Posts

Showing posts with the label राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक

धुळीत हरवले प्रश्न की नवे राजकीय समीकरणे

Image
 धुळीत हरवलेले प्रश्न की नवे राजकीय समीकरण? रंग तरंग घाडगे न्यूज  ।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. देशातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने   राहुरी मतदारसंघाचाही त्यात समावेश केला आहे. कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे राहुरीत राजकीय हालचाली, आरोप-प्रत्यारोप आणि रणनीतींची चुरस पाहायला मिळणार हे निश्चित आहे. योगायोग असा की पोटनिवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीतच होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच हवेत उडालेली धूळ खाली बसण्याआधीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारणात शक्यता आणि अशक्यता यांची सीमा फारच पातळ असते, हे खरे असले तरी लोकशाही व्यवस्थेत बिनविरोध निवडणूक ही अपवादात्मक गोष्ट असते. कारण निवडणूक लढव...