Posts

Showing posts with the label शिक्षण हक्क आहे

भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांचा नाही

Image
भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांची नाही  भाष्य।शिवाजी घाडगे  शिक्षण हा देशाच्या विकासाचा कणा असतो. ज्या देशाने शिक्षण, संशोधन, विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले, त्या देशाने जगाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील बदल हा केवळ अभ्यासक्रम बदलण्याचा विषय नसतो. तो देशाच्या भवितव्याशी संबंधित असतो. भारताच्या शिक्षण व्यवस्थेबाबत आज निर्माण झालेले प्रश्न त्यामुळेच गंभीर आहेत. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले. या बदलांमध्ये काही सकारात्मक उद्दिष्टे असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी, सरकारी शाळांची अवस्था, शिक्षकांची कमतरता, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न, खासगी शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी शिक्षणाचा तुटलेला संबंध यामुळे चिंता वाढत आहे. आज ‘नीट’ परीक्षेभोवती निर्माण झालेला गोंधळ हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थतेचे एक लक्षण आहे. नीटचा गोंधळ आणि तरुणांचा संताप वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो ...