Posts

Showing posts with the label फसवणू नको

शेतकऱ्यांना खराब बियाणे व खते विक्री करणा-याविरुद्ध कारवाई जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ

Image
खराब बी-बियाणे व खतांची विक्री कराल तर  कारवाई   जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  -  खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री  करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी  सालीमठ बोलत होते.             यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी   सुधाकर बोराळे,जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता पूर्ण असल्याची खात्री करावी.  खरेदीवेळी पक्के बील बियाण्यांची पिशवी व बियाण्यांचा  एक छोटा नमुना जतन करुन ठेवावा...