Posts

श्रीरापुरच्या गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ

Image
 श्रीरामपूरातील गुन्हेगारीला लगाम घालण्याची वेळ  स्पेशल रिपोर्ट ।शिवाजी घाडगे  श्रीरामपूर शहरात तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबया (वय ३०) यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेमुळे केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही, तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुंडांची दहशत नेमकी सामान्य नागरिकांवर आहे की कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर, असा सवाल उपस्थित केला जात आहे. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारहाण, खंडणी, दहशत आणि टोळीबाजीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा वर्चस्वाच्या संघर्षातून, तर कधी जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे शहराची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. शनिवारी घडलेल्या घटनेत एका हॉटेलमध्ये जेवण देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून वेटरला मारहाण करण्यात आली. हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या हॉटेल मालक आकाश दुबया यांच्यावर आरो...

टाळ्या वाजवणाऱ्या हातांनी केली टाळ वाजवणाऱ्या हाताची सेवा !

Image
टाळ्या वाजवणाऱ्या हातांनी केली टाळ वाजवणाऱ्यांची सेवा! तरंग।शिवाजी घाडगे  आषाढी वारी म्हणजे श्रद्धा, समता, सेवा आणि मानवतेचा अखंड उत्सव. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी श्रीरामपूरसह परिसरातील हजारो वारकरी दरवर्षी टाळ-मृदंगाच्या गजरात, मुखी हरिनामाचा जप करत पायी दिंडीतून पंढरपूरकडे प्रस्थान  करतात. या भक्तिमय वातावरणात श्रीरामपूरातील तृतीयपंथीय समाजाने केलेल्या सेवाभावी कार्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे केले. स्वतः टाळ्या वाजवून उपजीविका करणाऱ्या किन्नर (तृतीयपंथीय) समाजाने वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांना फळे, बिस्किटे आणि पिण्याचे पाणी वाटप केले. कोणताही गाजावाजा न करता, केवळ सेवाभाव आणि विठ्ठलभक्तीच्या प्रेरणेने त्यांनी केलेली ही सेवा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. "आम्ही टाळ्या वाजवून उदरनिर्वाह करतो; पण वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभावे, हीच आमची इच्छा आहे," अशी भावना तृतीयपंथीय समाजातील सदस्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीतून समाजाला माणुसकीचा आणि समतेचा अमूल्य संदेश मिळेल. ही घटना केवळ मदतीची नव्हे, तर सामाजिक समरसतेची होती. टाळ्या...

मुस्लिम समाजातील सहारा मंगल कार्यालयात महंत रामगिरी दिंडीचा मुक्काम

Image
 मुस्लिम बांधवांच्या 'सहारा' मंगल कार्यालयात महंत रामगिरी दिंडीचा मुक्काम  तरंग । शिवाजी घाडगे  आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या महंत रामगिरी महाराज यांच्या दिंडीचा शनिवारी रात्री देवळाली प्रवरा येथील 'सहारा' मंगल कार्यालयात मुक्काम झाला. या मुक्कामासाठी मुस्लिम समाजातील युनुस भाई  यांनी आपल्या मंगल कार्यालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचा एक सकारात्मक संदेश समाजापुढे आला. महंत गंगागिरी महाराज यांनी अनेक वर्षांपूर्वी पंढरपूर वारीची ही दिंडी सुरू केली होती. त्यांच्या पश्चात महंत नारायणगिरी महाराज यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे चालू ठेवली. सध्या महंत रामगिरी महाराज या दिंडीचे नेतृत्व संध्या करत असून, ही वारकरी परंपरा सातत्याने पुढे नेत आहेत. काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी एका धार्मिक विषयावरील केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाले होते. त्या वक्तव्याविरोधात विविध स्तरांतून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस संरक्षणही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा पा...

जिल्हा उपनिवडुक अधिकारी सुनील गाढे यांनी भरून घेतले सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र

Image
अहिल्यानगर चे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले घाडगे न्यूज।प्रतिनिधी  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणनापत्रे भरून घेत आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सक्रिय सहकार्य करून गणनापत्र वेळेत भरून द्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केले. शनिवारी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी राहुरी तालुक्यातील कणगर गावाला अचानक भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. पाहणीदरम्यान गावचे सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र भरले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर गाढे यांनी स्वतः त्यांच्या समक्ष त्यांचे गणनाप...

श्रीरामपूर हदरले हाॅटेल मालक आकाश दुबया चाकुने भोसकले

Image
श्रीरामपूर हादरले! लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक आकाश दुबया यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या घाडगे न्यूज| प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात शनिवारी दुपारनंतर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहर हादरून गेले. शहरातील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक आकाश शेखर दुबया यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे चार वाजल्यानंतर लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये काही व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी आकाश दुबया यांच्यावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वैयक्तिक वैर, व्यावसायिक स्पर्धा किंवा इतर कोणत्या कारणातून हा हल्ला झाला का, याचा सर्व बाजूंनी पोलीस तपास क...

मुख्यमंत्री बदलण्याच्या वावड्या कशासाठी

Image
मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या कशासाठी राजरंग।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. काही इलेक्ट्रॉनिक माध्यमे, यूट्यूब वाहिन्या आणि सोशल मीडियावरील तथाकथित राजकीय विश्लेषक गेल्या काही दिवसांपासून "मुख्यमंत्री बदलणार", "दिल्लीत  राजकीय भूकंप" अशा मथळ्यांनी वातावरण तापवत आहेत. परंतु या चर्चांचा वस्तुस्थितीशी कितपत संबंध आहे, हा खरा प्रश्न आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात "ब्रेकिंग न्यूज" देण्याच्या नादात अनेक माध्यमांनी सत्यापेक्षा सनसनाटीला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. एखादा नेता दुसऱ्या नेत्याला भेटला, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, एखाद्या सूत्राने माहिती दिल्याचा दावा केला किंवा सोशल मीडियावर अफवा पसरली की त्यावर तासन्तास चर्चा सुरू होते. प्रत्यक्षात कोणताही अधिकृत निर्णय नसतानाही अनेक माध्यमे मुख्यमंत्री बदल निश्चित झाल्याप्रमाणे चित्र रंगवतात. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी आणि जबाबदार पत्रकारितेसाठी धोकादायक आहे. मुख्यमंत्री बदल हा एखाद्या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसार...

भेसळ दुधाचा जनतेच्या जीवाशी खेळ सुरु

Image
 भेसळ दुधाचा जनतेच्या जीवाशी  खेळ   भेसळ। शिवाजी घाडगे "दूध" हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर शुद्धता, पवित्रता, आरोग्य आणि पोषण यांचे चित्र उभे राहते. आईच्या दुधानंतर मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा आहार म्हणून दुधाकडे पाहिले जाते. नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात दुधाला अनन्य महत्त्व आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो. "श्वेतक्रांती"ने देशाला आत्मनिर्भर बनविले, लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. मात्र आज या श्वेतक्रांतीलाच भेसळीच्या काळ्या सावलीने ग्रासले आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही केवळ एक गुन्हेगारी कारवाई नाही; तर ती आपल्या अन्नसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि समाजात बोकाळलेल्या नफेखोरीच्या विकृत मानसिकतेचे जिवंत उदाहरण आहे. ही कारवाई उघड करते की काही लोक अवघ्या काही रुपयांच्या रासायन...