Posts

Showing posts with the label अण्णाचे कार्य दीपस्तंभ...

अण्णा एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत , पण आठवणींचा अनंत प्रकाश

Image
अण्णा… एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत, पण आठवणींचा अनंत प्रकाश         @शिवाजी घाडगे “अण्णा…” ही हाक आजही कानात घुमते आहे. पण आता ती फक्त आठवणीत उरली आहे. आजच्या धावपळीच्या, बदलत्या काळात “अण्णा” अशी आपुलकीची, जिव्हाळ्याची हाक ऐकायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. डोक्यावर साधी टोपी, अंगात पायजमा-शर्ट किंवा तीन गुड्याचा सदरा, चेहऱ्यावर शांतता, वागण्यात संयम, बोलण्यात मितपणा आणि मनात अपार कर्तव्यभाव ही ओळख ज्या व्यक्तिमत्त्वाची होती, ते म्हणजे आमचे आधारवड सिताराम रंगनाथ घाडगे (वय ८४). राहुरी फॅक्टरी परिसरातील मुळा कॉलनीत वास्तव्यास असलेले अण्णा यांचे मूळ गाव कणगर. कणगर-तांभेरे रस्त्यावरील माळावर वसलेल्या साध्या मातीच्या छपरात त्यांचा जन्म झाला. वडील रंगनाथ बाबुराव घाडगे आणि आई जयाबाई यांच्या कुटुंबात नऊ अपत्यांचा मोठा परिवार रामचंद्र, सोन्याबापू, सिताराम, बन्सी, गोरक्षनाथ, मच्छिंद्र असे सहा भाऊ आणि विठ्ठाबाई, किसनबाई, लक्ष्मीबाई या तीन बहिणी. अजून आयुष्य समजायचं बाकी असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि संसाराच्या आभाळाला भेग पडली. त्या एका घटनेने घरात अंधार दाटला. पण आई ...