Posts

Showing posts from August, 2026

भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांचा नाही

Image
भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांची नाही  भाष्य।शिवाजी घाडगे  शिक्षण हा देशाच्या विकासाचा कणा असतो. ज्या देशाने शिक्षण, संशोधन, विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले, त्या देशाने जगाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील बदल हा केवळ अभ्यासक्रम बदलण्याचा विषय नसतो. तो देशाच्या भवितव्याशी संबंधित असतो. भारताच्या शिक्षण व्यवस्थेबाबत आज निर्माण झालेले प्रश्न त्यामुळेच गंभीर आहेत. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले. या बदलांमध्ये काही सकारात्मक उद्दिष्टे असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी, सरकारी शाळांची अवस्था, शिक्षकांची कमतरता, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न, खासगी शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी शिक्षणाचा तुटलेला संबंध यामुळे चिंता वाढत आहे. आज ‘नीट’ परीक्षेभोवती निर्माण झालेला गोंधळ हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थतेचे एक लक्षण आहे. नीटचा गोंधळ आणि तरुणांचा संताप वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो ...

तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावेच लागतील !

Image
तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावेच लागतील! भाष्य।शिवाजी घाडगे  सीजीपीचा संस्थापक अभिजीत दीपके याच्यामध्ये एक पत्रकार दडलेला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती, सत्तेला थेट प्रश्न विचारण्याची हिंमत, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेला शब्द देण्याची हातोटी यामुळे त्यांनी उभी केलेली सीजीपी ही केवळ सोशल मीडियावरील संघटना राहिलेली नाही. तिने एका विशिष्ट काळात तरुणाईच्या असंतोषाला व्यासपीठ मिळवून दिले आहे. आजच्या राजकारणात हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी आंदोलन उभे करायचे असेल तर पक्षाचे कार्यालय, संघटनेचे जाळे, कार्यकर्त्यांची फळी, मोठमोठ्या सभा आणि मोर्चे आवश्यक असायचे. आता एका मोबाईलच्या माध्यमातून प्रश्न उभा करता येतो, हजारो तरुणांना जोडता येते आणि काही तासांत एखादा मुद्दा देशव्यापी चर्चेचा विषय बनू शकतो. पारंपरिक राजकीय पक्षांना या बदलाची अजूनही पूर्ण जाणीव झालेली दिसत नाही. सीजीपीच्या आंदोलनाला मिळालेला तरुणाईचा प्रतिसाद याच बदलाचा संकेत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्य...

ध्येयाची नशा करा व्यसनाची नाही देवळाली प्रवरात विद्यार्थानी घेतली भारत नशामुक्त शपथ

Image
‘ध्येयाचा नशा करा, व्यसनाचा नाही’;  विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प घाडगे न्यूज: प्रतिनिधी भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत देवळाली प्रवरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, जनजागृती व्याख्यान आणि प्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी केंद्राच्या प्रमुख विजया दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या सहकार्याने देशभर ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ राबविण्यात येत असून, चार कोटी युवक-युवतींना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. व्यसनमुक्त भारत ही केवळ सरकारी योजना नसून ...

अहिल्यानगर च्या शासकीय रुग्णालयांच्या 981पदाना शासकीय मान्यता

Image
अहिल्यानगरच्या ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदांना राज्य शासनाची मान्यता  घाडगे न्यूज @विशेष बातमी  अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी आवश्यक ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय  निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाचे कार्यक्षम संचालन, दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला मोठी गती मिळणार आहे. राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शासन निर्णयानुसार रुग्णालयासाठी गट-अ, गट-ब आणि गट-क स...

मुळात ८५ टक्के पाणी

Image
मुळा धरणात ८५ टक्के पाणी शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्ह्याची जलसंजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा गुरुवारी सायंकाळपर्यंत २२,०१८ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) इतका झाला असून, तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या ८५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोतूळ परिसरातून मुळा धरणाकडे ५,६३८ क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक सुरू असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. मुळा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट असून, पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आता केवळ १५ टक्के पाण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणातील पाणी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी, शेती सिंचनासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धरणातील वाढता साठा लक्षात घेता आगामी रब्बी हंगामासाठीही...

व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वानी पुढे यावे-संभापती प्रा राम शिदे

Image
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे : सभापती प्रा. राम शिंदे घाडगे न्यूज ।प्रतिनिधी तरुण हे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. "एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य – व्यसनमुक्त जिल्ह्याकडे एक सामूहिक पाऊल" या संकल्पनेवर आधारित या अभियानानिमित्त शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार...

नशामुक्त जीवन व व्यसनमुक्त समाज रॅलीचे आयोजन-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

Image
अहिल्यानगर येथे व्यसनमुक्तीसाठी  भव्य ‘नशामुक्त जीवन’ जनजागृती रॅली- पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अमली पदार्थांचे वाढते सेवन, विविध प्रकारच्या व्यसनांचे समाजावर होत असलेले गंभीर दुष्परिणाम आणि तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी भव्य ‘नशामुक्त  जीवन’ व व्यसनमुक्त समाज जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक सुदर्शन म्हणाले की, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकारातून देशभर अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातही ‘नशामुक्त जीवन’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेबाबत जागर...

शेतीची ढासाळती अर्थव्यवस्था मजुरांचा ताण

Image
शेतीची ढासळलेली अर्थव्यवस्था : वाढता उत्पादन खर्च, मजुरीचा ताण  भाष्य।शिवाजी घाडगे  एकेकाळी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस शेतीने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले. ऊस उत्पादक म्हणजे सधन बागायतदार, अशी समाजात ओळख निर्माण झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांत बदललेल्या आर्थिक समीकरणांमुळे हे चित्र झपाट्याने बदलले आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे वाढलेले दर, रासायनिक खते व बियाण्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, बाजारातील अनिश्चितता आणि शेतमालाला न मिळणारा रास्त भाव यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतीपासून दूर जात भुसार पिकांकडे मोर्चा वळविला. मात्र, तेथेही अपेक्षित आर्थिक समाधान मिळत नसल्याने शेती आज तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढत आहे. ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक आहे. लागवडीपासून तोडणीपर्यंत साधारण वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. या काळात खत, औषधे, पाणी, मजुरी आणि इतर खर्च सातत्याने वाढत जातो. दुसरीकडे अनेक ठिकाणी उसाच्या वजनातील कथित अनियमितता, तोडणीसाठी लागणारा मोठा खर्च, वाहतूक, बांधणी साहित्या...

राजपुत्र बोललेच नाही मात्र राजकारणात मौन चालत नाही

Image
राजपुत्र बोललेच नाही मात्र  राजकारणात मौन चालत नाही! भाष्य।शिवाजी घाडगे  महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष एका व्यक्तीकडे खिळले होते. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. पक्षातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. व्यासपीठावर आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. मात्र सुरुवातीला ते काहीसे संकोचलेले दिसले. काही क्षण ते शब्द शोधत असल्याचे जाणवले आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. भाषण अपेक्षेपेक्षा लहान राहिल्याने त्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. राजकारणात एखादे भाषण हे केवळ शब्दांचे संकलन नसते. ते नेतृत्वाचा आत्मविश्वास, अभ्यास, विचारांची स्पष्टता आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते यांचे प्रतिबिंब असते. म्हणूनच अमित ठाकरे यांच्या या अल्प भाषणाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचवेळी एका भाषणावरून एखाद्या नेत्याचे संपूर्ण राजकीय मूल्यमापन करणेही तितकेच चुकीचे ठरते. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत वक्तृत्वाला नेहमीच मोठे स्थान र...

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयअधिकारी कार्यालयाच्या वतीने सामूहिक ग्रंथवाचन

Image
लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात अधिकारी कार्यालया मार्फत सामूहिक ग्रंथ वाचन   प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसा निमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे  सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथालय निरीक्षक रामदास  शिंदे यांच्या हस्ते  लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी श्री.छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक  विद्यामंदिर, भूतकर...