Posts

मुरकूटेचा दसरा तुरुंगातच

Image
मुरकूटे यांचा दसरा आता तुरुंगातच  याना अटक केली श्रीरामपूरात! राहुरी तालुक्यातील पाथरे येथील एका विवाहीत महिलेने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अमिष दाखवून बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती  मंगळवारी रात्री उशिरापर्यंत न्यायालयात प्रतिवाद सुरु होता न्यालयाने मुरकुटे यांना दोन दिवस तुरुंगात कोठडी दिली असून आता मुरकुटे यांचा दसरा तुरुंगात जाणार ? मुरकुटे तुरुंगात  शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो शेवटी खरा खोटा न्यायालय ठरविल मात्र कोणती स्त्री आपल्या आब्रु वेशीवर टागेल कदाचित दोघाच्या समतिने झाले असेल मात्र तुम्ही ईच्छे विरुध्द काहीच करु शकत नाही  मुरकुटे हे पहिल्या पासुन फटककळ स्वभावाचे आहेत जे काही आहे ते उघड उघड मात्र यातील तक्रारदार महिला व त्याची ओळख नेवासा येथील खडका फाटा नजीक शेतावर झाली अण ही शेती मुरकुटे यांना त्याच्या पहिल्या पत्नीची बुडिताची मिळाली अस बोलल जातय अण बुडिताच टिकत नाही अस म्हणतात त्यामुळेच उतार वयात मुरकुटे यांचे हे हाल 82 वर्ष वयाचे मुरकुटे 28 ...

शेती व शेतकरी समृध्दी साठी प्रयत्न

शेती व शेतकरी समृद्ध साठी प्रयत्न  राज्य शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे आणि जिल्हा प्रशासनाने प्रभाविपणे राबविलेल्या विविध योजनांमुळे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबत कृषी विकासाला गती मिळण्यास मदत झाली आहे. कांदा अनुदान योजना २०२२-२३ अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात ५५ हजार ३६८ लाभार्थी असून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे रुपये ११५ कोटी ९६ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ५०० शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलल्या अल्प मुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये ५० हजार या कमाल मर्यादेत रुपये ३६२ कोटी २३ लाख एवढा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला.  प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप व रब्बी हंगामात गेल्या तीन वर्षात ५ लक्ष १३ हजार ३७ शेतकऱ्यांना ११ अब्ज ६५ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.  प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित ...

प्रहारचे आमदार बच्चु कडु एकटेच

Image
आमदार बच्चु कडु पडले एकटे  @पत्रकार शिवाजी घाडगे  प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्य मंत्री आमदार बच्चु कडु आता या पक्षाचे एकमेव आमदार राहीले आहेत त्याचे एक आमदार यांनी त्यांना सोड चिठ्ठी देत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्याने आ बच्चु कडु हे एकटे पडले आहेत  तसे आ बच्चु कडु हे स्वत:च्या हिम्मत वर निवडणुन ऐनारे व्यक्ती मत्व आपल्या पक्षाचा एक आमदार देखील निवडुन आला होता  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चु कडु राज्यमंत्री होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ते गोहाटीला गेले तेव्हा माध्यमांना बच्चु कडु सामोर्य जायचे त्यामुळेच बच्चु कडु शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असतील असे सर्वाना वाटायचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजु भरभक्कम पणे आ बच्चु कडु माडायचे तसे दिव्यांगा साठी आ बच्चु कडु यांचे प्रामाणिक काम त्याची नोंद प्रतेकाच्या काळजावर कोरली गेली आहे म्हणून तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील दिव्यांग कल्याण महामंडळाचे अध्यक्ष पद आ बच्चु कडु यांना बहाल केले  नुकत्याच झालेल्या लोकसंभा निवडणू...

आमदार कानडे ना नडले का

Image
आमदार कानडेना का नडले  खदखद @पत्रकार शिवाजी घाडगे  शिर्डीत आगामी विधान  संभेच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीत मजुफर हुसने यांच्या समोर झाल्या यावेळी श्रीरामपूर चे आमदार लहु कानडे यांनी पक्षाला ताकत देण्या ऐवजी अन्य लोकांना ताकत दिल्याचा आरोप करीत कानडेना नडले खरच कानडे व त्याचे ते दोन भाऊ व  अधिकारी पाहुने हेच जनतेला पाहायला मिळाले का?  कधी ही बैठकीत मी देखील अधिकारी होतो असा फुका दम आमदार लहु कानडे हे भरायचे त्यामुळे ते आमदार असले तरी त्यांच्यातील अधिकारी पदाचा अहंभाव गेला नव्हता आमदार कानडे यांनी काहीच कामे केली नाही असे मात्र म्हणता येणार नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कानडे यांना काॅगेस चे एकमेव आमदार असल्याने भरीव निधी देत चांगली मदत केली बेलापूर ते श्रीरामपूर रस्ता त्यांच्या कालावधीत पूर्ण झाला या रस्त्याने श्रीरामपूर च्या वैभवात भर पाडली  अनेक कामे कानडे यांनी कामे लावली मात्र उद्घाटन करायला ते जिल्हा बॅकेचे संचालक युवा नेते करण ससाणे यांना बरोबर घेऊन करायच्या ऐवजी त्याचे कार्यकर्ते सचिन गुजर यांना गाडीत घेऊन फिरले तर कधी कधी माजी...

छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल शेतकऱ्यां साठी वरदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल ठरणार शेतकऱ्यांची कृषि पंढरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे          छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलामध्ये पाच कृषि संलग्न महाविद्यालयांचा व एका कृषि तंत्रनिकेतनचा समावेश असून राज्यातील नव्हे तर भारतातील एकमेव अशी ही संकल्पना आहे. या कृषि विज्ञान संकुलामध्ये परिसरातील शेतकऱ्यांना येथील प्राध्यापकांद्वारे त्यांच्या  समस्येवर योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.या संकुलामुळे येथील शेतकऱ्यांचा फायद्याचे होणार आहे.  यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल शेतकऱ्यांसाठी कृषि पंढरी ठरेल असे प्रतिपादन  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील, काष्टी, मालेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करतांना  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनीक बांधकाम ...

आंबिया बहर पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - कृषी मंत्री धनंजय मुंडे

Image
आंबिया बहार फळ पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - कृषी मंत्री धनंजय मुंडे : पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी  सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभा...

डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची शेती फुलली

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेती फुलली  डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना  चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांच्यासाठी जगण्याचं लाभकारी ठरली आहे. एकेकाळी कोरडवाहू शेतीमुळे  योजनेतून मिळालेल्या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून एकरी १२ क्विंटल सोयाबीन व गव्हाचं उत्पन्न घेतले आहे.  राज्य शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते .  योजनेतून दीड लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विषयक बाबीकरिता नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे अस्तरीकरण, वीज जोडणी, सौर कृषी पंप, पंप संच, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन संच या बाबीकरिता भरीव व पॅकेज स्वरुपात अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक सर्व गरजा  योजनेतून  पूर्ण होतात.  चितळी चे अर्जुन पगारे यांची ०.७५ हेक्टर शेतजमीन आहे. हे क्षेत्र पुर्णपणे कोरडवाहू असल्याने पगारे खरीपात बाजरीसारखी कोरडवाहू पीक घेत असतं. पिकासाठी लागणारा जास्त खर्च आणि उत्पन्न कमी त्यामुळे शेती फायदेशी...