Posts

तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Image
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात हळहळ राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरात समोरील लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरासह कामगार वसाहतीत शोककळा पसरली असून कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याने अनेक कामगार मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशाच परिस्थितीत बाळासाहेब तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीत घडलेली ही दुसरी आत्महत्येची घटना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कारखाना बंदीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. मृत बाळासाहेब तारडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुले तसे...

कर्तव्यासोबत पर्यावरण संरक्षण पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य

Image
कर्तव्यासोबत माणुसकी, पर्यावरण व वारसा संवर्धनाची जपणूक; पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य घाडगे न्यूज।@प्रतिनिधी  अहिल्यानगर  चांदबिबी पुनःप्रक्षेपण केंद्र येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार सागर दाणी यांनी आपल्या शासकीय कर्तव्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतानाच पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, ऐतिहासिक वारसा जतन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे प्रशासन, पर्यावरण आणि समाजसेवा यांचा प्रभावी समन्वय साधला जात असून समाजात एक सकारात्मक आदर्श निर्माण होत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सागर दाणी यांनी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक काम केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावर भर देत त्यांनी वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती, जंगलातील वणवे विझविण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग, वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी जनजागृती आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. तसेच जैवविविधतेस बाधक ठरणाऱ्या आक्रमक विदेशी वनस्पतींचे निर्मूलन करून देशी वृक्षांच्या बियांचे संकलन, रोपनिर्मिती आणि लागवडीचे उपक्रम हाती...

छत्रपतीचे विटबनेतील अज्ञात आरोपी अद्याप मोकाट

Image
छत्रपतींच्या विटंबनेचा आरोपी अद्याप मोकाट; राहुरी पोलिसांनी जाहीर केले ११ हजारांचे बक्षीस, पण आरोपी कधी सापडणार? घाडगे न्यूज @प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध लावणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राहुरी पोलिसांनी गुरुवारी केली. मात्र या घटनेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही आरोपीचा शोध लागलेला नाही, ही बाब केवळ खेदजनक नसून संपूर्ण यंत्रणेसाठी लाजिरवाणी मानली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि दीड वर्ष उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. गुन्हेगारांना शोधून काढण्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांना एका विटंबनाखोराचा माग काढता आलेला नाही, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांचा अवमान ...

घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा टप्पा पार

Image
घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा पार केला टप्पा  घाडगे न्यूज या डिजिटल वृत्तमाध्यमाने दोन लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून  याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान आहे. वाचकांच्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा प्रवास यशस्वीपणे पुढे सुरू राहुन आमच्या वाचकांना अधिका अधिक कसदार व निष्पक्ष निर्भीड सत्य बातम्या वाचायला मिळतील  घाडगे न्यूजने सुरुवातीपासूनच सत्य, वस्तुनिष्ठ आणि रोखठोक पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी निर्भीडपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले  आहे. सत्य मांडण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद व प्रेरणा आम्हाला आमच्या वाचकांच्या पाठिंब्यामुळेच मिळते. अनेक वाचकांच्या थेट मनापर्यत बातमी पोहचे  राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासाठी घाडगे न्यूज कटिबद्ध आहे. तशी आचारसंहिता आम्ही घालून घेतली असून बातमी प्रसिद्ध करताना वाचक हाच केंद्र स्थानी आहे शब्द हेच शस्त्र आणि रत्...

एलसीबीचे किरणकुमार कबाडी शिर्डी साई मंदिर सुरक्षाला

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; किरणकुमार कबाडी शिर्डी साई मंदिर सुरक्षा  अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत 14 पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय रामभाऊ ठेंगे यांची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अहिल्यानगर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक रविंद्र नरसिंह देशमुख यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांची नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलातील या फेरबदलांमुळे विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज विटबखोर माहीती देणाऱ्यास 11 हजाराचा इनाम

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा शोध सुरू; माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. या प्रकरणातील आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देऊन त्याला पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे राहुरी शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नागरिकांच्या मनात असलेला आदर लक्षात घेता या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर राहुरी पोलिसांनी विविध स्तरांवर तपास सुरू केला. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही विटंबना करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीची ओळख, त्याच्या ...

रेल्वे उड्डाण पुलासाठी भूसंपादनाचे पैसे देण्या साठी लाचेची मागणी श्रीगोदा-पारनेर प्रात कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Image
रेल्वे उड्डाणपुलासाठी भूसंपादन भरपाई प्रकरणात लाचेची मागणी; दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा घाडगेन्यूज| प्रतिनिधी रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश विजय ढुमणे (महसूल सहाय्यक) आणि अमोल काशिनाथ खामकर (कंत्राटी कामगार) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील एका शेतकऱ्याची गट क्रमांक 13 मधील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी अंतर्गत रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी शासनाने भूसंपादन केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यास 1 कोटी 47 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी संबंधित शेतकरी प्रांत कार्यालयात पाठप...