Posts

Showing posts with the label तहसीलदारांना दिले निवेदन

पावसाने नुकसान झालेल्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी-प्रहार

Image
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना अतिवृष्टीप्रमाणे अनुदान द्या - सुरेशराव लांबे  राज्य सरकारने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट अनुदान अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केल्याप्रमाणे अनुदान दिले. त्याच प्रमाणे सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतक-यांना त्वरित देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देत केली आहे.  निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी महाराष्ट्रासह राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु तालुक्यातील सात मंडळापैकी राहुरी या एकाच मंडळाला अतिवृष्टीच्या निकाषाप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यातही या मंडळातील अनेक शेतकर्यांचे अनुदान अजुनही खात्यावर जमा झालेले नाही. १३ जुन २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान जाहीर केले. परंतु शासनाने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट अनुदान जाहीर केलेल्या धोरणात बदल करून पुन्हा शासनाच्या वन व महसूल विभाग...