पाट पाणी उन्हाळी आवर्तन साठी अर्ज करा

उन्हाळी सिंचनासाठी पाटाचे पाणी मागणी अर्ज करा 
नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम २०२५–२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस तसेच फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी तसेच पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ मधील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उन्हाळी सिंचनासाठी पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी आणि आळंदी या धरणांच्या जलाशयांमधूनही पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्यांच्या पात्रातून तसेच गोदावरी नदीवरील विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
धरणांमधील उपलब्ध पाण्यातून प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात येईल. त्यानंतर उर्वरित पाण्यातून कालव्यांच्या आवर्तनानुसार शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच ठिबक आणि तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन