Posts

Showing posts with the label कृषी दिन गावात

दिवंगत माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक कृषी विद्यापीठ चे जनक डाॅ गोरक्ष ससाणे

Image
दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे व कृषि विद्यापीठांचे शिल्पकार - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे राज्याच्या हरितक्रांतीचे जनक असून त्यांच्या कार्यकाळातच राज्यातील चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. त्यांचे कृषि क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन आपण कृषि दिन म्हणुन साजरा करत आहोत. कै. वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे व कृषि विद्यापीठांचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्प व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिनाचे औचित्य साधुन भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम गावातील शेतकर्यांबरोबर सुसंवाद व प्रक्षेत्र भेटी कार्यक्रमाचे तांभेरे  येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प...