Posts

नशामुक्त जीवन व व्यसनमुक्त समाज रॅलीचे आयोजन-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

Image
अहिल्यानगर येथे व्यसनमुक्तीसाठी  भव्य ‘नशामुक्त जीवन’ जनजागृती रॅली- पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अमली पदार्थांचे वाढते सेवन, विविध प्रकारच्या व्यसनांचे समाजावर होत असलेले गंभीर दुष्परिणाम आणि तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी भव्य ‘नशामुक्त  जीवन’ व व्यसनमुक्त समाज जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक सुदर्शन म्हणाले की, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकारातून देशभर अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातही ‘नशामुक्त जीवन’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेबाबत जागर...

शेतीची ढासाळती अर्थव्यवस्था मजुरांचा ताण

Image
शेतीची ढासळलेली अर्थव्यवस्था : वाढता उत्पादन खर्च, मजुरीचा ताण  भाष्य।शिवाजी घाडगे  एकेकाळी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस शेतीने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले. ऊस उत्पादक म्हणजे सधन बागायतदार, अशी समाजात ओळख निर्माण झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांत बदललेल्या आर्थिक समीकरणांमुळे हे चित्र झपाट्याने बदलले आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे वाढलेले दर, रासायनिक खते व बियाण्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, बाजारातील अनिश्चितता आणि शेतमालाला न मिळणारा रास्त भाव यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतीपासून दूर जात भुसार पिकांकडे मोर्चा वळविला. मात्र, तेथेही अपेक्षित आर्थिक समाधान मिळत नसल्याने शेती आज तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढत आहे. ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक आहे. लागवडीपासून तोडणीपर्यंत साधारण वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. या काळात खत, औषधे, पाणी, मजुरी आणि इतर खर्च सातत्याने वाढत जातो. दुसरीकडे अनेक ठिकाणी उसाच्या वजनातील कथित अनियमितता, तोडणीसाठी लागणारा मोठा खर्च, वाहतूक, बांधणी साहित्या...

राजपुत्र बोललेच नाही मात्र राजकारणात मौन चालत नाही

Image
राजपुत्र बोललेच नाही मात्र  राजकारणात मौन चालत नाही! भाष्य।शिवाजी घाडगे  महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष एका व्यक्तीकडे खिळले होते. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. पक्षातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. व्यासपीठावर आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. मात्र सुरुवातीला ते काहीसे संकोचलेले दिसले. काही क्षण ते शब्द शोधत असल्याचे जाणवले आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. भाषण अपेक्षेपेक्षा लहान राहिल्याने त्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. राजकारणात एखादे भाषण हे केवळ शब्दांचे संकलन नसते. ते नेतृत्वाचा आत्मविश्वास, अभ्यास, विचारांची स्पष्टता आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते यांचे प्रतिबिंब असते. म्हणूनच अमित ठाकरे यांच्या या अल्प भाषणाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचवेळी एका भाषणावरून एखाद्या नेत्याचे संपूर्ण राजकीय मूल्यमापन करणेही तितकेच चुकीचे ठरते. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत वक्तृत्वाला नेहमीच मोठे स्थान र...

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयअधिकारी कार्यालयाच्या वतीने सामूहिक ग्रंथवाचन

Image
लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात अधिकारी कार्यालया मार्फत सामूहिक ग्रंथ वाचन   प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसा निमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे  सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथालय निरीक्षक रामदास  शिंदे यांच्या हस्ते  लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी श्री.छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक  विद्यामंदिर, भूतकर...

लोकमान्य टिळक पुण्यतिथी माझ्या भाषणाची पहिली सुरुवात

Image
लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनी माझ्या पहिल्या भाषणाचा जन्म   -शिवाजी घाडगे  लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने माझ्या वक्तृत्वाची, लेखणीचा आणि जीवन प्रवासाची सुरवात झाली  दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस देशभरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या आदराने साजरा केला जातो. अनेकांसाठी हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका महानायकाला अभिवादन करण्याचा असतो; पण माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व त्यापेक्षाही अधिक आहे. कारण हा दिवस माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारा दिवस आहे. आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वी, शालेय जीवनात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केलेले माझे पहिले भाषण हेच माझ्या वक्तृत्वाचा जन्म ठरले. त्या दिवशी मिळालेल्या टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आणि त्या टाळ्यांनीच माझ्यातील वक्ता, लेखक आणि पत्रकार घडविण्याची प्रक्रिया सुरू केली त्या वेळी मी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला व्यासपीठावर उभे राहण्याची भीती वाटली नाही स्वतःवर विश्वास...

शोध पत्रकारीता लोप पावता कामा नयेत प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील

Image
शोध पत्रकारिता लोप पावता कामा नये ; माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे – जयंत पाटील घाडगे न्यूजसाठी -श्रीरामपुरहुन @अनिल पाडे देशातील राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक बदलांचा सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या क्षेत्रावर पडला असेल, तर तो पत्रकारितेवर पडला आहे. पूर्वी समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी शोध पत्रकारिता आज दुर्मिळ होत चालली आहे. त्याऐवजी अनेक माध्यमांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप आणि तात्कालिक चर्चांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेने सत्य, वस्तुनिष्ठता आणि जनहित यांचा ध्यास सोडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीरामपूर येथे आयोजित ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकमतचे राजकीय संपादक यद...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
कापूस उत्पादक शेतकर्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन राहुरी। महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांतर्गत  कोंढवड येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या कापूस उत्पादक शेतकर्यांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार आणि दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सहायक कृषि अधिकारी भारती ढगे, दुर्गा शहाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. खर्डे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे उद्दिष्टे विषद केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मंचामार्फत शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कापूस उत्पाद...