Posts

Showing posts with the label निष्टचे स्वागत

खासदार राजाभाऊ राजा वाजत गाजत स्वागत

Image
खासदार राजाभाऊ खऱ्या अर्थाने ‘राजा’ ठरले! वाजत गाजत स्वागत  राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात सत्तेची समीकरणे बदलत असतात. आज सत्ता असते, उद्या नसते. पदे, मंत्रीपदे, निधी आणि अधिकार यांचा मोह अनेकांना आपल्या विचारांपासून आणि मतदारांनी दिलेल्या विश्वासापासून दूर नेत असतो. अशा परिस्थितीत सत्तेपेक्षा निष्ठेला महत्त्व देणारे नेते समाजाच्या स्मरणात राहतात. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये घेतलेली भूमिका याच मूल्यांची आठवण करून देणारी ठरली आहे. ज्या विचार धारेतुन आपण निवडून आलो त्या विचार धारे बरोबर प्रामाणिक राहणाऱ्यांना शिवसैनिक काय जनता देखील आदर करते  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत पक्षांतर, गटबाजी आणि राजकीय सोयीसाठी बदलणाऱ्या भूमिका यांची मालिका सुरू आहे. अनेकांनी सत्तेच्या दिशेने वाटचाल केली, तर काहींनी आपल्या राजकीय भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. राजाभाऊ वाजे यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यामुळेच त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, फटाक्यांची आतषबाजी झाली, फुलांचा वर्षाव झाला आणि निष्ठेचा उत्स...