Posts

Showing posts with the label विनाकारण वस्तु घेवु नका

संकट दारासमोर उभे उधळपट्टी थांबणार कधी

Image
संकट दारासमोर उभे उधळपट्टी थांबणार कधी  तरंग।शिवाजी घाडगे  देश संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना आपण मात्र अजूनही दिखावा, उधळपट्टी आणि राजकारणाच्या नशेत बुडालेलो आहोत. जगात युद्ध पेटले आहे, अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था हादरत आहे, इंधन आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे; पण आपल्या समाजाला अजूनही याचे गांभीर्य कळताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणाऱ्या मानसिकतेमुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालली आहे. आज वेळ आहे एकात्मतेची, संयमाची आणि जबाबदारीची. पण आपण काय करत आहोत? सोशल मीडियावर वाद, राजकीय टोळ्यांची बाजू घेणे, आणि वास्तवापासून पळ काढणे. देश अडचणीत असताना नागरिक म्हणून आपली भूमिका काय, याचा विचार करण्यास कोणी तयार नाही. भारत हा जगातील सर्वात मोठ्या ग्राहक बाजारपेठांपैकी एक देश आहे. अनेक राष्ट्रे आपल्याकडे ग्राहक म्हणून पाहतात, कारण आपण प्रचंड प्रमाणात खरेदी करतो. पण कटू सत्य असे की पेट्रोल, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आपण परदेशांवर अवलंबून आहोत. म्हणजे दुसऱ्या देशात युद्ध झाले, तर त्याची आग आपल्या घरच्या स्वय...