नगरच्या साखर लाॅबीवर "देवाभाऊ" ची गोड कृप्रा !
नगर जिल्ह्यातील साखर लॉबीवर ‘देवाभाऊं’ची गोड कृपा? राजरंग।शिवाजी घाडगे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील साखर लॉबी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी काही राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी पूर्वी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे तथाकथित ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात यांचे नाव चर्चेत आले होते. अशोक खरात यांच्याशी संबंधित काही कथित फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर त्यांच्या तथाकथित बुवाबाजीच्या साम्राज्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले गेले. यानंतर एसआयटी चौकशीसह विविध घटनांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. दर...