Posts

सत्तेत जाणच शाहणपणाच

Image
सत्तेत जाणच शाहणपणाच  राजरंग।शिवाजी घाडगे  सत्ये पुढे शहाणपण चालत नसत अस म्हणतात मात्र सत्तेत सहभागी होण हे देखील शहाणपणाचे नाही का तर याच उत्तर देखील होच येईल कोणाला काय वाटत कोण काय  म्हणेल याचा विचार राजकीय व्यक्तींनी करायचा नसतो तो करायचा सर्व सामान्य जनतेने  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या राजकीय भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम, नाराजी आणि आत्मपरीक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चूक नेमकी मतदारांची झाली की भाऊसाहेब वाकचौर यांची? शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांचा पराभव करून भाऊसाहेब वाकचौर यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले व  नंतर सदाशिव लोखंडे यांना डावलून भाऊसाहेब खासदार केले  पहिल्या कार्यकाळात निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या समीकरणांचा फायदा होईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा त्यांचा राजकीय अंदाज असावा. मात्र त्याचा अपेक्षित लाभ झाला नाही....

महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षक झाले आता डी वाय एस पी

Image
महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनाही बढती घाडगे न्यूज @प्रतिनिधी  महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल २४७ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेशही जाहीर करण्यात आले आहेत. या पदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले प्रमोद सदाशिव वाघ यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत त्यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून मुक्ताईनगर येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी पोलीस दलात जबाबदारीची पदे सांभाळताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे तसेच जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अ...

इंडीयाच्या विकासा साठी भारताचा त्याग

Image
इंडियाच्या विकासासाठी भारताचा त्याग का? तरंग।शिवाजी घाडगे  देशाचा विकास हा प्रत्येक नागरिकाचा अभिमानाचा विषय असतो. आधुनिक महामार्ग, बुलेट ट्रेन, मोठी धरणे, औद्योगिक प्रकल्प, बंदरे, विमानतळ आणि स्मार्ट शहरे ही प्रगतीची प्रतीके मानली जातात. परंतु या विकासाच्या चमकदार चित्रामागे एक मूलभूत प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो या विकासाची किंमत नेमकी कोण मोजत आहे? ग्रामीण आणि शहरी म्हणजे शहराचा विकासा साठी त्याग कोण करतय? चार, सहा किंवा दहा पदरी महामार्ग उभे राहताना हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जाते. बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. धरणांसाठी संपूर्ण गावे पाण्याखाली जातात. औष्णिक वीज प्रकल्पांसाठी जंगलांचा बळी दिला जातो आणि आदिवासींना त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडावे लागते. किनारपट्टीवरील प्रकल्पांसाठी मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते. प्रत्येक वेळी एकच युक्तिवाद पुढे केला जातो देशाच्या विकासासाठी काही ना काही त्याग करावाच लागतो. हा युक्तिवाद चुकीचा नाही. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीस...

नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले

Image
नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले   ‘राजकीय विमा’ फसला? राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकारणाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. राजकारणात पैसा, सत्ता, पद आणि प्रस्थ यांना महत्त्व असले तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हातातच असतो. अनेकदा निवडणुकीपूर्वी आखलेली गणिते, बांधलेली समीकरणे आणि केलेल्या राजकीय गुंतवणुकीवर नेतेमंडळींचा प्रचंड विश्वास असतो. मात्र निकाल लागल्यानंतर वास्तव काहीसे वेगळेच चित्र दाखवून जाते. नाशिकमध्ये नेमके तेच घडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला नसला तरी पाठींबा देऊन प्राचार थाबवण्या साठी हार घातला यातीलच फुले वाटुन गोकुळ गिते यांनी दराडे यांची हार करत विधानपरिषदेत पोहचले असून मंगळवारी त्यानी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. कदाचित नरेंद्र दराडे यांचा भविष्यात रोष रोखण्या साठी गोकुळ गिते यांनी सेनेचे गित गायले असावे अशी चर्चा आहे.  शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा झालेला प...

दिल्लीत वाढते शिंदेंचे वजन

Image
दिल्लीत वाढते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वजन राजरंग।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढते राजकीय महत्त्व. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील सभेत "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे" असे जाहीरपणे सांगितल्यानंतर या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षांपेक्षा हे संख्याबळ अधिक असल्याने केंद्रातील सत्तासमीकरणात शिंदे यांचे महत्त्व वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या वाढत्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वास्तव वेगळेच प्रश्न उपस्थित करत आहे. एका बाजूला दिल्लीत शिंदे यांचा गौरव होत असताना दुसऱ्या बाजूला नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होतो. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून महायुतीतील अंतर्गत राजकारणाचे संकेत देणारा मानला जात आहे. भाजपने मन...

नाशकात अपक्ष गोकुळ गिते विजयी ; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह

Image
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली होती. अखेर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिते यांना सुमारे ३५७ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) समर्थित महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महायुतीकडे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात असतानाही त्यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हा पराभव दराडे यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवरही मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असताना पराभव कसा झाला, याचे आत्मपरीक्षण आता संबंधित पक्षांना क...

कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल....

Image
 कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात यश अचानक मिळत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन, संघटन बांधणी, जनसंपर्क आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. परीक्षेत अव्वल येणारा विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करतो, त्याचप्रमाणे राजकारणातील मोठी पदे मिळविण्याचे स्वप्न पाहणारे नेतेही अनेक वर्षे आधीपासूनच आपली रणनीती आखत असतात. त्यामुळे एखादा नेता धार्मिक स्थळांना भेट देतो, जनसंपर्क वाढवतो किंवा आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यामागे केवळ श्रद्धा नसून राजकीय संदेशही दडलेला असतो. नुकतीच कोल्हापुरात महालक्ष्मीची ओटी भरल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सत्तेतील एका प्रभावशाली मंत्र्याने आगामी २०२९ च्या राजकीय समीकरणांचा विचार करून आतापासूनच तयारी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकारणातील प्रत्येक हालचालीचे अर्थ शोधले जात असताना या धार्मिक भेटीकडेही अनेकजण राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. गेल्या दशकात देशाच्या राजकारणात एका नेतृत्वाभोवती निर्माण...