देवळाली प्रवरा नगर पालिकेचे त्रिबकराज ग्रंथालयाचे ग्रंथपाल
संभाजी वाळके टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत 21.97 कि मी अंतर दोन तास अठरा मिनिटात पुर्ण केले ही मॅरेथॉन अशिया खंडात सर्वात मोठी मानली जाते यात लाखो स्पर्धेक सहभागी झाले होते रविवारी पहाटे ही स्पर्धा पार पडली
या स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल वाळके यांचे अभिनंदन होत आहे
भाचा कधीच येणार नाही मामाच्या गावाला… राहुरी। शिवाजी घाडगे प्रत्येक व्यक्तीला आपल्या मामाचं गाव जिव्हाळ्याचं असतं. कारण बालपणीच्या निरागस आठवणी, पहिल्या हशा-खेळा, मातीचा वास आणि माणसांचा ओलावा याच गावात जपलेला असतो. देवळाली प्रवरा हेच असे एक गाव होते—जिथे भाचे अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर ही त्यांची जन्मभूमीच नव्हे, तर त्यांच्या आयुष्याच्या आठवणींचं माहेरघर होतं. “बालपणाचा काळ म्हणजे सुखाचा काळ” असे म्हणतात, आणि ते अजितदादांच्या बाबतीत अगदी खरं ठरतं. देवळालीच्या जत्रेतली भेळ, गोडीशेव, लहानपणी खेळलेले गोट्या, कोया, सुरपारंब्या, विट्टी-दांडू—या साऱ्या खेळांमध्ये त्यांचं बालपण हरवलेलं होतं. इथंच शिक्षण घेत, मातीशी नातं घट्ट करत ते मोठे झाले. राज्याच्या राजकारणात ते “साहेब” झाले, पण देवळालीसाठी ते नेहमीच ‘दादा’ राहिले. देवळाली प्रवरा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी एक आठवण सांगितली होती— “आम्ही देवळाली प्रवरातून ज्वारीच्या बैलगाडीतून काटेवाडीला जायचो.” देवळालीत कदम कुटुंब हे ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत घाडगे न्यूज @ प्रतिनिधी अहिल्यानगर सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र राज्यातील नुकसान ग्रस्ता साठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपये मंजूर केले असून अहिल्यानगर साठी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ को...
राहुरीत अज्ञात इसमाचा खून; पोलिसांकडून तपास सुरू बेक्रींग @घाडगे न्यूज राहुरी येथे मंगळवारी रात्री एका अज्ञात इसमाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राच्या आवारात अज्ञात व्यक्तीने इसमाच्या डोक्यात गंभीर मारहाण करून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे. दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (शक्यतो घाडगे न्यूज असे फोटो देत नाही मात्र इसमाची ओळख पटवण्या साठी दिला त्याबद्दल वाचकाचे क्षमस्व)
Comments
Post a Comment