Posts

Showing posts with the label कृषी परिषद

नैसर्गिक शेतीचे उत्पादन वाढवुन पिढी सदृढ करा राज्यपाल आचार्य देवव्रत

Image
नैसर्गिक शेतीतुन  उत्पादकता वाढून पिढी सुदृढ करा  - राज्यपाल  आचार्य देवव्रत घाडगे न्यूज- प्रतिनिधी  हरित क्रांतीच्या आधी आपल्या देशातील जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2 च्या वर होता आता तो 0.5 च्या खाली झाला आहे. याचे कारण म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके आणि तन नाशकांचा वापर. यामुळे शेती खर्चिक झाली असून जमीन हळूहळू नापीक होत आहे. रासायनिक औषधे वापरून उत्पादित फळे,भाज्या व धान्यांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर सारखे आजार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे व माणसांचे आरोग्य ढासळत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमीन उत्पादक होत असून, सकस उत्पादन मिळून पुढची पिढी सुदृढ होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले. राजभवनाअंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथे राज्यपाल  आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक शेती परिषद संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कृषि मंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे व कृषिचे अतिरिक्त मुख्य सचिव  विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते. याप्रसं...