Posts

अवकाळी पाऊसाने नुकसान भरपाई शिवसेना शिष्टमंडळ प्रांताना भेटले

Image
अवकाळी अवकाळी पाऊसाने झालेल्या नुसकानीचे पंचनामे न झाल्याने देवळाली मंडळातील शेतकरी नुकसान भरपाई पासुनवंचीत. नुकसान भरपाई मिळावी म्हणुन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळाने घेतली श्रीरामपुर प्रांताधिकाऱ्यांना भेटले            देवळाली प्रवरासह ३२ गावांत गेल्या वर्षी सततचा पाऊस न् अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले.त्याची भरपाई अद्याप मिळाली नाही.तोच या वर्षी अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले.गेल्यावर्षीची नुकसान भरपाई देवुन या वर्षीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे म्हणुन शिवसेना(उध्दव  बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळाने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपुर प्रांताधिकारी श्री किरण सावंत यांना भेटुन मागण्याचे निवेदन दिले.        गेल्या वर्षी देवळाली मंडळ व ३२ गावांत सततचा पाऊस झाला.त्याचे पंचनामे प्रशासनाने केले.त्याचा नुकसान भरपाईचा अहवाल शासनांस दिला.ती भरपाई मिळण्याचा निर्णय झाला नाही तोच पुन्हा अतिवृष्टी झाली.तिचे पंचनामे करण्याचे आदेश आले.परंतु यापुर्वीच सततच...

नगर जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास-ना विखे

Image
जिल्ह्याचा विकास ना विखे-पाटील जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुन जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील   जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुन जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार असून शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतीने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी  श्विखे पाटील बोलत होते.  या समारंभात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,  जिल्हयातील स्वांतत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे विभा...

महात्मा फुले विद्यापीठात महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात 63 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा महात्मा फुले कृषि विद्यापीठाची सर्व क्षेत्रात दमदार वाटचाल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असंख्य लोकांच्या आंदोलनातून, प्रचंड खडतर प्रयत्नांमधून व 107 लोकांच्या बलिदानातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आपना सर्वांना त्या शहिदांविषयी, महाराष्ट्राविषयी अभिमान असला पाहिजे. त्याचबरोबर देशाच्या विकासात कामगारांचाही सहभाग फार मोठा आहे म्हणुन आजचा दिवस कामगार दिवस म्हणुनही साजरा केला जातो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. शेतकर्यांसाठी शिफारशीबरोबरच प्रत्यक पिकांचे नवनविन वाण तसेच शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. कास्ट प्रकल्प, सेंद्रिय शेती, देशी गाय प्रकल्प यासह अनेक प्रकल्पांसाठी शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे. विस्तार कार्य प्रभावी होण्यासाठी विद्यापीठ लवकरच कम्युनिटी रेडिओ सुरु करीत असून त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन प्रभावी पध्दतीने शेतकर्यांपर्यंत पोहचणार आहे...

विभागीय संचालक विनीत नारायण

Image
विभागिय संचालक नारायण साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्थांनी आर्थिक क्रांती घडवून पतसंस्था चळवळीमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. शिवाजी कपाळे यांनी इतर संस्थांना मार्गदर्शन करत असताना  पतसंस्था चळवळीला व सहकाराला योग्य दिशा देण्याचे काम केले असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महाराष्ट्र व गोवाचे विभागीय संचालक विनीत नारायण यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महाराष्ट्र व गोवाचे विभागीय संचालक  विनीत नारायण यांनी साई आदर्श मल्टीस्टेट मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली या प्रसंगी त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदर्श पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, योग प्रशीक्षक किशोर थोरात, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन ,हैदराबादचे नकुल सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी सुरुवातीला शिवाजी कपाळे यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, अगदी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने 150 कोटी ठेवींचा पल्ला पार केला आहे. अर्थकारणातच नव्हे तर समाजकारणातील संस्था अग्रेसर...

अवकाळी पाऊस उन्हाळ्यात

Image
काय राव उन्हाळ्यात पाऊस  बाजार समितीच्या निवडणुकीत कोणात फाईट !! अवकाळी पावसाने कहर केला असून सोबत सोसाट्याचा वारा देखील आहे आधीच शेती मालाला भाव नाहीत व त्यात निर्सगाचा कोप  होत असलेल्या बाजार समितीच्या मतदानावर याचा परिणाम होणार असून हा अवकाळी कोणाला फायदेशीर ठरणार हे आज सायंकाळी स्षष्ट होईल 

कुलगुरु डॉ पी जी पाटील होणार कर्नल

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठचे  कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होणार कर्नल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानद कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. मंगळवारी  2 मे, 2023 रोजी विद्यापीठात होणार्या दिमाखदार सोहळ्यात अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल वाय.पी. खांदुरी यांच्या हस्ते कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना बॅटन, सन्मानपत्र व कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी औरंगाबाद येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर यु.के. ओझा, अहमदनगर कॅन्टॉमेन्ट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, अहमदनगर 17 महाराष्ट्रीयन बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन गुरबॅक्स, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव प्रमोद लहाळे,  नियंत्रक विजय पाटील, लेफ्ट. सुनिल फुलसावंगे उपस्थित असणार आहेत. या कृषि विद्यापीठातील हे पाचवे कुलगुरु आहेत ज्यांना कर्नलप...

विद्यापीठ डिजिटल तंत्रज्ञान-कुलगुरू डॉ पी जी पाटील

Image
डिजिटल तंत्रज्ञान विद्यापीठ विकसीत डिजीटल तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्वावर प्रसार होणे गरजेचे - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पांतर्गत विविध हवामान अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. यामध्ये स्वयंचलीत हवामान केंद्र, आय.ओ.टी. तंत्रज्ञान, आटो.पी.आय. तंत्रज्ञान,  कृत्रिम बुध्दिमत्ता, रोबोटीक्स तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान व्यापारी तत्वावर विकसीत होऊन शेतकर्यापर्यंत पोहचण्यासाठी नविन उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपनी यांची आवश्यकता आहे. विद्यापीठ हे तंत्रज्ञान देण्यास तयार आहे. परदेशात औद्योगीक क्षेत्राच्या मागणीनुसार संशोधन केले जाते. त्याच धर्तीवर या विद्यापीठात संशोधन हाती घेण्यात येणार आहे. यासाठी भारत सब कॉन्टीनंट अॅग्री फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यामुळे नविन तंत्रज्ञान व्यापारी तत्वावर प्रसार होण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा शेतकरी व कृषि क्षेत्रातील उद्योजकांना होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ...