Posts

अँड सुभाष पाटील साहेब नेतृत्व नव्हे विश्वास!

Image
अँड सुभाष पाटील साहेब म्हणजे नेतृत्व नव्हे; एक विश्वास! जबरविश्वास।शिवाजी घाडगे  पद येतात-जातात, सत्ता बदलते, राजकीय समीकरणे बदलतात; पण माणसांच्या मनात निर्माण झालेला विश्वास कधीच बदलत नाही. आणि म्हणूनच अँड. सुभाष पाटील साहेब हे केवळ एक राजकीय नाव नाही, तर  सार्वजनिक जीवनातील एक विश्वासाची ओळख आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांच्या कर्तृत्वाची वेगळी ओळख आहेच , स्पष्टवक्ते, अभ्यासू, शिस्तप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि माणसांना जोडणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय मा. अँड. सुभाष पाटील साहेब. आज त्यांचा वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना मन अभिमानाने आणि आपुलकीने भरून येते. काही माणसे आयुष्यात येतात आणि केवळ स्वतःची ओळख निर्माण करून थांबत नाहीत; ते आपल्या विचारांनी, कृतीने आणि माणुसकीने अनेकांच्या आयुष्याला दिशा देतात. काही व्यक्ती पदावर असताना मोठ्या वाटतात; पण काही व्यक्ती अशा असतात की पद त्यांच्यामुळे मोठे होते. त्यांच्या नावापुढे पदाची गरज नसते, कारण त्यांच्या कार्यानेच त्यांची ओळख निर्माण झालेली असते. अँड. सुभा...

जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका राहुरीत

Image
 पोलीस अधीक्षक राहुरीत गणेश मंडळांशी साधणार हितगुज घाडगे न्यूज। प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम राखून साजरा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका हे सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) राहुरीत  येणार आहेत. यावेळी ते गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. सोमवारी सकाळी १०.३० वाजता राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात गणेश मंडळांच्या अध्यक्षांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका मार्गदर्शन करणार असून, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, मंडप उभारणी, वीज व अग्निसुरक्षा तसेच सामाजिक सलोखा याबाबत आवश्यक सूचना करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा उत्सव असल्याने उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या बैठकीत करण...

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरीत अडीच वर्ष श्रीगोंद्यात अडीच महिने

Image
राहुरीत अडीच वर्षे  श्रीगोंद्यात अडीच महिने  विशेष।शिवाजी घाडगे  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांतच श्रीगोंद्यातून  जावे लागल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. नेमके असे काय घडले की, ठेंगे यांची पुण्याला बदली झाली? की त्यांनीच ती करून घेतली? या प्रश्नाचे उत्तर सध्या नागरिक शोधत आहेत. विशेष म्हणजे, ज्या राहुरी पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तब्बल अडीच वर्षे सांभाळले, त्याच ठेंगे यांना श्रीगोंद्यात मात्र अडीच महिनेही पूर्ण करता आले नाहीत, ही बाब पोलीस वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. ठेंगे यांच्या राहुरीतील कार्यकाळाची आणि श्रीगोंद्यातील अल्प कार्यकाळाची तुलना केली जात असताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुरीत त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार ‘पाण्यात मिसळलेल्या रंगाप्रमाणे रंग घेण्याची’ भूमिका स्वीकारत कारभार केला, अशी चर्चा त्या काळात होती. मात्र श्रीगोंद्यात परिस्थिती वेगळी ठरल्याचे चित्र दिसून आले. राहुरी हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि संवेदनशील पोलीस ठ...

संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटाव विरोधात हिंदु जनआक्रोश मोर्चा

Image
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील अतिक्रमणाविरोधात नेवाशात हिंदू जनआक्रोश मोर्चा  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते ऋषी शेटे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी नेवासा येथे भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपावे, तसेच ऋषी शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नेवासा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्यामुळे आणि संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामुळे धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची भूमी मानली जाते. दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स...

देवळाली नगरपालिकेच्या श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाला आंतरराष्ट्रीय मानांकन

Image
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या त्रिंबकराज मोफत वाचनालयाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन वाचन संस्कृती । शिवाजी घाडगे पुस्तकाच्या प्रत्येक पानात एक नवे जग दडलेले असते. एखाद्या पुस्तकातून इतिहास समजतो, एखाद्यातून वर्तमानाची जाणीव होते, तर एखादे पुस्तक आयुष्याची दिशा बदलून टाकते. अशाच पुस्तकांच्या पानांतून गेली सात दशके देवळाली प्रवरा परिसरातील असंख्य नागरिकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोहोचविणाऱ्या श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या या वाचनालयाला ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. नवी दिल्ली येथील QRO Certification LLP या प्रमाणन संस्थेमार्फत वाचनालयाचे स्वतंत्र आणि सखोल मूल्यांकन करण्यात आले. वाचनालयाची कार्यपद्धती, ग्रंथ व्यवस्थापन, अभिलेख, वाचकसेवा, प्रशासन, उपलब्ध सुविधा, गुणवत्ता व्यवस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध बाबींची तपासणी करण्यात आली. निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाचनालयाला हे प्रमाणपत्र...

पोलीस दादा घुसले स्कूल बस मध्ये

Image
स्कूल बसमध्ये घुसले ‘पोलीस दादा’! ६६ बसची झाडाझडती; तब्बल ३३ बसवर दंडात्मक कारवाई घाडगे न्यूज| प्रतिनिधी शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच गुरुवारी सकाळी श्रीरामपूरच्या रस्त्यांवर पोलिसांची ‘स्कूल बस तपासणी’ मोहीम सुरू झाली आणि स्कूल बसचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेल्या बस अचानक पोलिसांनी अडविल्या. एवढेच नव्हे, तर पोलीस थेट बसमध्ये घुसले आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक-एक बाब तपासून पाहिली. बसमध्ये अचानक पोलीस आल्याने विद्यार्थ्यांनाही काही क्षण ‘पोलीस दादा बसमध्ये कसे?’ असा प्रश्न पडला; मात्र ही तपासणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकांनी या कारवाईचे स्वागत केले. खासगी इंग्रजी माध्यमासह विविध माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असतानाच पोलिस प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, तसेच प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेच्या...

राहुरीत 34221 मतदार वगळले

Image
राहुरी मतदारसंघात ३४,२२१ मतदार वगळले  राहुरी -  २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदार पडताळणीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या पडताळणीत तब्बल ३४ हजार २२१ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. एसआयआरपूर्वी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख २९ हजार ८९३ मतदार नोंदणीकृत होते. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत २ लाख ९५ हजार ६७२ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पडताळणीनंतर एकूण ३४ हजार २२१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये विविध कारणांचा समावेश आहे. त्यामध्ये १३ हजार ९२८ मयत मतदार, २ हजार ९२८ अनुपस्थित मतदार, ११ हजार ६८५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ५ हजार ६११ दुबार नोंद असलेले मतदार आणि अन्य कारणांमुळे ६९ मतदारांचा समावेश आहे. या पडताळणीमुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे....