राहुरी खुर्द तीव्र पाणीटंचाई विरोधात महिला अक्रमक

राहुरी खुर्दमध्ये पाणी मिळत नाही 
ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त महिलांनी ठोकले टाळे
राहुरी । 
 राहुरी खुर्द  तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थ हैराण झाले 
 असून संतप्त रहिवाशी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन बुधवारी करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आदोलन छेडले 
“जोपर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपस्थित नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यही कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महिलां म्हणाल्या की, “आम्ही नियमितपणे व वेळेवर पाणीपट्टी भरत आहोत. मात्र तरीही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नाही. अनेकदा दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.” यामुळे महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीकडून “१४ गाव पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत नाही,” असे कारण सांगण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी हे कारण मान्य करण्यास नकार देत प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

आंदोलनावेळी १४ गाव पाणीपुरवठा योजना सदस्य शिवाजी शेंडे, शौकत इनामदार, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण,आयुब पठाण व ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, आश्विनी कुमावत, असफ पठाण आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ महिलांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी केली.
 आंदोलनात जयश्री गाडे, मनिषा कारंजकर, स्वाती पवार, कविता पेंडभाजे, चंद्रकला खोजे, वैशाली क्षिरसागर, माया क्षिरसागर, शम्मू शेख, छाया मेहेत्रे, हेमा लालबागे, अर्पणा पवार, सुनंदा मोरे, मंगला कोरके, अनिता डोंगरे, नंदिनी डफळ, मंगला सांगळे, पूजा जाधव, सारिका वाकचौरे, रंजना दातीर, उमा मेहेत्रे, हौसाबाई चांदणे, सकुबाई चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
तसेच निसार शेख, पुंजा आघाव, लखन डोकडे, अन्सार पठाण, राजेंद्र खोजे, रफिक शेख, अशोक वाकचौरे, रंगनाथ चोपडे, संजय थोरात, जगन्नाथ भोसले, मनोहर गायकवाड, अनिल आढाव, राजेंद्र थोरात, योगेश गरड, अशोक जाधव, सकलेन शेख, फारूक सय्यद, रामनाथ डोके, बाबा आढागळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर