Posts

Showing posts with the label तहसीलदार/गटविकास अधिकरी

गावात स्मशानभूमी साठी जागा नाही मग करा अर्ज

Image
गावात स्मशानभुमीची जागा नाही मग करा अर्ज नगर  जिल्हयातील ब-याच गावांना तेथील ग्रामस्थांच्या उपयोगासाठी दहनभूमी, दफनभूमी ही किमान सुविधा उपलब्ध झालेली नसल्याचे तर पुष्कळ ठिकाणी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेली नसल्याने तेथील ग्रामस्थांना अत्यंत गैरसोय सहन करावी लागत आहे. अहमदनगर जिल्हयातील ज्या गावांमध्ये दहनभूमी, दफनभुमीची सोय उपलब्ध नाही, त्या गावातील ग्रामस्थांनी संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी अथवा तहसिलदार यांच्याकडे स्मशानभूमीसाठी सोयीची शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी  केले आहे.