थिक मदत, बेरोजगारांसाठी भत्ता, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, तसेच सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना या सगळ्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. या योजनांमुळे केवळ आश्वासनांची यादी नव्हे, तर “सरकार आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष मदत करू शकते” हा संदेश पोहोचवण्यात यश आले. याहून महत्त्वाची बाब म्हणजे, विजय यांनी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासह संविधानिक मूल्यांचा उल्लेख करत दिलेला संदेश. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन त्याला आमदार बनवणे ही कृती प...