गोड साखर माहागाईने कडु झाली
गोड साखर महागाईने कडू झाली! भाष्य।शिवाजी घाडगे दोन दिवसांत साखरेच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील गोडवा अक्षरशः कडू झाला आहे. रोजच्या चहापासून ते सणासुदीच्या गोड पदार्थांपर्यंत साखरेचा वापर प्रत्येक घरात होतो. त्यामुळे साखरेच्या दरात झालेली वाढ ही केवळ एका वस्तूची महागाई नसून तिचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन अर्थसंकल्पावर होतो. साखरेचा किरकोळ दर काही ठिकाणी ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जाते. पावसाचे कमी प्रमाण, उसाच्या उत्पादनावर होणारा परिणाम, साखर कारखान्यांकडून साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीला दिले जाणारे प्राधान्य, बाजारातील मागणी-पुरवठ्याचे बदलते गणित आणि व्यापाऱ्यांकडून केला जाणारा साठा, या सर्व बाबींचा परिणाम साखरेच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. मात्र, या सगळ्याचा अंतिम भार ग्राहकांच्या खिशावर पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचे नेमके कारण आणि त्यामागील बाजारव्यवस्था तपासणे आवश्यक आहे. पावसाच्या लहरीपणाचा उसाला फटका यंदा अनेक भागांत पावसाचे प्रमाण ...