डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची शेती फुलली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेती फुलली डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांच्यासाठी जगण्याचं लाभकारी ठरली आहे. एकेकाळी कोरडवाहू शेतीमुळे योजनेतून मिळालेल्या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून एकरी १२ क्विंटल सोयाबीन व गव्हाचं उत्पन्न घेतले आहे. राज्य शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते . योजनेतून दीड लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विषयक बाबीकरिता नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे अस्तरीकरण, वीज जोडणी, सौर कृषी पंप, पंप संच, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन संच या बाबीकरिता भरीव व पॅकेज स्वरुपात अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक सर्व गरजा योजनेतून पूर्ण होतात. चितळी चे अर्जुन पगारे यांची ०.७५ हेक्टर शेतजमीन आहे. हे क्षेत्र पुर्णपणे कोरडवाहू असल्याने पगारे खरीपात बाजरीसारखी कोरडवाहू पीक घेत असतं. पिकासाठी लागणारा जास्त खर्च आणि उत्पन्न कमी त्यामुळे शेती फायदेशी...