Posts

अहिल्यानगरात काॅफी रेव्ह पार्टी निवेदनानंतर रद्द

Image
अहिल्यानगरात प्रस्तावित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द; निवेदनानंतर रद्द  घाडगे न्यूज। प्रतिनिधी  मोठ्या शहरांमध्ये अधूनमधून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होत असल्याच्या घटना समोर येत असतात. अशा कार्यक्रमांचे नियोजन प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मर्यादित गटांमध्ये केले जाते. काही ठिकाणी अशा कार्यक्रमांवर कारवाई झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये “कॉफी रेव्ह पार्टी” नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रसारित झाली. ही बाब काही हिंदू संघटनांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवार, १४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) रोजी नगर शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. संबंधित जाहिरातीत महाविद्यालयीन तरुणींसाठी कमी शुल्कात प्रवेश दिला जाणार असल्याचा उल्लेख होता. तसेच संपर्कासाठी काही क्रमांकही देण्यात आले होते. सदर कार्यक्रमाबाबत संभाव्य गैरप्रकारां...

दादा गेले पण प्रश्नाचे वादळ थांबेना

Image
 दादा गेले… पण प्रश्नांचे वादळ थांबेना घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा कायमअसताना. मात्र या दुःखद घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काही चर्चांमागे त्यांच्या निधनानंतर उसळलेल्या प्रचंड सहानुभूती आणि लोकप्रियतेची धार बोथट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. दादा आज आपल्यात नाहीत; पण त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येकजण स्वतःला अधिक शहाणा ठरविण्याच्या स्पर्धेत उतरल्याचे चित्र दिसते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी कधी घ्यायला हवा होता, दहावा-तेरावा झाल्यानंतर घ्यायला हवा होता का, यावरही चर्चा रंगवली जात आहे. दादांच्या जाण्यानंतर घरातील नेतृत्व कोण स्वीकारणार, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र अशा चर्चांमधून नेमके काय साध्य होणार, याचाही विचार व्हायला हवा. दादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नाही, तर एका शैलीचे, एका कार्यपद्धतीचे आणि...

राहुरीत आमदार नाही महामार्ग साडेसाती त्यात आता हेल्मेट सक्ती

Image
राहुरीत आमदार नाही अधिकारी मुजोर?  महामार्ग  साडेसाती कधी संपणार त्यात हेल्मेट सक्ती! घाडगे न्यूज। प्रतिनिधी  राहुरी तालुक्याला सध्या आमदार नाही, आणि याच संधीचा गैरफायदा घेत अधिकारी वर्ग अधिकच शिरजोर झाला आहे का, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. नगर–मनमाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. गेली अनेक वर्ष झाले काम सुरु आहे  कडेने गॅस पाईपलाईन गेली ती पुर्ण झाल्यावर काम पूर्ण होईल अशी चर्चा आहे   दररोज जीवघेणे अपघात, मृत्यू, जखमी—परंतु प्रशासन मात्र अजूनही ढिम्मच आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारी अवजड वाहने, नियम धाब्यावर बसवलेले ढपर, क्षमतेपेक्षा अधिक भार—या सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना राहुरी पोलीस केवळ हेल्मेट तपासणीपुरतेच आपले कर्तव्य मर्यादित ठेवत असल्याचे चित्र आहे. नियम पाळणे गरजेचेच आहे; मात्र फक्त गोरगरीब शेतकरी, कामगार, दुचाकीस्वार यांनाच लक्ष्य करून कारवाई करणे म्हणजे सोपी शिकार नाही का? तालुक्यात अवैध व्यवसायांचे पेव फुटलेले असताना त्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिसांकडे आहे का, असा थेट प्रश्...

मुस्कान पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केले कौतुक

Image
अप्पर पोलीस महासंचालक  कृष्ण प्रकाश  यांच्याकडून राहुरी पोलीस ठाण्यातील टीम मुस्कान चे कौतुक   सोमवारी नगर जिल्ह्याच्या तपासणी साठी आलेले अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  राहुरी पोलीस स्टेशन  चे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुटका करत अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करत मुदतीत  न्यायालयात दोषारोप पाठवत कारवाई केल्या बाबत संपूर्ण राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले  तसेच बेलवडी पोलीस ठाण्यात देखील पो नि संजय ठेंगे यांची कामगिरी कौतुकास्पद राहीली. 

बुध्दीवानांचे राजकीय बळ लोणीत खेळ !

Image
बुध्दीवांनाचे राजकीय बळ लोणीत  खेळ  रविवार विशेष घाडगे न्यूज          ॥ शिवाजी घाडगे ॥ राजकारण हे केवळ पदांचा खेळ नसून ते बुद्धी, व्यूहरचना आणि वेळेच्या अचूक अंदाजाचा कस लागणारे क्षेत्र आहे. शनिवारी लोणीच्या क्रीडांगणावर रंगलेल्या दोन जलसंपदा मंत्र्यांच्या बुद्धीबळ सामन्याने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली. निमित्त होते जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे; मात्र त्याआड रंगणारा खेळ हा क्रीडेपेक्षा अधिक चर्चेचा ठरला .  राजकारणात बुध्दीचे बळ बाहु बळ  बुद्धीबळ हा ६४ घरांचा खेळ  मानला जातो. मात्र या सामन्यात प्रत्येक घरात केवळ सोंगटी नव्हत्या, तर वरिष्ठांचे संकेत, संघटनात्मक गणिते आणि भविष्यातील राजकीय समीकरणेही ठेवलेली होती. कुणाच्या बाजूने प्रभावशाली पाठबळ आहे, कोणाच्या चालींना वरचा कौल लाभतो—यावरच पुढील डाव ठरत होते. राजा, राणी, हत्ती, उंट, घोडे आणि प्यादी—अशी संपूर्ण फौज दोन्ही बाजूंनी सज्ज होती. तथापि अलीकडील निवडणूक निकालांनी एक वास्तव समोर आणले आहे की, कार्यकर्त्यांच्या बळावर उ...

अखेर ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात असलेला पोलीस शामसुंदर शासकीय सेवेतुन बडतर्फ

Image
ड्रग्ज प्रकरणातील अटक : पोलीस शामसुंदर गुजर सेवेतून बडतर्फ घाडगे न्यूज | प्रतिनिधी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर यास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश जारी केले आहेत. अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (ब) व २१ (क) अंतर्गत दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शामसुंदर गुजर याचा अंमली पदार्थ तस्करीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (५) व ३१८ (४) अन्वये अपहार व फसवणूक प्रकरणी दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, प...

राहुरीची पोट निवडणूक उमेदवार नाही दिशा ठरवणारी लढाई

Image
राहुरी पोटनिवडणूक  उमेदवार नाही, तर दिशा ठरवणारी लढाई स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज  ॥ शिवाजी घाडगे ॥ राहुरीची संभाव्य पोटनिवडणूक ही केवळ एका रिक्त आमदारकीसाठीची लढाई राहिलेली नाही. ती आता तालुक्याच्या राजकीय दिशेचा, पक्षीय समीकरणांचा आणि नेतृत्वाच्या अस्तित्वाचा कौल ठरणार आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनाने निर्माण झालेली ही राजकीय पोकळी अनेकांसाठी संधी आहे, तर काहींसाठी अस्तित्वाची परीक्षा. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे : “वेट अँड वॉच” की “हाय रिस्क डिसिजन”? प्राजक्त तनपुरे यांची आजची भूमिका अलर्ट आहे, पण ती निष्क्रिय नाही. त्यांच्याकडे तीन स्पष्ट पर्याय दिसतात— राष्ट्रवादीत राहून दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची वाट पाहणे स्वतंत्र निर्णय घेऊन नव्या राजकीय वळणाकडे जाणे हिंदुत्वाच्या मुद्द्याशी थेट किंवा अप्रत्यक्ष जुळवून घेणे गळ्यात दिसणारे भगवे उपरणे ही केवळ प्रतिकात्मक बाब नाही. ती राजकीय चाचपणी आहे—जनमत कुठे झुकतेय, हे पाहण्याची. राहुरीत हिंदुत्वाचा मुद्दा निवडणूक जिंकवू शकतो, हे शिवाजी कर्डीले यांच्या विजयाने आधीच सिद्ध झाले आहे.  राष्ट्रवादी...