गुणवंता व मानाकण विद्यापीठाला महत्वाचे-कुलगुरु डॉ. विलास खर्चे
गुणवत्ता आणि मानकीकरण हेच कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ- कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी।प्रतिनिधी विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील मानकांचे शिक्षण मिळावे औद्योगिक मानके आणि गुणवत्ता नियंत्रणाविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'भारतीय मानक ब्यूरो' (BIS) विद्यार्थी शाखेचे योगदान नक्कीच मोठे आहे. हे पाऊल कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गुणवत्ता आणि मानकीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या विद्यार्थी शाखेच्या ( स्टुडन्ट चाप्टर) उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रस...