Posts

Showing posts with the label देवा भाऊचा विश्वास सार्थ ठरवेल

अक्षय कर्डीले यांनी जिकले मने वडिलांच्या आठवणीने रडले मने

Image
राहुरीत अक्षय कर्डीले यांनी जिंकली जनतेची मने; वडिलांच्या आठवणींनी रडले सगळेच  राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी झालेली भाजपची प्रचार सभा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता भावनांचा महासागर ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला प्रचंड जनसमुदायाने प्रतिसाद दिला. मात्र या सभेचे खरे केंद्रबिंदू ठरले ते उमेदवार अक्षय कर्डीले यांचे हृदयस्पर्शी, प्रांजळ आणि अश्रूंनी दाटलेले भाषण. सभास्थळी वातावरण उत्साहाने भरलेले असतानाच अक्षय कर्डीले व्यासपीठावर उभे राहिले आणि काही क्षणांसाठी त्यांनी जनसमुदायाकडे पाहिले… तो क्षण जणू भावनांनी भारलेला होता. आपल्या भाषणाची सुरुवात करताच त्यांनी दिवंगत वडील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि क्षणार्धात संपूर्ण वातावरण गंभीर झाले. माझ्या मनात काय वेदना आहेत प्रतेक जण भेटायला येतो मात्र वडील भेटायला कधी येणार नाहीत ही वेदना सहन होत नाही. वडलांच्या आठवणीने,बहीण, पत्नी नातेवाईक संगळेच रडले मात्र उपस्थित जनसमुदाय सुध्दा रडला  “म...