Posts

Showing posts with the label बैठकीत निर्णय

राहुरीत एकल महिला व बालकांच्या योजना प्रभावी राबविणार

Image
राहुरीत एकल महिला व एकल बालकांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय; विविध योजनांच्या प्रभावी राबविणार  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीची महत्त्वपूर्ण सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. यात तालुक्यातील एकल महिला आणि एकल बालकांच्या विविध समस्या, त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच त्यांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले तसेच 'साऊ' एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस उपस्थित होते. सभेत तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या महिलांची अचूक ...

भंडारदरा धरणातून शेतीचे चार आर्वतने सोडणार

Image
भंडारदरातून शेतीचे चार आवर्तने सोडण्यात येणार - भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात संपन्न झाली.‌ याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ किरण लहामटे आमदार अमोल खताळ आ.हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे,  निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते. भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्यातून सध्या सिंचन बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. येणाऱ्या  काळात २० फेब्रुवारी ते २४ मार्चमध्ये पुढचे आवर्तन करण्याचे नियोजन असून,२४ मार्च ते ३० एप्रिल मध्ये दुसरे आवर्तन आणि शिल्लक पाण्यातून जून...