Posts

Showing posts from December, 2025

श्रीरामपूरात गोळी बारात बंटी जहागीरदार ठार

Image
बंटी जहागीरदार यांची गोळ्या  झाडून हत्या हल्लेखोर पसार राहुरी  श्रीरामपूरात  बुधवारी  गोळीबाराचा थरार झाला असून दुपारी अडीच्या  सुमारास कब्रस्तानातील एक अंत्यविधी आटोपून परतणारे बंटी जहागीरदार यांच्यावर सेंट्लुक हॉस्पिटलच्या  गेट समोर थांबलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.या गोळीबारामध्ये ते  मरण पावले  कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हे आपले मित्र अमीन हाजी याच्या बाईकवर मागे बसून घरी परत चालले होते.संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ ते आले असता आधीपासून तेथे उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला.दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडी वरून उतरले व त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावर भिरकावला. त्याक्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल मधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.यानंतर ते खाली कोसळले.त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते...

आब्या च्या भुरी रोग नियंत्रणावर सल्ला

Image
आंबा भुरी रोगाबाबत शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सल्ला राहुरी                  डिसेंबर व जानेवारी महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्यास सुरुवात होताच आंबा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असा इशारा राहुरी कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. संजय कोळसे व डॉ. प्रवीण खैरे यांनी दिला आहे. या कालावधीत हवामान ढगाळ राहणे, रात्रीचे तापमान दिवसाच्या तुलनेत कमी असणे व दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास भुरी रोग झपाट्याने पसरल्याचे आढळून येते.          हा रोग ओयडियम मॅन्जीफेरी या बुरशीमुळे होतो. या बुरशीची बीजे वाऱ्यामार्फत पसरत असून मोहोर व कोवळ्या पालवीवर प्रथम लागण दिसून येते. सुरुवातीला मोहोराच्या दांड्याच्या टोकाजवळ पांढऱ्या रंगाची तंतूमय बुरशी दिसते व पुढे संपूर्ण मोहोरावर तिचा प्रसार होतो. बुरशी पेशीतील अन्नरस शोषून घेत असल्याने मोहोराची वाढ खुंटते. रोग तीव्र झाल्यास ७० ते ८० टक्के ...

एक आदानी बाकी आडानी

Image
एक अदानी, बाकी आडाणी भाष्य घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  उद्योग क्षेत्रातील नामवंत गौतम अदानी अलिकडेच बारामतीत येऊन गेले आणि खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. मागे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येऊन गेले होते. मग तेव्हाच खासदार सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात गेल्या असत्या. मुळात लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांनी अतिशय बिकट परिस्थितीत आघाडीचे खासदार निवडून आणले. अनेक जण खासदार होऊन गेले. मुळात उद्योग येत-जात असतात; याचा थेट संबंध मंत्रिमंडळात स्थान मिळण्याशी जोडणे कसे शक्य आहे? तसे राजकारणात अशक्य असे काही नसते. तसे खासदार सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तर ते चांगलेच. कारण खासदार निलेश लंके काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकले व काढले गेले. त्या छायाचित्रात खासदार सुप्रिया सुळे देखील हसताना दिसत होत्या. खा. शरद पवार… भल्याभल्यांना न उलगडणारं कोडं…  त्याच्या पुढे ए आय तंत्रज्ञान कदाचित फिके पडेल  कारण उद्योगपती गौतम अदानी बारामतीत आले आणि भल्याभल्यांची नीती ग...

सत्कार पडत्या काळात मदत करणाऱ्यां हाताचा !

Image
सत्कार मदत करणाऱ्या हातांचा   साथ ॥ घाडगे न्यूज  आपल्या यशस्वी जीवनप्रवासात, विशेषतः जीवनाच्या खडतर काळात साथ देणाऱ्या, मदत व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिमाखदार स्नेहसत्कार सोहळा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा पूर्वी श्रमिक व्यावसायिक आणि सध्या हरिभक्त पारायण कीर्तनकार असलेले राजेंद्र धनराज चोरडिया यांनी आयोजित केला होता. या सोहळ्यास अगदी मोजकेच स्नेहजन उपस्थित होते. हुरडा, मिष्टान्न भोजन व स्नेहसत्कार  नातेवाईकांपासून ते समाजातील अनेक घटक असे असतात की, ज्यांनी आयुष्यात मोठे सहकार्य केलेले असते; मात्र त्यांचे साधे आभारही कधी व्यक्त केले जात नाहीत. मात्र राजेंद्र चोरडिया यांनी आपल्या उद्योग-व्यवसायात मदत व सहकार्य करणाऱ्या सर्व कष्टकरी घटकांचा स्नेहसत्कार करून एक वेगळाच आदर्श घालून दिला. ऊसतोडणी कामगार, टोळी मुकादम, अधिकारी, ट्रक चालक, फिटर, कीर्तनकार अशा सर्वांचा त्यांनी सन्मान करून मनापासून आभार मानले. “मी आज जे काही आहे, ते तुमच्या मदतीमुळे आणि सहकार्यामुळे आहे,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या जी...

दादा जरा दमान पाय काढू नका पायावर उभे करा

Image
दादा, जरा दम्यानं… पाय काढू नका, लोकांना पायावर उभं करा भाष्य घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगरपालिकेत पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून सत्यजित कदम यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र विजयानंतर झालेल्या आभार सभेत “पाय काढण्याची” भाषा वापरणे योग्य नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आपल्या पदाचा आणि पक्षाचा उपयोग लोकांना पायावर उभे करण्यासाठी व्हायला हवा. कारण तुमचे पाय खेचण्याचे प्रयत्न करणारे लोक तुमच्या पक्षातही आहेत, हे वास्तव आहे. सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होणारे तुम्ही देवळाली प्रवराचे पहिलेच नगराध्यक्ष आहात. तुमचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हेही अवघ्या एका मताने नगराध्यक्ष झाले होते आणि पुढे राहुरीचे आमदार बनले. कदाचित तुम्हीही भविष्यात आमदार व्हाल, मात्र सध्या तरी दादा, जरा दम्यानं वागण्याची गरज आहे. तसे पाहिले तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या फारशी अवघड नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याचे बोलले जाते. शिवाय केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने “देवळालीत पुन्हा भाजपलाच सत्...

भाजपा होतोय का आया राम गया राम पक्ष?

Image
भाजप होत आहे ‘आया राम–गया राम’ पक्ष? चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  भाजपमध्ये ‘आया राम–गया राम’ संस्कृती वाढत असल्याचा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. याबाबत अलिकडेच माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आवाज उठवला. कोणतीही तमा न बाळगता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड विरोध दर्शवला. याआधी पक्षातील ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे तसेच “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,” तसेच विनोद तावडे यांनाही अशाच प्रकारची वागणूक मिळाल्याचे जनतेसमोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या, स्वतःला  सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमध्ये असे बेशिस्त वातावरण निर्माण होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आधीच तापलेले नाशिक, आता भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे अधिकच तापले आहे. साधु नाशकात येण्या आधीच राजकीय सधी साधुनी संधी साधली.  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्य...

कोपरगावात आक्का च्या नावावर तिकीट फाडत संधान साधले

Image
कोपरगावात ‘आक्का’च्या नावावर तिकीट फाडत संधान साधले घाडगे न्यूज |@ शिवाजी घाडगे कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या  निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला होऊन . या चुरशीच्या लढतीत भाजपाने अवघ्या ४०९ मतांनी राष्ट्रवादीला पराभूत करत नगराध्यक्ष पदांवर संधान साधले.  ही निवडणूक आमदार आशुतोष काळे आणि  चेअरमन विवेक कोल्हे यांच्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी लढली गेली अखेर विवेक कोल्हे यांनी आपले उमेदवार पराग संधान यांना नगराध्यक्ष पदावर बसवून करत कोपरगाव शहरावरील आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.  भाजपाचे उमेदवार पराग संधान यांना १८ हजार ५०३ मते मिळवून विजयी पताका फडकवली, तर राष्ट्रवादीचे ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना १८ हजार ०९४ मते मिळाली. नगरसेवक निवडणुकीत भाजपाला १९, तर राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या. अवघ्या ४०९ मतानी पराग संधान यांचा विजय झाला.  विशेष बाब म्हणजे, ओमप्रकाश कोयटे हे कोल्हे गटाशी संबंधित असतानाही ‘आक्का’च्या नावाने तिकीट फाडत त्यांना राजकीय कोंडीत पकडण्यात कोल्हे गट यश...

राहुरीची आमदारकी "दादा" भोवती

Image
राहुरीची आमदारकी ‘दादा’भोवती फिरतेय घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट |  @शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा मतदारसंघाची संभाव्य पोटनिवडणूक सध्या विविध ‘दादा’ नावांभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. डाॅ सुजय दादा विखे-पाटील, प्राजक्त दादा तनपुरे, अक्षय दादा कर्डीले , हर्ष दादातनपुरे, सत्यजित दादा, या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका कोणता ‘दादा’ आमदार होणार, हे मात्र काळच ठरवेल. नगरपालिकेच्या निवडणुकीतील गुलाल अजून रस्त्यावरून पुसला गेलेला नसतानाच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपकडून अक्षय दादा कर्डीले यांना उमेदवारी दिली जाणार की माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील किंवा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांना संधी मिळणार, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याचा पूर्वीचा इतिहास...

श्रीरामपूरात काॅगेसाचा हात बळकट

Image
श्रीरामपूरात काँग्रेसचा हात बळकट घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे श्रीरामपूर नगरपालिकेत दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक करण ससाणे हे जनतेतून निवडून येत नगराध्यक्ष झाले आहेत. ते ससाणे कुटुंबातील तीसरे नगराध्यक्ष झाल्याने येथे नगराध्यक्ष पदाची हॅटट्रीक त्यांच्या रुपाने साधली गेली आहे.  करण ससाणे यांना २४,७२४ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे श्रीनिवास बिहाणी यांना १७,९५७ मते, तर शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांना ८,०८६ मते मिळाली. एकूण ९ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावले होते. करण ससाणे यांनी ६,०६७ मतांच्या आघाडीने विजय संपादन केला. भाजप व शिवसेना शिंदे गट वेगवेगळे लढल्याचा फायदा ससाणे यांना झाला. सत्ताधारी पक्ष आपसातील संघर्षात अडकले असताना करण ससाणे यांनी रणनीतीने भाजपच्या ‘कमळा’ला धक्का देत बिहाणी यांचा राजकारणातील श्रीगणेशा रोखण्यात यश मिळवले. निवडणूक काळात काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांच्या अपहरणाचा व जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीरामपूर रेल्वेच्या पलीकडील परि...

देवळाली प्रवरात भाजपाचे कमळ पुन्हा सत्येची जित !

Image
देवळाली प्रवरात दुसऱ्यांदा कमळाची कमाल भाजपाचा सत्ता विजय; सत्यजित कदम पुन्हा नगराध्यक्ष देवळाली प्रवरा | घाडगे न्यूज  @ शिवाजी घाडगे देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपाने पुन्हा एकदा आपली निष्ठा सिद्ध केली आहे. मतदारांनी कदम कुटुंबाच्या भाजप निष्ठेला साथ देत काँग्रेसच्या ‘हाताला’ नकार दिला आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत सत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यानंतर देवळालीकरांना एक विश्वासार्ह व आश्वासक नेतृत्व मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपाच्या ‘कमळा’ला . नगराध्यक्ष पदा करीता  सत्यजित कदम यांना १० हजार ४१४ मते मिळाली असून त्यांनी विरोधी उमेदवाराचा ५ हजार ६९० मतांनी पराभव केला, हे विशेष उल्लेखनीय ठरते. भाजपाच्या नगरसेवकाच्या 15 जागा आल्या असून काॅगेस 4 वंचित 1,शिवसेना 1 असे 6 विरोधी नगरसेवक निवडून दिले आहेत.  केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर सत्ता असतानाही वेळप्रसंगी कोणतीही तमा न बाळगता मदतीला धावून येणारा नेता म्हणून मतदारांनी सत्यजित कदम यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची संधी दिली आहे. ...

नगराध्यक्ष खुर्चीवर कोण

Image
नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार  चर्चा @शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा शहराचा नगराध्यक्ष कोण होणार, याचा निकाल आज दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. प्रशासनाने निकाल जाहीर करण्याची सर्व तयारी पूर्ण केली असून,  निवडणुक पुढे ढकलण्यात आल्यामुळे  निकालाची  उत्सुकता शिगेला पोहचली  देवळाली प्रवरा येथे भाजपाचे सत्यजित कदम आणि काँग्रेसचे कृष्णा मुसमाडे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी थेट लढत दिसून आली  येथे पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘हात’ बाजी मारणार,हे आता काही तासात उघड होईल दरम्यान, राहुरीतही  नगराध्यक्षपदा करीता विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे आणि भाजपाचे सुनील पवार यांच्यात लढत आहे. येथे ‘कमळाला छत्रीच्या काड्यांचा सामना करावा लागणार का?’ अशी चर्चा रंगली आहे. आता अवघ्या काही तासांत देवळाली प्रवरा आणि राहुरी या दोन्ही शहरांना नवे नगराध्यक्ष कोण मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

नगरचे जिल्हाधिकारी कार्यालयात बाॅम्ब.... ठेवलाय

Image
नगर जिल्हाधिकारी कार्यालयाल बाॅम्ब  ठेवलाय    नगर।प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला गुरुवारी सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटने उडवून देण्याच्या धमकी  ईमेल व्दारे आली  आणि सारे वातावरण गंभीर झाले  मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे. असे असले तरी नेमके कशा मुळे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय बाँबस्फोट घडवून उडवून देण्याचा मेल करण्या मागचा हेतू काय कारण जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस गढुळ होत चालले असून प्रशासनाने देखील आता जागृत व्हायला हवे.  कदाचित आज स्पोट झाला नाही मात्र अशी धमकी देण्याचे धाडस तरी ईमेल करणाराने का केला नेमक झाल काय    जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व‌ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला.  बॉम्ब शोधक पथकातील 'लु...

बेशिस्त डम्पर मुळे आपघात वाढ

Image
राहुरी फॅक्टरी–कणगर रस्त्यावर खडी डम्परमुळे अपघात वाढले राहुरी।प्रतिनिधी  नगर–मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी चौक सध्या अपघातप्रवण मार्ग बनला आहे. मात्र, या गंभीर समस्येबाबत कोणीही बोलायला तयार नाही. बेशिस्त वाहतुकीला शिस्त कोण लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना हप्त्या पोटी रस्त्यावर लोक तडफडून मरत आहेत. बेशरम प्रशासनाला मात्र याचे काहीच सोयरसुतक नाही. सध्या कणगर खडी क्रशरवरून भरगच्च खडी भरलेले डम्पर भरधाव वेगात बेसुमार धावत असून, राहुरी फॅक्टरी चौक व ताराबाद चौफुली परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. डम्पर चालकांसाठी काही नियम आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभाग, आरटीओ व पोलीस प्रशासन सगळेच जणू मूग गिळून गप्प आहेत. लोक मरत असताना प्रशासन झोपेचे सोंग घेऊन सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. या रस्त्यावर शाळेच्या बसेस, स्थानिक वाहने, अतिक्रमण यामुळे आधीच वाहतूक कोंडी होते. त्यात निवडणुकीचे बॅनर्स परिस्थिती अधिकच अडचणीची करत आहेत. डम्पर चालकांना पायी चालणारे प्रवासी दिसत नाहीत काय? नियमाप्रमाणे किमान वेगमर्यादा पाळणे व डम्परला...

देवळाली प्रवरात कोणाचा झेंडा

Image
देवळाली प्रवरात नगरपालिकेवर कोणाचा झेंडा? घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडियावरील प्रचार, बॅनर्स, चौकसभा यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक नियोजित वेळेत झाली असती तर चित्र वेगळे असले असते; मात्र मुदतवाढीनंतर ही लढत अधिकच उत्कंठावर्धक बनली आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता तिरंगी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना रंगणार आहे. भाजपाकडून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, काँग्रेसकडून शहराध्यक्ष व तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, तर शिवसेना (शिंदे) गटाकडून उद्योजक बाबासाहेब मुसमाडे हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय बहुजन वंचित समाज पक्षाचे ॲड. प्रसाद सांगळे यांनीही स्वतंत्र ताकद उभी केली आहे. या निवडणुकीत कमळ, पंजा, धनुष्यबाण आणि गॅस टाकी या चिन्हांमध्ये लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादी का...

भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्या-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Image
भाविकांच्या सुरक्षितेची काळजी घ्या   - मुख्य सचिव राजेश अग्रवाल शिर्डी/राहुरी - प्रतिनिधी   नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ‘शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक आहे.भाविकांची सुरक्षा, आरोग्य व वाहतूक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देत या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मंगळवारी दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे आयोजित बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल बोलत होते. या बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सादरीकरणाद्वारे तयारीचा सवि...

जीवन एक खेल है सय्यम जरुरी-सचिव हर्ष तनपुरे

Image
जीवन एक खेल है, संयम जरूरी है – सचिव हर्षदादा तनपुरे राहुरी।संवादाता  संयम जीवन का अत्यंत महत्वपूर्ण गुण है जीवन की यात्रा एक खेल की तरह ही होती है, और इसमें जीत हासिल करने के लिए भी संयम की आवश्यकता होती है, ऐसा प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडल के सचिव हर्षदादा तनपुरे ने किया वे संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय एवं जूनियर कॉलेज के क्रीड़ांगण विकास कार्य के भूमिपूजन समारोह में बोल रहे थे सचिव हर्षदादा तनपुरे ने कहा कि नेत्रहीन छात्राओं द्वारा प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम ने दृष्टिवान और सक्षम लोगों को भी लज्जित कर दिया उन्हें न दिखाई देता है, न सुनाई देता है, फिर भी वे संयम के साथ जीवन का खेल सफलतापूर्वक खेलते हैं इसके लिए उनके शिक्षकों को भी अत्यंत परिश्रम करना पड़ता है—हाथों के संकेतों या स्पर्श के माध्यम से ज्ञान देना पड़ता है नेत्रहीन एवं दिव्यांग विद्यार्थियों को कितनी पीड़ा सहनी पड़ती है, इसके बावजूद वे आत्मविश्वास के साथ बिना डरे मंच पर अपनी कला प्रस्तुत करते हैं जब वे ऐसा कर सकते हैं, तो हम पूर्णतः सक्षम होते हुए भी पीछे क्यों रहें? प्रत्येक विद्यार्थी...

गुणवंता व मानाकण विद्यापीठाला महत्वाचे-कुलगुरु डॉ. विलास खर्चे

Image
गुणवत्ता आणि मानकीकरण हेच कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ- कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी।प्रतिनिधी   विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील मानकांचे शिक्षण मिळावे औद्योगिक मानके आणि गुणवत्ता नियंत्रणाविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'भारतीय मानक ब्यूरो' (BIS) विद्यार्थी शाखेचे योगदान नक्कीच मोठे आहे. हे पाऊल कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गुणवत्ता आणि मानकीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी  व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या विद्यार्थी शाखेच्या ( स्टुडन्ट चाप्टर) उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते.          याप्रस...

नगर पालिका पुढे ढकल्या कोणाला तोटा कोणाचा फायदा यांचा न्याय मतदारांच्या कोर्टात

Image
निवडणूक पुढे ढकलण्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला  न्याय  मतदारांच्या कोर्टात  घाडगे न्यूज कुजबुज -शिवाजी घाडगे       राज्यातील काही नगर पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या मात्र याचा फायदा कोणाला व तोटा कोणाला याचा न्याय आता मतदार करणार आहेत  होत्या आता 20नोव्हेबर मतदान होत असून या निवडणुकात उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननीत अन्याय झाल्याने उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली जेथे नगराध्यक्ष उमेदवारी पदा साठी हरकत होती अथवा नगसेवक पदा अर्ज बाद ठरवण्यात आले म्हणून नामनिर्देशन कर्ते न्यायालयात गेले होते आपल्या न्याय हक्का साठी न्यायालयात जाने गैर ही नाही   न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले  यांना वेळ कमी मिळाला जेथे निवडणूक पुढे गेल्या तेथे शांतता पसरली तापलेला प्रचार थंड झाला सारे काही शांत आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि येथे केवळ उमेदवार  नामनिर्देशनपत्र मागे घेवु शकत होता नविन भरता येत नव्हते म्हणजे निवडणूक अर्ज माघर घेण्या साठी पुढे ढकल्या होत्या ? असा प्रश्न निर्माण होतो का तर पुन्हा उच्च न्याया...

सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोखंडे यांचे दुःख निधन

Image
 अण्णा गेले..... शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश मुरलीधर लोखंडे  वय 62 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन  सुरेश लोखडे हे अण्णा नावाने प्रसिद्ध होते सामाजिक ,सांस्कृतिक, धार्मिक   कार्यात नेहमी आघाडीवर होते  देवळाली प्रवरा नगर पालिका स्थापने पासून ते निवडुक साठी उभे राहयचे मात्र त्यांना पराभावला सामोर्य जावे लागले  यावेळेस त्यांचे बंधु राजेंद्र उर्फ बाळु हे भाजपा कडुन निवडणूक लढवत असून निवडुक पुढे ढकली गेल्याने ते ही निवडणूक निकाल पाहु शकले नाहीत.  त्यांची राजकीय सुरुवात शिवसेना पासून झाली नंतर विकास मंडळ, काॅगेस,अपक्ष अशी निवडुक लढवली प्रतेक निवडुक मध्ये ते  उमेदवारी करत सहभागी असायचे मात्र अपयशाला सामोर्य जावे लागले  या वेळी ते निवडुक लढले नाहीत  अशी पहीच निवडुक ठरली असली तरी त्यांचे बंधु निवडुक लढवत आहेत.   पंचवीस वर्षां पुर्वी दिवंगत संजय म्हसे खुन व सुरेश लोखंडे यांच्या वर  राहुरी रेल्वे स्टेशनवर झालेल्या खुनी हल्यात  संजय म्हसे यांचा मृत्यू झाला यात मुख्य सा...

गावरान गाय नैसर्गिक शेतीचा पाया कुलगुरु डॉ विलास खर्चे

Image
गावरान नैसर्गिक शेतीचा पाया; देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार   -  कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज |प्रतिनिधी  कुलगुरू  डॉ. विलास खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. यावेळेस त्यांनी संशोधन केंद्राने जोपासलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या देशी दुधाळ गोवंशांची व खिलार, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ, कोकण कपिला, डांगी आणि पुंगनूर या देशी गोवंशांची पाहणी केली. संशोधन केंद्रातील सर्व गोठे, दूध उत्पादन व प्रक्रिया युनिट, बायोगॅस सयंत्र, सौर ऊर्जा युनिट, शेण व गोमूत्र प्रक्रिया युनिट, पशुधनाकरता आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक औषधींची धन्वंतरी बाग, गो परीक्रमा, वातावरण नियंत्रित गोठा तसेच संशोधन केंद्राने विकसित केलेले एकात्मिक गोपालन मॉडेल या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली. केंद्राद्वारे राबविल्या जात असलेल्या विविध संशोधन कार्यक्रमांची व प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी देशी गाय संशोधन ...