Posts

Showing posts from June, 2026

तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Image
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात हळहळ राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरात समोरील लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरासह कामगार वसाहतीत शोककळा पसरली असून कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याने अनेक कामगार मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशाच परिस्थितीत बाळासाहेब तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीत घडलेली ही दुसरी आत्महत्येची घटना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कारखाना बंदीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. मृत बाळासाहेब तारडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुले तसे...

कर्तव्यासोबत पर्यावरण संरक्षण पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य

Image
कर्तव्यासोबत माणुसकी, पर्यावरण व वारसा संवर्धनाची जपणूक; पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य घाडगे न्यूज।@प्रतिनिधी  अहिल्यानगर  चांदबिबी पुनःप्रक्षेपण केंद्र येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार सागर दाणी यांनी आपल्या शासकीय कर्तव्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतानाच पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, ऐतिहासिक वारसा जतन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे प्रशासन, पर्यावरण आणि समाजसेवा यांचा प्रभावी समन्वय साधला जात असून समाजात एक सकारात्मक आदर्श निर्माण होत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सागर दाणी यांनी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक काम केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावर भर देत त्यांनी वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती, जंगलातील वणवे विझविण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग, वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी जनजागृती आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. तसेच जैवविविधतेस बाधक ठरणाऱ्या आक्रमक विदेशी वनस्पतींचे निर्मूलन करून देशी वृक्षांच्या बियांचे संकलन, रोपनिर्मिती आणि लागवडीचे उपक्रम हाती...

छत्रपतीचे विटबनेतील अज्ञात आरोपी अद्याप मोकाट

Image
छत्रपतींच्या विटंबनेचा आरोपी अद्याप मोकाट; राहुरी पोलिसांनी जाहीर केले ११ हजारांचे बक्षीस, पण आरोपी कधी सापडणार? घाडगे न्यूज @प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध लावणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राहुरी पोलिसांनी गुरुवारी केली. मात्र या घटनेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही आरोपीचा शोध लागलेला नाही, ही बाब केवळ खेदजनक नसून संपूर्ण यंत्रणेसाठी लाजिरवाणी मानली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि दीड वर्ष उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. गुन्हेगारांना शोधून काढण्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांना एका विटंबनाखोराचा माग काढता आलेला नाही, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांचा अवमान ...

घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा टप्पा पार

Image
घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा पार केला टप्पा  घाडगे न्यूज या डिजिटल वृत्तमाध्यमाने दोन लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून  याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान आहे. वाचकांच्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा प्रवास यशस्वीपणे पुढे सुरू राहुन आमच्या वाचकांना अधिका अधिक कसदार व निष्पक्ष निर्भीड सत्य बातम्या वाचायला मिळतील  घाडगे न्यूजने सुरुवातीपासूनच सत्य, वस्तुनिष्ठ आणि रोखठोक पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी निर्भीडपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले  आहे. सत्य मांडण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद व प्रेरणा आम्हाला आमच्या वाचकांच्या पाठिंब्यामुळेच मिळते. अनेक वाचकांच्या थेट मनापर्यत बातमी पोहचे  राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासाठी घाडगे न्यूज कटिबद्ध आहे. तशी आचारसंहिता आम्ही घालून घेतली असून बातमी प्रसिद्ध करताना वाचक हाच केंद्र स्थानी आहे शब्द हेच शस्त्र आणि रत्...

एलसीबीचे किरणकुमार कबाडी शिर्डी साई मंदिर सुरक्षाला

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; किरणकुमार कबाडी शिर्डी साई मंदिर सुरक्षा  अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत 14 पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय रामभाऊ ठेंगे यांची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अहिल्यानगर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक रविंद्र नरसिंह देशमुख यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांची नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलातील या फेरबदलांमुळे विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज विटबखोर माहीती देणाऱ्यास 11 हजाराचा इनाम

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा शोध सुरू; माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. या प्रकरणातील आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देऊन त्याला पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे राहुरी शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नागरिकांच्या मनात असलेला आदर लक्षात घेता या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर राहुरी पोलिसांनी विविध स्तरांवर तपास सुरू केला. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही विटंबना करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीची ओळख, त्याच्या ...

रेल्वे उड्डाण पुलासाठी भूसंपादनाचे पैसे देण्या साठी लाचेची मागणी श्रीगोदा-पारनेर प्रात कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Image
रेल्वे उड्डाणपुलासाठी भूसंपादन भरपाई प्रकरणात लाचेची मागणी; दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा घाडगेन्यूज| प्रतिनिधी रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश विजय ढुमणे (महसूल सहाय्यक) आणि अमोल काशिनाथ खामकर (कंत्राटी कामगार) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील एका शेतकऱ्याची गट क्रमांक 13 मधील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी अंतर्गत रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी शासनाने भूसंपादन केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यास 1 कोटी 47 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी संबंधित शेतकरी प्रांत कार्यालयात पाठप...

निवासी अतिक्रमणे नियमित करण्या साठी ढुस यांच्या कडून जनजागृती मोहीम

Image
निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांच्याकडून रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम राहुरी : शासन निर्णयातील तरतुदीनुसार देवळाली प्रवरा हद्दीतील निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील वसाहत परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आप्पासाहेब ढूस यांनी शासन निर्णयातील विविध तरतुदींची माहिती नागरिकांना दिली. यावेळी गजानन येवले, अबूबकर शेख, बाळू पेटारे, राहुल गायकवाड, कांतीलाल गायकवाड, संगीता सोज्वल, रैसा शेख, सुग्राबी शेख, मार्था बोर्डे, दत्तात्रय देसाई, शारदा थोरात, बबन सरोदे, अनिल खरात, बाळू पंडित, सोमनाथ कांबळे, दीपक थोरात, नर्मदा वरगुडे, कुसुम बोरकर, सतीश गायकवाड, रमाबाई पालवे, आत्माराम शिंदे, रतनबाई बाबुळके, चंद्रकांत दहिवाले, सुनीता म्हस्के, आकाश पेटारे, लीलाबाई पेटारे, संगीता देसाई, सिद्धार्थ दहिवाले आदींसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपले मत मांडताना आप्पासाहेब ढूस यांनी १ जानेवारी २०११ पूर्वी शासनाच्या ...

आता आम्ही आहोत तुमच्या समवेत

Image
आम्ही आहोत तुमच्या पाठीशी!  राजकीय शुभेच्छांचा अर्थ काय राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  तसेच  सुजय विखे-पाटील  उपस्थित होते. या सत्कारानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री सत्कार करताना नेमके काय म्हणाले असतील, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. "घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी," असे काहीसे आश्वासक शब्द त्यांनी उच्चारले असतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण तर मिश्किलपणे असेही म्हणू लागले आहेत की, "तुम्हाला पक्षात घेतले आणि अवघ्या काही दिवसांत आमदारकीची संधी मिळाली; आता तरी मामांना सांगा या ईकडे अर्थात हा राजकीय उपहासाचा भाग असला तरी सध्याच्या राजकारणातील वेगवान घडामोडी पाहता अशा चर्चांना खतपाणी मिळणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, बिनविरोध निवड होणे ही कोणत्याही राजकारण्या...

पत्रकार सुधाकर कराळे यांचा ७१व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Image
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस तसेच जलनायक व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी कराळे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला   सुधाकर कराळे यांनी शेतकरी, कष्ट करी शोषित  घटक तसेच ग्रामीण विकासा साठी लेखन केले   पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्य करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि सुखसमृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात पत्रकारिता, समाजसेवा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. ७१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

शुटीबाॅल स्पर्धेत यशसंपादन केलेल्या खेळाडु समृध्दी पवळेचा गौरव

Image
 समृध्दीचा गौरव शूटींग बाॅल यश आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाच्या यशामध्ये राहुरी फॅक्टरी येथील कु. समृद्धी महेश पवळे हिचा महत्वाचा सहभाग राहीला  कु. समृद्धी महेश पवळे यांची कन्या ज्येष्ठ नागरिक चांगदेव पवळे यांच्या नात  डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत  संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा विशेष गुण गौरव   करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी शाल व वैभव ढूस लिखित ‘अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन तिचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, चांगदेव पवळे, सार्थक पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी समृद्धीच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या भावी वाटचाल...

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुळे अहिल्यानगर ठरला राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Image
प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा घाडगे न्यूज @प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने आता आणखी एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या १९ वर पोहोचली असून, राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगरची नोंद झाली आहे. हा विक्रम राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि अल्पावधीतच उमेदवारी जाहीर होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडामोडीची मोठी चर्चा रंगली. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आणि विधान परिषदेचे ७ असे एकूण १९ आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ९ आमदार असून, अजित पवार गटाचे ५, शिवसेना (शिंदे गट) चे २ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँ...

जंतर-मंतरवर तरुणाईचा हुंकार

Image
जंतर-मंतरवर पुन्हा तरुणाईचा हुंकार?   तरंग।शिवाजी घाडगे  देशाच्या राजकारणात अनेक आंदोलने झाली, अनेक नेते आले-गेले; पण जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. सध्या नीट  परीक्षा, विद्यार्थ्यांचे भविष्य, वाढता मानसिक ताण आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे देशातील युवकांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काॅकोरज पार्टीचे अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवरून केंद्र सरकारविरोधात उघडलेला मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी थेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरुणांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात असला, तरी या पाठिंब्याचे प्रत्यक्ष आंदोलनात किती रूपांतर होते, हा खरा प्रश्न आहे. कारण सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि जनआंदोलनातील ताकद यामध्ये मोठा फरक असतो. आज देशातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. गावाकडील पालक कर्ज काढून मुलांना शहरात शिकवतात. मुलांच्या यशस्वी...

पत्रकारांचे भुषण हरपले

Image
पत्रकारितेतील ‘भूषण’ हरपले... भूषण।शिवाजी घाडगे  मृत्यू कोणत्या रूपाने समोर येईल, हे कुणालाच सांगता येत नाही. मात्र आपल्या आवडत्या कामात, आपल्या ध्यासात आणि समाजासाठी ज्ञानदान करत असताना मृत्यूने कवेत घेणे, हे फारच विरळा नशिबी येते. अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि वारसा संवर्धन चळवळीचे प्रणेते भूषण देशमुख यांच्या निधनाने नगर जिल्ह्याने केवळ एक पत्रकार गमावलेला नाही, तर आपल्या इतिहासाचा एक चालता-बोलता ग्रंथच हरवला आहे. भुईकोट किल्ल्यावर इतिहासाची माहिती देत असताना झालेला सर्पदंश आणि त्यानंतर आलेले निधन हा केवळ एक अपघात नाही; तर आपल्या वारशासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीच्या कार्याचा कळसाध्याय आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले. इतिहास सांगताना, वारसा जपण्याचा संदेश देताना आणि समाजाला ज्ञानाचा प्रकाश देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पत्रकारिता क्षेत्रात वेग, स्पर्धा आणि प्रसिद्धीची धडपड वाढत असताना भूषण देशमुख यांनी पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप दिले. त्यांनी कधीही पत्रकारितेचा वापर वैयक्तिक लाभासाठी केला नाही. सत्तेच्या...

शाब्बास शहाबाज शाब्बास...

Image
शाब्बास शहाबाज... शाब्बास! राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आणि महायुतीने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या बिनविरोध निवडीमागील पडद्यामागच्या घडामोडी पाहिल्या तर अनेक राजकीय धागेदोरे उलगडताना दिसतात. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत चर्चेत आलेले नाव म्हणजे एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद. विधान परिषद निवडणुकीतील सर्व गणिते जुळून आली आहेत, असे वाटत असतानाच दत्तात्रय पानसरे यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नसल्याचा दावा करून प्रशासन आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडवली. तब्बल सहा तास जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण झालेल्या या पेचामुळे बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला आणि पानसरे यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त झाला. राजकारणात अंकगणित जितके महत्त्वाचे असते तितकेच संवादाचे राजकारणही महत्त्वाचे असते. पानसरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि संवादाची दारे खुली ठे...

अखेर भाजपाचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झालेच...

Image
अखेर प्राजक्त तनपरेआ यांना आमदारकीचा बिनविरोध गुलाल  राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून हा क्षण राहुरीच्या राजकीय इतिहासात सुर्वण अक्षरानी कोरला जाईल व राहुरीचे राजकारण पुन्हा तनपुरे कुटुंबा भोवती आले  श्रध्दा व सबुरीचा फायदा प्राजक्त तनपुरे यांना झाला असून   उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर इतर सर्व प्रतिस्पर्धी मैदानातून बाहेर पडल्याने तनपुरे यांना बिनविरोध आमदार होण्याचा मान मिळाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना इतक्या लवकर विधान परिषदेची संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि त्याचे फलित बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या...

जिल्ह्यातील पोलीस दादा बदल्याना मुर्हुत

Image
अहिल्यानगर पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांना अखेर मुहूर्त  घाडगे न्यूज @प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतीक्षित प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुरुवारी  पोलीस मुख्यालयात विनंती बदली बैठक   प्रक्रियेत राबविण्यात आली  जिल्ह्यातील सुमारे 300 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.    जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अंमलदारांकडून यापूर्वीच बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या तीन ठिकाणांचा उल्लेख करून अर्ज सादर केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, 30 एप्रिल रोजी त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया खोळबली  होती. पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन यांनी प्रलंबित प्रक्रिया पुन्हा गतीमान केली असून बदलीपात्र अंमलदारांना गुरुवारी सकाळ पासून ...

प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध आमदारकीला सहीची आडकाठी?

Image
प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोधला सहीची आडकाठी? राजरंग।शिवाजी घाडगे  नामनिर्देशनपत्र माघारी प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक पेचामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली । अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात अनपेक्षित घडामोडी घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली असतानाच नामनिर्देशनपत्र माघारी प्रक्रियेदरम्यान सहीच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या नामनिर्देशनपत्र माघारीबाबत आवश्यक असलेल्या सहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. पानसरे यांचा अर्ज वैध राहणार की माघारी मान्य होणार, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघाल...

भाजपाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोध गुलाल?

Image
भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोधचा गुलाल? घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत नगराध्यक्ष करण ससाणे आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. उर्वरित उमेदवार कमलेश गांधी आणि दत्तात्रय पानसरे यांची मनधरणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. करण ससाणे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दोन्ही उमेदवारांनीही माघार घेतल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होईल. त्यामुळे विधान परिषदेत अहिल्यानगरचे खाते प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने उघडले जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  यांच्यावर अहिल्यानगर जागेची जबाबदारी सोपविली होती. स्थानिक पातळीवरील समन्वय साधत त्य...

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरुवात

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्रीला प्रारंभ राहुरी :  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात ‘फुले समर्थ’ या कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री बुधवारपासून सुरू करण्यात आली. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते करजगाव (ता. नेवासा) येथील सुनिता फुलसौंदर आणि बेलापूर येथील शेतकरी मारुतराव राशिनकर यांना ‘फुले समर्थ’ कांदा बियाण्यांचे वितरण करून विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा फुले विद्यापीठाचे संशोधन केलेले बियाणे खरेदी साठी महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात   यावेळी कुलगुरू डॉ. खर्चे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ‘फुले समर्थ’ या वाणाची वैशिष्ट्ये सांगितली. आकर्षक लाल रंग, चांगली गुणवत्ता आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे या वाणाला इतर कांदा वाणांच्या तुलनेत अधिक बाजारभाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करताना त्यांनी सुपीक, मध्यम ते भारी जमिनीची निवड करण्याचा सल्ला दिला. पेरणीपूर्वी बियाण्यांवर कार्बेन्डाझीम (बाविस्टीन) २ ग्रॅम प्रति किलो या प्रम...

बेकायदेशीर ड्रोन उडवली रात्रीची झोप मात्र उडवणारे मास्टरमाईड कोण

Image
बेकायदेशीर ड्रोनने उडवली झोप; ‘मास्टरमाईंड’चा शोध अद्याप कायम ड्रोन।शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींनी नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. सुरुवातीला एखाद-दुसरा ड्रोन दिसल्याच्या चर्चा होत असताना पुढे अनेक गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी आकाशात फिरणारे ड्रोन दुष्टीपथास पडले . त्यामुळे भीती, संभ्रम आणि विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. गेल्या तीन-चार दिवसांत या ड्रोनच्या हालचालींमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलीस प्रशासनाला तीन संशयित ड्रोन हस्तगत करण्यात यश आले असल्याने तपासाला दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. हे ड्रोन नेमके कोणी उडवले? त्यामागचा उद्देश काय होता? आणि रात्रीच्या अंधारात या हालचाली का केल्या जात होत्या? याची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. या प्रकरणादरम्यान सोशल मीडियावर आणि गावोगावी अनेक अफवांनीही उंच भरारी घेतली. ज्याच्या त्याच्या परीने विविध तर्क मांडले गेल...

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

Image
राहुरीत अज्ञात इसमाचा खून; पोलिसांकडून तपास सुरू बेक्रींग @घाडगे न्यूज  राहुरी येथे मंगळवारी रात्री एका अज्ञात इसमाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राच्या आवारात अज्ञात व्यक्तीने इसमाच्या डोक्यात गंभीर मारहाण करून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे. दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (शक्यतो घाडगे न्यूज असे फोटो देत नाही मात्र इसमाची ओळख पटवण्या साठी दिला त्याबद्दल वाचकाचे क्षमस्व)

तीन बेकायदेशीर ड्रोन सापडले राहुरी पोलिसांच्या तपासाला यश

Image
 तीन संशयित बेकायदेशीर ड्रोन आढळले; राहुरी पोलिसांच्या शोध मोहिमेला यश  ड्रोन।शिवाजी घाडगे  राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद ड्रोनच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीती आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष शोध मोहिमेला मंगळवारी महत्त्वाचे यश मिळाले. तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरात प्रत्येकी एक असे एकूण तीन संशयित ड्रोन स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले असून ते पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पथक आणि विशेष अँटी-ड्रोन पथक या संशयास्पद ड्रोनचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवत आहे. दरम्यान, परिसरात दिसणाऱ्या ड्रोनची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण काही प्रमाणात निवळत असले, तरी या ड्रोनचा उगम, मालक आणि त्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.  रात्री पोलि...

महाविकास आघाडीचा घोळ की राजकीय पेच नगराध्यक्ष करण ससाणे लढतील

Image
महाविकास आघाडीचा घोळ की राजकीय पेच करण ससाणे लढतील  राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी जवळपास निर्विघ्न ठरत असताना, महाविकास आघाडी मात्र उमेदवारीच्या प्रश्नावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. हा केवळ समन्वयाचा अभाव आहे की त्यामागे काही मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. महाविकास आघाडीने जागावाटप केले, चर्चा केली, संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ येताच चित्र पूर्णपणे बदलले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून चर्चा असलेले नगराध्यक्ष करण ससाणे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतात, जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना ऐनवेळी थांबवले जाते आणि खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीपासून दूर राहतात. या सर्व घटनाक्रमातून महाविकास आघाडीचा समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर येतो. राजकारणात पराभवापेक्षा चुकीचा संदेश अधिक घातक असतो. या निवडणुकीत महाविकास आघाडीने लढण्याप...

बेकायदेशीर ड्रोनविरोधात शोध मोहीम सुरूच;संख्या रोडावली

Image
बेकायदेशीर ड्रोनविरोधात शोधमोहीम सुरूच संख्या रोडावली  राहुरी |  राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाची मोहीम सुरूच असून ड्रोन संख्या मात्र रोडावली आहे नागरिकांच्या दृष्टीस पडणाऱ्या या ड्रोनमुळे परिसरात निर्माण झालेले भीती आणि संभ्रमाचे वातावरण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी या ड्रोनचा उगम, मालक आणि उद्देश अद्यापही स्पष्ट झालेला नाही. सोमवारी रात्री राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा ‘मिशन अँटी ड्रोन’ अंतर्गत विशेष तपास मोहीम राबविली. या मोहिमेत अत्याधुनिक अँटी-ड्रोन गन तसेच लेझर गनच्या सहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रोनची उंची, दिशा आणि हालचाली यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला. या मोहिमेत राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस कर्मचारी सूरज गायकवाड, पुणे येथील अँटी-ड्रोन पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप, जालिंदर साखरे, प्रमोद ढाकणे, सोहेल सय्यद, रियाज शेख यांच्या...

दुसर्‍याच पक्षांतर पाप स्वतःच मात्र पुण्य

Image
दुसऱ्यांचे पक्षांतर पाप, स्वतःचे पुण्य राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात पक्षांतर हा काही नवीन विषय नाही. मात्र एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा त्याच्या निर्णयाचे मूल्यमापन तत्त्वांवर कमी आणि राजकीय सोयीसुविधांवर अधिक केले जाते, हे वारंवार दिसून येते. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर सुरू झालेल्या प्रतिक्रिया त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. जेव्हा एखादा नेता आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, तेव्हा त्याला "विचारधारेशी प्रतारणा", "संधीसाधूपणा" किंवा "स्वार्थी राजकारण" अशा विशेषणांनी हिणवले जाते. मात्र इतिहास पाहिला तर जवळपास सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या काळात इतर पक्षांतील प्रभावी नेत्यांचे स्वागत केले आहे. त्यावेळी विचारधारा आणि निष्ठेचे निकष अनेकदा मागे पडतात आणि राजकीय गणिते पुढे येतात. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे विरोधकांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. कारण एखादा प्रभावी नेता पक्ष सोडतो तेव्हा केवळ एक व्यक्ती जात नाही, तर त्याच्यासोबत कार्यकर्त्यांचा एक वर्ग, स्थानिक प्रभाव आणि राजकीय समीकरणेही बदलतात. त्यामुळे विरोधकां...