Posts

Showing posts with the label स्पर्धा पिकाची

पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

Image
पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे   खरीप व रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण  व आदिवासी गटासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.  राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, या उद्देशाने राज्यांतर्गत या पीकस्पर्धा राबविण्यात येत आहेत.   सर्वसाधारण व आदिवासी गटसाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी शेतकऱ्यांची निवड...