छत्रपती दैवताला कोणी छेडले

राहुरीत कोणी छेडले दैवताला ? 
नेमके घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालमीत असलेला अर्ध पुतळा कोण्या डोक्याफिरुने विटंबना केल्याची निंदनीय घटना घडल्याने वातावरण तापले होते निषेध व्यक्त करीत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले  कडकडीत बंद पाळण्यात आला जमाव  सतप्त होता भावना तर दुखावल्या मात्र काळजात जखमा देखील झाल्या शिवाजी महाराज काय परंतु कोणत्याच राष्ट्र पुरुषांची विटंबना व्हायला नको तशी समाज कटकाना जात नसते त्याच्या अविवेकी कृत्या मुळे गुण्या गोविंदाने एकत्र असलेला समाज एक मेकांकडे संशयाने पहातो 
अशीच राहुरी महाविद्यालय समोर भारत मातेची विटंबना काही वर्षा पुर्वो झाली होती वातावरण तापले पोलीसांकडून अरोपी म्हणून राहुरीत धोडासा मतिमंद असलेला तरुण संशयित म्हणून अटक करण्यात आला पुढे यामुळे तो वेडा झाला न्यायालयात निर्दोष शाबिद झाला मात्र त्याला बसलेल्या धक्क्याने तो मात्र आयुष्यातून उठला तेव्हा राहुरी तालुक्यात अतिशय सारे धर्मिय गुण्या गोविंदाने नादत होते मात्र लोकसंभा निवडणूक नंतर हिरवा गुलाल उधळला यांचा परिणाम काही दिवसात दिसुन आला मात्र गुहा, उंबरे येथील घटना देखील गंभीर होत्याच मात्र हे विझवायचे की पेटवायचे हे आपल्या समाज्यावर अवलंबून आहे म्हणा तो 
जेम्स लेन यांने देखील शेन खाल्ले होते 
 या लोकांची डोकी सडकी असतात मात्र ते आपल्या आर्दशाचा आधार घेत आपल्या भावनेला हात घालतात व व्यवस्थित रित्या आपला कार्यभाग साधत असतात राहुरीच्या तालमीत छत्रपती शिवाजी महाराज व हनुमान यांचे भगवान म्हणून तालमीत होते एक तर लाल मातीच्या तालमी मोबाईल युगात केव्हाच बंद झाल्यात व अशा हाताच्या बोटावर वर मोजल्या जाणाऱ्या तालमीत देखील...... खाणारे लोक छत्रपतीचा आवमान करतात    
छत्रपती शिवाजी महाराज नाव काढणाऱ्याचे राजकारण संपले तसेच राजकारणा साठी कोणी छत्रपतीचा वापर करणार असेल तर त्याचे राजकारण संपणार आहे मुळात शिवाजी महाराज राजे होते ते राजेच राहतील 
एक परिदा मंदीर पे जा बैठा कभी ओ मंजीत पे जा बैठा पक्षाला मंदीर व मंजीत सारखीच असते 
मात्र पहाणार्‍या ते भावेलच असे नाही कारण आपल्याला आता देशा पेक्षा आपला र्धम, जात क्षेष्ठ वाटु लागली 
कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा पध्दतीर पणे बिघडवली जात आहे 
विटबना करणार्यांना शोधने पोलिसाच्या दुष्टीने फार से अवघड नाही वते शोधतील देखील खरच कोणी केली असेल शिवबाची विटंबना व हे कृत्य करून त्याने मिळवले तरी काय 
एक मात्र खरे शिवाजी महाराजांच्या अज्जीने नगरच्या शहाशरिफ ला नवस केला होता म्हणे तेव्हा त्यांनी आपल्या दोन मुलांची नावे शहाजी व शरीफजी असे ठेवले अण शहाजी म्हणेजे शिवाजी महाराज चे वडील इतकी मोठी परंपरा आपल्या जिल्हाची आहे 
मात्र इतिहास वाचतो तरी कोण 
तेव्हा मजहब नही शिकाता आपसमे बैर रखना मात्र काही लोकांना बैर वाढवाचे असेल तर त्याचा बंदोबस्त देखील करायलाच हवे नाहीतर आम्ही तुमच्याशी प्रेमाने राहायचे अण तुम्ही... करायचे तेव्हा रिजेचा इतिहास कोणी विटंबना करुन मिटला जाणार नाही व दिवसेंदिवस तेजोमय होत आहे आता देवा चे राज्य आहे अण शिवबा तर आमेचे दैवत आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन