बेशिस्त वाहनांवर पोलीसांकडून कारवाई
बेशिस्त वाहनांवर कारवाई
नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांवर शुक्रवारी राहुरी पोलिसांनी कडक कारवाई केली. या कारवाईत चुकीच्या दिशेने धावणाऱ्या ४ बससह इतर २८ अशी एकूण ३२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वाहनचालकांकडून एकूण २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच संबंधित चालकांना भविष्यात नियमांचे पालन करण्याची तंबी देण्यात आली.
नगर–मनमाड राज्य मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनचालकांविरोधात ही मोहीम राबविण्यात आली.
पोलीस रस्त्यावर तैनात असल्याने वाहनांच्या वेगावरही आपोआप नियंत्रण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राज्य मार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, अनेकांना पाठी व मानेच्या दुखण्याचा त्रासही जाणवत आहे.
Comments
Post a Comment