Posts

झोडपले तरी शान कायम ?

Image
झोडपले तरी शान कायम…? घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी शहरात अलीकडे घडलेल्या घटनेने कायदा, पोलीस यंत्रणा आणि लोकशाहीतील मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना शहरातून पायी फिरवत त्यांच्या तोंडावर काळे फडके बांधून धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि त्यानंतर शहरात चर्चेचे वादळ उठले. पोलीसांवर हल्ला करणे हे नक्कीच गंभीर आणि निंदनीय कृत्य आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच जर हात उगारला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कारवाई करताना कायद्याच्या चौकटीत राहणे हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. आरोपींची धिंड काढणे, त्यांना पायी फिरवणे किंवा सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक देणे हे कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा “दाखवण्याचा” प्रकार ठरतो, अशी टीका होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, आरोपींना न्यायालयात नेत असताना जर कोणत्याही नागरिकाने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर त्या अनर्थाची जबाबदारी कोणाची राहिली असती? पोलिसांकडे वाह...

राहुरीत पोलिसांवर हल्ला कायद्याचा धाक कमी झाल्याचा संकेत

Image
राहुरीत पोलिसांवर हल्ला; कायद्याचा धाक कमी झाल्याचे संकेत रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच सार्वजनिक ठिकाणी हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. या घटनेमुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. घटनेत जखमी झालेले पोलीस कर्मचारी विलास वैराळ यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांना अटक केली असून स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. मात्र या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असल्याने तपासाचे आव्हान अजूनही कायम आहे. या घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार अनेकांच्या उपस्थितीत घडल्याचे समोर येत आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाच अशा प्रकारे मारहाण होत असेल, त...

राहुरीत कायद्याची ऐसी तैसी पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Image
राहुरीत कायदा धाब्यावर : पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला विकास वैराळ यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न; ११ जणांवर गुन्हा राहुरी : राहुरी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्यावर समाजकंटकांनी निर्घृण हल्ला करून गळा दाबत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात वैराळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर–मनमाड राज्य मार्गावर कंटेनर आणि स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून काही जणांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण सुरू केली होती. ही घटना पाहून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी पुढे येत चालकाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायदा हातात घेतलेल्या समाजकंटकांनी चालकाला वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच लक्ष्य केले. घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग मनात धरून आरोपींनी वैराळ यांच्यावर गज, काठ...

पाट पाणी उन्हाळी आवर्तन साठी अर्ज करा

Image
उन्हाळी सिंचनासाठी पाटाचे पाणी मागणी अर्ज करा  नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम २०२५–२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस तसेच फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी तसेच पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ मधील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उन्हाळी सिंचनासाठी पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी आणि आळंदी या धरणांच्या जलाशयांमधूनही पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्...

तोच जिव्हाळा उत्साह कायम पुण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ

Image
 जिव्हाळा कायम… दिघीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची स्नेहभेट राहुरी : नोकरीच्या बदल्या, जबाबदाऱ्या आणि काळाच्या ओघात अनेक नाती मागे पडतात; मात्र काही नाती अशी असतात की वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचा जिव्हाळा तसाच टिकून राहतो. पुणे येथील दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या राहुरीतील भेटीतून याच भावनेचा प्रत्यय आला. रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना प्रमोद वाघ यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून जुन्या मित्रांची स्नेहभेट घेतली. तब्बल नऊ वर्षांपूर्वी ते राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. बदली होऊन अनेक वर्षे उलटून गेली असली तरी राहुरीतील मित्रमंडळी आणि परिचितांशी असलेले त्यांचे स्नेहबंध आजही तेवढ्याच आत्मीयतेने जपले गेले आहेत. शिर्डीकडे जाताना राहुरीत थांबण्याचा त्यांचा निर्णय हा त्या आठवणींना आणि नात्यांना दिलेला मान असल्याचे मित्रांनी सांगितले. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रम...

बाबांनी तारले केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत

Image
बाबांनी ‘तारले’ केंद्रीय मंत्री रामदास आठवले  शिर्डीत रविवार विशेष।शिवाजी घाडगे  शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकेकाळी राजकारणाचा गंध नसलेले आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले भाऊसाहेब वाकचौरे खासदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. पंढरपूरमधून निवडून येण्याची अपेक्षा असताना शिर्डीतील हा पराभव आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हेही नगर दक्षिणमध्ये पराभूत झाले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केला होता. मात्र ते साध्य झाले नाही आणि अखेरीस पवार यांनी दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांना राज्यसभेची संधी दिली. यानंतर रामदास आठवले आणि दिवंगत शिवाजी कर्डिले हे दोघेही भाजपसोबत राजकारणात सक्रिय झाले. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत आठवले भाजपसोबत असले तरी ते सर्वच पक्षांना परवडणारे नेते मानले जातात. कार्यकर्त्यांना कोरे लेटरपॅड देऊन काम करण्याची संधी ...

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हातात लग्नांच्या बेड्या

Image
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे याच्या हातात लग्नांच्या बेड्या  घाडगे न्यूज।प्रतिनिधी   कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज कारवाईमुळे नगर जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे शनिवारी विवाहबंधनात अडकले. त्याच्या हातात लग्नांच्या  बेड्या अडकल्या संभाजीनगर येथील ‘सूर्या लॉन्स’ येथे पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील  संतोष खाडे हे अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले अधिकारी आहेत. ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील मुलगा असलेल्या खाडे यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर शिक्षण पूर्ण करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर निवड मिळवली. सेवेत दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशिक्षण काळातच त्यांनी धाडसी व प्रभावी कारवायांमुळे स्वतःची वेगळी छाप उमटवली. गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी अल्पावधीतच जनतेत विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. खाडे यांच्या लग्नसोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्...