यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधरात
शेतकऱ्यांकडे विकायला काहीच नाही दिवाळी गेली अंधारात....! स्पाॅट रिपोर्ट @घाडगे न्यूज मध्यतंरी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभे पिके सडुन गेले हाता तोडाशी आलेले घास पाण्यात गेला बि-बियाणे खरेदी साठी कर्ज घेतलेले वाढत असून उद्याच्या भरवशावर आज मात्र आता विकायला काही नाही शेतकरी अन्नदाता ची यंदाची दिवाळी अंधारात साजरी केली गेली. आपल सार गणीत कोलमडून गेले शेतीतील उत्पादन आदिक होण्या ऐवजी कायम वजावट शेतात अतिवृष्टीचे पाणी घुसल्याने माती देखील शिल्लक राहीली नाही होत्याच नव्हत झाल दसऱ्याला 150 रुपये किलोने विकली गेलेली झेंडूची फुले आता दिवाळीदा अवघी 50 रुपये किलोने विकली गेली मागच्या दिवाळीत 200 रुपये जोडी विकली जाणारी लक्ष्मी ( शिराई ) अवघी 100 रुपये जोडी होती तर बाजारातुन बत्ताशे गुल झाले . पणत्या आणायला देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत ज्युन्याच पणत्या आणि विक्री साठी येणारा कुंभार देखील मातीच्या पणत्या घेऊन येत नाही कारण पणत्या बनवायला माती शिल्लक नाही कसे बसे किराणा दुकान दाराच्या हाता पाया पडून किराणा आणला ...