Posts

Showing posts with the label कृषी शिवार

शेतात राबविण्यात महिला अग्रगण्य कृषी मंत्री दत्ता भरणे

Image
शेतीच्या कामात महिलाचा सहभाग अग्रण्य   कृषि मंत्री दत्तात्रय भरणे घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे संशोधनाचे काम उत्तम असून. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम  दीपस्तंभासारखे आहे.  शेतीतात राबणारा मध्ये महिला भगिनी अग्रगण्य आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषि विभागांतर्गत आपण 50 हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबवत आहोत. शेतकर्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरो घरी, समृद्धी येईल गावो गा...