Posts

Showing posts with the label नागरिकांच्या डोळ्यात पाणी

देवळाली प्रवरा पाणी दर वाढ रद्द करा-नगसेविका पल्लवी ढुस

Image
पाणीपट्टी दर वाढ निर्णय रद्द करा  - नगरसेविका पल्लवी वैभव ढूस  देवळाली प्रवरा ।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा शहरातील  नागरिकांना विश्वासात न घेता १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये पाणीपट्टी वाढविण्याचा देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घेतलेला निर्णयाने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले असून ही जाचक पाणी पट्टी दर वाढ नागरिकांना विश्वासात न घेऊन केली असून ती    करा अन्यथा ०६ मार्च २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार हेमंतजी ओगले यांना २५ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.    पल्लवी ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही त्यांच्या आर्थिक क्षमतेशी सुसंगत्व व्यवहार्य असणे आवश्यक आहे.  तथापि, देवळाली प्रवरा नगरप...